गेल्या आठवड्यात नागपुरात देवेंद्र फडणवीसांची "ऑफ द रेकॉर्ड" मुलाखत झाली. हेतुपुरस्सर (कदाचित) त्या मुलाखतीचे थेट प्रक्षेपण देवेंद्रजींच्याच पेजवरून करण्यात आलं. लगेच ती लिंक हटवण्यातसुद्धा आली. आणि ह्याचा जो काही अपेक्षित परिणाम हवा होता, (१/१६)
तो साधला गेला. त्या मुलाखतीत देवेंद्रजी ह्यांनी एक गौप्यस्फोट केला, जिथे ते म्हणाले होते की ८० तासाचं सरकार हे शरद पवारांच्या सहकार्याने बनले होते. अगदी सर्व खातेवाटप, पालकमंत्री सुद्धा ठरवून झाले होते. पण ऐनवेळी पवारांनी कच खाल्ली. शरद पवारांचा स्पष्ट उल्लेख हा ह्याचसाठी (२/१६)
महत्वाचं कारण एवढं तथाकथित बंड करूनही अजितदादांच्या पोर्टफोलिओत कसलीही तडजोड केली गेली नव्हती. खुद्द राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी त्या ऐंशी तासात अजितदादांवर मजबूत तोंडसुखसुद्धा घेतलं होतं. अजितदादा शांतपणे एवढंच म्हणत होते, सगळं सुरळीत होईल. कारण खरी वस्तुस्थिती फार (३/१६)
थोड्या लोकांनाच माहित होती. म्हणून तथाकथित बंड करूनसुद्धा अजितदादांवर पक्षशिस्तीचा बडगा उगारला गेला नाही.
त्यानंतर तीन चारच दिवसात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकरांच्या पहिल्या वर्षाच्या कार्याचे अवलोकन करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन होते तेंव्हा, 'आपल्याला (४/१६)
जास्त काळ विरोधी पक्षात राहायचे नाही' असे सूचक वक्तव्य करून देवेंद्रजींनी पुन्हा एकदा नव्याने त्याच चर्चेच्या दृष्टीने विश्लेषकांना लावले..
एका आठवड्याच्या अंतराने घडलेल्या ह्या दोन गोष्टी हेतुपुरस्सर कि उगाच सोडलेली पुडी?
मी लल्लनटॉप हे युट्युब चॅनेल नेहमी पाहतो. आता (५/१६)
त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला येऊ लागले आहेत. सर्वात पहिल्यांदा प्रभू चावलांची औपचारिक ओळख करून देताना, खानमार्केटच्या संबंधातील, जिथे शासकीय निर्णय आणि हालचाली सर्वात आधी कळतात, तिथली एक मातब्बर असामी, असं सौरभ द्विवेदी म्हणाले तेंव्हा प्रभू म्हणाले, की २०१४ आधी (६/१६)
परिस्थिती तशी होती, पण सध्या जोवर काही जाहीर होत नाही तोपर्यंत ह्या मोदीसरकारमध्ये काय चाललंय ह्याबाबतीत खान मार्केटसुद्धा अनभिज्ञ असतं..
माध्यमांना किती, काय, कसं आणि केंव्हा द्यायचं? हे मोदी-शहांना नेमकं कळतं.. "कुछ तो बडा होनेवाला है" ह्यापालिकडे फारसं कोणी जाऊ शकत नाही(७/१६)
देवेंद्रजींची शैली सुद्धा त्याच पठडीतली वाटते.
'८० तासाचा खेळ', जसा सर्वांच्या तोंडात बोटे घालायला लावणारा होता, तसं काही येत्या काळात घडू शकत नाही अशी छातीठोक हमीसुद्धा कोणीच देऊ शकत नाही.
त्यात मध्ये जयंत पाटील, नितीन गडकरी आणि देवेंद्रजी भेटलेसुद्धा होते. पत्रकारपरीषद(८/१६)
सुद्धा घेतली होती, अजेंडा वेगळाच होता.. कदाचित केवळ दाखवण्यापूरता? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणासाठी पवारसाहेब मोदी, शहा, निर्मलाजी ह्यांच्या भेटीला गेले होते. हे तसंच नसेल? असेल?
