एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी!
गो ग्रीन नावाखाली आपण ५-१० झाडं किंवा फार तर २० झाडं लावली असतील. पण एका व्यक्तीने, एकट्याने एक कोटीं पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. कोण आहे ही व्यक्ती?
एक चांगला शिकला सवरलेला माणूस,
निसर्गाच्या रक्षणाचा ध्यास घेतलेला माणूस, निसर्गाचे महत्व कळलेला माणूस. पण सर्वज्ञात नसलेला अत्यंत साधा माणूस.सायकलवर फेरी मारायची, त्यामुळे कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडेच करतात. फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून यायच्या. हे मोठ्ठ काम ह्या व्यक्तीने हाती घेतलं
पण कुठेही बोभाटा न करता.गावातल्या काही लोकांना ह्या माणसाच्या वेड्या छंदाची माहिती होती. काही लोक वेडा माणूस म्हणायचे, उगाच वेळ वाया घालवतोय म्हणायचे. पण ह्याचे काम चालूच. ध्यासच घेतला होता जणू..!या अवलीयाचं नाव आहे दरीपल्ली रामय्या. तेलंगणा राज्यातल्या ‘खंमम’ जिल्ह्यातला हा
रहिवासी. फक्त त्याच्याच गावातल्या लोकांना त्याची ही करामत माहिती आहे. म्हणून काही लोक त्याला ‘चेटला रामय्या’ असे संबोधतात.चेट्टू म्हणजे झाड. (तेलगू भाषेत) म्हणून हा ‘झाडं वाला रामय्या’ झाला. आता सगळे त्याला ह्याच नावानं ओळखतात.हा रामैय्या नुसत्या बिया पेरत नाही तर, त्या बियांची
रोपंही तयार करतो. त्याने त्याच्या विभागाच्या नगर सेवकाला झाडांचे महत्व पटवून दिले. त्या नगरसेवकाच्या मदतीने रामय्याने खंमम जिल्ह्यातील एक कॅनॉल निवडला. चार किलोमीटरच्या परिसरात कॅनॉलच्या दोन्ही बाजूने अनेक वृक्षांची उभारणी केली.रामय्या नुसती झाडे लावून थांबत नाही तर, त्या
झाडांची वाढ होईपर्यंत त्यांची काळजी स्वतः सायकलवर फिरून घेतो. एखाद्या लहान मुलाला वाढवावं तसं त्या रोपांना वाढवतो. मोठी झालेली झाडं काही दिवसांत मोठे वृक्षही होतील.कोण कोणत्या प्रकारचे आहेत हे वृक्ष?रामय्यांनी लावलेल्या झाडांत असंख्य प्रकारचे वृक्ष आहेत. बेल , पिंपळ, कदंब,
कडूनिंब,चंदन,रक्तचंदन असे मोठे मोठे वृक्ष रामय्याने लावलेत. त्याचे गाव सगळीकडे हिरवे गार झाले आहे, तेही त्याच्या एकट्याच्या ध्यासातून.ह्या कामात रामय्यांच्या पत्नीने खूप मदत केली आहे. ‘टिक’ वृक्षाचं जे बी असतते, ते कठीण कवचाच्या आतमध्ये असते आणि ते फोडून ते बी बाहेर काढावे लागते.
