स्त्रीसुरक्षेच्या दृष्टिकोनातून योगी सरकार एक अभिनव असा अद्भुत प्रकल्प राबवणार आहे..

उत्तप्रदेशातील गुन्ह्यांचा विचार करून २०० हॉटस्पॉट्स ठरवण्यात आले आहेत. तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड असे कॅमेरे लावण्यात येणार. जिथे रस्त्यावर छेडछाडीचे प्रकार चालतील +
तिथून लगेच संबंधित कंट्रोल रूमला संदेश जाईल आणि कारवाई केली जाईल. बर्याचदा असंही होऊ शकेल कि काही प्रकार कॅमेरातून सुटू शकतील, अश्या वेळेस महिलांच्या चेहऱ्याच्या भावावरून तो कॅमेरा कॅट्रोल रूमला संदेश पाठवेल आणि घटनेची शहानिशा केली जाईल.

अर्थात ह्यात काही अडचणी निर्माण होतील.+
पण ट्रायल-एरर पद्धतीने ह्याची अंमलबजावणी होईल. नंतर ते एक आदर्श-मॉडेल म्हणून नक्कीच विकसित होईल.

योगी जेंव्हापासून उत्तरप्रदेश एका नवीन आणि आशादायी असे राज्य होण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. ह्याची मुख्य धारेतील प्रसार माध्यमे किती दखल घेतात माहीत नाही पण +
सामान्य उत्तरप्रदेशातील नागरिक मात्र ह्या अश्या बदलांचे नक्कीच स्वागत करत आहे.

निवडणूक तोंडावर आल्यावर प्रकल्पाची घोषणा करून नंतरची दशके वाट पाहायला लावणारी काँग्रेसची संस्कृती हद्दपार करून 'प्रकल्पाची घोषणा आणि त्याचे उदघाटन एकाच व्यक्तीकडून करण्याची भाजपसंस्कृती,+
हीच ह्या देशाला प्रगतीपथावर दिमाखाने नेईल ह्यात मला शंका वाटत नाही..

एका सामान्य माणसालासुद्धा वेगळे काही वाटत नसेलच..

बाकी उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून योगीजी पुन्हा एकदा शपथ घेतीलच...

जय हिंद..

- चेतन दीक्षित

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Chetan Dixit

Chetan Dixit Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @mechetandixit

25 Jan
शरद पवार आणि सत्य परिस्थिती ह्यात नेहमीच ३६चा आकडा असतो.. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..

साहेब बच्चनस्टाईलमध्ये म्हणाले की, राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे पण शेतकरी नेत्यांना भेटायला वेळ नाही, ते गोव्याला निघून गेले.

वस्तुस्थिती अशी की +
ह्या सर्व (तथाकथित) नेत्यांना आधीच राज्यभवनाकडून कळवलं गेलं होतं की राज्यपाल गोव्याला जाणार आहेत म्हणून. आता गोव्याला जाणार म्हटलं की मजा मारायला हेच ह्यांना माहित कदाचित ह्यांचे आदर्श तिकडे जाऊन तेच करत असतील. असो तर कोशियारी हे गोव्याचेसुद्धा राज्यपाल आहेत.+
त्यामुळे जेंव्हा एखादी व्यक्ती नाही हे माहित असतं तेंव्हा उगाच नखरे करायचे धंदे सोशल मिडीयाच्या काळात चालत नसतात, पवारसाहेब.

आता हे साडे तीन जिल्ह्यावाल्या पवारांना माहित नसेल का? नक्कीच माहित असेल पण पूर्ण आयुष्य ज्यांनी दिशाभूल करण्यात घालवलं असता +
Read 4 tweets
5 Dec 20
आवर्जून वाचा #थ्रेड 👇👇👇

महाराष्ट्रातल्या तमाम हिंदूंनो, जी गोष्ट अगदी कट्टर काँग्रेसी राज्यात नव्हे तर अगदी हैद्राबादेत घडली नसेल, अशी गोष्ट महाराष्ट्रात घडतीये. हिंदूंची ओळख पुसून टाकण्याचा डाव हे लादलेले शासन आखत आहे. टाइम्स नाऊची बातमी आहे. +

timesnownews.com/education/arti…
आता १० वी, १२ वीच्या परीक्षा अर्जात हिंदूच्या ऐवजी "नॉन-मायनॉरीटी" हा शब्द असणार आहे. ह्याचा अर्थ "अ-अल्पसंख्यांक". म्हणजे आता आपली ओळख ह्या राज्यात हिंदू म्हणून नाही तर "अ-अल्पसंख्यांक" अशी असणार आहे.. उद्या हिच ओळख आपल्या जन्मतारखेच्या दाखल्यावर, लग्न प्रमाणपत्रावर येणार नाही?+
चाय-बिस्कुट वाले सरसकट संपादक सहा पैकी पाच ठिकाणी विजय मिळाला म्हणून ह्या अपघाती घरकोंबड्याचं कौतुक थोबाड फाटेपर्यंत करण्यात माध्यमं स्पर्धा करत असताना हिंदूंच्या अस्तित्वावर फुली मारण्याचे हे षडयंत्र, पर्याय नाही म्हणून हिंदुत्व स्वीकारलेली, सोनियासेना करत आहे. आता त्यांनाही +
Read 6 tweets
2 Dec 20
#थ्रेड 👇👇👇

ज्या ज्या मराठी कलाकारांना बॉलिवूडचा पुळका येतो त्यांनी बॉलिवूडमध्ये त्यांची किती ठेवली जाते ह्याचा विचार करावा..

