#Thread: Renaissance State

इतिहासाचं विकृतीकरण काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही. अनेक महापुरुषांच्या इतिहासाचं विकृतीकरण गेले अनेक दशकं सुरु आहे.

@girishkuber यांच्या या👇🏼 पुस्तकावरुन पुन्हा एक जूना वाद पेटला आहे.

आज कुबेर यांनी मांडलेल्या काही प्रमुख मुद्यांचं खंडण करतोय.

१/२०
🔸 बखरकार/इतिहासकार/कादंबरीकार आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.

बखरकारांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कधी कळलेच नाही. काहींनी मुद्दामून त्यांना बदनाम केलं.

दोन बखरकारांनी शंभूराजेंची बदनामी केली - कृष्णाजी अनंत सभासद (ब्राह्मण) आणि मल्हार रामराव चिटणीस (चं.का.प्रभू).

२/२०
इथे या दोघांची जात नमूद का केलीये ते पुढे कळेलंच.

मल्हार रामराव चिटणीसाचे लिखाण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून केलेले आहे हे तर सर्वश्रुत आहे.

सभासद आणि चिटणीस बखरीमध्ये शंभूराजेंच्या केलेल्या नालस्तीबद्दल डॅा.जयसिंगराव पवारांचं मत👇🏼

३/२०
पण सभासद आणि चिटणीस या दोघांनी शंभूराजेंची बदनामी केली म्हणून सगळ्या ब्राह्मणांना आणि चं.का.प्रभूंना शिव्या देऊन नाही चालणार.

कारण धर्मवीर शंभूराजेंचा ‘खरा इतिहास’ लोकांसमोर यावा यासाठी आपलं आयुष्य वेचणारे वा.सी.बेंद्रे आणि डॅा.कमलताई गोखले हे पण चं.का.प्रभू/ब्राह्मण होते.

४/२०
कोण कुठला लेखक काहीतरी लिहीतो आणि स्वत:ला ‘सुजाण’ दाखवणारे #बाजारु_विचारवंत दोन समाजांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतात हेच या महाराष्ट्राचं दुर्दैव.

मला कुबेर यांची जात माहिती नाही. पण B-ग्रेडी बाजारु विचारवंतांच्या कमेंट्सवरुन ते ब्राह्मण आहेत असं वाटतय. असतीलही.

५/२०
B-ग्रेडी बाजारु विचारवंतांनी लगेच गिरीश कुबेरांना अनाजी चा वारस ठरवलं.

अनाजी पंताचाच का? तो गद्दार होता लेखक नाही.

मंबाजी भोसले, नागोजी माने, चंद्रराव मोरे, नाईकजी पांढरे, कल्याणजी यादव, पिलाजी व शंकराजी मोहिते, बाजी घोरपडे यांचा का नाही?

गद्दारी काय एकानेच केलेली का?

६/२०
तसं तर मग ‘हुतात्मा संभाजी’ या पुस्तकात शंकरराव सावंत यांनी जी शंभूराजेंची बदनामी केलीये त्यावर हे बाजारु विचारवंत काय म्हणणार?

सावंतांनी तर शंभूराजेंचा खरा इतिहास मांडणाऱ्या बेंद्रे आणि गोखले यांच्यावर पण नाही नाही ती टीका केलेली.

७/२०
बखरकारांच्या लिखाणावर आवलंबून राहणारे इतिहासकार पण बदनामीकरणाला कारणीभूत आहेत.

मुळात धर्मवीर शंभूराजेंवर जितकं संशोधन होयला हवं होतं तेवढं कित्येक वर्ष झालंच नाही.

इतिहासकारांकडून त्यांची बदनामी का झाली याच्या कारणांकडे दुर्लक्ष करुन नाही चालणार.

८/२०
माझ्या मते मुंबईकर इंग्रजांचं हे पत्र सगळ्या बदनामीकरणाचे मूळ आहे.

समकालीन असणाऱ्या फ्र.मार्टिन (फ्रेंच), खाफी खान (मोगल) या शत्रूंनी देखील शंभूराजेंची अशीच बदनामी केली.

पुढे जदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन या सारख्या इतिहासकारांनी हीच साधनं वापरुन शंभूराजेंवर लिखाण केलं.

९/२०
कादंबरीकारांनी याच साधनांचा वापर केला.

