मंजुश्री सारडा 👈🙏
खून खटला एक चक्रव्युव्ह
In fact this is a case of circumstantial evidence 🙏
स्थळ पुणे .
मंजुश्री सारडा लग्न 11 फेब्रुवारी 1982 मृत्यू 11 जून 1982 .शरद बिरदी सारडा घरचा पिढीजात कापडाचा व्यवसाय ,शरद केमिकल इंजिनियरआणि भोसरी ला केमिकल ची फेक्टरी असलेला धनाढ्य
कुटुंबातील मुलगा ,मंजुश्री पण केमिस्ट ची डिग्री घेतलेली ,सुंदर ,सुस्वभावी आणि बरीच भावनाळू मुलगी.खरे तर लग्नानंतर चे एक वर्ष शब्दशः झोपाळ्या विना झुलायचे असते चोरट्या खाणाखुणा ,कुटुंबियांच्या लक्षात येऊ नये म्हणून केलेले कटाक्ष ,नजरेचे लाडिक खेळ आणि हवाहवासा वाटणाराचोरटा स्पर्श
पण हे सुख मंजुश्री च्या ललाटावर लिहिले नव्हते .फेब्रुवारी त लग्न झाले आणि नवरा बायको चतुश्रूंगी च्या जवळपास तक्षशिला अपार्टमेंट ला लगेचच रहायला गेले.आणि महिन्याभरात मंजुश्री चे पत्र तिच्या बहिणीला आणि मैत्रीणी ला आले.दिसते तसे नसते इकडे बरच वेगळे चित्र आहे.नवरा शरद ने त्याच्या
एका उज्वला नावाच्या मैत्रिणीशी मंजू ची ओळख करून दिली आणि सांगितले की तू बायको असली तरी खरी मालकीण उज्वला आहे ती जसे सांगेल तसे तुला वागायचे आहे.मंजू लिहिते की मी घरातली पगार नसलेली मोकलरीण च आहे बाकी काही नाही.मंजू ने बहिणी ला असेही लिहिले की हे सगळे आई बाबांना सांगू नको त्यांना
त्रास आणि दुःख नको .मंजू नंतर एकदा परत माहेरी आली नंतर परत थोड्या दिवसांनी माहेरी आली आणि सासऱ्यांचा फोन आला की शरद च्या बहिणीचा साखरपुडा आहे तू पुणे ये .मंजू पुणे साखरपुड्याला निघाली ती तिची माहेरचा उंबरठा ओलांडायची शेवटची वेळ.11 जून ला शरद चा भाऊ त्याची बायको आणि मंजू बाहेरून
कोटुंबिक कार्यक्रम आणि जेवण करून घरी आले .रामेश्वर मंजू ला घरी सोडून जवळच आपल्या घरी गेला.आता घरात फक्त शरद आणि मंजुश्री होते.मंजू सकाळी तिच्या बेडवर गतप्राण अवस्थेत सापडली .तक्षशिला अपार्टमेंट मध्ये दोन डॉक्टर असूनही दोन किलोमीटर वरून फेमिली डॉक्टर लोढा यांनी येऊन तिला मृत
घोषित करून पोस्टमार्टेम ला पाठवले.मृत्यु चे कारण स्पष्ट झाले . काय ? तर पोटात "पोट्येशियम सायनाईड "हे जगविख्यात जहाल विष सापडले .आणि 1980 च्या दशकातील समाज हादरला,पोलिस तपास यंत्रणा कामाला लागली .शरद त्याचा भाऊ आणि काका तिघे अटकेत गेलेत .सेशन कोर्टात खटला चालला तिथून हायकोर्टात
