मवाली कुणिकडचे 😡🌑
कॉलोनी ,गल्ली ,सोसायटी चे आवार जवळचा चौक इथे ही प्रजाती हमखास सापडते. विचित्र रंगांनी आणि स्टाईल ने सजवलेली हेयरस्टाईल /कानात डुल कुठे बिकबाळी /हातात कडे/ पॅंट अतिशय घट्ट नाहीतर अर्धी फाटलेली काय तर फेशन आहे .टपरीवर उभे तोंडात सिगरेट ,भर पावसात गॉगल 😎
हे नेहमी बाईक वर ट्रिपल च बसणाऱ् ,सिग्नल वरच्या पोलिसाला जमले तर मुदाम हात दाखवून जाणार.26 जानेवारी ला चौकात रांगोळी घालून कुठूनतरी स्पीकर आणून देशभक्ती पर गाणे लावणार .रंगपंचमीला कपडे फाडून विद्युत तारांवर फेकणार.नुसता धांगडधिंगा आरडाओरडा मवाली कुणीकडचे .
तुम्ही टू व्हीलर
वरून जात असतात आणि ती बंद पडते ,किक मारून जीव जातो इकडे तिकडे बघतात ,स्वछ इस्त्री आणि पॉलिश केलेले बूट घालणाऱ्या कडे आशाळ भूत नजरेने मदत करतील म्हणून पाहतो तितक्यात एक मवाली येतो "काय झाले हो काका ? सरका बाजूला म्हणून गाडीचा ताबा घेतो काहीतरी खाड खुड करतो किक मारतो गाडी चालू
करून देतो .घ्या काका झाली चालू आपण आभार मानेपर्यंत गर्दीत मिसळतो .गॅस हंडी उचलतांना समोरची महिला त्रस्त झाली बघून कोणी येतो सरका ताई म्हणून घराच्या गेट पर्यंत पोचवतो.कोणी हात दाखवून रिक्षा थाम्बवून देतो ,दोन दिवस प्लम्बर मिळत नाही म्हणून त्याला समजले तर पाच मिनिटांत प्लम्बर
घेऊन घर दाखवून देतो.रस्तावर गाड्यांची टक्कर झाली की त्या उचलायला तोच आधी पळणार ओळख नसताना जास्त लागलेल्या ला दवाखान्यात पोहोचवणार.उत्सवाच्या दिवशी तुम्ही सोवळे सोवळे घालून घरी फोटो काढणार तो छोटा मंडप त्याला लायटिंग केळीचे पान पूजेची सगळी तयारी करून सार्वजनिक उत्सवात उत्साहाने
वावरणार ,तो आरती म्हणताना चूक करतो ,आधी प्रसादाला पाणी फिरव रे , काय पोरे रे तुम्ही आजकालची ? कोणीतरी त्याला टोकणारच पण सकाळी फुलांचा मोठा ताजा हार तोच आणणार .मागच्या कॉलनीत काहीतरी गडबड गोंधळ सगळी धावपळ कोणीतरी झटक्यात अम्ब्युलन्स आणून पेशंट ला दवाखान्यात घेऊन पण गेले ,रुग्णां
चे मुले अर्धातासा ने पोचलेत. कुठलीही कामे अडून बसली की हे मवाली आलेच धावून काही संबंध नाही ओळख पाळख नाही त्यांना इगो तर अजिबात नसतो .असाच परवा एक मवाली गणपती आरती झाली आणि सगळ्यांना म्हणाला कोण कोणाचा डोस राहिला आहे पहिला आणि दुसरा ? कोणी म्हणे माझा एक झाला माझा एक पण नाही.
मग त्या हिरो ने सांगितले मी दुपारी एक वाजता कॉल करतो तुम्ही लगेच तिथे पोहोचून जायचे ठीक ? आम्ही माना हलवल्या .अरे त्याच्या नादी लागू नका त्या कॉलेज जवळ दिसतो नेहमी मुलीं न बरोबर .वाया गेलेला आहे तो .एक वाजता कॉल 😱 काका या सगळे आम्ही आठ दहा हॉस्पिटल जवळ तो आला आधारकार्ड घेऊन
गायब 😩आम्ही शोधले ते साहेब एक नर्स बरोबर गुलगुलू गप्पात दंग 😡.थांबा काका म्हणत परत गायब मग आला आणि सगळ्यांना नंबर न लावता एक एक करून डोस घायला लावला .जातांना हातात गोळ्या काय झाले तर कॉल करा म्हणत हॉस्पिटल च्या दारापर्यंत आला.इकडे ऑन लाईन नंबर ,गर्दी , रेटारेटी न करता सगळे
काम सुरळीत पार पडले ते ही अर्ध्या तासात. कोणीतरी त्या मवाली ला टोकलेच का रे नर्स चांगली ओळखिची दिसते रे तुझ्या ?अहो काका माझी चुलत बहीण आहे ती .मी सांगून ठेवले आमच्या सोसायटी ल्या काका काकू मावशी सगळ्यांना आणणार एक दिवस मग आज नंबर लागला तुमचा .कोणी राहिले असेल तर मी सांगतो
त्या दिवशी परत पाठवा .आम्ही खजील घरी जाऊन मी अंथरुणात थोडी थंडी थोडा ताप .रात्री पुणे वरून पुतण्याचा कॉल काका मी उद्या तुझा नंबर बुक करतोय 1250 देऊन टाकतो तू जा त्या हॉस्पिटलमध्ये आणि आधी डोस घेऊन टाक .मी म्हटले नको रे झाले काम फुकट घेतला डोस .पुतण्या विचारतो केव्हा घेतला ?
