My Authors
Read all threads
।। श्रीशिवराजाभिषेक२०२० ।। #Thread

१. बुंदेलखंडहून छत्रसाल येऊन म्हणतात राजे मला तुमच्या स्वराज्यसेवेत घ्या.
२. कवी भूषण जे तिकवापूर हुन स्वराज्यात येऊन महाराजांची भेट घेतात आणि स्वराज्याचे होऊन बसतात.
३. समर्थ रामदास स्वामींनी महाराजांवर बहुमोल विश्लेषणाची उधळण केली आहे.

१/२५
४. ५०० कोसांवरच्या तंजावरहुन जयरामकवी सारखा बारा भाषांचा बृहस्पती राजेंच्या दर्शनासाठी येतो आणि दर्शन घेऊन शिवरायांचे चरित्र विविध भाषेत गुंफण्याचा संकल्प करतो. त्यास आरंभ ही करतो.
महाराजांच्या चरित्रातून त्या कवींना किती स्फूर्ती मिळाली!

२/२५
महाराजांच्या योग्यतेचा साक्षात्कार महाराष्ट्रपुरता मर्यादित न्हवता तर महाराष्ट्राबाहेर उत्तरेत आणि दक्षिणेत ही पसरलेली आहे ह्याचा भरघोस पुरावे म्हणजे वरील ४ उदाहरण. महाराज कर्तबगारांच्या, कलावंतांच्या, विद्वानांच्या, कृषीमुनींच्या मनात किती बिंबली होती हे लक्षात येतं.

३/२५
असे अनेक विद्वान, अनेक कवी, योद्धे राजांच्या चरणी निष्ठापूर्वक सेवा करीत होते. तरीही स्वकीय जनता, परकीय सत्ताधीश शिवरायांना सार्वभौम राजा आणि स्वराज्य हे मानतच न्हवते.
कुठे कमी पडतोय का?
कुणी ह्याबद्दल विचारही करीत न्हवते.
ही गोष्ट का कुणाच्या लक्षातही येत न्हवती.

४/२५
आणि एक योग्य आला!
श्री गंगेच्या तीरावर श्री काशिक्षेत्रात एक महापंडितांचे कान टवकारले गेले.
नौबती ऐकू येत होत्या.
जयघोष ऐकू येत होते.
किल्ल्यांचे महाद्वार उघडले जात होते आणि द्वारपाल मुजरे झाडत होते. तेच मुजरे स्वीकारत एक तेजस्वी पुरुष घोडदौड करीत सीमोल्लंघन करीत होते.

५/२५
त्यांच्या मागोमाग, सैन्य, घोडदळ भाले आणि नांग्या तलवारी नाचवीत होते. त्यात तेजस्वी भागव्या रंगाचा एक ध्वज फडफडत होता.
हर हर महादेव! हर हर महादेव! अशी इतिहासाची नवीन पाने दक्षिणेत लिहिली जात होती आणि हे सगळं ऐकून ह्या महापंडितांचे हृदय प्रफुल्लित होत होते.

६/२५
याच वेळी औरंग्याने काशिक्षेत्रात, पंजाबमध्ये व इतर ठिकानी केलेली भीषण कृत्ये, साधुबैरायांची हत्या, लोकांचे हाल, विश्वासघात, विध्वंस हे सारे त्या महापंडितांच्या डोळ्यासमोर उभे राहत होते आणि त्यामुळेच शिवरायांचे मोल त्यांना जास्त आकर्षित करत होते.

७/२५
अश्या महापुरुषाची भेट आपण घ्यायला पाहिजे. त्यांचे कार्य बघितले पाहिजे. हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय ते नजरेस दिसोई पाहिजे आणि म्हणून त्यांनी निश्चय केला.
ते स्वतः उठून महाराजांच्या दर्शनाला श्री क्षेत्र काशीवरून महाराष्ट्रात येण्यास निघाले.

