आपण एखाद्याच्या आनंदासाठी, सुखासाठी अपार धडपड केलेली असेल आणि समृद्धी आनंदाच्या शिखरावर पोहोचल्यावर त्या व्यक्तीस आपले स्मरण होत नसेल तर ती व्यक्ती स्वार्थी आणि नीच असते.
ती कुणाचाही वापर करायला मागेपुढे पाहत नाही.
(1)👇
अशी व्यक्ती अधिकाधिक मोठी होत जाते आणि त्याच्यासाठी झिजणाऱ्यास भाबडी आशा वाटत राहते की आज ना उद्या आपल्या ऋणांची जाणीव त्यास होईल !
मात्र तसे घडत नाही. कारण अशा व्यक्ती कुणाच्याच नसतात, त्या फक्त त्यांच्या कैफात जगणाऱ्या असतात.
(2)👇
अशांना चार शब्द सुनवायला गेलं की आपलाच पाणउतारा होतो. म्हणून फक्त वाट पाहायची.
फ्रॉड करणाऱ्या लोकांचा एक वेगळाच स्वॅग असतो. यांची काही वैशिष्ट्य.
1. ही लोकं प्रचंड आत्मविश्वासानं डोळ्यात डोळं घालून खोटं बोलतात आणि ते अगदी सहज. 2. फेकायच्या बाबतीत जगातले सारे विक्रम मोडीत काढायची क्षमता यांच्यात असते.
(1)👇
यात घरं, गाड्या, पार्टनर्शीपसह बड्या बड्या ओळखी वगैरे प्रामुख्याने. बरं समोरच्याला माहीत असलं तरीही हे तीव्र पद्धतीनं फेकण्याची कला ढिल्ली सोडत नाहीत. 3. राहणीमान एकदम क्लास. म्हणजे घरात दरिद्री असली तरी सोशल मीडियात किंवा कुणाला भेटायचं असल्यास तरी प्रचंड काळजी घेतात.
(2)👇
4. महागडं वर्तन जगाला दाखवत राहायचं. त्यात, गाडी, मोबाईल, विमान आणि क्लासिक फोटोज अतिमहत्वाचं. 5. ही लोकं त्यांचा फ्रॉड सापडेपर्यंत समाजासाठी फारच ग्रेट वगैरे असतात. म्हणजे सामाजिक कार्यकर्ते, किंग ऑफ हर्ट, बादशाह, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस वगैरे वगैरे.
(3)👇
निळू फुले या नावाची, व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख करून द्यायची खरंतर गरज नाहीच. आजही खेड्यांमध्ये पन्नास ते नव्वदच्या दशकातील बायकांना निळू फुलेंबद्दल विचारलं तर त्या नाक मुरडतात, शिव्या देतात. प्रत्यक्ष आयुष्यात 'हिरो' असलेल्या निळूभाऊंच्या कामाची ही पावतीच.
(1)👇 #niluphule
आपल्याकडे सरसकट 'बाई वाड्यावर या' हा डायलॉग म्हणजे निळू फुले असं समीकरण लोकांनी करून टाकलंय आणि कॉमेडी शोमध्ये लोक त्याच्याशी संबंधित फालतू विनोदांवर टाळ्याही वाजवतात हे दुर्दैव आहे.
आपणच आपल्या एका महान कलाकाराला किती खाली आणतोय याची त्यांना कल्पनाही नसते. (2)
👇
बाई वाड्यावर या या डायलॉगच्या पलीकडे निळूभाऊ ९९% शिल्लक राहतात आणि ते जाणून, समजून घेतले तर हा माणूस किती मोठा होता हे लक्षात येतं.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या 'समता संगर' नावाच्या पुस्तकात निळूभाऊंच्या भन्नाट आठवणी सांगितल्यात. (3)
👇
कृपया हा थ्रेड नीट वाचावा.
हा माणूस आपल्यासारखं घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा नाही. 'अमक्या कार्यकर्त्यांनी धारावी कोरोनामुक्त केली, तमक्या साहेबांनी दौरे झोडले, दमक्या भाऊंनी ह्यांव केलं' अशा गोष्टी घरात बसून फॉरवर्ड करणाऱ्या लोकांनी ही त्यांनी मांडलेली गरज लक्षात घ्यावी.
नाहीतर प्रेतं पुरायला, जाळायला जागा शिल्लक राहायची नाही. देव, अल्लाह, जीजस वगैरे सर्वव्यापी आहेत ना, मग त्यांनी निर्मिलेल्या या विश्वात महामारी येतेच कशाला? आणि आली तरी हे सगळे कुठं गेलेत?
कुणाच्याही धार्मिक भावनेला ठेस पोहोचवायची नाहीये, मंगेश दादाच्या मताशी पूर्ण सहमत आहे.
तुम्ही हजार देवळं, मशिदी, चर्च बांधा, पण त्या देवळात, मशिदीत जायला माणसं राहावीत यासाठी दवाखाने, दवाखान्यांच्या सोयीसुविधा ह्या गोष्टींना आधी प्राथमिकता दिलीच पाहिजे.