गेला .पोलीस ,डॉक्टर , वकील ,यांचे एका मागोमाग जबाब झाले.खटला गाजला तो याकरता की प्रत्यक्षदर्शी नाही तर परिस्थीतीजन्य पुरावा ग्राह्य धरला गेला.मंजुश्री बरोबर शेवटचा एकच माणूस तिच्या बरोबर होता तो म्हणजे शरद .सेशन कोर्ट ने रामेश्वर आणि रामविलास यांना दोन वर्षांची तर शरद ला फाशी ची
शिक्षा दिली .मंजुश्री ने स्वतः जीवन संपवले असा युक्तिवाद कोर्टाने खोडुन काढला, मंजू ने घरी पाठवलेली पत्रे "मृत्यूपूर्व जबानी " म्हणून ग्राह्य धरण्यात आली.हायकोर्ट मध्ये एकच वेळी तीन केसेस लागल्या एक होती कॉन्फरमेशन ,दुसरी होती सारडा अपिलात गेले ती आणि तिसरी म्हणजे महाराष्ट्र
सरकार रिव्हिजन करता या करता की सारडा चा भाऊ आणि काका याना अजून कडक शिक्षा करावी.हायकोर्टाने ही शरद ची फाशी ची शिक्षा कायम ठेवली आणि सारडा कुटुंबीय सुप्रीम कोर्टात गेले . हायकोर्टाने एखादी खटला भरपूर चुका करून निर्णय दीला असेल तर सुप्रीम कोर्ट बदल करू शकते. आणि मग कायदेतज्ञ ,
जडबंबाळ पुस्तके ,इतर खटल्याचे हजारो संदर्भ ,साक्षी ,पुरावे यांचे पीठ पडून या खटल्याचा निकाल लागला.या खून खटल्याने जितका महाराष्ट्र हादरला त्या पेक्षा निकालाने महाराष्ट्र सुन्न झाला .या खटल्याचे जजमेंट तुम्ही गुगल वर वाचू शकतात .कन्यादान करणारा प्रत्येक बाप /अथक परिश्रम करून छडा
लावणारे पोलीस अधिकारी / डॉक्टर/ आणि सहृदयी समाजमनाच्या सगळ्यानी मंजुश्री ची भरल्या डोळ्यांनी माफी मागितली.सुप्रीम कोर्टाने परिस्थिती जन्य पुरावा या दोन शब्दांवर खंडात्मक चर्चा करून निकाल दिला की शरद बिरदीडचंद सारडा याने मंजुश्री ला विष दिले हे सिद्ध होत नाही तो निर्दोष आहे .
आज ही मंजुश्री सारडा खून खटला दुर्मिळ निकाल म्हणून अभ्यासला जातो .फाशीची शिक्षा झालेल्या शरद सारडा ला चक्रव्युव्हातून सहीसलामत सोडून आणले ते कायदेपंडित होते
राम जेठमलानी 🙏 .
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अफगाणिस्तान 🙏.
अतिशय स्पष्ट शब्दात म्हणजे क्रिस्टल क्लियर असे म्हणतो त्या शब्दात बीडन ने अफगाणिस्तान ला सांगितलेकी त्यांना स्वतःकरता लढावेच लागेल.34 पैकी 9 राज्य तालिबान कब्जात आहेत.काबुल एक महिन्यात पडेल असा अंदाज आहे.भारताने बरीच गुंतवणूक केली आहे दुर्दैवाने तिची माती होणार.
