थ्रेड🌷👇
राजकारणातल्या काही डागाळलेल्या माणसांनी हे क्षेत्रच बदनाम करून टाकलं, पण या दलदलीतही समाज, समर्पण आणि सेवा याला समोर ठेऊन काम करणाऱ्या माणसांची कमी नाही. ही माणसं प्रसिद्धीच्या झोतात कमी आली असतील पण यांनी कामात कसर ठेवली नाही. जिल्ह्यातल्या, राज्यातल्या मीडियाने यांना+
हिरो नसेल केलं पण मतदारसंघातल्या माणसांसाठी हेच खरे हिरो आहेत, कारण संकटात धावून आलेल्या माणसांना चिखलामातीत राबणारी माणसं कधीच विसरत नसतात. हे आहेत अक्कलकोट तालुक्याचे युवा आणि तडफदार आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी!
सचिन दादांनी, आपल्या अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी कोरोनाच्या+
काळात आपल्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या सहयोगातून अवघ्या 15 दिवसात ऑक्सिजनयुक्त 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभा केलंय. त्यामध्ये 10 बेडला हे बायपॅपचीही व्यवस्था केली आहे. एवढेच नाही तर तालुक्यातल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी आणि कोरोनातुन मुक्त करण्यासाठी अजून 100 बेडची तयारी+
असल्याचं सचिन दादा सांगतात. ही गोष्ट सहज साधी नाही, जिल्ह्यातलं सर्वात मोठं रुग्णालय आहे हे. सचिन दादा भारतीय जनता पार्टीचे युवा आमदार आहेत. मी सहज एका कार्यकर्त्यांसोबत बोलत असताना त्यांनी मला तिथं सचिन दादांनी केलेल्या या स्तुत्य कामाची माहिती दिली.
जानेवारी - फेब्रुवारी 2017+
च्या दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेच्या इलेक्शन सुरू व्हायच्या होत्या, तत्कालीन सहकारमंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या आढावा दौरा सुरू होता,सोबत तत्कालीन जिल्हाध्यक्ष शहाजी भाऊ पवार होते, अक्कलकोट तालुक्यात प्रवास आणि बैठका सुरू असताना सचिन दादांच्या कामाचा अनुभव येत होता, अत्यंत+
हुशार, नम्र आणि मितभाषी असलेले दादा लोकांना सहज भेटायचे, बोलायचे, अडचणी समजून घ्यायचे अन खांद्यावर हात ठेवून काम पूर्णही करायचे.
अक्कलकोटच्या एका दुर्लक्षित बाजूला खडकाळ वाट काढत टेकडीवर गेल्यावर तिथे एका बैठकीत त्या परिसरात वीजच आली नसल्याचं सांगितलं, तेव्हा दादांनी तातडीने+
दखल घेत लवकर काम मार्गी लावलं होतं, पाण्याचा प्रकल्प लवकर मार्गी लागत नव्हता म्हणून थेट त्या प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन कामाची अडचण समजून घेणारा हा माणूस!
राजकारण होत राहील पण सामाजिक भावना जागृत ठेवणारी माणसं राजकारणात बोटावर मोजण्याइतकीच असतात. अक्कलकोट तालुक्यात गेल्या अनेक+
वर्षांपासून आमदार सचिन दादांच्या स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात शेकडो वधू वरांचे विवाह मोफत लावली जातात, स्वामी विवेकानंद मल्टिस्टेट आणि पतसंस्थांच्या माध्यमातून होतकरू तरुणांना कर्ज उपलब्ध करून देत उद्योग विश्वातही एक वेगळा आयाम+
उभा केला आहे. अक्कलकोट शिवारात जलसंधारणाच्या माध्यमातून सचिन दादांनी केलेली कामं ही समृद्ध आणि पाणीदार अक्कलकोटची साक्ष देत राहतात. 2018 साली योगगुरू रामदेव बाबांच्या उपस्थितीत हजारो नागरीकांना एकत्र करत तीन दिवसीय चिकित्सा आणि योग शिबीर हा अभूतपूर्व सोहळा होता. या+
व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यासाठी अनेक कामं सांगता येतील.
शिक्षण, सहकार, सेवा, उद्योग अशा अनेक क्षेत्रात सचिन दादा निरपेक्षपणे कार्यरत आहेत. आता कोरोनाच्या काळात गेल्या वर्षी 2000 नागरिकांना रोज दोनवेळचे मोफत भोजन पुरवणारा हा आमदार पडद्यावर कधी स्टार बनून आला नाही, भाजपाचा+
विचार, संघ परिवाराचे संस्कार आणि काम करण्याची तळमळ यातून अखंड सेवा कार्य सुरू असतं. सॅनिटायझर, मास्क वाटपही नित्याने सुरू आहे. एका गावचे सरपंच असलेले सचिन दादा कल्याणशेट्टी दिग्गज प्रस्थापितांना अलगद बाजूला सारून अक्कलकोटसारख्या पुण्यवंत तीर्थक्षेत्र नगरीचे आमदार कसे होतात+
याच्यामागे सेवेचा असलेला हा आलेख आहे.