कोणी नंबर लावला ? किती पैसे घेतले ? मी म्हटले सगळे नीट घेतलंय काळजी करू नको.
पुतण्या परत कोणी घेऊन दिली रे तुला काका ?
मी म्हटले होता रे एक
मवाली कुणिकडचा 🌹🙏.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
🌹घाल घाल पिंगा वाऱ्या
माझ्या परसात 🌹🙏.
एक दिवस सांगावा येतो मुलगी पसंत आहे दिवाळीत तारिख निघतेय ,मग पाच महिन्यात लग्न आणि अल्लड वयातली मुलगी दोन नद्या आणि चार डोंगर सोडून तिच्या खटल्याच्या घरात माप ओलांडून संसारी होते.काल परवापर्यंत बाप रागावला की माय च्या पदराआड लपणारी ,
भावाबरोबर भांडणारी, हट्ट करून जे पाहिजे ते मिळवणारी ती अबोध आज कोणाच्या तरी घरची "सून " झालीय .दिवसभराच्या कामातून थोडा वेळ मिळाला म्हणून दुपारी परसातल्या धुणे धुवायच्या दगडावर थोडा वेळ विसावा घ्यावा म्हणून बसते. नदीपलीकडच्या माहेरच्या दिशेने वाऱ्याची झुळूक येते आणि माहेरच्या
वाऱ्या बरोबर जिवाभावाच्या गप्पा होतात आणि मग कृ ब निकुंभ यांच्या लेखणी तुन एक नितांत सुंदर कविता लिहिले जाते
💐
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात !
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊ साठी परी मन खंतावल !
विसरली का ग भादव्यात वर्ष झालं
मंजुश्री सारडा 👈🙏
खून खटला एक चक्रव्युव्ह
In fact this is a case of circumstantial evidence 🙏
स्थळ पुणे .
मंजुश्री सारडा लग्न 11 फेब्रुवारी 1982 मृत्यू 11 जून 1982 .शरद बिरदी सारडा घरचा पिढीजात कापडाचा व्यवसाय ,शरद केमिकल इंजिनियरआणि भोसरी ला केमिकल ची फेक्टरी असलेला धनाढ्य
कुटुंबातील मुलगा ,मंजुश्री पण केमिस्ट ची डिग्री घेतलेली ,सुंदर ,सुस्वभावी आणि बरीच भावनाळू मुलगी.खरे तर लग्नानंतर चे एक वर्ष शब्दशः झोपाळ्या विना झुलायचे असते चोरट्या खाणाखुणा ,कुटुंबियांच्या लक्षात येऊ नये म्हणून केलेले कटाक्ष ,नजरेचे लाडिक खेळ आणि हवाहवासा वाटणाराचोरटा स्पर्श
पण हे सुख मंजुश्री च्या ललाटावर लिहिले नव्हते .फेब्रुवारी त लग्न झाले आणि नवरा बायको चतुश्रूंगी च्या जवळपास तक्षशिला अपार्टमेंट ला लगेचच रहायला गेले.आणि महिन्याभरात मंजुश्री चे पत्र तिच्या बहिणीला आणि मैत्रीणी ला आले.दिसते तसे नसते इकडे बरच वेगळे चित्र आहे.नवरा शरद ने त्याच्या
अफगाणिस्तान 🙏.
अतिशय स्पष्ट शब्दात म्हणजे क्रिस्टल क्लियर असे म्हणतो त्या शब्दात बीडन ने अफगाणिस्तान ला सांगितलेकी त्यांना स्वतःकरता लढावेच लागेल.34 पैकी 9 राज्य तालिबान कब्जात आहेत.काबुल एक महिन्यात पडेल असा अंदाज आहे.भारताने बरीच गुंतवणूक केली आहे दुर्दैवाने तिची माती होणार.
