कट्टरतावाद विनाशाला आमंत्रण देतो याचं उदाहरण म्हणून आपण पाकिस्तान, तालीबान यांकडे पाहू शकतो. म्हणून माझा कट्टरतावादाला विरोध आहे, मग तिथे #जयश्रीराम म्हणणारी मुले असोत किंवा #अल्लाहुअकबर म्हणून विरोध करणारी ती मुलगी असो. कट्टरतावाद आणि धर्मांधता नकोच.
#भारत_माता_की_जय
(1/3)👇
कोणते कपडे परिधान करायचे हा ज्याचा त्याचा हक्क नक्कीच आहे, परंतु शाळा काॅलेजचा ड्रेसकोड ठरलेला असेल तर तो नियम पाळला गेला पाहिजे. सर्व धर्मीय विद्यार्थी असलेल्या सरकारी शाळेत जी प्रार्थना होते त्यात बहूतेक ठिकाणी फक्त एकाच धर्माची प्रार्थना म्हणली जाते हे ही चुकीचेच आहे. (2/3)👇
कर्नाटक मध्ये हिजाब वरून तापलेलं वातावरण हे ड्रेसकोडचा नियम मोडला म्हणून तापले नसून राजकिय भुमिकेने आणि धर्मांधतेच्या मानसिकतेतून तापले आहे. त्या मुलीला मुलांच्या घोळक्याकडून घेरण्याचा प्रयत्न झाला. या गोष्टी नक्कीच लाजिरवाण्या आणि निषेधार्ह आहेत.
#BeingIndian
(3/3)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Digvijay Vibhute

Digvijay Vibhute Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Digvijay_004

Mar 7, 2021
#पार्टनर

(तो बेडवरून उठला आणि कपडे घालु लागला. ती तशीच पडुन होती.
तो तिच्याकडे पहात स्मितहास्य करत आहे.)
तो : उठ, आवर, जायचय आपल्याला..
ती : हममम
(ती तशीच पडुन आहे.)
ती : ऐक ना.. थॅन्क्स
तो : कशासाठी?
ती : मला जेव्हा गरज वाटते तेव्हा तु नेहमी माझी गरज पुर्ण करतोस म्हणून 👇
(तो फक्त स्माईल देतो)
तो : मला असं वाटत की आपण लग्न करावं
ती : वेडा आहेस का?
तो : कदाचित
ती : नको असा विचार करू.. तुला मी बेस्ट फ्रेंड मानते
तो : तु पण माझी बेस्ट फ्रेंड आहेस. पण त्या पलिकडे जाऊन मला तुझ्याबद्दल प्रेम वाटते..
👇
ती : आता नाहि रे प्रेम वगैरे यावर विश्वास बसत. एवढ्या खोलवर जखमा झाल्यात मनात की आता पुन्हा त्या भरून येणं खुप अवघड आहे.
तो : मान्य आहे.. पण सगळेच सारखे नसतात ना..
ती : हो.. पण आता मी आनंदी आहे.. मला लग्न वगैरे याची गरज नाहि वाटत.. मला कोणत्या बंधनात नाहि अडकायचं..
👇
Read 17 tweets
Feb 16, 2021
राजर्षी शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे पराकोटीचे शत्रुत्व जगजाहीर होते मात्र दोघेही एकमेकांचे मोठेपण जाणून होते. त्यामुळे एकमेकांवर प्रखर टीका करताना दोघांनीही कधीच मर्यादा ओलांडली नाही. ना शाहू महाराज टिळकांना कधी 'समाजद्रोही' म्हणाले, 👇
ना लोकमान्य कधी शाहू महाराजांना 'स्वराज्यद्रोही' म्हणाले. परंतु ही नैतिक मर्यादा टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांना पाळता आली नाही. केळकर, खापर्डे, भोपटकर इत्यादी टिळक अनुयायींनी शाहू महाराजांविरुद्धची विखारी चळवळ कायम धगधगती ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न केले. 👇
शाहू महाराजांना लोकांच्या नजरेत बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न केले, १८ मे १९२१ रोजी तासगावात झालेली 'कुलकर्णी परिषद' त्यापैकीच एक.
१७ मे रोजी 'केसरी'चे संपादक केळकर यांनी खास अंक काढून शाहू महाराज आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यात संस्थानातील दहशतवादी कारवाया निपटून काढण्यासाठी 👇
Read 14 tweets
Feb 15, 2021
आपल्याच देशबांधवांना स्वातंत्र्याचे हक्क नाकारणाऱ्या, पण इंग्रजांकडे स्वातंत्र्याचे हक्क मागणाऱ्या लोकांविषयी

१. स्वामी विवेकानंद म्हणाले होते -

"भारताचा उद्धार करावयास हवा. गरिबांना पोटभर अन्न द्यावयास हवे. शिक्षणाचा प्रसार करायला हवा; आणि पुरोहितगिरी नष्ट करायला हवी. 👇
पुरोहितांचा जुलूम नको. सामाजिक अत्याचार नको..