कोरोनाच्या काळात अव्याहतपणे सुरू असलेलं काम पाहिल्यांनंतर त्यांच्या याही कार्याचं पुन्हा कौतुक वाटतं, भेटायला सहज, साधा असलेला माणूस तरुण आमदार आणि कामदार आमदार आहे हेच सिद्ध करतो. हेच काम आणि कर्तृत्व भाजपाच्या पेचात तुरा रोवणारं आहे.
सचिन+
दादा, तुमच्या कार्याला खूप शुभेच्छा!💐🌷🌺
- विकास विठोबा वाघमारे
मोहोळ, जि. सोलापूर
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अनाथांचा नाथ!🧡🌺
तुमची राजकारणातली खुर्ची ही दगाफटका करून काढून घेतली जाऊ शकते, पण तुमचं राजकारणातलं अढळ स्थान कोणीही काढून घेऊ शकत नाही, तुमचं नेतृत्व, कर्तृत्व आणि हृदयाची विशालता काढून घ्यायला समोरच्याला तेवढं "मोठं" व्हावं लागतं. अन त्यासाठी त्यांच्याकडे तेवढं समर्पण, त्याग+
आणि अंत्योदयासाठी काम करण्याची तळमळ असावी लागते. आज देवेंद्रजींनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या १०० मुलांचं संपूर्ण पालकत्व स्वीकारलं! सिद्धिविनायक सेवा ट्रस्टकडे नोंदणी केलेली ही मुलं होती.
अनाथ मुलांना आज परत एकदा देवेंद्रजींच्या रूपाने आधार मिळाला! एवढंच नाही तर दक्षिण - पश्चिम+
नागपूर विधानसभेत अजून जेवढी अनाथ मुलांची नोंदणी होईल तीही स्वीकारण्याची तयारी देवेंद्रजींनी ठेवली आहे. ज्यांच्या नावातच "देव" आहे, तो अनाथांचा नाथ झालाय.☺️
राजकारणाच्या चिखलफेकीतही काळीज असलेली अशी लाखमोलाची माणसं पाहिली की अभिमान वाटतो. आणि ही माणसं आपले नेते आहेत याने तर अजून+
पंढरीच्या कौलाचे गुपित..🌷👇
पंढरपूर - मंगळवेढ्याच्या संतभूमीत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले अन सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. हा विषय खरंच राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा आहे, याची अनुभूती लवकरच दिसेल. मात्र हा निकाल घोषित झाल्यानंतर महाआघाडीच्या काही महत्वाच्या नेत्यांच्या+
चुकीच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मात्र मला स्वस्थ बसवेना..
मंगळवेढा आणि पंढरपूर ही संतांची भूमी आहे, कर कटेवरी ठेऊन उभा असलेला विठूमाऊली अन मंगळवेढ्यावर दृष्टी ठेऊन असलेले दामाजीपंत! सोबतीला ज्ञानोबा, तुकोबाराय, मुक्ताई, जनाई, नामदेव आणि अशा अनेक महान संतांचे अधिष्ठान या भूमीत+
आहे. या महान भूमीतल्या निवडणूकीत यंदा भाजपाचाच पठ्ठा विजय करायचा हा खुद्द पांडुरंग परिवाराचाच निश्चय! त्याप्रमाणे विजय झालाही!
पण या विजयामागे असलेलं एक गुपित म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, ती लोकांना माहिती नाही. आघाडीच्या नेत्यांना कळेना की सगळं काही ठीक असताना आपण निवडणूक हरली+
अत्यंत महत्वाचा थ्रेड👇
राज्यातल्या कोरोनाग्रस्त लाखो सामान्य रुग्णांना दिलासा देणाऱ्या एका याचिकेची नुकतीच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी ही याचिका दाखल केली होती, त्यांचा आक्षेप असा होता+
की, शासनाने 23 मे 2020 रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ केवळ व्हेंटिलेटरवरील गंभीर कोविड रुग्णांनाच देण्यात येतो, तो कोविडच्या सर्व रुग्णांना त्या योजनेंतर्गत लाभ देण्याची मागणी केली होती. दरम्यान या याचिकेवर सुनावणी सुरू असताना+
न्यायालयाने सरकारची भूमिका विचारली त्यावेळी या आघाडी सरकारने न्यायालयात शपथपत्रासह सांगितले की, व्हेंटिलेटरवरील 8 उपचारासहित 20 अन्य उपचार कोविड रुग्णांना महात्मा फुले योजनेत मोफत देण्यात येईल.
