पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...

टप्पा १:- १९५० ते १९७५

या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती.
सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक...
मोठे वाडे...
दांडगा रुबाब...
निसर्गावर चालणारी शेती...
अगदी १० वी-१२ वी शिकलेले सुद्धा शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले. तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळावायचे.
अनेक पदवीधर PSI, Dy. SP, तहसीलदार त्या काळात झाले.
नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...
उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती.
हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.

टप्पा २:- १९७५ ते १९९५

देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.
शेतीची विभागणी सुरु झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले.
बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.
शेती आता भांडवलदाराची होऊ लागली.
विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या.
पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली.
राजकारण गावागावात घुसलं.
पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या.
बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले.
स्पर्धा वाढली.
आता नोकरी सोपी राहिली नाही.
हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला.
वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली.
२० एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या फुकू लागला, पोरं बेकार फिरू लागली.

टप्पा ३:- १९९५ -२००९

हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ.
परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले.
मोठे उद्योग यांनी काबीज केले.
हॉटेल शेट्टी लोक, दूध, पेपर, भाजीपाला, टॅक्सी, पाणीपुरी, किरकोळ दुकानदारी आदि उत्तरेतील लोकांनी काबीज केली.
सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पम्प, बिअर बार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली.
मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडणे, बोअर मारणे, स्पर्धा परीक्षा तयारी करणे, भरतीला जाणे, पोराला हायस्कुल वर चिटकवणे ह्यातच गुंतलेला दिसला.
२० एकर जमीन वाटण्या होऊन, मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते.
अजूनही पाटीलकी व जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता.
टप्पा ४:- २००९ ते २०२०

ग्लोबलायझेशन झाले, जगाचे पैसे भारतात आले.
पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती आल्या.
मग काय?
जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली.
राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा 'मुळशी पॅटर्न' झाला.
जमीनदारी संपली, पोरं बेकार किंवा पुणे-मुंबईत ८-१० हजारांच्या नोकऱ्या करू लागली.
आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही.
खरी, बिकट गरिबी सुरु झाली.
पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला.
बापाकडे लग्नाला पैसा नाही.
मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या.
गावचा जमीनदार हमाली करू लागला.
व्यापारी तृतीय म्हणायचे त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं ही वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अश्या नोकऱ्या करू लागली व जयंती साजरी करणेसाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली.

टप्पा ५:- २०२० ते २०३०
इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल.
ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार.
नोकरी हा विषय संपला आहे.
नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल.
उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल.
पैसा न कामविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही.
शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल.
अजून वेळ गेली नाही.
शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा.
नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.

जो चूक करतो तो माणूस,
तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस,
जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस.
अजुन वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्याच चुका पुन्हा होणार नाहीत हे पहाण्यासाठी.

आपल्या माणसाला साथ द्या,
आपल्या माणसाला मोठ करा.
आपल्या माणसाचे पाय ओढणे थांबवा.
आपणच आपल्या माणसाला साथ दिली पाहिजे.
(सत्य परिस्थितीवर आधारीत असलेला हा लेख सोशल मीडियावरून घेतलेला.)मी स्वत: लीहीलेला नसुन मला आवडलेला आहे,आपणासही नक्कीच आवडेल बघा आपल्या पुढच्या पीढ्या वाचवता आल्या तर छानच 🙏🙏

@threadreaderapp Plz unroll

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ADITI Gujar

ADITI Gujar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AditiGujar

2 Oct
आजचे ज्ञान..

आज अख्खी ज्ञानामृताची बाटली घेऊन आले आहे🤣🤣🤣

तरी सर्वांनी लाभ घ्यावा.

स्वर्गात जायचे असेल तर आई चे पाय दाबून झोपत जा..
मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..

काही चेहरे मॉर्निंग वॉक ला जाण्यासाठी भाग पाडतात..😌
काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत..
फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात..

माझ्या काही नातेवाईकांचे फोन नंबर्स मी..
त्यांचा फोन कधीच न उचलण्यासाठी सेव्ह केलेत..🙂
त्यांनीही माझा नंबर त्यासाठीच सेव्ह केलाय..तो भाग वेगळा..😒
रडल्या नंतर मन मोकळं होवो ना होवो पण..
नाक मात्र नक्की मोकळं होत..🙂

चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य..
"माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं..😣😪

तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी..
ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..😝
Read 9 tweets
2 Oct
सारे सारे निघून गेलेत
"कहीं दूर, कहीं दूर"

