#सावरकरांच्या_आठवणी
भाग २० : #आत्मर्पणाचा_विचार

"माझ्या आठवणीप्रमाणे आपल्या आत्मर्पणाची प्रकट चर्चा तात्यांनी श्री.धनंजय कीर यांच्यापाशी केली होती.

१९६३ नोव्हेंबरमध्ये केव्हातरी संध्याकाळी खाली अंगणातून फेरी मारून झाल्यावर त्यांच्यापाशी तात्यांनी ही चर्चा केली.

(१/४)
कुमारील भट्ट, जगद्गुरू आद्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास यांच्याप्रमाणे आपणास आत्मार्पण करावे असे का वाटते, याविषयी सांगताना तात्या म्हणाले :
'वरील संतांना आपले जीवितकार्य पूर्ण झाले, आता कर्तव्य काही उरले नाही, अशी कर्तव्यपूर्ततेची भावना प्रबळ झाली -

(२/४)
- तशीच माझीही भावना झाली असल्याने मलाही त्यांच्याप्रमाणेच आत्मर्पणाचा मार्ग अनुसरावा असे वाटत आहे. माझा हा विचार पक्का होत आहे.'

हे सांगताना तात्यांचा स्वर रुद्ध झाला, कंठ दाटून आला. तेव्हा मला आता बोलणे अशक्य झाले आहे, असे सांगून तात्यांनी श्री.धनंजय कीर यांचा निरोप घेतला."
३/४

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with स्मित सुशील प्रभूखानोलकर 🇮🇳

स्मित सुशील प्रभूखानोलकर 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @smitprabhu

1 Jan
#सावरकरांच्या_आठवणी
भाग २१ : #गीतरामायण

सुप्रसिद्ध कवी कै.ग.दि.माडगूळकर यांनी त्यांचे #गीतरामायण हे काव्य लिहावयास आरंभ केला होता आणि काही कडवी रविवारच्या #केसरी त प्रसिद्ध होऊ लागली होती.
तात्याराव सावरकर ती कडवी अगदी न चुकता वाचत असत.

(१/८) ImageImage
ग. दि. माडगूळकरांच्या कल्पकतेची झेप आणि अर्थपूर्ण शब्दांची यथायोग्य योजना तात्यांना फार आवडे.

एकदा केसरी मधील #गीतरामायण काव्य वाचून झाल्यावर तात्या म्हणाले, “माडगूळकरांची प्रतिभा उत्तुंग आहे. ते खरे प्रतिभासंपन्न कवी आहेत."

(२/८) Image
#गीतरामायण ला पुढे प्रख्यात संगीत दिग्दर्शक #सुधीरफडके ह्यांनी अर्थपूर्ण चाली देऊन ते स्वतः त्याचे गायनाचे कार्यक्रम करीत.
त्या सुमारास एक घटना घडली.
तात्यांचा पुण्यात दौरा होता. सकाळी नगर वाचनालयात सभा होती. त्या सभेत सुरुवातीला सुधीर फडके यांनी #सागरास हे सावरकरांचे गीत गाईले. ImageImage
Read 9 tweets
1 Jan
नववर्ष इ.स.२०२१ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शंभूराजांना केलेला उपदेश मनी धरावा :

अखंड सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे ।
तजवीज करीत बैसावे । येकांत स्थळी ।।

काही उग्रस्थिती सांडावी । काही सौम्यता धरावी ।
चिंता पराची लागावी । अंतर्यामी ।।

(१/४) Image
श्रेष्ठी जे जे मेळविले । त्यासाठी भांडत बैसले ।
तरी मग जाणावे, फावले । गनिमासी ।।

ऐसे सहसा करू नये। दोघां भांडण तिसऱ्या जाय।
धीर करोन महत्कार्य । समजोन करावे ।।

आरंभीच पडीली धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती ।
याकारणे समस्ती । बुद्धी शोधावी ।।

(२/४) Image
समय प्रसंग वोळखावा । राग निपटुनी काढावा ।
आला तरी कळो न द्यावा । जनामाजी ।।

शिवराजांस आठवावे । जिवीत तृणवत मानावे ।
इहलोकी-परलोकी रहावे । कीर्तिरूपे ।।

शिवराजाचे आठवावे रूप ।
शिवराजाचा आठवावा प्रताप ।
शिवराजाचा आठवावा साक्षेप ।
या भूमंडळी ।।

(३/४) Image
Read 4 tweets
28 Dec 20
#सावरकरद्वेषींची_खरडपट्टी

#गुलाम मानसिकतेत जन्मलेल्या नि स्वार्थासाठी कणाहीन नेतृत्वाचा उदो उदो करणाऱ्या कर्तृत्वशून्य, निर्बुद्ध #सावरकरद्वेषी किड्यांची, सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी #भाषाप्रभू पु.भा.भावे यांनी आपल्या अग्रलेखातून केलेली खरडपट्टी आजही तेवढीच लागू पडते.

