Mahesh Profile picture
अतार्किक
Nov 13, 2020 5 tweets 2 min read
#थ्रेड

तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायचे तेल' परवडत नाही.

पु.ल

किराणा दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता.
१/५
👇👇 तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.
.
दुकानदार "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला.
.
ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."

२/५
👇👇
May 25, 2020 8 tweets 2 min read
थ्रेड
#वाचलेलं_आवडलेलं
भावाच्या वाटणीच्या तुटपुंज्या शेतीत आणखीन वाटणी नको म्हणून मुंबई-पुण्याची वाट धरलेला "गावकरी".
गावी आपलं ऐटबाज, टुमदार,अभिमानान दाखवता येईल अस घर असावं म्हणून स्वप्न रंगवत शहरात राबणारा "गावकरी".
#म
#मराठी
१/८ मुंबई पुण्यासारख्या महानगरात आपली वेगळी अस्मिता दाखवण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या नावाने महोत्सव भरवणारा "गावकरी".
गावच्या शाळा, देवळांचे जीर्णोद्धार करताना शेजारच्या गावपेक्षा आपल देऊळ भव्य असाव अशी अपेक्षा ठेऊन मुंबईत गावच्या देवळासाठी वर्गणी जमा करत फिरणारा "गावकरी".
२/८
May 18, 2020 4 tweets 2 min read
#थ्रेड

मृत्यूपूर्वी वडिल आपल्या मुलाला म्हणाले, "माझ्या आजोबांनी मला दिलेले हे घड्याळ आहे. हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे. मी ते तुला देतो, तु दागिन्यांच्या दुकानात जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे आणि ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा. "
#म
#mondaythoughts
👇👇 मुलगा दागिन्याचा दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला, आणि म्हणाला, "त्यांनी १५० रू ऑफर केले कारण ते फारच जुने आहे."

वडिल म्हणाले, "आता मोहरांच्या दुकानात जा."

मुलगा मोहराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येवून म्हणाला, "त्यांनी २० रू अॉफर केले कारण ते खूप खराब आहे."
👇👇
Apr 11, 2020 9 tweets 6 min read
#गुलामगिरी च्या निमित्ताने,
महात्मा ज्योतिबा फुले यांना सत्यशोधक, सुधारणावादी का म्हणतात याचा प्रत्यय #गुलामगिरी वाचताना अगदी पहिल्या ओळीपासून येतो. त्यांनी अत्यंत निर्भीडपणे, छातीठोकपणे आपले म्हणणे मांडलेले दिसून येते. इंग्रजदेखील सुधारणावादी मताचे असल्याने (१/८) 👇 ज्योतिबांना त्यांचे सत्यशोधन/ त्यांचा अभ्यास अशा रितीने पुस्तक रूपाने लोकांसमोर आणताना एकप्रकारे बळ नक्कीच मिळाले असणार परंतु सरळ सरळ व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह लावल्याने विरोधही कशाप्रकारे झाला असेल याची कल्पनाही न केलेली बरी. (२/८) 👇