मुळात इतिहासकारांचा शत्रूच्या साधनांवर जास्तं भार पडला हेच चूकलं.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास लोकांसमोर मांडला तो वा.सी.बेंद्रे आणि डॅा.कमलताई गोखले ह्यांनी.

१०/२०
धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल बोलावं तितकं कमीच.

थोडक्यात शंभूराजे कसे होते या साठी केशव पंडितांच्या काही ओळी पूरेशा आहेत.

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम।
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा॥
संभाजीकेन च भ्राता ज्वलज्ज्वलनतेजसा
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच॥

११/२०
🔸पुण्यश्लोक शाहूछत्रपती

श्री कुबेरांचं असं मत आहे कि छत्रपती शाहू महाराजांकडे ‘दूर्दृष्टि चा अभाव होता’.

आता यावर काय बोलावं🤦🏻‍♂️

दूर्दष्टि चा अभाव असणारे पुण्यात्मा ‘हिंदुपदपादशाह’ झाले असते का🤷🏻‍♂️

असो, कुबेरांना मी अवगत करवून देतो - पुण्यश्लोक शाहूछत्रपतींची दूर्दृष्टि.

१२/२०
नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे देताना राजश्रींनी नानासाहेबांना केलेली आज्ञा त्यांच्या दूर्दृष्टिचं एक उत्तम उदाहरण आहे.

“अटकेपार घोडे चालवावे”. आणि १७५८ मध्ये मराठ्यांचे घोडे अटकेपार चालले!

पुण्यश्लोक शाहूछत्रपतींच्या उत्तम राजकारणाची ओळख करवून देणारी अशी अनेक पत्र आहेत.

१३/२०
Tīn-Chār Laksha (Lakhs) Faujecha Pātshāhā āmchā Pātshāhā Chattrapati (Shahu) Mahārāj!

Tyānchā Jaye va Pratāp āmche mastaki astāt!

Sarva Prithvichā jaye sampādito va ājbar sampādit ālo āhot! Tumchā tamā dharito yese nāi!

- १७६० मध्ये भाऊसाहेबांचे उद्गार (पानिपतची बखर)

१४/२०
🔸शिवछत्रपती आणि थोरले बाजीराव पेशवे

#RenaissanceState या पुस्तकात कुबेर यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांची तुलना शिवछत्रपतींसोबत केली आहे.

मी आजवर अनेक वेळेला ही गोष्ट स्पष्ट केली आहे - कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केली जाऊ शकत नाही!

१५/२०
कुबेर यांच्या पुस्तकाचं खंडण या👇🏼महाशयांनी पण केलं. करायलाच हवं होतं.

पण मंडण करताना कच खालली🤦🏻‍♂️

१७३७ मध्ये ६००००+ सैन्य घेऊन दिल्लीला आव्हान देणारे थोरले बाजीराव हे पहिले मराठा योद्धे. यात कहर कसला?

महादजी शिंदे यांनी राऊसाहेबांच्या मृत्यूनंतर ३१ वर्षांनी दिल्ली जिंकली.

१६/२०
थोरल्या राऊसाहेबांनी पुण्यश्लोक शाहूछत्रपतींच्या आज्ञेवरुनंच दिल्लीवर चढाई केलेली.

एवढंच नाही तर याच मोहीमेसाठी शाहूछत्रपतींनी राऊंची मदत न करणाऱ्या यशवंतराव दाभाडे यांना ताकीद ही दिलेली.

कुबेरांनी माती खालली म्हणून राऊस्वामींचा पराक्रम झाकायचा याला काय अर्थ आहे🤷🏻‍♂️

१७/२०
पाटील बाबांच्या (महादजी) अफाट कामगिरीचा उल्लेख कुबेरांनी नाही केला हे दुर्दैवंच.

पण या साठी थोरल्या बाजीरावांना दोष देणं हा मूर्खपणा आहे.

हे बाजारु विचारवंत तर असं बोलत आहेत जसं कि थोरल्या बाजीरावांनीच कुबेरांना सांगितलं त्यांची तुलना शिवछत्रपतींसोबत करायला🤦🏻‍♂️

१८/२०
अशा वादांच्या मागे लपून B-ग्रेडी बाजारु विचारवंत छत्रपती विरुद्ध पेशवे, शिंदे विरुद्ध होळकर, होळकर/शिंदे विरुद्ध पेशवे आदि नसलेले वाद पेटवायला बघतात.

सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी - या सगळ्या घरण्यांमध्ये असलेले स्नेह संबंध सिद्ध करायला अनेक समकालीन पत्र उपलब्ध आहेत.

१९/२०
शेवटी एकंच सांगू इच्छितो - कुठलाही लेखक, मग तो कोणत्याही जातीचा असो, स्वत:चं मत मांडत असतो, संपूर्ण समाजाचं नाही.

अशा लिखाणाचं खंडण जरुर करा पण मंडण करताना कुठल्यातरी एका जाती ला शिव्या घालून स्वत:चा विषारी अजेंडा नका चालवू.

२०/२०

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devashish Kulkarni

Devashish Kulkarni Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @HearMeRoar21

16 May
#Thread: COVID-19, India and Politics.

India is at WAR.

Since March 2020, we are at war with #COVID19.

In the last 14 months, we all have seen enough misinformation being spread about India’s COVID policy by the media, both domestic and international.

1/18
🔸The Second Wave

In the recent past, opposition leaders and the media have blamed the Modi Government for the second wave of the pandemic.

But the PM and the Central Government had warned the CMs of all the States on several occasions.

2/18
timesofindia.indiatimes.com/india/from-sep…
On March 17, 2021 PM @narendramodi interacted with all the CMs on COVID19 situation.

He reiterated the 3T strategy - Test, Track and Treat.

He also ensured all the CMs of the support from the Central Government.

3/18
hindustantimes.com/india-news/pm-…
Read 18 tweets
8 May
काल या झाकणझुल्याला ‘Quote’ करुन उत्तर दिलं नाही म्हणून आज काही झाकणझुले बांगड्या फोडतायेत.

102nd Constitutional Amendment च्या मागे लपून #महाविनाशआघाडी चा अकार्यक्षमपणा लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे.

पण प्रत्येक वेळेला केंद्रावर जबाबदारी ढकलून पळ काढता येत नाही.

१/९
१०२ वी घटना दुरुस्तीचं विधेयक ११ एप्रिल, २०१७ रोजी राज्य सभेने एका ‘Select Committee’ कडे पाठलेलं.

भुपेंद्र यादव (भाजप) या कमिटी चे अध्यक्ष होते.

महाराष्ट्राचे हुसैन दलवाई (कॉंग्रेस), प्रफुल पटेल (राष्ट्रवादी) आणि अनिल देसाई (शिवसेना) हे पण या कमिटीचे सदस्य होते.

२/९
पुढे ८ ॲागस्ट, २०१८ ला राज्य सभेत ह्या विधेयकला १५६ सांसदांनी मंजूरी दिली.

कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या पाठिंब्याशिवाय १०२ वी घटनादुरुस्ती करणे शक्य नव्हते, याचेही भान आज कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी बाळगले पाहिजे.

३/९
Read 9 tweets
11 Apr
हैंदव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही ‘मनुस्मृतिच्या कायद्याची अम्मलबजावणी होती’ - satyashodhak.com

हा विकृत इतिहास अनेक B-ग्रेडी बाजारु विचारवंत पसरवत असतात.

पण सत्य काय आहे? शंभूराजेंची हत्या कोणी आणि का केली हे जाणून घेऊयात ‘मआसिर-ए-आलमगिरी’ मधून.

१/४
मआसिर-ए-आलमगिरी औरंगजेबाच्या शेवटच्या सचिव व लाडका शिष्य (इनायतुल्लाह खान कश्मीरी) याच्या सांगण्यावरुन मुहम्मद साकी मुस्तैद खान ने १७१० मध्ये पूर्ण केला.

मआसिर-ए-आलमगिरी च्या ३२व्या अध्यायात पृ.१९४ ते १९६ वर धर्मवीर शंभूराजे आणि कविकलश यांच्या अमानूष हत्येचा उल्लेख आहे.

२/४
धर्मवीर शंभूराजे आणि छंदोगामत्य कविकलश यांना कशा प्रकारे हाल करुन आणि कोणाच्या सांगण्यावरुन मारलं गेले हे साफ नमूद केलेलं आहे.

एवढंच नाही तर ‘का मारलं गेलं’ हे पण नमूद केलेलं आहे.

आता समकालीन मआसिर-ए-आलमगिरी वर विश्वास ठेवायचा का विकृत इतिहासावर, हे ज्याने-त्याने ठरवावे.