एकट्या रामय्याने ते फोडण्याचा प्रयत्न केला पण ते बी मिळवायला वेळ बराच खर्च व्हायला लागला.पण ह्या कवच फोडण्याच्या कामात रामय्यांच्या पत्नीने खूप मदत केली आणि ते काम हलके झाले. कशी? तीही एक गंमत आहे.रामय्यांची बायको बसून चुलीपुढे स्वयंपाक करायची. त्याला एक कल्पना सुचली. त्याने
एका पोत्यात ह्या कवच असलेल्या बिया भरल्या आणि ते आसन तिला बसायला दिले. रोज रोज त्यावर बसून कवच फुटले आणि बिया मिळाल्या!सगळ्यांना प्रश्न पडतो की, रामय्याला या कामातून काय मिळतंय? रामय्या म्हणतो मला यातून शांती आणि समाधान मिळते म्हणून मी हे करतो. ‘वृक्षो रक्षती रक्षितः’
म्हणजे वृक्ष त्याचे रक्षण करणाऱ्याचे रक्षण करतात असे स्लोगन त्याने तयार केले आहे.एवढे करून रामय्या शांत बसत नाही तर, त्याने जिल्ह्यातल्या लायब्ररीतून अनेक वृक्ष लागवडीची माहिती देणारी पुस्तके मिळवली. शास्त्रीय पद्धतीने लागवड कशी करायची ह्याचीही माहिती मिळवली. आता त्यापद्धतीने
रोपे तयार करून त्याचे वाटप तो करतो आहे.एवढं करूनही तो थांबत नाही तर त्याने तेलगू भाषेतली काही स्लोगन तयार केली आहेत.ती तो गावातल्या भिंतींवर जनजागृतीसाठी छान रंगांनी रंगवतोय. याशिवाय तो जुन्या गाड्यांच्या क्लचप्लेट्स आणून पत्र्याचे तुकडे हिरव्या रंगाने रंगवतो.झाडे लावा झाडे जगवा,
निसर्गाशी नाते जोडा त्यावर असे स्लोगन लिहून जन जागृती करतो आहे.एकदा त्यांच्याच सायकलवरून पडून त्यांचा अपघात झाला. त्यांच्या पायाला जबर मार लागला.पायाचं हाड मोडलं आणि काही महिने त्यांचे बाहेर जाणे बंद झाले. पण त्यांचे काम थांबले नाही. पाय दुखावला पण हात तर काम करू शकतात ना.
! म्हणून रामय्याने घरात रोपं लावायचं काम चालू ठेवलं. त्याचं काम अजिबात थांबलं नाही.एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने रामय्यांच्या कामासाठी मदत म्हणून ५००० रुपये देणगी स्वरूपात दिले. तर तेही रामय्याने वृक्ष लागवडीच्या कामात खर्च केले.नसा-नसात निसर्ग प्रेम
भरलेल्या ह्या रामय्याला लोकांनी सल्ले दिले की, तू लावलेली झाडे तू विकून पैसे मिळव तुला भरपूर पैसे मिळतील. तर रामय्या म्हणाले,या काळ्या आईच्या पोटातून जन्मणाऱ्या झाडांना मी विकण्यासाठी नाही लावलं. या झाडांमुळे आपल्या सगळ्यांनाच फायदा होणार आहे. शुद्ध हवा,भरपूर पाऊस आणि पर्यावरणाचा
समतोल राखला जाईल, म्हणून मी ही झाडं लावलीत.रामय्यांचे म्हणणे आहे की, निसर्ग आपण न मागता आपल्याला उपयोगी पडणाऱ्या सगळ्या झाडांची निर्मिती करतो. आपल्याला चांगली फळे फुले देतो. तर मग आपले कर्तव्य आहे की आपण निसर्गाचे रक्षण केलेच पाहिजे.पुढे ते असेही म्हणतात की,तुम्ही तुमच्या
मुलांना फक्त फळे खायला देऊ नका. त्यांना त्या झाडाचे रोप आणून द्या आणि लावायला सांगा. त्याची निगा राखायला शिकवा. म्हणजे मुले मोठी झाल्यानंतर त्यांना त्याच झाडाची गोड फळे चाखता येतील. त्यातला आनंद काही वेगळाच असेल.आज जी लहान मुलं आहेत तीच उद्याचे नागरिक होणार आहेत. मग लहानपणीच
त्यांना निसर्गाचे ज्ञान द्या म्हणजे मोठेपणी त्यांना आनंद मिळेल. निसर्गाबद्दल प्रेम वाटेल.ते म्हणाले होते, मी सरकारलाच सांगणार आहे की तुम्ही सरकारी जमिनीत रक्तचंदनाची झाडे लावून ती मोठी झाल्यावर सरकारतर्फेच लिलावाच्या पद्धतीने विका. म्हणजे तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. ही रामय्यांची
सूचना सरकारने मान्य देखील केली.रामय्याची आपल्या कामावर निष्ठा आहे. त्यांनी केलेल्या कामाचे फळ आता सगळीकडून त्यांना मिळायला लागले आहे. लोक आता त्यांच्या कामाची वाहवा करायला लागले आहेत. त्यांना आपोआपच नावलौकिक मिळायला लागला आहे.काही राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांसोबत त्यांना
२०१७ साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार ही मिळाला आहे.प्रसिद्धीची आस नसलेल्या, धनाची लालसा नसलेल्या, पण निसर्गाची समृद्धी सतत वाढत राहो या उत्कट इच्छेने काम करणाऱ्या या अवलीयाला शतशः प्रणाम..!
