स्वराज्य म्हणजे परकीय सत्तेच्या राजकीय दास्यापासून मुक्तता एवढाच मर्यादित अर्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्यास प्राप्त होत नाही; तर परकीय सत्तेप्रमाणेच स्वकीय जुलमी लोकांपासूनही मुक्तता‚ हाही अर्थ स्वराज्यात अभिप्रेत होता!
त्याचबरोबर स्वराज्यात स्वधर्म व स्वसंस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे‚ असाही त्यांचा आग्रह होता. या दृष्टिकोनातून महाराजांच्या स्वराज्याच्या कार्याकडे पाहिले की‚ त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महत्ता द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही.
केवळ प्रशासन‚ लष्कर‚ आरमार‚ दुर्ग‚ व्यापार‚ उद्योग या क्षेत्रांतच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नवे युग सुरू केले असे नाही‚ तर धर्म व भाषा यासारख्या सामाजिक क्षेत्रांतही नवे पायंडे पाडले‚ नवे दंडक निर्माण केले.
धर्मांतर होऊन बाटलेल्या पूर्वाश्रमीच्या हिंदूंना परत स्वधर्मात घेण्याचा पायंडा महाराजांनीच पाडला; आणि कर्मठ हिंदू समाजासमोर एक पुरोगामी आदर्श उभा केला. भाषेच्या क्षेत्रात तर अरबी व फारसी या परभाषांचा प्रभाव पराकोटीस पोहोचला होता.
परकीय भाषांनी मराठी मायबोली जवळजवळ गिळंकृत केली होती. तिचे स्वत:चे अस्तित्वच नष्ट होत चालले होते. भाषा ही कोणाही संस्कृतीचा आत्माच असते. या संस्कृतीच्या आत्म्यास परभाषांच्या मगरमिठीतून सोडविण्याचे महान सांस्कृतिक कार्य महाराजांनी केले आहे.
खालील पुस्तकातून ~

शिवछत्रपती : एक मागोवा (संशोधनात्मक)
लेखक - प्रा. डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार
मेहता पब्लिशिंग हाऊस

#LetsReadIndia
| #शिवजयंती | #म | #मराठी | #रिम | #पुस्तक |

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with धनेश दांगट | Dhanesh Dangat

धनेश दांगट | Dhanesh Dangat Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @DangatDhanesh

Feb 14
कौन जात हो भाई?
“दलित हैं साब!”
नहीं मतलब किसमें आते हो?
आपकी गाली में आते हैं
गन्दी नाली में आते हैं
और अलग की हुई थाली में आते हैं साब!
मुझे लगा हिन्दू में आते हो!
आता हूँ न साब! पर आपके चुनाव में।
क्या खाते हो भाई?
“जो एक दलित खाता है साब!”
नहीं मतलब क्या-क्या खाते हो?
आपसे मार खाता हूँ
कर्ज़ का भार खाता हूँ
और तंगी में नून तो कभी अचार खाता हूँ साब!
नहीं मुझे लगा कि मुर्गा खाते हो!
खाता हूँ न साब! पर आपके चुनाव में।
क्या पीते हो भाई?
“जो एक दलित पीता है साब!
नहीं मतलब क्या-क्या पीते हो?
छुआ-छूत का गम
टूटे अरमानों का दम
और नंगी आँखों से देखा गया सारा भरम साब!
मुझे लगा शराब पीते हो!
पीता हूँ न साब! पर आपके चुनाव में।
Read 5 tweets
Oct 11, 2021
तो दीड वर्षांचा असताना त्याच्या आईने आणखी एका मुलाला जन्म दिला, दुर्दैवाने तो तीनच महिन्यांत गेला. त्यानंतर दोन वर्षांनी त्याला एक बहीण मिळाली; पण तीसुद्धा चार महिन्यांत गेली. पुढे अडीच वर्षांनंतर त्याच्या आईने चौथ्या मुलाला जन्म दिला; पण वर्ष होण्याच्या आत तेसुद्धा देवाघरी गेले.
भावंडांशी खेळण्याच्या वयात त्याने एकापाठोपाठ एक तीन भावंडं गमावली. त्या वेळी तोही लहान असल्याने त्यांचं जाणं त्याला समजण्याच्या पलीकडे होतं. त्यात घरातलं दु:खी वातावरण, ताण, आईचं रडणं यांमुळे तो जास्तच एकटा पडला आणि चिडचिडा झाला. यातून हळूहळू तो खूप हट्टी झाला.
तो तीन वर्षांचा होईपर्यंत बोलत नव्हता. अगदी क्वचित एखादं अक्षर उच्चारायचा. त्यामुळे ‘आपला एकुलता एक मुलगा मुका तर नाही ना’ अशी भीती त्याच्या आईला वाटायला लागली होती. म्हणून त्याच्या आईच्या वडिलांनी त्याला अक्षरं शिकवायचं ठरवलं. त्यासाठी ‘अक्षर अभ्यासम’ हा विधी करावा लागणार होता.
Read 14 tweets
Oct 11, 2021
माझा मुद्दा

महाराष्ट्र राज्य सदैव संबंध देशाला योग्य दिशा दाखवण्याच्या कामगिरी मध्ये अग्रगण्य व अग्रेसर राहला आहे. आज महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या भावना, आक्रोश व संताप यांचा सन्मान करत राज्यव्यापी बंद पुकारला आहे.
देशात गेली कित्येक दिवस पंजाब व हरियाणा येथील शेतकरीवर्ग मोदीच्या भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी, अन्यायकारक व महागाईला प्रोत्साहन देणाऱ्या काळ्या कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय. केंद्रातील मोदीचे भाजप सरकार ते आंदोलन दमनशाही करून चिरडण्याचे काम करत आहे.
ज्या मध्ये आतापर्यंत ४०० शेतकरी आंदोलकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.

यात कहर म्हणजे मोदीच्या भाजप सरकार मधील केंद्रीय गृहराज्य मंत्र्याने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करण्यासाठी...
Read 6 tweets
Oct 10, 2021
देशातील शेतकरीवर्ग आपल्या देशचा कणा आहे आणि केंद्रातील भाजपचे मोदी सरकार हा कणा मोडायला निघाले आहे, आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना गुलामीच्या दुष्टचक्रात कायमचे कैद करून संपवायला निघाले आहे. आज देशातील जनता महागाईने होरपळत आहे.
तरूणवर्गला बेरोजगारीने जर्जर केले आहे, देशातील शेतकरी मरत आहे. तो केंद्र सरकारने शेतीसंबंधी आणलेल्या काळ्या कायद्यातील ज्या त्रुटी आहेत, त्याबाबत पुनर्विचार करत ते कायदे मागे घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय.
तगोरगरीब शेतकरी आंदोलकांवर दादागिरी करत आंदोलन दडपण्याची धडपड करणारे केंद्रातील मोदी सरकार आणि त्या सरकार मधली केंद्रीय गृहराज्य मंत्र्याने शेतकऱ्यांबाबत केलेल्या प्रक्षोभक भाषणाचा निषेध करण्यासाठी लखीमपुर येथे जमलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवत त्यांना चिरडण्याची घटना घडली.
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

:(