Discover and read the best of Twitter Threads about #गुलामगिरी

Most recents (3)

जोतिबा फुले हे माझे शाळेत असल्यापासून ते त्यांचे साहित्य अभ्यासेपर्यंत आदर्श होते; मात्र फुलेंचे साहित्य वाचल्यानंतर माझे फुल्यांविषयीचे मत बदलले. माझे फुलेंबद्दल मत बदलण्याच्या कारणाचे स्पष्टीकरणही मी येथे सप्रमाण देतो.
छत्रपती शिवराय हे अखिल महाराष्ट्राचे दैवत आहे. शिवरायांबद्दल एकही अपशब्द मराठी माणसाला सहन होत नाही. याचप्रमाणे वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळ असल्याने तो संप्रदाय उभे करणारे व वाढवणारे
संतही आपल्याला शिवप्रभूंइतकेच वंदनीय असल्याने संतांबद्दल कुणी काढलेले अनुचित उद्गारही खऱ्या मराठी माणसाला सहन होत नाहीत.
फूलेंनी त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकांमध्ये (शेतकऱ्याचा आसूड व गुलामगिरी) ब्राह्मणांसोबतच हिंदू धर्म, हिंदू देवदेवता व संत यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत.
Read 24 tweets
गुलामगिरी ⛓

१८७३ साली म. फुले यांनी 'गुलामगिरी' हे जहाल व ब्राह्मणी व्यवस्थेला नेस्तनाबूत करणारे पुस्तक लिहिले. ब्राह्मणी गुलामिच्या विध्वंसनाला प्रारंभ झाला. बहुजनांच्या स्वातंत्र्य
लढ्यातील एक महान ग्रंथ म्हणजे 'गुलामगिरी' होय. अत्यंत पुराव्यानिशी व चिकित्सक
पद्धतीने फुल्यांनी या देशातील बहुजनांचा इतिहास मांडला आहे. वैदिक ब्राह्मणी ग्रंथातून मांडलेली त्यांची संस्कृती नाकारत असताना आपला इतिहास शोधण्याचा प्रयत्न सर्व प्रथम यात झालेला आहे. पुराणे म्हणजे भाकड कथा हे जरी खरे असले तरी त्यात बहुजनांचा इतिहास दडलेला आहे. तो मांडण्यासाठी
फुल्यांची दृष्टी घेऊन कार्य करावे लागेल. अलिकडे 'गुलामगिरी' या मांडणीच्या पद्धतीचा अत्यंत योग्य विकास डॉ. आ. ह. साळुंखे यांनी करून 'बळीवंश' हा ग्रंथ सिद्ध केला आहे. महात्मा फुल्यांचा इतिहास लेखनाचा हा अत्यंत योग्य व वास्तववादी अविष्कार आहे. बहुजनांच्या इतिहासाची पुनर्मांडणीच
Read 19 tweets
#गुलामगिरी च्या निमित्ताने,
महात्मा ज्योतिबा फुले यांना सत्यशोधक, सुधारणावादी का म्हणतात याचा प्रत्यय #गुलामगिरी वाचताना अगदी पहिल्या ओळीपासून येतो. त्यांनी अत्यंत निर्भीडपणे, छातीठोकपणे आपले म्हणणे मांडलेले दिसून येते. इंग्रजदेखील सुधारणावादी मताचे असल्याने (१/८) 👇
ज्योतिबांना त्यांचे सत्यशोधन/ त्यांचा अभ्यास अशा रितीने पुस्तक रूपाने लोकांसमोर आणताना एकप्रकारे बळ नक्कीच मिळाले असणार परंतु सरळ सरळ व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह लावल्याने विरोधही कशाप्रकारे झाला असेल याची कल्पनाही न केलेली बरी. (२/८) 👇
ज्या गोष्टी आम्हाला बालवर्गात छान छान गोष्टींच्या नावाखाली रंजकतेने सांगितल्या गेल्या त्या मागचा इतिहास इतका घाणेरडा, कपटाने, खोटारडेपणाने भरलेला आहे याची कल्पना कोणालाही नसेल.#गुलामगिरी मधील भाग ६ ते भाग ८ महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटतात..(३/८) 👇
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!