जसे नशीब फुटके असते ना तसे या देशाचे नशीब खराब आहे.अमेरिका आणि रशिया हे दोन राहू केतू यांच्या हस्तरेषेत गेले 40 /50 वर्ष बसले आहेत.आज US ने सैन्य माघार घेतली आणि तालिबान ने 9 राज्ये घशात घातली.2 महिन्यात 90 हजार लोक बेघर झाली आहेत.एकाच वर्षात 4 लाख बेघर.या लोकांना मदत करण्यास
अडचण आहे.आजच जर्मनी आणि नेदरलँड ने मदत थाम्बवली आहे. अफगाण सैन्य तालिबानला शरण जात आहे.काबुल पासून 80 km वर च्या गांझी शहरात आज तालिबानी घुसले आहेत. अफगाण अर्थमंत्री देश सोडून गेले आहेत. बाकी पण त्याच मार्गावर आहेत.जवळजवळ 70 % अफगाणिस्तान तालिबान ने घेतला आहे. एक देश सोडून
देवाक काळजी रे 😭
थोडा व्यक्त होतोय बाकी लोकांना ही विनंती आहे खास करून शिक्षण क्षेत्रात असलेल्या नि जरूर व्यक्त व्हा .मी जे अनुभवतो आहे ते लिहितोय .आज ना मुलांना ना त्यांच्या पालकांना निकालाची ना हुरहूर , ना उत्साह ,ना भीती ना उत्कंठा ,ना देवाचा धावा ना पेढ्यांचा गोडवा ,
हा सगळा निकाल अंतर्गत मूल्यमापन यावर आधारित खरे तर दीड ते दोन वर्षे अभ्यास, टेस्ट, परीक्षा हजेरी, निकाल सगळेच ऑनलाइन आहे .आज उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थ्यांची आकडेवारी आणि टक्केवारी वाचाल तर डोळे पांढरे होतील एकूण 93435 विदयार्थी 90%
1350 विद्यार्थ्यांना 95% तर 46 विद्यार्थी
100% मिळवून आहेत.दहावी चे पण तेच आणि 12 वी चे ही तेच. लाखो मुले पास झाली आहेत आणि ही काही आनंदाची बातमी नाही .10 वि 12 विच्या पौगंडावस्थेतील मुला मुलींन चे भावविश्व काचेच्या पेल्या सारखे तडकणार आहे .,मुले आणि पालक डिप्रेशन मध्ये जाणार.काही डॉक्टर इंजिनियर CA होणार बाकी काय ?
अलबेला 🌹
भगवान आबाजी पालव जन्म 1 ऑगस्ट 1913 अमरावती .वाचतांना किती साधे सरळ नाव वाटते ना ? दादर मध्ये वडील गिरणी कामगार म्हणून काम करत होते म्हणून यांचे बालपण पण मुंबईतच गेले .मध्यमवर्गीय कुटुंबातला हा आहे पहिला मराठी आणि हिंदी महानायक.हा होता 'शापित गंधर्व " प्रतिभेचे दान जरी
ईश्वराने पदरात टाकले तरी प्रारब्ध किंवा हाताच्या रेषांचे जाळे तुम्हाला त्यांनी आखून दिलेल्या रिंगणाबाहेर जाऊ देत नाही .भगवान दादा चे पण रिंगण वरतून आखून दिले होते दादर ची चाळ, चाळीतून जुहू चा समुद्र काठचा 20 खोल्यांचा बंगला ,आलिशान 8 दहा मोटारी उत्तुंग यश अमाप पैसा ,प्रसिद्धी
मग अपयश, घर दार गाड्या पैसा सर्व गायब आणि परत दादरची चाळ .लहानपणा पासून चित्रपटाची आवड वडील गिरणीत गेले की दादा परळ च्या स्टुडियोत चक्कर मारणार. एक मुकपट करून झाला ,दादा ला दिग्दर्शन करायची आवड एक दोन चित्रपट ही काढून झालेले.1951 मध्ये दादांनी बनवलेल्या "अलबेला " ने आयुष्याला
संस्कार ठेवा रे 😡
अजित पवार आज म्हणाले ही महाराष्ट्र ची भाषा नाही पण हे तितके खरे नाही .खरे तर शिवराळ भाषा राजकारणात आणण्याचे श्रेय सेने कडे जाते .भुजबळांना मैद्याचे पोते ,पवारांना बारामती चा मल्ल , ही उपाधी बाळासाहेब यांनीच दिली .मागे फडणीस यांचा वारु मोकाट उधळत होता तेव्हा