जसे नशीब फुटके असते ना तसे या देशाचे नशीब खराब आहे.अमेरिका आणि रशिया हे दोन राहू केतू यांच्या हस्तरेषेत गेले 40 /50 वर्ष बसले आहेत.आज US ने सैन्य माघार घेतली आणि तालिबान ने 9 राज्ये घशात घातली.2 महिन्यात 90 हजार लोक बेघर झाली आहेत.एकाच वर्षात 4 लाख बेघर.या लोकांना मदत करण्यास
अडचण आहे.आजच जर्मनी आणि नेदरलँड ने मदत थाम्बवली आहे. अफगाण सैन्य तालिबानला शरण जात आहे.काबुल पासून 80 km वर च्या गांझी शहरात आज तालिबानी घुसले आहेत. अफगाण अर्थमंत्री देश सोडून गेले आहेत. बाकी पण त्याच मार्गावर आहेत.जवळजवळ 70 % अफगाणिस्तान तालिबान ने घेतला आहे. एक देश सोडून
देवाक काळजी रे 😭
थोडा व्यक्त होतोय बाकी लोकांना ही विनंती आहे खास करून शिक्षण क्षेत्रात असलेल्या नि जरूर व्यक्त व्हा .मी जे अनुभवतो आहे ते लिहितोय .आज ना मुलांना ना त्यांच्या पालकांना निकालाची ना हुरहूर , ना उत्साह ,ना भीती ना उत्कंठा ,ना देवाचा धावा ना पेढ्यांचा गोडवा ,
हा सगळा निकाल अंतर्गत मूल्यमापन यावर आधारित खरे तर दीड ते दोन वर्षे अभ्यास, टेस्ट, परीक्षा हजेरी, निकाल सगळेच ऑनलाइन आहे .आज उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थ्यांची आकडेवारी आणि टक्केवारी वाचाल तर डोळे पांढरे होतील एकूण 93435 विदयार्थी 90%
1350 विद्यार्थ्यांना 95% तर 46 विद्यार्थी
100% मिळवून आहेत.दहावी चे पण तेच आणि 12 वी चे ही तेच. लाखो मुले पास झाली आहेत आणि ही काही आनंदाची बातमी नाही .10 वि 12 विच्या पौगंडावस्थेतील मुला मुलींन चे भावविश्व काचेच्या पेल्या सारखे तडकणार आहे .,मुले आणि पालक डिप्रेशन मध्ये जाणार.काही डॉक्टर इंजिनियर CA होणार बाकी काय ?
अलबेला 🌹
भगवान आबाजी पालव जन्म 1 ऑगस्ट 1913 अमरावती .वाचतांना किती साधे सरळ नाव वाटते ना ? दादर मध्ये वडील गिरणी कामगार म्हणून काम करत होते म्हणून यांचे बालपण पण मुंबईतच गेले .मध्यमवर्गीय कुटुंबातला हा आहे पहिला मराठी आणि हिंदी महानायक.हा होता 'शापित गंधर्व " प्रतिभेचे दान जरी
ईश्वराने पदरात टाकले तरी प्रारब्ध किंवा हाताच्या रेषांचे जाळे तुम्हाला त्यांनी आखून दिलेल्या रिंगणाबाहेर जाऊ देत नाही .भगवान दादा चे पण रिंगण वरतून आखून दिले होते दादर ची चाळ, चाळीतून जुहू चा समुद्र काठचा 20 खोल्यांचा बंगला ,आलिशान 8 दहा मोटारी उत्तुंग यश अमाप पैसा ,प्रसिद्धी
मग अपयश, घर दार गाड्या पैसा सर्व गायब आणि परत दादरची चाळ .लहानपणा पासून चित्रपटाची आवड वडील गिरणीत गेले की दादा परळ च्या स्टुडियोत चक्कर मारणार. एक मुकपट करून झाला ,दादा ला दिग्दर्शन करायची आवड एक दोन चित्रपट ही काढून झालेले.1951 मध्ये दादांनी बनवलेल्या "अलबेला " ने आयुष्याला
संस्कार ठेवा रे 😡
अजित पवार आज म्हणाले ही महाराष्ट्र ची भाषा नाही पण हे तितके खरे नाही .खरे तर शिवराळ भाषा राजकारणात आणण्याचे श्रेय सेने कडे जाते .भुजबळांना मैद्याचे पोते ,पवारांना बारामती चा मल्ल , ही उपाधी बाळासाहेब यांनीच दिली .मागे फडणीस यांचा वारु मोकाट उधळत होता तेव्हा
छगन उठ कमळ बघ ,शरद कमळ घे असे हलके वक्तव्य करून हा वारसा सुरू केला .आज राणे न चे पोर म्हणतात हे भाडखाऊ सरकार आहे .ही भाषा नाही हे संस्कार आहेत.जनाब सेना ,सोनिया सेना ,जितृदिन आव्हाड, संघोट्या , टरबूज ,चम्पा , बोबड्या , फावड्या , पेंग्विन , धरण मुत्र्या, बेडूक .अरे काय लावलय काय
इतकीच खुमखुमी आहे ते सरळ आई बहिणीवरून शिव्या चालू करा ना .शिव्या पेक्षा ही खालची पातळी राजाकारण्यांनी धरली आहे,त्यात सर्व पक्षीय महिला पदाधिकारी पण चौखूर उधळल्या आहेत.मुख्य म्हणजे महिलांच्या अशा वक्तव्ये किंवा ट्विट ला हजारो लाईक करणारे त्यांचे चाहते आहेत. संजय राऊत यांनी शायरी