मराठीतले सुपरस्टार हे हिंदीत जाऊन धुणी-भांडी करण्यात धन्यता मानतात.. (अर्थात नाना पाटेकर, विक्रम गोखलेंसारखे सन्माननीय अपवाद वगळता)

ह्याबाबतीत +
जर खरी मराठी अस्मिता दाखवायची असेल तर दक्षिणेकडच्या खर्याखुर्या सुपरस्टार्सची उदाहरणे अभ्यासावीत. अगदी "मराठी" गायकवाड "बंगळुरातून" "तमिळनाडूत" जाऊन "सुपरस्टार रजनीकांत" बनतो, ह्यापेक्षा मोठं उदाहरण, तेही आदर्श म्हणावं असं, दुसरं नाही..

आणि हे असे कलाकार बॉलीवूडला अक्षरशः +
कोलतात. इकडे त्यांचे चित्रपट लागोत वा ना लागोत. दक्षिणेत त्यांचा चित्रपट मजबूत व्यवसाय करतो. दक्षिणेने अजून चित्रपट संस्कृती कशी जोपासलीये, हे पाहायचं असेल तर एकदा दक्षिणेत येऊन, भलेही भाषा ना का समजेना, चित्रपटगृहात धडकून पहा. मग कळेल काय असते अस्मिता आणि ती कशाशी कशी खातात ते.+
Read 10 tweets
30 Nov 20
हैद्राबादच्या निमित्ताने #थ्रेड

भाजप ज्या पद्धतीने ग्रेटर हैद्राबादच्या महापालिकेच्या निवडणुकीत जोर लावतीये ते पाहता भाजपा हे निवडणूक जिंकेलच असं काही भाकीत मी करणार नाही.अर्थात जिंकलं तर भाजपासमर्थकांना आनंद वाटेलच ह्यात शंका नाही. जेथे जेडी-बीजेपी केवळ पाचच जागांवर निवडून आली+
तिथे पाच वर्षात भाजपाचा झेंडा सत्तास्थानी रोवेल हे शक्यता कमीच वाटते.

दक्षिणेत कर्नाटक सोडलं तर भाजपा भक्कम फारशी नाही. कोणत्याही गुंतवणुकीचे शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्म फायदा पाहणारा पक्ष म्हणजे भाजपा. पुर्वांचलात यश मिळण्यामागे दशकांची मेहनत आहे. पश्चिम बंगालातील गेल्या +
निवडणुकीत, ज्या पद्धतीने भाजपचे एकंदरीत मतदानातील टक्केवारीत झेप घेतली, ती ममताच्या उरात धडकी भरवणारी होती. येत्या निवडणुकीत कितीजरी "किशोर" त्यांच्या बाजूला उभे राहिले तरी त्यांचे स्थान धोक्यातच आहे ह्याची ग्वाही कोणताही राजनीतीतज्ञ देऊ शकेल.

हैद्राबादेत गेल्या लोकसभेत दोन +
Read 12 tweets
28 Nov 20
#थ्रेड 🙏
आई आज भयंकर संतापून बोलत होती..

आज सकाळी घर वगैरे आवरून जरा टीव्हीसमोर बातम्या पहात बसलो होतो. आई आली. बातमी सुरु होती की कांजूरमार्गवरून राज्यशासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक आठवडा दिलाय. कांजूरमार्ग मध्ये मेट्रो कार शेड हलवण्याचा परस्पर निर्णय कसा घेतला+
ह्यावर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झालीये..

मेट्रो प्रकरणात होत असलेला अनाठायी विलंब आणि त्यामुळे होत असलेले हजारो कोटींचे नुकसान ह्याची कल्पना आईला आहे.

तळपायाची आग मस्तकात गेली होती आईच्या. तसं आई राजकारणावर फारसं बोलत नाही. त्यात बाबांच्या आजारपणात किती गोष्टींनी त्रास +
करून घ्यायचा? म्हणून ताणाचे विषयसुद्धा नसतात गप्पा मारताना..

पण आज आई भडकली होती..

"ह्यांचं काय जातंय एवढे मोठे प्रकल्प भिजत ठेवायला? ह्यांच्या मालमत्ता सुरक्षित आहेत. हे उद्योजक होतात. सामान्य माणूस काय करतो? ह्या असल्या मूर्खासारख्या निर्णयामुळे एवढं नुकसान होतं, ते आम्ही +
Read 9 tweets
23 Nov 20
फडणवीस चुका मान्य करा..
होय फडणवीस आपण नुसतेच अपयशी मुख्यमंत्री नाही तर अपयशी राजकारणीसुद्धा आहात..
कारण..
● आपण नगरसेवकापासून अगदी मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतलीत पण कधी कोणाची जात काढली नाहीत कि कोणावर वैयक्तिक टीका केली नाहीत. असं कोणी करतं का?
● नैसर्गिक आपत्तीवेळी आपण +
घरात बसून केंद्राकडून पैसे हवेत असा घोष लावला नाहीत जरी आपल्याच पक्षाचे सरकार केंद्रात असले तरी. उलट कायद्यात बदल करून नुकसानभरपाईची रक्कम वाढवून संबंधितांच्या खात्यात वर्ग केलीत. असं कोण करतं? जनतेला आशेवर झुलत राहायची सवय आहे. तसंच झुलवत ठेवायचं असतं देवेंद्रजी. +
हेच आपल्या राज्याने आत्तापर्यँत पाहिलंय आणि द्यायचं म्हटलंच तर रुपायातले १०-२०पैसे फेकायचे काही जणांच्या तोंडावर उपकार म्हणून.. तेही आपल्याला जमलं नाही.
● मुख्यमंत्री झाल्यावर बायकोला चार भिंतीच्या आडच ठेवायचं असतं. तिचं स्वतंत्र अस्तित्व नाकारायचं असतं, हा ह्या पुरोगामी +
Read 14 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!