छगन उठ कमळ बघ ,शरद कमळ घे असे हलके वक्तव्य करून हा वारसा सुरू केला .आज राणे न चे पोर म्हणतात हे भाडखाऊ सरकार आहे .ही भाषा नाही हे संस्कार आहेत.जनाब सेना ,सोनिया सेना ,जितृदिन आव्हाड, संघोट्या , टरबूज ,चम्पा , बोबड्या , फावड्या , पेंग्विन , धरण मुत्र्या, बेडूक .अरे काय लावलय काय
इतकीच खुमखुमी आहे ते सरळ आई बहिणीवरून शिव्या चालू करा ना .शिव्या पेक्षा ही खालची पातळी राजाकारण्यांनी धरली आहे,त्यात सर्व पक्षीय महिला पदाधिकारी पण चौखूर उधळल्या आहेत.मुख्य म्हणजे महिलांच्या अशा वक्तव्ये किंवा ट्विट ला हजारो लाईक करणारे त्यांचे चाहते आहेत. संजय राऊत यांनी शायरी
घरोघरी चे आहारतज्ञ 😩
काल प्रफुल ने केलेल्या ट्विट वरून जे मनात आहे ते लिहितोय .शब्दशः उच्छाद घातलाय या घरोघरी च्या आहारतज्ञ जमाती ने .आणि ही जमात सगळ्यांच्या घरी असते .शिक्षित अडाणी हुशार मठ्ठ गरीब श्रीमंत सगळीकडे ही जमात पावसाळ्यातील भुछत्र सारखी उगवली आहे.मुख्य म्हणजे
आपले तोकडे ज्ञान इतरांना सांगताना ते किंचित ही लाजत नाही 😱.आता या जमातीचे बोल वाचा माझे एक जवळचे संबंधित आहे त्यांच्या कडे पाच लोक मिळून अर्धा किलो तेल महिनाभर पुरते आम्ही तेल खातच नाही म्हणे, जपान मध्ये उकडलेले अन्न खातात म्हणून 100 वर्ष आरामात जगतात आम्ही उकडलेलं खातो 😩 एकदा
घरी दोस्त आला मी सफरचंद सोलून काप करून त्याला खायला दिले .साल फेकू नये खरे सत्व त्यातच असते तू चुकीच्या पद्धतीने सफरचंद खातो आहे म्हणाला.😩कोणाकडे जेवायला गेले की विचारणार भात वाढू ना शुगर आहे म्हणून विचारतो आहे 😩 अरे वाढ 😡 वरण भाता शिवाय जेवण आहे का ? चहा चे पण तेच साखर टाकू ?
स्वयंप्रकाशीत व्हा 🌹🙏
प्रीतम वय 38 ,पंकजा वय 42 तसे पाहिले तर राजकारणात आल्यात तेव्हा 30 आणि 35 च्या असतील.गोपीनाथ मुंडे हे फक्त मराठवाडा पुरते लाडके व्यक्तित्व नव्हते तर उभा महाराष्ट्रात त्यांचे चाहते होते .आज मुंडे साहेबांन वर लिहिण्याचे काही प्रयोजन नाही विषय मुंडे
साहेबांचा नाही तर त्यांच्या मुलींचा आहे म्हणून त्यांची आठवण काढणे जरुरी आहे.आज जे काही या दोघीना मिळाले आहे म्हणजे प्रीतम ला दोन वेळा लोकसभा आणि पंकजा ला एकदा आमदार पद ते फक्त आणि फक्त मुंडे साहेबांना मरणोत्तर दिलेला सन्मान आहे तो मराठवाडा च्या लोकांनी आणि भाजपा या दोघांनी दिला
आहे.प्रीतम च्या पारड्यात 6 लाख असे विक्रमी मतदान हे मुंडे साहेबांन वरचे प्रेम आणि माया आहे .यात प्रीतम आणि पंकजा यांचा खारीचा वाटा आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही.पंकजा आक्रमक स्वभावाची आहे ती म्हणते मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे त्याची जाणीव गोपीनाथ गडावरच्या भव्य गर्दी