३/४
Read 4 tweets
10 Apr
प्रति #महाराष्ट्रद्रोही_ठाकरेसरकार व सर्व #PaaltuPatrakaar

दि.५ व ६ एप्रिल, हे २ दिवस मी माझ्या आजोबांना घेऊन बेड साठी अख्खं पुणे पालथं घातलेलं. असंख्य लोकांना फोन केले.

पण पुण्यात कुठेच बेड नाही मिळाला. PMC ने फोन करुन ३ प्रायव्हेट हॅास्पिटल्स ची नावं सांगितली.

१/५
हॅास्पिटल ला फोनवर पहिलेच ‘बिल किती होईल’ हे विचारा, असं पण सांगितलं.

हे ऐकूनंच आम्ही फोन नाही केला.

स्वामीकृपेमुळे आजोबा स्टेबल आहेत व होम आयसोलेशन मधेच रिकव्हर होतायेत.

पण असे कित्येक लोकं आहेत ज्यांना बेड ची गरज असून देखील बेड मिळत नाहीयेत.

२/५
का? कारण महाराष्ट्र सरकार ने गेल्या वर्षी उघडलेली कित्येक Covid Care Centres बंद केली.

‘Preventive’ वॅक्सिनसाठी बोंबा मारताना तुम्ही ‘Curative’ #Remdesivir बद्दल का बोलत नाही आहात?

संघाच्या ग्रुप वर रोज बेड व Remdesivir साठी मेसेजेस येत असतात.

३/५
Read 5 tweets
4 Apr
सर्वप्रथम, ‘छत्रपती शिवाजी महाराज सनातन हिंदु धर्माचे पालन करत होते’ हे त्रिवार सत्य मान्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

या वेळेला तर तुम्ही कहरंच केलात. रायगडाच्या वाताहतीसाठी पेशव्यांसोबत पुण्यश्लोक शाहूछत्रपतींना पण दोषी ठरवलत🤦🏻‍♂️

पुन्हा एकदा सत्य काय आहे ते बघूयात.

१/११
१७७३, १७८६-८७, १७९६-९७ या साली रायगडावर उत्सव असो, सिंहासनासाठी तख्त पुजारी नेमणे असो, सिंहासनाची डागडूची असो, नगारखान्याची व्यवस्था असो -

हे सगळं असून पण तुम्ही पुण्यश्लोक शाहू महाराज आणि पेशव्यांना रायगडाच्या वाताहती साठी कसं दोषी ठरवता, हे तुम्हालाच ठाऊक🤷🏻‍♂️

२/११
एवढंच नाही तर, जेम्स डगलस ने ‘Book of Bombay’ मधे ‘दुसऱ्या बाजीरावाची बायको १८१८ मधे रायगडावर राहत होती’ हे नमूद केलेलं आहे.

यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते कि एप्रिल १८१८ पर्यंत रायगडची अवस्था ‘चांगली’ होती.

मग वाताहात कशामुळे झाली?

याचं उत्तर खूप सोप्पं आहे.

३/११
Read 11 tweets
3 Apr
#Thread:

इतिहास संशोधनातला एक महत्वाचा नियम असा आहे की इतिहासकार - मग तो कितीही मोठा असो - त्याची किंमत केवढी? तर त्याने दिलेल्या पुराव्या एवढी!

कादंबऱ्यांमधून हास्यासपद संदर्भ देणाऱ्या श्री.पाटील यांना आज कळेल की ‘पुरावे गोळा करायला बरेच दिवस लागलेले’ बरे असतात.

१/२३
श्री.पाटील यांचा हा संदर्भ किती हास्यासपद आहे ते बघा:

🔸जेम्स डगलस ने त्याच्या Book of Bombay च्या पृ.४३३ वर शिवछत्रपतींच्या समाधीचं वर्णन केलय व समाधीच्या अवस्थेसाठी मुख्यत: सातारकर व कोल्हापूर छत्रपतींसह त्यांच्या पेशव्यांना दोषी ठरवलय.

“No man now cares for Seevajee”.

२/२३
🔸इंग्रजांच्या हाती रायगड ‘मे १८१८’ मध्ये आला, १८१६ मध्ये नाही.

आणि तुमच्या माहिती करिता जेम्स डगलस चे ‘Book of Bombay’ हे प्रथम १८८२ मध्ये प्रकाशित झालं.

तुम्ही १८१६ मध्ये हे वृत्तांत कसं प्रकाशित करवलं हे तुम्हालाच ठाऊक.

असो.

३/२३
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(