बरेच लोक केनियाने पाठवलेल्या १२ टन धान्याची थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब" इत्यादी म्हटले जात आहे. तर एक छोटीशी कथा ऐका..
तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच.
बहुतेक लोकांनी जे ऐकले नसेल, ते म्हणजे 'केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे 'इनोसाईन' गाव आणि येथील स्थानिक जमात "मसाई"!
अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याची बातमी मसाई लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागले. आपल्या जवळच्या गावात राहणारी आणि
स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली, तेव्हा तिने स्थानिक मसाई लोकांना ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली.
एखादी इमारत इतकी उंच असू शकते की ती पडली तर तिच्याखाली दबून इतकी
माणसे मरू शकतात हे सर्व झोपडीत राहणाऱ्या त्या मसाई लोकांसाठी अविश्वसनीय होते. परंतु तरीही त्यांना अमेरिकी लोकांबद्दल दुःख वाटले आणि त्याच वैद्यकीय विद्यार्थिनीच्या माध्यमातून केनियाची राजधानी नैरोबीमधील अमेरिकन दूतावासाचे उपप्रमुख विल्यम ब्रॅंगिक यांना एक पत्र पाठवण्यात आले.
त्यांनी ते पत्र वाचले. विल्यम ब्रॅंगिक प्रथम विमानात चढले. काही काळ हवाई प्रवास आणि मग तिथून मसाई जमातीच्या गावाला जाण्यासाठी अनेक मैलांचा मोडक्यातोडक्या वाटेने प्रवास करत ते तेथे पोहोचले.
गावात पोहोचल्यावर, मसाई लोक एकत्र जमले आणि त्यांनी सोबत १४ गायी घेऊन ते अमेरिकन
दूतावासाच्या उपप्रमुखांकडे पोहोचले. मसाईसच्या एका वडिल माणसाने गाईचा दोर त्या उपप्रमुखांच्या हातात देऊन एका फलकाकडे निर्देश केले. त्या फलकावर काय लिहिले होते ते तुम्हाला माहिती आहे?
त्यावर लिहिले होते -
"या दु:खाच्या घटनेत अमेरिकेच्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही या गायी दान करीत आहोत".
होय, ते पत्र वाचल्यानंतरच, जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि संपन्न देशाच्या राजदूताने चौदा गायींचे दान गोळा करण्यासाठी शेकडो मैलांचा प्रवास पार केला होता.
पण पुन्हा प्रश्न उद्भवला तो गायींच्या वाहतुकीची अडचण व कायदेशीर बंधन ! या दोन्हीमुळे त्यांनी गायी नेण्यात असमर्थता दर्शवली परंतु त्या सर्व गाई विकून त्यातून येणाऱ्या रकमेतुन एक दागिना किंवा आभूषण खरेदी करून त्यास मसाई लोकांच्या कृतज्ञते बद्दल ९/११ च्या मेमोरियल म्युझियममध्ये
ठेवण्यात येईल असा प्रस्ताव ठेवण्यात आला.
जेव्हा ही गोष्ट अमेरिकेतील नागरिकांपर्यंत पोचली, तर मग काय घडले हे तुम्हाला माहिती आहे?
त्यांनी आभूषणांच्या जागी गायी स्वीकारण्याचा आग्रह धरला. मग ऑनलाईन याचिकांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या की त्यांनी गाय ठेऊन घ्याव्या, आभूषणे ठेवू नयेत.
मग अधिकारी वर्गांना ईमेल पाठवल्या गेल्या, राजकारण्यांशी चर्चा केली गेली आणि लाखो अमेरिकन लोकांनी या अभूतपूर्व प्रेमाबद्दल मसाई जमातीचे आणि केनियाच्या जनतेचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले.
***
कृपया १२ टन धान्याकडे पाहू नका ते स्वीकारा. ते तुलनेने कमी असेलही कदाचित, परंतु दान नव्हे, दान देणाऱ्याच्या हृदयाकडे पहा, त्याच्या भावना पहा. लहान लहान खड्यांकडे पाहू नका, ते लहान खड़े उचलून रामसेतु निर्माणकार्याला हातभार लावणाऱ्या खारीची श्रद्धा पाहा. google.com/amp/s/www.time…
चहा, कॉफी, भुईमूग अशी केनियात पिकलेल्या १२टन खाद्यपदार्थांची भेट केनियाने भारताला देऊन करोना संकटात आपला मैत्रभाव व्यक्त केला आहे. मुंबईतील कोविड फ्रंटलाईन फायटर्सना मुख्यतः ही अन्नाची पॅकेट्स देण्याची इच्छा त्या देशाच्या भारतातील
उच्चायुक्तांनी व्यक्त केली आहे.