८/२५
कोण होते हे?
आहो हे तर फार थोर पंडित!
साक्षात वेदोनारायण!
श्री काशिक्षेत्रातील अग्रपूजेचे अधिकारी!
प्रकांडपंडित श्रीमत् विश्वेश्वरभट्ट बिन दिवाकरभट्ट उर्फ गागाभट्ट.
मूळचे पैठणचे राहणारे हे भट्ट घराणे फार स्रेष्ठ परंपरेतील.

९/२५
आणि महाराजांना खबर मिळाली की गागाभट्ट गौतमीच्या तीरी नाशिकला येऊन पोहोचले आहेत.
खबर ऐकून महाराजांनी गागाभट्टांना मनाने रायगडावर घेऊन येण्यासाठी अधिकाऱ्यांना लवाजम्यासह नाशिकला रवाना केले.

१०/२५
गागाभट्टांची स्वारी गडा नजीक आल्याचे समजता महाराज स्वतः जातीने मंत्र्यांसह सामोरे गेले.
प्रगाढ विद्वान आणि प्रचंड शौर्याची भेट झाली.
स्वागत केले, सन्मान केले आणि सर्व लवाजम्यासह त्यांना घेऊन गडावर आले.

११/२५
पूजन, भोजण, राजाचा कारभार, लोकसंग्रह, साहित्यसंग्रह, सैन्य, किल्ले, पागा, अठरा कारखाने, समृद्ध खजिना, सुखी व संतुष्ट प्रजा पाहून अधिक आनंददायी व आदरणीय वाटले. मुख्य म्हणजे शून्यातून उभारलेले स्वराज्य पाहून गंगाभट्टांना खुप आनंद झाला.

१२/२५
गागाभट्टांनी अचूक ओळखले होते, जे कार्य प्रभू श्री रामाने केले, जे श्री कृष्णाने केले तेच कार्य ह्या महापुरुषाने केले आहे, करीत आहे.
ह्या कार्याला इतर उपमा नाही. राजांचे ऐतिहासिक मोल जाणले आणि नेमका महत्वाचा विचार अचानक बाहेर आला आणि स्वराज्याच्या नेमक्या नाडीवर बोट ठेवले.

१३/२५
गंगाभट्टांनी सांगायचे ठरवले आणि ते म्हणाले,
राजा, तु राजाभिषेक करून घे!
त्याशिवाय तुझ्या बहुमूल्य कार्याला पूर्णतः नाही!
राजाला राजाभिषेक हा झाल्याशिवाय जगाची मान्यता नाही!
एकवेळ जगाची मान्यता नसली तरी चालेल, पण आपल्या प्रजेची मान्यता ही मिळायलाच पाहिजे!
तख्त बसवावे!

१४/२५
गंगाभट्टांनी सांगायचे ठरवले आणि ते म्हणाले,
राजा, तु राजाभिषेक करून घे!
त्याशिवाय तुझ्या बहुमूल्य कार्याला पूर्णतः नाही!
राजाला राजाभिषेक हा झाल्याशिवाय जगाची मान्यता नाही!
एकवेळ जगाची मान्यता नसली तरी चालेल, पण आपल्या प्रजेची मान्यता ही मिळायलाच पाहिजे!
तख्त बसवावे!

१४/२५
आऊसाहेबांना काय वाटले हे थोर विचार ऐकून!
महाराष्ट्र भूमी तर साडेतीनशे वर्षांपासून ह्याच क्षणाची वाट पाहत होती. सततच्या यवनांच्या जुलमांना कंटाळलेली रयत हे ऐकून किती समाधान होणार होती हे त्या काळालाच माहीत.
आऊसाहेबांची आणि महाराजांनी सर्व विचार करून होकार दिला.

१५/२५
शिवरायांचा राजाभिषेक व्हायचा म्हणजे साधी सोपी गोष्ट न्हाई. किती वर्षांनी हा सुवर्ण दिवस उगवणार होता. शिवरायांचा राजाभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीशी लग्न!
भूमी आनंदाने सुखावली आनं लाजून लाजून चुर झाली.
केवढी लगीनघाई उडाली गडावर!