जेंव्हा देवेंद्रजींची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली (९/१६)
तेंव्हाचं त्यांचं भाषण हे दगाबाजी करून हाताशी आलेला विजय हिसकावून नेल्यावर त्या पराक्रमी पुरुषाचं जसं असेल तसंच होतं. तेंव्हाचं भाषण संपवताना त्यांनी सरळ सरळ त्यांचा हेतू स्पष्ट केला होताच. "जिथं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, तिथं काहीही होऊ शकतं.. आणि(१०/१६)
येत्या काळात काहीही होऊ शकेल.." असंच त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं होतं..
कर्नाटक, मध्यप्रदेश ह्या राज्यात पंधरा महिने झाले की सत्तापालट झाला होता. कर्नाटकात जनमत लाथाडून तर मध्यप्रदेशात सर्वात जास्त मतदान होऊनसुद्धा भाजपा अगदी काठावर हरली. काँग्रेसला ज्योतिरादित्यांना (११/१६)
सांभाळता आलं नाही. दोन्हीचे परिणाम आपण सर्व पहात आहोत.
मविआचे पंधरा महिने भरत आहेत. आणि त्यात देवेंद्रजींची ही विधाने. ह्याला केवळ योगायोग म्हणायचं? असेलही..
नागपूरच्या ह्या "ऑफ द रेकॉर्ड" मुलाखतीत देवेंद्रजींना हे असं राष्ट्रवादीसोबत जाणं का गरजेचं वाटलं? ह्यावर (१२/१६)
उत्तर देताना देवेंद्रजी एक वाक्य बोलले होते, "इफ यु डाय इन पॉलिटिक्स, देअर कॅन नॉट बी इथिकल पॉलिटिक्स.." म्हणजे जर तुम्ही राजकारणात मेलात तर तुम्हाला नैतिक राजकारण करता येणार नाही"
हा इशारा मला तरी महत्वाचा वाटतो.कोणतीही आतली म्हणतात अशी "इंसाईडर इन्फर्मेशन" मला मिळण्याचा(१३/१६)
संबंध नाही. पण जेव्हा हे असे संकेत सरळ सरळ देवेंद्रजींकडून मिळत असतात तेंव्हा पडद्यामागे नक्कीच काहीतरी "मोठं" चालू असेल(च) अशी शक्यता वाटते. कारण "मुंबई मनपा" ह्या सोन्याच्या कोंबडीचा २०२२ मधला निकाल आपल्या बाजूने लावण्याचे प्रयत्न 'सर्व'बाजूने मजबूत असे होतील हे सांगायला(१४/१६)
कोणताही राजकीय निरीक्षक लागणार नाही.. त्यासाठी वाट्टेल ते केलं जाईल..
कारण राजकारणात मृत्यू यावा असं कोणालाच वाटणार नाही.. कोणालाच..
आणि ह्या तिघाडीत कोणाची आणि कशी वासलात लावली गेलीये वा लावली जाणारे हे काळच सांगेल..
त्यामुळे, "इफ यु डाय इन पॉलिटिक्स..." हे(१५/१६)
ज्यांना कळतं, चांगलंच वळतं, त्यांच्याकडून येत्या काळात जे काही घडेल हे रंजकच असेल ह्यात वाद नाही..
पाहुयात..
- चेतन दीक्षित (१६/१६)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
कालपासून काही भाजपसमर्थकांच्या काही पोस्ट्स वाचतोय. कि आम्ही काय एवढं बोटचेपं शासन हवं म्हणून ह्या शासनाला निवडून दिलं का? केंद्रानं कडक पावलं का उचलली नाहीत $!आधीच? एवढे खासदार, आमदार वगैरे वगैरे असताना शेतकरी आंदोलनच वरचढ ठरलं.. वगैरे वगैरे+
ह्या सर्वांच्या भावनेबद्दल शंका नाहीच.. पण ह्या अनुषंगाने काही गोष्टींचा विचार आपल्यासमोर मांडतोय..
