सदर माहिती आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे यांची आहे... त्यामूळे नक्कीच वाचा आणि पुढे शेअर पण करा.. खूप महत्वपूर्ण धागा आहे.

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे ऑक्टोबर २०१९ च्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले श्रीनिवास पाटील हे पुण्याचे जिल्हाधिकारी असतांना त्यांनी ३ एकर २६
गुंठे जमिनीचे क्षेत्र ३२६० एकर कसे व कोणासाठी केले होते? वाचा आणि पुढे पाठवा !छत्रपती संभाजी महाराजांचे वारस, छत्रपती शाहू महाराजांनी १७३५ साली ३ एकर २६ गुंठे ही जमीन भट आणि गोसावी यांना इनाम म्हणून दिलेली. पुढे या जमिमीचे काय झालं बघाच...

१. सन १९५० ला मुकुंद भवन ट्रस्टने या
जमिनीवर दावा सांगितला तत्कालीन कलेक्टरने दावा अमान्य केला.

२. मुकुंद ट्रस्टने नंतर न्यायालयात दावा दाखल करून ती जमीन त्यांच्याकडे जबरदस्ती ठेवून घेतली पण १९५३ ला संस्थाने खालसा होऊन ती ३ एकर २६ गुंठे जमीन सरकार ने ताब्यात घेतली आणि त्या बदल्यात मुकुंद भवन ट्रस्टला ५० हजार ८१८
रुपये ६३ पैसे मोबदला देण्यात यावा असे न्यायालयाने सांगितले.

३. एवढ्यावरच मुकुंद भवन ट्रस्ट न थांबता पुढे कोर्ट कचेऱ्या केल्या पण त्याचा फायदा झाला नाही.

४. सन १९८८ साली तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांच्या काळात या वादाला वेगळे वळण मिळाले.हे तेच श्रीनिवास पाटील आहेत जे
आता साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आले आहेत...

५. श्रीनिवास पाटील हे पुण्याचे कलेक्टर असताना कोणतेही शासन आदेश नसताना या जमिनीचा कोर्टात दावा दाखल केला.

६. कोर्टात दावा दाखल केल्या नंतर काही महिन्यातच १८ डिसेंबर १९८९ ला जिल्हाधिकारी व मुकुंद
भवन ट्रस्टने न्यायालयाबाहेर तडजोड केली आणि मुकुंद भवन ट्रस्टचा मूळ दावा ३ एकर २६ गुंठ्यांचा असताना या तडजोडीत मुकुंद भवनाला ३२६ एकर जमीन देण्याचा निर्णय झाला.
७. ज्या दिवशी मुकुंद ट्रस्ट ला ३२६ एकर देण्याची तडजोड करण्यात आली,त्या पैकी ७९ एकर जमीन त्याच दिवशी मुकुंद भवन ट्रस्टला
ताब्यात ही देण्यात आली.

८. ह्या ३.२६ एकर चे अपूर्णांक गायब होऊन ३२६ एकर झाले. हे एवढ्यावरच न थांबता त्या ३२६ च्या तडजोडीला शासकीय मान्यता मिळण्या आधीच त्या ३२६ पुढे शून्य जोडून ३२६० एकर जमीन मुकुंद भवन ट्रस्ट च्या नावावर करण्यात आली.
त्या ३२६० एकर मध्ये पुणे मेंटल हॉस्पिटल,
येरवडा कारागृह ही जमीन देखील मुकुंद भवन ट्रस्टची दाखवण्यात आली.

९. तर ही ३ एकर २६ गुंठे असलेली जमीन ३२६० एकर कशी झाली, त्यामुळे सर्वच अवाक झाले आणि त्या मुकुंद ट्रस्टचा ट्रस्टी कोण आहे शोधण्याचा प्रयत्न झाला तर ती मुकुंद भवन ट्रस्टची धर्मादाय आयुक्ता कडे नोंदणीच झालेली नव्हती.
१०. मुकुंद भवन ट्रस्ट चा माय बाप कोण आहे? हे शोधण्याचे काम चालूच होते. तेंव्हा कुठं मुकुंद भवन ट्रस्टचे भागीदार सापडले.

११. डी बी रिऍलिटी आणि पंचशील टेक पार्क हे मुकुंद ट्रस्टचे भागीदार आहेत असं निष्पन्न झालं.