#म #मराठी #महाराष्ट्र #अंघोळीचीगोळी
#खिळेमुक्तझाडं

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 💊 #BathPill 💊- Skip a Bath अंघोळीची गोळी

💊 #BathPill 💊- Skip a Bath अंघोळीची गोळी Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AngholichiGoli

Aug 7, 2020
🌳 झाडांच्या स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल 🌳

भारतीय स्वातंत्र्याची ७३ वर्ष यावर्षी पुर्ण होत आहेत. ब्रिटिशांशी चाललेल्या या लढ्यात अनेकांनी आपले योगदान दिले आणि अखेर ब्रिटिश राजवट खालसा झाली पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण देशांचे नागरिक Image
म्हणुन आपल्या मुलभूत गरजांसाठी काम करण्यास सुरुवात केली. पंचवार्षिक योजना, हरित क्रांती, दुग्ध क्रांती, माहिती आणि तंत्रज्ञान, उद्योग व्यापार, डिजिटल क्रांती सर्वच क्षेत्रांत आपण दिवसेंदिवस एक पाऊल पुढे टाकत आहोत. दुर्गम भागात रस्ते, लाईट, पाणी पोहचवण्यासाठी आपण पुढाकार घेत आहोत Image
आपल्याला अत्यावश्यक वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत. मात्र भारतीय स्वातंत्र्याची ७३ वर्ष उलटुन गेली तरी येथील झाडे अजुनही पारतंत्र्यात आहेत. हो नक्कीच आहेत कारण आपल्याकडे झाडांसाठी अनेक कायदे नमुद असले तरी हे कायदे मोडणाऱ्या एखाद्या व्यक्ती Image
Read 8 tweets
Aug 4, 2020
ढगांचे खुप प्रकार असतात. त्यातला एक प्रकार असतो Cirrocumulus ढग. हे आपलं विमान ज्या उंचीला उडतं ना त्याच्या थोडं खाली असतात (ढोबळ मानाने पृथ्वी पासुन 5 ते 10 हजार मिटर उंचीवर). पांढरे शुभ्र ढगांचे पुंजके आपण बघतो ना ते हेच. आपलं विमान यातुन जातं तेव्हा आपण रोमांचीत होतो. Image
हे पावसाचे ढग नव्हेत. पावसाचे ढग म्हणजे Nimbus. ते काळेशार असतात. ज्यांना बघुन कालिदासाला मेघदुतम सुचलं आणि त्याने एका निंबस ला आपल्या प्रेयसी पर्यंत आपला निरोप पोहोचवण्याची विनंती केली. ते असो, Cirrocumulus ढग पांढरे शुभ्र असल्याने आणि त्यांच्यात पाणी सुपर कुल्ड स्वरुपात
गोठलेले असल्याने पृथ्वीचे तापमान वाढू देत नाही. यांच्या वरुन उष्णता परत अवकाशात परावर्तीत होते वगैरे तो तांत्रिक भाग पुन्हा कधी तरी. मात्र आता Cirrocumulus ढग ग्लोबल वार्मिंग मुळे प्रचंड प्रमाणात कमी होत चाललेत. परिणामत: आपण 1, 1.5, 2 अंशाने तापमान वाढणार असं जे वातावरण निर्माण
Read 5 tweets
Jul 23, 2020
शिवाजी महाराज आणि पाणी व्यवस्थापन
गेले अनेक दिवस पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडला नाही. लोकांना #अंघोळीचीगोळी घ्यावी लागते का काय शी भीती आहे.पण शिवाजी महाराजांनी त्या काळात पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्तिथ पार पडले.आपण कधी महाराजांचा विचार आत्मसात करणार ?