लता, आशा आता गात नाहीत

भीमसेन, कुमारचे सुर हरवले

शिवकुमार, हरिप्रसाद ही आता केव्हातरी

आर डी, लक्ष्मी-प्यारे शांत झालेत

कपिल, गावस्कर, तेंडुलकर आता खेळत नाहीत

प्राण, कादर खानची दादागिरी संपलिये

अमिताभ आता फाइटिंग करत नाही
रेखा, हेमा, जीनत, परवीन
सा-यांचं सौंदर्य संपुन गेलय

अटलजींचं ओघवतं हिंदी,

इन्दीवरच्या गाजलेल्या मैफिली

जगजीत, मेहन्दीचा दर्दभरा आवाज

रफी, किशोरची हृदयातली साद

मुकेशचं कारुण्यं, मन्ना डेचा पहाड़ी सुर

सारे सारे निघून गेलेत
"कहीं दूर, कहीं दूर"
रेश्माची तानही विरून गेलीये

तलतची मखमल विरून गेलीये

पु.लंचं मिश्किलपणे गोष्टी सांगणं

बापट, विंदा, पाडगावकरांचं कविता ऐकवणं

हृदयनाथ, ग्रेसच्या अविस्मरणीय मैफिली

पल्लेदार संवादांनी जीवंत झालेला
काशीनाथ घाणेकरांचा संभाजी

कड़क, शिस्तप्रिय तरीही प्रेमळ, हवासा
Read 13 tweets
2 Oct
लग्नानंतर प्रथमच माहेरी आलेल्या मुलीचे माहेरपण आठवडाभर चालले. सगळा आठवडा तिला हवं ते करण्यात सरला.
परत सासरी जातांना वडिलांनी तिला एक सुगंधी अगरबत्ती पुडा दिला. "जेव्हा सकाळी पुजेला बसशील तेव्हा ही अगरबत्ती लाव बेटा", असं आठवणीने सांगितले.
आई म्हणाली "असं अगरबत्ती देतं का कुणी, ती प्रथमच माहेरपण करून सासरी जाते आहे, काहीतरी मोठं द्यायला हवे होते "
तसं वडिलांनी खिशात हात घातला अन् असतील तेवढे पैसे तिच्या हातात दिले.
सासरी पोहचल्यावर सासुने सुनेच्या आईने दिलेल्या सगळ्या वस्तु बघितल्या. बाबांनी दिलेला अगरबत्ती पुडा बघुन नाक मुरडले.
सकाळी मुलीने अगरबत्तीचा पुडा उघडला. आत एक चिठ्ठी होती.
"बेटा ही अगरबत्ती स्वतः जळते, पण संपूर्ण घराला सुगंधी करून जाते.
Read 8 tweets
30 Sep
सावधान, श्रीकृष्ण जिवंत आहे !!🦚

कृष्ण अंधारात जन्माला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
एक बाप मुलाला म्हणाला, " आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ. "
मुलगा भिंतीवर चढला.
बाप म्हणाला, " आता खाली उडी मार. मी आज तुला मोठा धडा शिकवत आहे."
मुलगा घाबरला. दहा फूट खाली उडी मारायची हिंमत होत नव्हती.
बाप म्हणाला, " मार उडी. काळजी करू नकोस,
मी तुला झेलून घेईन."

मुलाने डोळे बंद केले आणि उडी मारली. बाप बाजूला निघून गेला. मुलगा धाडकन खाली आदळला. जोरात आपटला. बापाने मुलाला सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवून उडी मारायची चूक केलीस. म्हणून पडलास. डोळे उघडे ठेवून, तुझ्या बळावर उडी मारली असती तर काही झालं नसतं.
Read 18 tweets
25 Sep
#कन्यादानच

गेले चार पाच दिवस समाज माध्यमातून एक विषय जोरदार चर्चेत आहे.आलिया भट नामक सिनेअभिनेत्री ने एका जाहिरातीत कन्यादान करण्याऐवजी कन्यामान करा असा अनाहुत सल्ला हिंदुंना दिला.वरवर पाहता एखाद्याला वाटेल की कन्येचा मान करायला सांगतेय यात काही चुकीचं नाही.परंतु त्या आधी ती
कन्यादाना ऐवजी हे करायला सांगतेय ते १००%चुकीचे आहे.कसे ते आपण नीट पाहिले पाहिजे.
सनातन वैदिक हिंदु धर्मात काही संकल्पना मांडल्या आहेत.दान हि देखील एक उदात्त संकल्पना आहे.सत्पात्री व्यक्तीलाच दान दिले पाहिजे असा शास्त्राचा दंडक आहे.योग्य काळी,योग्य वेळी एखादि जबाबदारी योग्य
व्यक्ती कडे सुपूर्द करणे हे दानात अभिप्रेत आहे.दान हे निर्जीव वस्तुचे होते हा एक गोड गैरसमज आहे.शास्त्रानुसार गोप्रदान,महिषीदान,मेषदान, भूदान अशी अनेक सजीवांची दाने देखील सांगीतली आहेत.त्यामुळे हा मुद्दा आपसुकच बाजूला होतो.
दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.शास्त्रानुसार कौमार्य
Read 14 tweets
24 Sep
लेखन प्रपंच करावासा वाटतोय.

काल प्रसिध्द हिंदुत्वनिष्ठ लेखक भागवत व रामायणाचे अभ्यासक डॉ.सच्चिदानंद शेवडे व गणकप्रवर सिध्दांतिज्योतिषरत्न डॉ.गौरव देशपांडे या दोन मान्यवरांशी चर्चा करुनच आज हा विषय मांडत आहे.

परवा पासुन चार पाच महिलांनी दुरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क केला व
एक विचारणा केली. गुरुजी नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात व देवीची नवग्रहांची कृपा प्राप्त करुन घ्यावी असे मेसेज सोशल मिडिया द्वारे प्रसारीत होत आहेत, हे सत्य आहे का?

काही महिलांनी तर नऊ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले, गऴ्यातले अलंकार हवेत व कोणते
दागिने घालावेत व त्यांनी देवीची कशी कृपा होते याचेही मेसेज आपणास आले आहेत असे सांगीतले. धर्मशास्त्रात असे काही दिले आहे का? हे विचारले.

गरबा व दांडिया खेऴ हाच देवीला आवडतो व तो खेऴलात कि "लक्ष्मी प्राप्त "होईल अशाही चर्चा होताहेत.

यात सत्यता आहे का? गुरुजी धर्मशास्त्रात हे
Read 20 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(