१२. सदर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या पंचतारांकित हॉटेल व आय. टी.
पार्कसाठी शाहिद बलवा यांनी परवानगी मागितल्याची बाबही समोर आली. त्यांनीच पंचशील टेकपार्कच्या वतीने ही स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

१३. आता पंचशील टेकपार्क चे प्रमोटर कोण आहेत? तर पंचशील टेक पार्क चे प्रमोटर आहेत खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे मिस्टर सदानंद सुळे यांच्या सह अतुल
चोरडिया, श्रीमती वर्षा अतुल चोरडिया, सागर ईश्र्वरदास चोरडिया, सुप्रिया सदानंद सुळे, सदानंद भालचंद्र सुळे, पुरुषोत्तम लोहिया आदी प्रमोटर आढळून आले.
कशा प्रकारे १९८८ साली तत्कालीन जिल्हाधिकारी व आताचे राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील शरद पवार मुख्यमंत्री असताना
कोर्टाबाहेरच्या तडजोडी द्वारे ३ एकर २६ गुंठे जमिनीचे क्षेत्र आधी ३२६ एकर केले व त्यानंतर ३२६० एकर केले तेच कळलं नाही.

सदरील जमिनीवर मोठं मोठे कामर्शिल कॉर्पोरेट ऑफिसेस आणि टेक पार्क आहेत. ते नेमके कुणाचे आहेत? याचे उत्तर त्याच पावसात भिजत भाषण करणाऱ्या मोठ्या साहेबांकडे आहे.?

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with मोटाभाई गुजरातवाले😎

मोटाभाई गुजरातवाले😎 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Motabhaigujratw

14 Aug
मराठी मुलांची तुलना योग्य आहे का ?

नीरज चोप्रा (२३) रवी दहिया (२३)
दीपक पुनिया (२२) लव्हलीना बोर्गोहेन (२३)

ऑलिम्पिकमधील या पदक विजेत्या आणि चांगला खेळ करणाऱ्या एथलिट्सची तुलना आपल्या मराठी मुलांसोबत केली जात आहे.याशिवाय ते या वयात नेत्यांसाठी घाम गाळतात, त्यांच्या प्रचारासाठी
गावभर फिरतात, जर कोणी चांगला खेळ केला असता तर आपल्याला मराठी चेहरा पदक विजेता म्हणून पाहायला मिळाला असता, अशा आशयाचा मेसेज सध्या फिरत आहे.

बरं मग प्रवीण जाधव, राही सरनोबत, राहुल आवारे (कॉमनवेल्थ चॅम्पियन), दत्तू भोकनळ, अविनाश साबळे हे सर्व चीनवरून मागवलेले खेळाडू आहेत का ?
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले खेळाडूच आहेत ना ? आता यांच्यापैकी जर कोणी पदक जिंकलं असतं तर "मराठी माणूस, मराठी माणूस" म्हणून तुम्हीच डोक्यावर मिरवलं असतं.

साताऱ्याची ललिता बाबर माहीत आहे का ? २०१५ ची IAAF वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०१६ ची रिओ ऑलिम्पिकमध्ये धावणीच्या ३ हजार मी.
Read 9 tweets
14 Aug
काँग्रेसच्या कारभाराची अजून एक काळी कथा.!

'ए म्हातारे, तू इथे येत नको जाऊस.! तुझा मुलगा डाकू होता, दरोडेखोर होता, म्हणून इंग्रजांनी त्याला गोळी घातली.!'
गावाशेजारच्या जंगलात लाकडं गोळा करताना गांधीबाबाच्या एका अहिंसात्मक जमावाने त्या वृद्धेला अडवून धमकावलं.!

"नाही, हो.!
माझ्या चंदू ने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाव म्हणून हौतात्म्य पत्करल.!" त्या वयोवृद्ध स्त्री ने मोठ्या अभिमानाने सांगितलं.!

त्या वयोवृद्ध स्त्री चे नाव होते, जगरानीदेवी.!
आणि त्यांना पाच मुलं होती.! त्यातले चार आधीच गेले होते आणि सगळ्यात धाकटा मुलगा थोड्या दिवसांपूर्वीच
हुतात्मा झाला होता.! आणि ही आई त्याला प्रेमाने चंदू म्हणायची आणि बाकी सगळं जग त्याला आझाद हो, चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखायचं.!

भारत स्वतंत्र झाला होता.! आझाद चे मित्र, सदाशिवराव एक दिवस आझाद च्या आईवडिलांचा शोध घेत त्यांच्या गावात आले.!
स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण खूप काही
Read 16 tweets
11 Aug
शेतकऱ्यांसाठीची 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' योजना

Kisan credit card scheme :
मागच्या काही वर्षांत शेतीत मोठे बदल होत आहेत. शेतीमधील तंत्रज्ञान बदलाने आधुनिक शेतीकडे आताच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पूर्वी आणि आताही कोणत्याही संकटाना सामोरे जावे लागत आहे.
नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. येणाऱ्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे या समस्या घेऊन जात असतो. त्या समस्येवरील उपाय विचारण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही.मोदी सरकारने काढलेल्या योजनेचा
शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत (Kisan credit card scheme) किसान कॉल सेंटरमधील प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एका फोनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातच राहून समस्या निराकरण करता येत आहे.