केंद्राने कडक पावलं उचलायची गरज होती म्हणजे नेमकं काय करणं गरजेचं होतं?
नाकेबंदी? लाठीचार्ज? रसद तोडणे? जर केंद्रानं हे सगळं केलं असतं तर तो घटनाद्रोह झाला असता.. +
कारण "राईट टू डिसेंट" हा सुद्धा मूलभूत अधिकारच आहे. भलेही त्या डिसेंटला काडीचाही अर्थ नसला तरी.
त्या पार्श्वभूमीवर ह्या दलालांचे दिल्लीतील आंदोलन हे घटनाबाह्य नाही. त्यामुळे जर केंद्रानं कडक भूमिका घेतली असती तर प्रकरण भयंकर चिघळलं असतं. आणि सुप्रीम कोर्टाने ह्याची गंभीर दखल +
शरद पवार आणि सत्य परिस्थिती ह्यात नेहमीच ३६चा आकडा असतो.. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..
साहेब बच्चनस्टाईलमध्ये म्हणाले की, राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे पण शेतकरी नेत्यांना भेटायला वेळ नाही, ते गोव्याला निघून गेले.
वस्तुस्थिती अशी की +
ह्या सर्व (तथाकथित) नेत्यांना आधीच राज्यभवनाकडून कळवलं गेलं होतं की राज्यपाल गोव्याला जाणार आहेत म्हणून. आता गोव्याला जाणार म्हटलं की मजा मारायला हेच ह्यांना माहित कदाचित ह्यांचे आदर्श तिकडे जाऊन तेच करत असतील. असो तर कोशियारी हे गोव्याचेसुद्धा राज्यपाल आहेत.+
त्यामुळे जेंव्हा एखादी व्यक्ती नाही हे माहित असतं तेंव्हा उगाच नखरे करायचे धंदे सोशल मिडीयाच्या काळात चालत नसतात, पवारसाहेब.
आता हे साडे तीन जिल्ह्यावाल्या पवारांना माहित नसेल का? नक्कीच माहित असेल पण पूर्ण आयुष्य ज्यांनी दिशाभूल करण्यात घालवलं असता +
स्त्रीसुरक्षेच्या दृष्टिकोनातून योगी सरकार एक अभिनव असा अद्भुत प्रकल्प राबवणार आहे..
उत्तप्रदेशातील गुन्ह्यांचा विचार करून २०० हॉटस्पॉट्स ठरवण्यात आले आहेत. तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड असे कॅमेरे लावण्यात येणार. जिथे रस्त्यावर छेडछाडीचे प्रकार चालतील +
तिथून लगेच संबंधित कंट्रोल रूमला संदेश जाईल आणि कारवाई केली जाईल. बर्याचदा असंही होऊ शकेल कि काही प्रकार कॅमेरातून सुटू शकतील, अश्या वेळेस महिलांच्या चेहऱ्याच्या भावावरून तो कॅमेरा कॅट्रोल रूमला संदेश पाठवेल आणि घटनेची शहानिशा केली जाईल.
अर्थात ह्यात काही अडचणी निर्माण होतील.+
पण ट्रायल-एरर पद्धतीने ह्याची अंमलबजावणी होईल. नंतर ते एक आदर्श-मॉडेल म्हणून नक्कीच विकसित होईल.
