रोज दहा/ साडे दहा वाजता फुटपाथवर उभं रहायचं, चार - दोन बुम घेऊन रोजचे पत्रकार येतात, मग गल्लीतल्याने आंतरराष्ट्रीय विषयांवर दे दणादण वाटेल तसं बरळायचं, त्यांनतर शेवटी उद्धवजी जगातले बेस्ट शियम आहेत, आमचं सरकार स्थिर आहे, 5 वर्षे टिकेल. एवढं पेटंट वाक्य फेकून पुन्हा फूटपाथवरून+
गायब व्हायचं. हा माणूस नेमकं राहतो कुठं माहीत नाही, रोज रस्त्यावर मात्र न चुकता असतो...
पण आता रोज नुसती धावपळ सुरुय, काल म्हणे सरकार वाचवण्यासाठी अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये महत्वाची आणि गुप्त बैठक झाली. जर हे तीन टाईम टिव्हीला येऊन सांगतात की सरकार स्थिर आहे तर सरकार+
वाचवण्यासाठी धावपळ का करताहेत मला कळेना! अजित दादांच्या नाड्या ईडी आवळत आहे, कालच त्यांच्या मामांचा कारखाना जप्त केला, काँग्रेस विधानसभा अध्यक्ष पदावर ठाम आहे, राष्ट्रवादीच्या मनात नेमकं काय आहे हे घरगड्यालाही कळेना. सरकार वाचवण्याच्या प्रक्रियेत काँग्रेस का नाही?हा प्रश्न मात्र+
अनुत्तरित आहे, काँग्रेसला बैठकीत घ्यावं एवढीही त्यांची पात्रता राहिली नाही का? तसं असेल तर काँग्रेस लाचार झालीय म्हणायला हरकत नाही.
पण सरकारच्या या सर्कशीत संजय राऊतांना मात्र खूप खेळावे लागत आहेत, मदारी मात्र वाटेल तसं खेळवून घेणार आणि हे आमचा मामु,आमचं सरकार यानेच कमालीचे खुश+
आहेत.
आमचं सरकार 5 वर्षे पूर्ण करेल हे रोज सांगत असताना त्याच्या मागे असलेली भीतीच सगळं सांगून जाते, सगळं आलबेल आहे म्हणत असताना आतून वाघाची झालेली अवस्था कळतीय. सरकार नावाच्या या सर्कशीला शुभेच्छा,वाट पाहूया उद्या पुन्हा वाघ रस्त्यावर येऊन उभा राहण्याची.😂
-विकास विठोबा वाघमारे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
महत्वाचा थ्रेड👇
28 व्या वर्षी अजून नीटसं मिसरूटही न फुटलेली यांची पोरं थेट कॅबिनेट मंत्री करायला येतात, ज्याला नीट चार शब्द बोलता येत नाही त्याला खासदारकीची स्वप्नं पडायला लागतात, आमदार होतात, ज्याचा बाप कित्येक वर्षे आमदार, मंत्री होता त्यांची मुलगी राज्यमंत्री करायला वेळ आहे+
मात्र बाप शेतात राबत असताना शेतकऱ्यांचा पोरगा अधिकारी होण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतोय त्याला हे सरकार अधिकारी होण्यासाठी नीट व्यवस्था निर्माण करू शकत नाही, याची लाज स्वतः उद्धव ठाकरे आणि या सरकारच्या कर्त्याधर्त्या सर्वांनीच बाळगली पाहिजे. एका अधिकारी झालेला पण या ठाकरे+
सरकारच्या गलथानपणामुळे MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत न झालेल्या तरुण स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केल्याचं कळलं आणि खूप वाईट वाटलं. आतून अस्वस्थ आहे. खरंतर ही आत्महत्या नाही तर हत्या आहे, या राज्यात गेल्या दोन वर्षांपासून जे काही अंधाधुंद चाललंय त्याचा हा परिणाम आहे,+
काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून 1999 साली राष्ट्रवादीचा जन्म झाला, शाहू - फुले- आंबेडकरांचे नाव घेऊन पुरोगामीत्वाची झुल पांघरत चालण्याला आज 22 वर्षे झालीत. मला राष्ट्रवादीबद्दल प्रेम, आस्था किंवा आपुलकी अजिबात नाही, कारण मी त्यांचा कार्यकर्ताही नाही अन हितचिंतकही नाही, पण या+
दगाबाज राष्ट्रवादीने इतक्या वर्षात मिळवलं काय? हे कोण सांगेल! कधी त्यांच्या कार्यकर्त्यांना तरी हे कळलंय का!वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा इतिहास कुणीही विसरणार नाही.
पण या 22 वर्षात काँग्रेसपासून फारकत घेत नेमकं काय सिद्ध केलं? आणि काँग्रेसपासून वेगळं होण्याचं कारण काय तर+
विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा म्हणे! असो...