या योजतंर्गत
Read 8 tweets
5 Jun
Web series Family Man2 आणि राजीव गांधी व श्रीलंकन तामिळी !!

भारत आणि श्रीलंका यांची राजकीय खेळी आणि तामिळ संघर्ष यांची कथा यात दर्शवली आहे.पण मी आज तुम्हाला श्रीलंकेच्या आणि भारताच्या काही घटना सांगू इच्छित आहे.भारताच्या स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर (१९४८) ब्रिटिशांनी
श्रीलंकेला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केला.श्रीलंकेच्या जनसंख्येत सगळ्यात मोठा समुदाय हा सिंहला समाज म्हणून होता.श्रीलंकेच्या स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेत राहणारा सगळ्यात मोठा समूह सिहाला हा होता.जेव्हा भारत आणि श्रीलंके च्या ब्रिटिश राजवटी मध्ये श्रीलंके मध्ये
मोलमजुरी करण्यासाठी भारतातून भरपूर प्रमाणात भारतातल्या तामिळींना श्रीलंके मध्ये नेण्यात आले.श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर दुसरा मोठा समुदाय म्हणजे तामिळ पण होता.त्या नंतर हळू हळू तामिळी जनतेचे शोषण होऊ लागले,याच कारणास्तव तामिळी जनतेच्या हितासाठी तिथे छोटेमोठे गट तयार झाले (
Read 20 tweets
2 Jun
अरे !! जातीवादी आणि सेक्युलर प्लिल्ल्यांनो !!

शेवट पर्यन्त वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा .. मित्रांनो
या या इकडे या.. सौदी अरेबिया मध्ये मशिदीच्या भोंग्यावर निर्बंध आलेत.
सोनू निगम ला शिव्या घालणार्त्यांनो मुस्लिम देशात हाच मुद्दा उचलला गेला .जो मागच्या काही 1/4
वर्षांपूर्वी सोनू निगम ने उचलला होता."" झोप मोड होणे "" याच मुद्दयांवर तिथल्या नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आहे.सोनू निगम व टीकेची झोड उडाली होती आता त्या सेक्युलर आणि जातीवाद्यांनी यावर बोलावे.तिथे लहान मुलांची झोप उडते म्हणून तिथल्या सरकार ने मागील आठवड्यात भोंग्याचा 2/4
आवाज कमी असावा असे आदेश काढले आहेत. अजानच्या मोठ्या आवाजाने झोप मोड होते अश्या तक्रारी आल्या होत्या सौदी अरेबिया मध्ये म्हणून हि कारवाई केली.नमाज अदा करण्यासाठी अजान ची कशाला वाट बघायची ? जनतेला भडकावणारे सौदी अरेबियाचे शत्रू आहेत असे विधान तिथले इस्लामिक कार्यमंत्री 3/4
Read 4 tweets
1 Jun
मित्रांनो!!

तुम्ही जवळपास सगळ्या हिंदी भाषी कलाकारांना follow केले असेल. पण आपल्या मराठी कलाकरांना तुम्ही सगळे विसरलात..
@SachinPilgaonkr 6,510Followers
@SarafAshok 4,934Followers
@maheshkothare 41KFollowers
ज्यांनी ३-४ दशके मराठी रंगभूमी गाजवली त्यांना आपण 1/2
अशा प्रकारे सन्मान देणे योग्य नाही.लाखो च्या संखे ने त्यांना follow करा.अरे ते साऊथवाले बघा त्यांच्या चांगल्या कलाकारांना कशे दुधाने अभिषेक घालतात मी तर तुमहाला ते करायला नाही सांगत पण निदान त्यांचे followers बघून मलाच लाज वाटली. प्रत्येक मराठी twitter handle ने त्यांना follow2/2
करा. त्यांना योग्य तो सन्मान द्यावा हि विनंती.
@Harshal13898031 @malhar_pandey @gajanan137 @QuiteSubtle_ @onlyonenetra @BalshaliBharat @ABHIca92 @researchanand @t_hemant @Real_Hemlata @RaneManoj1993 @sonali_rane3008 @The_NitinD @MH12_PUNE @Arya00716 @LakhobaLokhande
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(