(१/८)
पु.भा.भावे लिहितात :
"भ्रष्टबुद्धी असलेल्याने सावरकरांस हिणविणे म्हणजे कर्दमांतील गांडुळाने फणीधरासमोर वळवळ करणे होय, जनान्यातील कंचुकीने अनेक समरप्रसंग गाजवणारऱ्या शुरांस युद्ध शास्त्रावर धडे देणे होय, दरिद्री खर्डेघाशाने कालिदासाच्या प्रतिभेसमोर वाकुल्या दाखवणे होय.

(२/८)
स्वतःच्या बायका परक्या घरी लोटावयास जे धैर्य लागते त्याच जातीचे धैर्य सावरकरांसारख्या नरशार्दुलावर भीरूतेचा आरोप करावयास लागते.

चोरट्या प्रणयाच्या अंधारऱ्या खोलीने अंदमानातिल तुरूंगाच्या अंधारकोठडीस खिजवावे, -
(३/८)
Read 8 tweets
28 Dec 20
#सावरकरांचे_विचार
भाग १६

" 'नाही, नाही, राष्ट्रे कधीही मरत नाहीत, परमेश्वर गांजलेल्यांचा कैवारी आहे. त्याने मनुष्याला स्वातंत्र्यात राहण्यासाठी उत्पन्न केले आहे. तुम्ही मनांत आणा की तुमचा देश स्वतंत्र झालाच!' याहून अधिक उत्साहक असा दुसरा कोणाचा #राष्ट्रमंत्र आहे ?

(१/८)
'एकदा मनुष्याने असा निश्चय केला की मी स्वातंत्र्य, स्वदेश व मानव्य यावर भक्ती करतो, की मग त्याने स्वातंत्र्यासाठी, स्वदेशासाठी व मानव्यासाठी लढलेच पाहिजे, अखंड लढले पाहिजे, सर्व आयुष्यभर लढले पाहिजे, शक्य त्या त्या शस्त्राने लढले पाहिजे, -

#स्वातंत्र्यवीरसावरकर
(२/८)
- तिरस्कारापासून तो मरणापर्यंत सर्व संकटे तुच्छ मानली पाहिजेत, द्वेषाला नि निंदेला तोंड दिले पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही फलाची आकांक्षा न करता फक्त कर्तव्य म्हणून त्याने तत्पर झाले पाहिजे !' याहून अधिक दिव्य असा दुसरा कोणता #राष्ट्रमंत्र आहे ?

#स्वातंत्र्यवीरसावरकर

(३/८)
Read 8 tweets
26 Dec 20
#सावरकरांचे_विचार
भाग १५

सन १९५२ मध्ये पुण्यात #अभिनवभारत सांगता समारंभानिमित्त #स्वातंत्र्यवीरसावरकर आले असता त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे कसबा पेठेतील तरुण मित्रमंडळाने योजले होते.

(१/५) Image
या समारंभाला सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कै.ग.वि.केतकरही उपस्थित होते.

त्या दाटीवाटीच्या समारंभातील भाषणात संदेश देताना सावरकर म्हणाले होते :
“हिंदूच्या हितार्थ झटणारे आपण #हिंदुत्वनिष्ठ आधीच मूठभर ! -

(२/५) Image
- अशा आपणा सर्वांनी समान कार्यक्रमावर एकत्र न येता, जर पक्षभेद किंवा दुय्यम मतभेदास्तव स्वतंत्रपणे कार्य करीत राहिलो तर हिंदुहिताचे, #हिंदुत्वरक्षणाचे ध्येय कधीच साधले जाणार नाही. कारण आपल्या या विघटन वृत्तीचा लाभ राष्ट्रविघातक कारवाया करणाऱ्या अन्यधर्मीयांना होतो.

(३/५) Image
Read 5 tweets
5 Sep 20
#चाणक्य
भाग १

यह धारावाहिक उस महापुरूष के जीवन, उनके विचारोंपे आधारित है, जिन्होंने #राष्ट्रहितसर्वोपरि विचार सर्वप्रथम रखा और #अखंडभारत को सशक्त एवं एकसंघ राष्ट्र बनाने का स्वप्न देखा!

इस धारावाहिक को मूर्तरूप देने वाले 'पागल' व्यक्ति का नाम है - डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी।

१/१०
चलिए देखते है #चाणक्य धारावाहिक से जुड़े कुछ दिलचस्प तथ्य:

१) लेखक एवं निर्देशक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदीजी ने पूरे ५ साल एकाग्र चित्तसे अनुसंधान (research) करने के पश्चात इस धारावाहिक की निर्मिती की है। मराठी, गुजराथी, हिंदी, अंग्रेजी एवं अन्य भारतीय प्रादेशिक भाषा -

२/१०
में चाणक्य एवं उस कालखंड के उपर लिखित कई पुस्तकोंका आधार बनाकर द्वेवेदीजी ने अपना अनुसंधान किया है।

२) धारावाहिक का प्रत्यक्ष छायाचित्रण शुरू होने के पूर्व ही द्वेवेदीजी ने पहले ३३ भागोंका लेखन पूर्ण कर दिया था।

३) ३३ से आगे सभी भागोंका लेखन करने का दायित्व जिस -

३/१०
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!