#सावरकरद्वेषींची_खरडपट्टी

#गुलाम मानसिकतेत जन्मलेल्या नि स्वार्थासाठी कणाहीन नेतृत्वाचा उदो उदो करणाऱ्या कर्तृत्वशून्य, निर्बुद्ध #सावरकरद्वेषी किड्यांची, सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी #भाषाप्रभू पु.भा.भावे यांनी आपल्या अग्रलेखातून केलेली खरडपट्टी आजही तेवढीच लागू पडते.

(१/८)
पु.भा.भावे लिहितात :
"भ्रष्टबुद्धी असलेल्याने सावरकरांस हिणविणे म्हणजे कर्दमांतील गांडुळाने फणीधरासमोर वळवळ करणे होय, जनान्यातील कंचुकीने अनेक समरप्रसंग गाजवणारऱ्या शुरांस युद्ध शास्त्रावर धडे देणे होय, दरिद्री खर्डेघाशाने कालिदासाच्या प्रतिभेसमोर वाकुल्या दाखवणे होय.

(२/८)
स्वतःच्या बायका परक्या घरी लोटावयास जे धैर्य लागते त्याच जातीचे धैर्य सावरकरांसारख्या नरशार्दुलावर भीरूतेचा आरोप करावयास लागते.

चोरट्या प्रणयाच्या अंधारऱ्या खोलीने अंदमानातिल तुरूंगाच्या अंधारकोठडीस खिजवावे, -
(३/८)
षंढ विलासांनी रंगलेली शरीरे मार्जित करणाऱ्या टरकीश टबाने महासागरांची पायमल्ली करण्यास सरसावावे, गहाण पडलेल्या चित्रमंदिरातील नकली पिस्तुलाने २८ ब्राऊनिंग पिस्तौलाची खिल्ली करण्यास धजावे अशातला हा प्रकार....निरर्गल नीचतेची मजल !

(४/८)
ज्वरदूषित घुंगुरटे चावे घेत उंच उडाले तरी काही त्याला गगनविहारी विनायकाची सर येत नाही, कागदी बावडी गिरक्या घेत कितीही नाचवली तरी ती मेघमालेचे वैभव हिरावू शकत नाही, नाटक्याने कितीही किंचाळ्या मारल्या तरी काही कुणी त्याला व्हिक्टोरिया क्राॅस बहाल करीत नाहीत.

(५/८)
जो स्त्रैण आहे तो स-आवेश व स-आविर्भाव कितीही बडबडला तरी त्याला पार्थाची सर येत नाही !

#मूर्तीमंतशौर्य हा एकाचा स्वभाव तर शौर्याच्या अभिनय हा दुसरऱ्याचा जन्मगुण!
एकाचे सख्य शूरांशी तर दुसऱ्याचे षंढांशी! रणभूमी हे एकाचे वांछित शय्यास्थान तर शय्यास्थान ही दुसऱ्याची वांछित रणभूमी!
रणचंडीस एकाने शीरकमलांच्या माळा घातलेल्या तर दुसऱ्याने गावभवानीस आपला मस्तकझेंडू अर्पण केलेला.

एकाने आजन्म शरचाप चालविलेले तर दुसरऱ्याने नुसत्या पिचकाऱ्या मारलेल्या.

विजनवासाचे लोखंडी लंगर एकाने तोललेले तर बाजारातल्या फुलमाळा झेलण्यात दुसऱ्याने धन्यता मानलेली.

(७/८)
सुताच्या राजकारणाची धनुकली वाजवणारा बोंद्या पिंजारी शिवधनुष्य पेलावयास गेला...आणि व्हायचे तेच झाले, ते दैवी धनुष्य उरावर घेऊन तो आता केविलवाणा बोंबलू लागला आहे..!"
- #भाषाप्रभू_पुभाभावे

#स्वातंत्र्यवीरसावरकर
#जाज्वल्यदेशाभिमानी
#वंदेमातरम् 🇮🇳

(८/८)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with स्मित सुशील प्रभूखानोलकर 🇮🇳

स्मित सुशील प्रभूखानोलकर 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @smitprabhu

28 Dec
#सावरकरांचे_विचार
भाग १६

" 'नाही, नाही, राष्ट्रे कधीही मरत नाहीत, परमेश्वर गांजलेल्यांचा कैवारी आहे. त्याने मनुष्याला स्वातंत्र्यात राहण्यासाठी उत्पन्न केले आहे. तुम्ही मनांत आणा की तुमचा देश स्वतंत्र झालाच!' याहून अधिक उत्साहक असा दुसरा कोणाचा #राष्ट्रमंत्र आहे ?