सह्याद्रीच्या शिखर Image
माथ्यावर अनेक गड-किल्ले आहेत. त्यातील काही शिलाहार, यादवकालीन तर काही शिवकालीन गड-कोट आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या गड-किल्ल्यांच्याच आश्रयाने उभे राहिले होते, त्यामुळे गडावर त्यांचे विशेष प्रेम. डोंगरमाथ्यावरील या किल्ल्यांवर प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असे. Image
आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामधील गडाची राखण या विषयासंबंधी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, 'तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी Image
Read 23 tweets
Jun 29, 2020
काल एक ट्विट आले.
परिषद शाळा अजिवली,पनवेल.
शाळेतील सर्व झाडे विनाकारण तोडली आहेत.
कृपया चौकशी करण्यात यावी.@Nitin_Mali यांचे .
वाटले की
" प्रत्येक कायद्यासाठी स्वतंत्र पोलीस "
आपल्याला माहित आहे अन्याय झाला तर पोलीस मदत करतात.ही साधी सोपी परंपरा आहे. Image
गुन्हा सिद्ध करायला पोलीस न्यायदेवतेला साथ देतात.आज, भारतीय दंड संहिता (IPC) १८६० नुसार झालेल्या गुन्ह्यांसाठी पोलीस असतात असे आपल्याला ठोबळपणाने माहित आहे.
गुन्हा हा पोलीस स्टेशन मध्ये नोंदवला जातो,मग पुरावे, मग न्यायालयाच्या 'तारीख पे तारीख'.ज्यावेळेस न्याय नको पण ह्या Image
न्यायालयाच्या कचाट्यातून सोडव देवा अशी अवस्था होते तेव्हा कुठे न्याय मिळतो. पण मग त्याला न्याय म्हणायचे का ?
गुन्हा कोणत्या कायद्याखाली नोंदवायचा याबाबत पोलीस अनेकवेळा संभ्रमात असतात.अहो इथे लाखो कायदे आहेत. एक उदाहरण सांगतो. क्वारंटाईन झालेल्या एका इसमाला सोसायटीने लिफ्ट
Read 12 tweets
Jun 21, 2020
कोण म्हणतं, खिळ्याने फक्त चायनाचे #ChinaArmy सैनिकच जीव घेतात ?
शहरातली झाडं पहिली तर कळेल की खिळ्यांनी फक्त माणसंच नाही तर झाडंसुद्धा तीळ तीळ मारायची कला आपल्याच काही माणसांना अवगत आहे.हो ,आपल्याच माणसांना.
'हिंदी-चिनी भाई-भाई' यावर आजही आमचा ठाम विश्वास आहे. Image
माणूस वाईट नसतोच पण त्या माणसाचे काही दुर्गुण वाईट असतात.आपल्याला माणूस नाही तर त्यांच्यातला दुर्गुण संपवायचा आहे.
हो,२० सैनिक शाहिद झाले,वाईट झाले.सलाम सर्वांना.त्या सैनिकांनी आपल्या भारताची रक्षा केली होती. भारताची म्हणजे डोंगर,नदी,नाले,झाडे,माणसं,प्राणी,बिल्डिंगा,शेतं हे सगळे Image
...बरोबर ना ?
पण मग त्या सैनिकांकडूनच का अपेक्षा ठेवायची सगळ्या भारताची रक्षा करण्याची ?
आपण नाही का रक्षा करू शकत ? निदान आपल्या आजुबाजुंच्या झाडांची !
खिळे मारणे काय आणि खिळ्यांनी मारणे काय,दोन्हीही सारखेच.
चिनी सैनिकांबद्दल आमच्याही मनात राग आहे.
@PMOIndia @CMOMaharashtra Image
Read 8 tweets
Jun 21, 2020
#Yoga philosophy is one of the major orthodox schools of #Hinduism.
The yoga schools systematic studies to better oneself physically and spiritually. It has influenced all other schools if Indian #Philosophy.
@moayush
#YogaDay2020
Some of our old memories,activity on #YogaDay Image
The metaphysics of Yoga is built on dualist foundation Purusa ( Consciousness ) and Prakriti ( matter ).
Jiva ( a living being ) is considered as a state in which purusa is bounded to prakriti in some form.
#YogaDay
@CMOMaharashtra @PMOIndia Image
During a state of imbalance or ignorance , one or more constituents overwhelm the others , creating a form of bondage.
#YogaForHealth
Old memories of #अंघोळीचीगोळी volunteer. Image
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(