चहा, कॉफी, भुईमूग यांची भारतात वानवा आहे असे नाही. आपण जे देतोय ते अन्नपदार्थ भारतासाठी काही फार मोठे अप्रूप नसणार याची केनियाला कल्पना नाही, असेही नाही. पण थेट आपल्या शिवारातील वानोळा देण्यामागे जी " संकट काळात आम्ही सोबत आहोत " ही भावना या
लहानशा देशाने दाखवली आहे त्याला खरी दानत म्हणतात !
केनियातील माणसे आपण विडिओत पाहतो. काटक शरिराची व कणखर मनाची. तिथल्या वैविध्यपूर्ण निसर्ग व प्राण्यांशी एकरूप झालेली. चित्र विचित्र पोशाखाची. पर्यटकांशी देहबोलीतून हितगुज करणारी. निखळ, निर्व्याज मनाची.
हिरोला गुंडांनी बेदम मारले आहे... तो जमिनीवर अगदी मरणोन्मुख होऊन पडला आहे.. व्हिलनला वाटते तो मेलाच... आणि अचानक कशाने तरी प्रेरित होऊन तो उभा राहतो आणि सगळ्या गुंडांना मारतो- हे पाहणे आपल्या भारतीयांना जाम आवडते. भारताने दुसऱ्या कसोटीत मिळवलेला विजय यापेक्षा
1
काही वेगळा नव्हता. पण हा विजय केवळ क्रिकेटप्रेमींनी साजरा करावा असाच नाही, तर सगळ्यांनी काही लाईफ लेसन्स घेऊन जावे असा आहे..
त्याआधी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. ह्या जानेवारीमध्ये विरुष्काच्या प्रेमाला गोड फळ येणार हे आधीच डिक्लेअर झाले होते. जानेवारीतच भारत
2
महत्वाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही येणार होता. म्हणजे पहिल्या कसोटीनंतर विराट पितृत्व रजेला जाणार त्यानंतर उपकप्तान अजिंक्य रहाणे कडे नेतृत्वाची धुरा जाणार हे आधी माहित होतेच. बहुतेकांनी याकडे थोडे नाक मुरडूनच पहिले. म्हणजे ठीक आहे की तो कसोटी संघाचा उपकप्तान आहे,
सुशिक्षित कोण आणि अशिक्षित कोण ? या प्रश्नाचा एक नवा वेध घेणे गरजेचे आहे. सध्याची सुशिक्षित लोकांची व्याख्या त्याच्या शिक्षण नावाच्या रचनेशी जोडलेली आहे. अर्थात जो शिकलाय तो सुशिक्षित आणि नाही शिकला तो अशिक्षित . इथे एक प्रश्न जाणीवपूर्वक उभा करायला हवा की,
खरोखरीच शिक्षण घेतलेले " सुशिक्षित " आहेत का ? शिक्षण म्हणजे नेमके काय ? चार पुस्तके आणि शाळा नावाची रचना मनुष्याला सुशिक्षित बनविण्यासाठी पुरेशी आहे का ? सदसदविवेकबुध्दी शाबूत राखून या तीन प्रश्नांची उत्तरे शोधल्यास काही नकारार्थी उत्तर हाती येऊ शकतात. शिक्षण घेतलेल्या
बहुतांशी व्यक्तीचे सामाजिक वर्तन हे अत्यंत मागास दर्जाचे असते. याची उदाहरणे नुसते डोळे उघडून सर्वत्र फिरवले तरी ठायीठायी दिसतील. भ्रष्टाचार , व्यसनासक्त ,जातीयता अंधश्रध्दा अशा बरेच बाबतीत सुशिक्षित मंडळी मागे नाहीत तर पुढेच आहेत हे नाकारता येत नाही .
शेठ जसे सत्तेत आले तस मालकांनी देशातील कोणकोणत्या सरकारी संस्था,कंपन्या यांना विकून टाकले,किंवा त्या कंपन्यांत असणारी सरकारी गुंतवणूक काढून घेतली...यावर एक नजर टाकूयात.
2014-15
1. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड.
0.29% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
2. SAIL (Steel Authotiry of india ltd.)
5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
3. NALCO (National Aluminium Company Ltd.)
0.13 % सरकारी हिस्सा विकण्यात आला.
4. MMTC (Minerals and Metals trading Company)
0.073% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
5. CIL (Coal India ltd.)
10% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.