(१/८)
'एकदा मनुष्याने असा निश्चय केला की मी स्वातंत्र्य, स्वदेश व मानव्य यावर भक्ती करतो, की मग त्याने स्वातंत्र्यासाठी, स्वदेशासाठी व मानव्यासाठी लढलेच पाहिजे, अखंड लढले पाहिजे, सर्व आयुष्यभर लढले पाहिजे, शक्य त्या त्या शस्त्राने लढले पाहिजे, -

#स्वातंत्र्यवीरसावरकर
(२/८)
- तिरस्कारापासून तो मरणापर्यंत सर्व संकटे तुच्छ मानली पाहिजेत, द्वेषाला नि निंदेला तोंड दिले पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही फलाची आकांक्षा न करता फक्त कर्तव्य म्हणून त्याने तत्पर झाले पाहिजे !' याहून अधिक दिव्य असा दुसरा कोणता #राष्ट्रमंत्र आहे ?

#स्वातंत्र्यवीरसावरकर

(३/८)
Read 8 tweets
26 Dec
#सावरकरांचे_विचार
भाग १५

सन १९५२ मध्ये पुण्यात #अभिनवभारत सांगता समारंभानिमित्त #स्वातंत्र्यवीरसावरकर आले असता त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे कसबा पेठेतील तरुण मित्रमंडळाने योजले होते.

(१/५) Image
या समारंभाला सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कै.ग.वि.केतकरही उपस्थित होते.

त्या दाटीवाटीच्या समारंभातील भाषणात संदेश देताना सावरकर म्हणाले होते :
“हिंदूच्या हितार्थ झटणारे आपण #हिंदुत्वनिष्ठ आधीच मूठभर ! -

(२/५) Image
- अशा आपणा सर्वांनी समान कार्यक्रमावर एकत्र न येता, जर पक्षभेद किंवा दुय्यम मतभेदास्तव स्वतंत्रपणे कार्य करीत राहिलो तर हिंदुहिताचे, #हिंदुत्वरक्षणाचे ध्येय कधीच साधले जाणार नाही. कारण आपल्या या विघटन वृत्तीचा लाभ राष्ट्रविघातक कारवाया करणाऱ्या अन्यधर्मीयांना होतो.

(३/५) Image
Read 5 tweets
5 Sep
#चाणक्य
भाग १

यह धारावाहिक उस महापुरूष के जीवन, उनके विचारोंपे आधारित है, जिन्होंने #राष्ट्रहितसर्वोपरि विचार सर्वप्रथम रखा और #अखंडभारत को सशक्त एवं एकसंघ राष्ट्र बनाने का स्वप्न देखा!

इस धारावाहिक को मूर्तरूप देने वाले 'पागल' व्यक्ति का नाम है - डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी।

१/१०
चलिए देखते है #चाणक्य धारावाहिक से जुड़े कुछ दिलचस्प तथ्य:

१) लेखक एवं निर्देशक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदीजी ने पूरे ५ साल एकाग्र चित्तसे अनुसंधान (research) करने के पश्चात इस धारावाहिक की निर्मिती की है। मराठी, गुजराथी, हिंदी, अंग्रेजी एवं अन्य भारतीय प्रादेशिक भाषा -

२/१०
में चाणक्य एवं उस कालखंड के उपर लिखित कई पुस्तकोंका आधार बनाकर द्वेवेदीजी ने अपना अनुसंधान किया है।

२) धारावाहिक का प्रत्यक्ष छायाचित्रण शुरू होने के पूर्व ही द्वेवेदीजी ने पहले ३३ भागोंका लेखन पूर्ण कर दिया था।