इंग्रजांकडून अधिक सत्ता मिळावी म्हणून आपल्यातील काही खुळे तरुण सभा भरवतात. त्यांचे हे प्रयत्न पाहून इंग्रज लोक नुसते हसतात. ज्याला इतरांना स्वातंत्र्य देण्याची इच्छा नसते तो स्वतःच स्वातंत्र्याला लायक नसतो..! 👇
कल्पना करा,इंग्रजांनी सारी सत्ता तुम्हाला दिली तर परिणाम काय होईल?जे सत्ताधारी होतील ते बाकीच्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यापर्यंत काही ती सत्ता पोहोचू देणार नाहीत..!अशा गुलामांना सत्ता हवी असते इतरांना गुलाम बनविण्यासाठी."

- स्वामी विवेकानंदांची पत्रे, पृ.२९२.👇
Read 6 tweets
Jan 31, 2021
शाहू महाराज ब्राम्हणद्वेष्टे होते का?

उत्तर : अजिबात नाही. जातिभेदाविरुद्ध लढणारा व्यक्ती एखाद्या जातीचा द्वेष करू शकेल काय? नक्कीच नाही.

मग ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर असा संघर्ष का उभा राहिला?

शाहू महाराजांना समाजातील विषमता संपायची होती, 👇
जातीभेद संपवून मागासलेल्या जातींना त्यांचे सामाजिक हक्क मिळवून द्यायचे होते. ब्रिटिशांच्या काळात सर्व प्रशासनयंत्रणा ब्राम्हण समाजाच्या हातात होती कारण सरकारी नोकरी शिकलेल्याला मिळे आणि शिक्षण ही फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. शाहू महाराजांकडे राजसत्ता होती आणि 👇
सत्तेच्या जोरावर त्यांनी खंबीर पावले उचलून ही शिक्षणातली आणि प्रशासनातली ब्राह्मणांची मक्तेदारी मोडून काढली. बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी वसतिगृह चळवळ आणि अनेक शिक्षणविषयक कायदे / आदेश काढून शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर समाजासाठी शिक्षणाची गंगा वाहती केली.👇
Read 14 tweets
Jan 27, 2021
भारताला शेतकरी आंदोलनाचा फार मोठा इतिहास आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी साहजानंद सरस्वती, प्रोफ. एन जी रंगा, सर छोटूराम, चौधरी चरणसिंग, महेंद्रसिंग टिकैत अशा अनेक दिग्गजांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले आहे. 👇
इंग्रजांपासून ते तत्कालीन काँग्रेस सरकारपर्यंत जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलने झाले तेव्हा सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले, पण कधी आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी अतिरेकी, लाल बावटे, देशद्रोही, विरोधी पक्षाने प्रेरित ठरवण्याचा प्रयत्न झाला नाही.
१९८७ साली केंद्रात काँग्रेसचे/राजीव गांधी 👇
यांचे बहुमताचे सरकार होते तर उत्तरप्रदेशात काँग्रेस नेते वीरबहादूर सिंग मुख्यमंत्री होते. पश्चिम उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर मधील कर्नूकखेडी गावात शेतीला वीज मिळण्याबाबत काहीतरी समस्या निर्माण झाली. त्याचवेळी विजेचे दर सुद्धा वाढवले गेले होते. 👇
Read 12 tweets
Jan 23, 2021
खरंतर १८९६ सालीच शाहू महाराजांनी कोल्हापुरात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम कॉलेजला जोडून एक वसतिगृह स्थापन केले होते. यात सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश होता. या वसतिगृहाचे व्यवस्थापन ब्राम्हण मंडळींकडे होते. शिक्षण ही आपलीच मक्तेदारी आहे 👇
अशी मानसिकता या मंडळींची होती त्यामुळे ब्राह्मणेतर मुलांची संख्या हळूहळू कमी झाली, कालांतराने ते वसतिगृह फक्त ब्राह्मणांचेच बनले. शाहू महाराजांच्या डोक्यात शिक्षण क्षेत्रातील ही मक्तेदारी नाहीशी करण्याबाबत चक्रे फिरत होती. याला वेग आला तो पी.सी.पाटलांमुळे (थोर कृषीतज्ञ).👇
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पी.सी.पाटलांनी त्यांना आलेल्या समस्या शाहू महाराजांना सांगितल्या. गावाचा राजा समजल्या जाणाऱ्या पाटलांच्या पोरांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर मागासलेल्या जातींची काय अवस्था होत असेल या विचाराने महाराज अस्वस्थ झाले.👇
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

:(