नाही म्हणलं तरी शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापन केली ती पंतप्रधान होण्यासाठीच. कारण काँग्रेसमध्ये राहिले असते तर पंतप्रधान पदासाठी नंबर लागणार नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना असेल, इकडे राष्ट्रवादीची आपल्या 22 वर्षातली आजची स्थिती+
थ्रेड🌷👇
राजकारणातल्या काही डागाळलेल्या माणसांनी हे क्षेत्रच बदनाम करून टाकलं, पण या दलदलीतही समाज, समर्पण आणि सेवा याला समोर ठेऊन काम करणाऱ्या माणसांची कमी नाही. ही माणसं प्रसिद्धीच्या झोतात कमी आली असतील पण यांनी कामात कसर ठेवली नाही. जिल्ह्यातल्या, राज्यातल्या मीडियाने यांना+
हिरो नसेल केलं पण मतदारसंघातल्या माणसांसाठी हेच खरे हिरो आहेत, कारण संकटात धावून आलेल्या माणसांना चिखलामातीत राबणारी माणसं कधीच विसरत नसतात. हे आहेत अक्कलकोट तालुक्याचे युवा आणि तडफदार आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी!
सचिन दादांनी, आपल्या अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी कोरोनाच्या+
काळात आपल्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या सहयोगातून अवघ्या 15 दिवसात ऑक्सिजनयुक्त 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभा केलंय. त्यामध्ये 10 बेडला हे बायपॅपचीही व्यवस्था केली आहे. एवढेच नाही तर तालुक्यातल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी आणि कोरोनातुन मुक्त करण्यासाठी अजून 100 बेडची तयारी+
अनाथांचा नाथ!🧡🌺
तुमची राजकारणातली खुर्ची ही दगाफटका करून काढून घेतली जाऊ शकते, पण तुमचं राजकारणातलं अढळ स्थान कोणीही काढून घेऊ शकत नाही, तुमचं नेतृत्व, कर्तृत्व आणि हृदयाची विशालता काढून घ्यायला समोरच्याला तेवढं "मोठं" व्हावं लागतं. अन त्यासाठी त्यांच्याकडे तेवढं समर्पण, त्याग+
आणि अंत्योदयासाठी काम करण्याची तळमळ असावी लागते. आज देवेंद्रजींनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या १०० मुलांचं संपूर्ण पालकत्व स्वीकारलं! सिद्धिविनायक सेवा ट्रस्टकडे नोंदणी केलेली ही मुलं होती.
अनाथ मुलांना आज परत एकदा देवेंद्रजींच्या रूपाने आधार मिळाला! एवढंच नाही तर दक्षिण - पश्चिम+
नागपूर विधानसभेत अजून जेवढी अनाथ मुलांची नोंदणी होईल तीही स्वीकारण्याची तयारी देवेंद्रजींनी ठेवली आहे. ज्यांच्या नावातच "देव" आहे, तो अनाथांचा नाथ झालाय.☺️
राजकारणाच्या चिखलफेकीतही काळीज असलेली अशी लाखमोलाची माणसं पाहिली की अभिमान वाटतो. आणि ही माणसं आपले नेते आहेत याने तर अजून+
पंढरीच्या कौलाचे गुपित..🌷👇
पंढरपूर - मंगळवेढ्याच्या संतभूमीत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले अन सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. हा विषय खरंच राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा आहे, याची अनुभूती लवकरच दिसेल. मात्र हा निकाल घोषित झाल्यानंतर महाआघाडीच्या काही महत्वाच्या नेत्यांच्या+
चुकीच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मात्र मला स्वस्थ बसवेना..
मंगळवेढा आणि पंढरपूर ही संतांची भूमी आहे, कर कटेवरी ठेऊन उभा असलेला विठूमाऊली अन मंगळवेढ्यावर दृष्टी ठेऊन असलेले दामाजीपंत! सोबतीला ज्ञानोबा, तुकोबाराय, मुक्ताई, जनाई, नामदेव आणि अशा अनेक महान संतांचे अधिष्ठान या भूमीत+
आहे. या महान भूमीतल्या निवडणूकीत यंदा भाजपाचाच पठ्ठा विजय करायचा हा खुद्द पांडुरंग परिवाराचाच निश्चय! त्याप्रमाणे विजय झालाही!
पण या विजयामागे असलेलं एक गुपित म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, ती लोकांना माहिती नाही. आघाडीच्या नेत्यांना कळेना की सगळं काही ठीक असताना आपण निवडणूक हरली+
अत्यंत महत्वाचा थ्रेड👇
राज्यातल्या कोरोनाग्रस्त लाखो सामान्य रुग्णांना दिलासा देणाऱ्या एका याचिकेची नुकतीच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी ही याचिका दाखल केली होती, त्यांचा आक्षेप असा होता+
की, शासनाने 23 मे 2020 रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ केवळ व्हेंटिलेटरवरील गंभीर कोविड रुग्णांनाच देण्यात येतो, तो कोविडच्या सर्व रुग्णांना त्या योजनेंतर्गत लाभ देण्याची मागणी केली होती. दरम्यान या याचिकेवर सुनावणी सुरू असताना+
न्यायालयाने सरकारची भूमिका विचारली त्यावेळी या आघाडी सरकारने न्यायालयात शपथपत्रासह सांगितले की, व्हेंटिलेटरवरील 8 उपचारासहित 20 अन्य उपचार कोविड रुग्णांना महात्मा फुले योजनेत मोफत देण्यात येईल.
मात्र वस्तुस्थिती अशी होती की, सरकार केवळ घोषणा करून कागदी घोडे नाचवत आहे, वास्तविकता+