१६/२५
समारंभासाठी अंबऱ्या, अब्दागिरी, भगवे, पालख्या, मेने, मोर्चेले, छत्र, सुवर्ण कलश, पडदे, कपडे, शेले, शालू, हिऱ्यामोत्यांचे अलंकार, वस्त्रालंकार, सुगंधी पदार्थ, पंचार्त्या, धुपदीप, हत्ती, घोडे, गाई,
किती सांगू आणि काय सांगू!

हजारो प्रकारचे समान-साहित्य.

१७/२५
धार्मिक विधी लवकरच सुरू होणार होत्या. त्याआधी राजे किल्ले प्रतापगडावर गेले होते आई भवानीच्या दर्शनाला. कोणत्याही शुभकारणासाठी आपण जैसे देवाचे पूजन करतो तसे महाराज उभ्या महाराष्ट्राची कुलदेवता, महाराष्ट्रधर्मरक्षिका आई भवानीच्या दर्शनाला गेले होते.

१८/२५
गगभट्टांनी राजाभिषेकसाठी
" राजाभिषेकप्रयोग " नावाचा ग्रंथ ही लिहिला होते ज्यामध्ये राजाभिषेक कसा करावा, कोणत्या विधी घ्यावेत ह्याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती लिहून ठेवली होती. त्यानुसार आता विधींना प्रारंभ होणार होता, आणि पहिला विधी म्हणजे महाराजांची मुंज!

१९/२५
जेष्ठ शुद्ध चतुर्थी ही तिथी गंगाभट्टांनी निश्चित केली आणि चव्वेचाळीस वर्षांच्या राजांची मुंज आपल्या मुलांदेखत पार पडली. हा योग काही न्याराचं!
आता दुसऱ्या दिवशी दुसरी विधी. महाराजांचे लग्न होणार कारण मुंज झाल्यावरच लग्न करायचे असते. शास्त्र हे असे असते.

२०/२५
मुंजी नंतर राजांचे आणि सोयरबाईंचे समंत्रक विवाह झाला. अगदी सध्या पद्धतीने लग्न करण्यात आले. नंतर सकवारबाईसाहेब आणि पुतलाबाईसाहेब ह्यांची ही महाराजांसोबत लग्न झाले. मुंजी बरोबर आपल्या आईवडिलांच्या लग्नात उपस्तीत राहण्याचे गमतीदार भाग्य मुलांना लाभले.

२१/२५
नंतर, ऋत्विजवर्णन-पुण्याहवाचनपूर्वक यज्ञास प्रारंभ करून विनायकशांती करण्यात आली. नक्षत्रशांती, गृहशांती, ऐंद्रियशांती, पौरंदरीशांती इत्यादी विधी पार पडले. महाराज ह्याकळात व्रतस्थ होते. दुग्धपण व फलहार करून प्रत्येक धार्मिक विधी पार पाडीत होते.

२२/२५
जेष्ठ शुद्ध एकादशीस महाराजांची सुवर्णतुला झाली. ताराजूच्या एका पारड्यात महाराज आणि दुसऱ्या पारड्यात सोन्याचे होणं घातले जात होते. वजन समान झाले आणि महाराजांची तुळा झाली. सोन्याशिवाय चांदी, थांबे, कपूर, साखर वगैरे अनेक पदार्थांची तुळा करून दानधर्म करण्यात आला.

२३/२५
जेष्ठ शुद्ध द्वादशी उजाडला. सुर्योदयास तीन घटका अवधी असताना म्हणजे पहाटे पाच वाजता राज्यरोहणाचा मुहूर्त होता. हा पहाटेचाच मुहूर्त महाराजांना लाभत होता म्हणून तो गगभट्टांनी निश्चित केला होता.

२४/२५
आणि ज्या दिवसाची वाट अखंड महाराष्ट्र पाहत होता तो उजाडला. जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सरे, शालिवाहन शके १५९६, शनिवार, शिवराय सिंहासनाधिश्वर झाले!
राजे छ्त्रपती झाले!

२५/२५
वरील धागा आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपला अनुभव मला कळवावा.

#जय_शिवराय
#श्रीशिवराजाभिषेक२०२०
#हिन्दू_साम्राज्य_दिनोत्सव
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with द लायन किंग 🦁 👑 🤺🥇

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!