३) ३३ से आगे सभी भागोंका लेखन करने का दायित्व जिस -

३/१०
Read 10 tweets
14 Aug
#अखंडभारत
"भारताच्या फळणीविरोधी आंदोलनात मी आघाडीवर होतो. परंतु शेवटी १९४७ मध्ये आपल्या मातृभूमीचे दोन तुकडे झाले. अशा प्रकारे पाकिस्तान अस्तित्वात आले तरी ती हानी भरून निघावी अशी घटना घडली, ती म्हणजे परकीय दास्यातून हिंदुस्थानचा फार मोठा भाग मुक्त करण्यात आपणाला यश मिळाले.
(१/६)
भारताच्या स्वातंत्र्याचे जे युद्ध आमच्या पिढीने सतत लढविले आणि ज्यामध्ये एक सैनिक म्हणून गेली पन्नास वर्षे मी दिलेली लढत, भोगलेले कष्ट नि केलेला त्याग आमच्या पिढीतील अन्य कोणाही देशभक्तापेक्षा उणा नाही. ते युद्ध मुक्त शेवटी आम्ही जिंकले !

#AkhandBharat
(२/६)
मुक्त आणि स्वतंत्र भारतीय राज्य जन्मास आले. माझा देश मुक्त झालेला पाहण्यास मी जगलो हे मी माझे मोठे भाग्यच समजतो.यातही काही संशय नाही की माझ्या कार्यातील एक भाग अपुरा राहिला.परंतु 'सिंधू पासून सागरापर्यंत पसरलेली ही आमची मातृभूमी पुन्हा अखंड करण्याचे ध्येय आम्ही सोडले नव्हते'.
३/६
Read 6 tweets
8 Jul
त्या साहसी उडीला आज ११० वर्ष पूर्ण !
तो दिवस होता ७ जुलै १९१० !

फ्रान्समधल्या मार्सेलिस बंदरावर हिंदुस्थानास निघालेली 'मोरिया' बोट काही काळासाठी स्थिरावली होती.

त्या बोटीत साखळदंडात कैद होते #स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
इंग्रजांचे अतिशय #डेंजरस् कैदी !

(१/१८)
कारण लंडनला, शत्रूच्या घरातच जाऊन सावरकरांनी तेथील भारतीय क्रांतिकारकांच्या सहाय्यानं #अभिनव_भारत या आपल्या क्रांतिकारी संघटनेचं जाळं विणलं होतं.
पिस्तुलं जमविली होती, बॉम्ब बनविण्याचं प्रशिक्षण मिळवलं होतं.
अगदी भारतात सुद्धा ते तंत्र आणि बॉम्ब पाठविले होते.

(२/१८)
भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा सावरकरांचा प्रयत्न होता कारण भारतीयांच्या इच्छेनुसारच आम्ही त्यांच्यावर राज्य करीत आहोत असा अपप्रचार ब्रिटिश करत होते.

सावरकरांच्या ब्रिटिशविरोधी कारवायांमुळे त्यांना अटक करण्याची संधीच ब्रिटिश शोधत होते.
(३/१८)
Read 19 tweets
3 Jul
मानवी शरीर निसर्गाने अतिशय सुदृढ बनवले आहे की, ते मोठमोठे आघात सहन करूनही जिवंत रहाते; परंतु आपल्या शरीरात काही अशीही स्थाने आहेत, ज्यांच्यावर आघात झाल्याने मनुष्याचा तत्काळ मृत्यू होऊ शकतो. यांना #मर्मस्थान म्हटले जाते. शिखेच्या (शेंडीच्या) अधोभागातही मर्मस्थान असते.
१/४
ज्याविषयी #सुश्रुताचार्य यांनी लिहिले आहे की,

" मस्तकाभ्यन्तरो परिष्टात् शिरा संधि सन्निपातो ।
रोमावर्तो धिपतिस्तात्रापि सद्यो मरणम् ॥ "

अर्थ : डोक्यावर जेथे केसांचा #भोवरा असतो, त्याखाली आतील भाग नसा आणि सांध्यांशी संबंधित असतो, त्याला #अधिपतिमर्म म्हटले जाते.

२/४
तेथे मार लागल्यास तत्काळ मृत्यू होतो.(सुश्रुतसंहिता)

ज्या ठिकाणी शिखा ठेवली जाते ते स्थान आपली सर्वांगे, मन आणि बुद्धी यांना नियंत्रित करते.आणि हे medical science ने सप्रमाण सिद्धही केले आहे.
केवळ टीकाच करायची आहे म्हणून आपल्या अज्ञानातून हजारो वर्षांपूर्वी सिद्ध केलेल्या -
३/४
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!