योगी जेंव्हापासून उत्तरप्रदेश एका नवीन आणि आशादायी असे राज्य होण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. ह्याची मुख्य धारेतील प्रसार माध्यमे किती दखल घेतात माहीत नाही पण +
महाराष्ट्रातल्या तमाम हिंदूंनो, जी गोष्ट अगदी कट्टर काँग्रेसी राज्यात नव्हे तर अगदी हैद्राबादेत घडली नसेल, अशी गोष्ट महाराष्ट्रात घडतीये. हिंदूंची ओळख पुसून टाकण्याचा डाव हे लादलेले शासन आखत आहे. टाइम्स नाऊची बातमी आहे. +
आता १० वी, १२ वीच्या परीक्षा अर्जात हिंदूच्या ऐवजी "नॉन-मायनॉरीटी" हा शब्द असणार आहे. ह्याचा अर्थ "अ-अल्पसंख्यांक". म्हणजे आता आपली ओळख ह्या राज्यात हिंदू म्हणून नाही तर "अ-अल्पसंख्यांक" अशी असणार आहे.. उद्या हिच ओळख आपल्या जन्मतारखेच्या दाखल्यावर, लग्न प्रमाणपत्रावर येणार नाही?+
चाय-बिस्कुट वाले सरसकट संपादक सहा पैकी पाच ठिकाणी विजय मिळाला म्हणून ह्या अपघाती घरकोंबड्याचं कौतुक थोबाड फाटेपर्यंत करण्यात माध्यमं स्पर्धा करत असताना हिंदूंच्या अस्तित्वावर फुली मारण्याचे हे षडयंत्र, पर्याय नाही म्हणून हिंदुत्व स्वीकारलेली, सोनियासेना करत आहे. आता त्यांनाही +
ज्या ज्या मराठी कलाकारांना बॉलिवूडचा पुळका येतो त्यांनी बॉलिवूडमध्ये त्यांची किती ठेवली जाते ह्याचा विचार करावा..
मराठीतले सुपरस्टार हे हिंदीत जाऊन धुणी-भांडी करण्यात धन्यता मानतात.. (अर्थात नाना पाटेकर, विक्रम गोखलेंसारखे सन्माननीय अपवाद वगळता)
ह्याबाबतीत +
जर खरी मराठी अस्मिता दाखवायची असेल तर दक्षिणेकडच्या खर्याखुर्या सुपरस्टार्सची उदाहरणे अभ्यासावीत. अगदी "मराठी" गायकवाड "बंगळुरातून" "तमिळनाडूत" जाऊन "सुपरस्टार रजनीकांत" बनतो, ह्यापेक्षा मोठं उदाहरण, तेही आदर्श म्हणावं असं, दुसरं नाही..
आणि हे असे कलाकार बॉलीवूडला अक्षरशः +
कोलतात. इकडे त्यांचे चित्रपट लागोत वा ना लागोत. दक्षिणेत त्यांचा चित्रपट मजबूत व्यवसाय करतो. दक्षिणेने अजून चित्रपट संस्कृती कशी जोपासलीये, हे पाहायचं असेल तर एकदा दक्षिणेत येऊन, भलेही भाषा ना का समजेना, चित्रपटगृहात धडकून पहा. मग कळेल काय असते अस्मिता आणि ती कशाशी कशी खातात ते.+
भाजप ज्या पद्धतीने ग्रेटर हैद्राबादच्या महापालिकेच्या निवडणुकीत जोर लावतीये ते पाहता भाजपा हे निवडणूक जिंकेलच असं काही भाकीत मी करणार नाही.अर्थात जिंकलं तर भाजपासमर्थकांना आनंद वाटेलच ह्यात शंका नाही. जेथे जेडी-बीजेपी केवळ पाचच जागांवर निवडून आली+
तिथे पाच वर्षात भाजपाचा झेंडा सत्तास्थानी रोवेल हे शक्यता कमीच वाटते.
दक्षिणेत कर्नाटक सोडलं तर भाजपा भक्कम फारशी नाही. कोणत्याही गुंतवणुकीचे शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्म फायदा पाहणारा पक्ष म्हणजे भाजपा. पुर्वांचलात यश मिळण्यामागे दशकांची मेहनत आहे. पश्चिम बंगालातील गेल्या +
निवडणुकीत, ज्या पद्धतीने भाजपचे एकंदरीत मतदानातील टक्केवारीत झेप घेतली, ती ममताच्या उरात धडकी भरवणारी होती. येत्या निवडणुकीत कितीजरी "किशोर" त्यांच्या बाजूला उभे राहिले तरी त्यांचे स्थान धोक्यातच आहे ह्याची ग्वाही कोणताही राजनीतीतज्ञ देऊ शकेल.