मात्र वस्तुस्थिती अशी होती की, सरकार केवळ घोषणा करून कागदी घोडे नाचवत आहे, वास्तविकता+
महत्वाचा थ्रेड👇🌷
राज्य सरकार नेमकं मोफत काय देणार! आणि फुकटच्या क्रेडिटसाठी राज्य नेमकं कितीवेळा तोंडचलाखी करणार हे सांगणं तसं अवघड आहे. आयजीच्या जीवावर बायजी उधार म्हणजे काय खाली सांगतो बघा! उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री म्हणून तर सपशेल अपयशी आहेतच, पण माणूस म्हणूनही ते त्या+
पात्रतेत बसत नाहीत, कारण या मरणासन्न काळात सर्वात जास्त राजकारण आणि द्वेष जर कुणी केला असेल तर उद्धव ठाकरे यांनीच केलाय.
काल मीडियाच्या माध्यमातून अजून एक दलाली करण्याचा प्रयत्न केला आणि राज्यातल्या लोकांना एक मेसेज पोहचवण्याचा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे सरकारने केला की,+
"केंद्र सरकार विकत लस देत आहे, आणि राज्य सरकार आपल्या पैशातून सर्व नागरिकांना मोफत लस देत आहे." मग सगळे पाळलेले दलाल आणि गुलाम वाहवा करायला लागले. पण तुम्हाला मी सत्यता सांगतो. सोबतच गुलामांच्या आणि राज्य सरकारची दलाली करणाऱ्यांच्या तोंडावर हाणायला लिंकसुद्धा देतो.👇
होय! हे तेच @AjitPawarSpeaks आहेत, ज्यांनी पंढरपूर - मंगळवेढ्याच्या विधानसभा पोटनिवडणुकीत येऊन प्रचार केला. केवळ जाहीर सभाच नाही तर गल्लोगल्ली फिरून याच दादांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
त्या भागात आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना मात्र हेच अजित दादा बेताल वक्तव्ये करत+
सुटले आहेत. हे म्हणतात की, "या कोरोनाच्या उद्रेकाला तिथली जनताच जबाबदार आहे".
खरंतर अशा प्रकारचे वक्तव्ये हे लाजिरवाणे आहे, दादा हे वागणं बरं नव्हं. जर त्या भागात तुमचे अर्धा डझन मंत्री आणि तुम्ही स्वतः येऊन सभा घेतली नसती तर कशाला लोक जमले असते?लोकांना दोष देणं बंद करा.
भाजपाने+
प्रचार केला, मात्र अशाप्रकारे जबाबदारी ढकलली नाही, ना बेताल वक्तव्ये केलीत. उलट त्या ठिकाणी कोविड सेंटर व्हावे यासाठी भाजपा नेतेच प्रयत्नशील आहेत.
पण दादांनी आजच आपली पंढरपूर - मंगळवेढ्याची हार मान्य केली आहे, मतांचा जोगवा मागूनही लोकांनी इंद्रायणी काठ दाखवला असल्याची कुणकुण+
महत्वाचा थ्रेड👇
हे दोन फोटो बघा! राज्यात आरोग्य व्यवस्था आज चव्हाट्यावर आहे, राज्यकर्ते महत्त्वाकांक्षी आणि धोरणात्मक निर्णय घेणारे नसल्याने आज राज्याची वाताहत झालीय हे नाही म्हणलं तरी निखळ सत्य आहे. देवेंद्रजी फडणवीस या माणसावर विरोधकांचा राग असू शकतो पण या माणसाची राज्याच्या+
प्रशासनावर आणि कारभारावर घट्ट पकड होती. आणि आजही आहे. त्याची अनुभूती अवघ्या राज्याला अजूनही येतेय..
खरंतर देवेंद्रजींनी गेल्या पाच वर्षात आरोग्य क्षेत्रात जे काम केलं ते आत्तापर्यंतच्या इतिहासात कधीच झालं नाही हे दाव्याने सांगू शकतो. गावगाड्यातल्या माणसाला उपचार मिळाले पाहिजेत+
आणि उपचाराविना कोणीही जीवानिशी गेला नाही पाहिजे हे काळजात कोरून काम करणारा देवेंद्र नावाचा माणूस! अन सोबतीला झपाटून आणि झोकून देऊन तळमळीने काम करणारे ओमप्रकाश शेटे सर...
महाराष्ट्रात एकही गाव असं नसेल की ओमप्रकाश शेटे सरांना आम्ही ओळखत नाही. अवघा महाराष्ट्र देवदूत म्हणून ओळखतो,+