#थ्रेड
#ब्लॅक_टायगर
#रवींद्र_कौशिक
#R_A_W
🇮🇳

भारतात एक असा गुप्तहेर झाला आहे की, तो मृत्यूनंतर देशाचा हिरो ठरला. ते गुप्तहेर म्हणजे रवींद्र कौशिक. भारताचे 'ब्लॅक टायगर' म्हणून ते ओळखले जातात.
👇
यांच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट ही आला आहे ज्यात जॉन अब्राहम यांची भूमिका निभावतो.
#Romeo_Akbar_Walter
त्यात त्यांनी कशी महत्वाची महिती भारताला पुरवली याची कल्पना येते.
👇
मुस्लीम बनून पाकिस्तानात दाखल झालेल्या रवींद्र कौशिक यांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. परंतु, दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारला त्यांचं शव स्वीकारण्यासही नकार द्यावा लागला होता. कौशिक हे भारताचे नागरिक नसल्याचं पहिल्यांदा भारत सरकारनं सांगितलं होतं.
👇
त्यावेळी भारत सरकारने कौशिक यांची कामगिरी जाहीर केली नाही. परंतु, नंतर मात्र भारत सरकारनं रवींद्र कौशिक हे भारताचे नागरिक होते, असं जाहीर केलं. रविंद्र कौशिक यांचं काम एका मिशनपुरतं मर्यादीत राहिलं नाही तर ते पाकिस्तानमध्ये राहून पाकिस्तान सेनेच्या मेजर पदापर्यंत जाऊन पोहचले.
👇
पाकिस्तानी सेनेत त्यांनी काही काळ काम केल्यावर त्यांना 'मेजर' या पदावर बढती मिळाली. आपल्यासोबत एक भारतीय गुप्तहेर काम करत असल्याचा मागमूसही एव्हाना पाकिस्तानी सेनेला नव्हता.
खरचं यापेक्षा उत्तम दर्जाची गुप्तहेरी काय असू शकते.
👇
पाकिस्तानमध्ये राहून त्यांनी अनेक माहिती ही भारतापर्यत पुरवत असत.
मात्र, १९८३ हे वर्ष त्यांच्यासाठी फार वाईट ठरले. त्यांना भेटाण्यासाठी 'रॉ'ने एका गुप्तहेराला पाठवलं. परंतु, रवींद्र कौशिक यांना भेटण्याअगोदरच हा गुप्तहेराला पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेनं ताब्यात घेतलं.
👇
त्याची चौकशी केल्यानंतर कौशिक यांची खरी ओळख आणि पाकिस्तानी ओळख समोर आली. याची कुणकुण लागताच अटक होण्याआधीच रवींद्र कौशिक भूमिगत झाले.
अखेर पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून कौशिक यांना अटक करण्यात आली. त्यांना सियालकोटच्या तुरुंगात डांबण्यात आलं.
👇
सियालकोटच्या जेलमध्ये त्यांचा अनेक प्रकारे छळ करण्यात आला. त्यांच्यावर अनेक आरोप लागले. अनेक खटलेदेखील चालवण्यात आले. इतकंच नाही तर, भारतीय सरकारची गुप्त माहिती त्यांनी पाकिस्तानला दिली तर मुक्त करण्याचं प्रलोभनंही त्यांना दाखवण्यात आलं.
👇
मात्र रवींद्र कौशिक यांनी जीवाला धोका असूनही भारताविषयी कुठलीही गुप्त माहिती पाकिस्तानसमोर जाहीर केली नाही.
पाकिस्तानमध्ये १९८५ मध्ये त्यांना फाशी आणि जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली.
२००१ मध्ये रवींद्र कौशिक यांचा तुरुंगाताच मृत्यू झाल्याचं पाकिस्तानने जाहीर केले.
👇
गुप्तहेरांचं आयुष्य म्हणजे रोज टांगती तलवार घेऊन जगणं! केव्हा शत्रूंना आपलं खरं रूप समजेल आणि केव्हा जीव गमवावा लागेल हे काही सांगता येत नाही. तरीही हे गुप्तहेर आपलं काम चोख बजावत असतात.
अश्या हया सर्व भारतमातेच्या वाघांना सलाम 🙌
👇
कोणत्याही स्वार्थाविना केवळ आपल्या जन्मभूमीच्या सेवेसाठी प्राणांचे बलिदान देणारा हा ब्लॅक टायगर आजही विदेशात तैनात असणाऱ्या इतर गुप्तहेरांना निडर होऊन आपले कार्य पार पाडण्याची प्रेरणा देतो आहे.
🇮🇳
#प्रेरणा
साभार - गूगल , वाचलेलं .
फोटो - गूगल
🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Sujit Pandurang Patil

Sujit Pandurang Patil Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @sujitppatil

15 Aug
#थ्रेड 📌📌📌

🇮🇳

74 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता… या प्रवासात आपण कोठुन कुठपर्यंत आलोय याच सिंहावलोकन करण्याचा हा छोटासा प्रयत्न.. 👇
१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट पडद्याला बाजूला सारून स्वतंत्र्याचा सोहळा रंगमंचावर मांडण्यात आला. सूत्रसंचालकाची भूमिका पंतप्रधान पंडित नेहरू यांनी चोखपणे निभावली..”अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता..” 👇
या अजरामर आणि ऐतिहासिक भाषणातून नेहरूंनी देशाला स्वबळावर भरारी घेण्याचे स्वप्न दिले. मात्र हा प्रसंग साकार होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या आयुष्याचा होम करावा लागला ,अन तेंव्हा हे तिरंगी 🇮🇳 दृश्य साकार झाले.👇
Read 8 tweets
5 Jul
#थ्रेड
#खरंच_याला_महत्त्व_द्यायचं_का
कोरोनामुळे आपल्याला आपल्या मुख्य गरजा काय आहे हे लक्षात आलंच आहे,
आपण काही गोष्टींना विनाकारण महत्व द्यायचो असा अनुभव अनेकांना आलाच असेलच,
अश्याच अजुन काही गोष्टी ज्याना आपण खूप जास्त महत्त्व देतो
पण यांना इतकं महत्त्व द्यावं का ? 🤔

1/6
ज्या गोष्टींचे जगात कुठेही नवल वाटल नाही अश्या गोष्टी आपण भारतात मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतो
त्यातील हे ह्या काही गोष्टी 👇:
1. गोरेपणा - ह्या वर आपण भारतीय इतकं महत्त्व देतो की ह्यामुळे भारतात बऱ्याच कंपन्या गोरे व्हायची क्रीम विकून लाखो कोटी कमावतात .

2/6
2. रिअॅलिटी शो - यात सर्व ठरवून प्लॅनिंग ने केलं जातं तरीही आपण ते खरं समजून बघत बसतो
व त्या अभिनेत्याला हीरो मानायला लागतो.
3. पदवी - आपल्या कडे अजूनही पदवीला अनन्यसाधारण महत्त्व देतात
म्हणून फक्त आणि फक्त पदवी मिळवण्यासाठी बरेचजण खटाटोप करतांना दिसतात.

3/6
Read 6 tweets
29 Jun
#खेळाडूपणा
#थ्रेड
एका शर्यतीत, केनियाचे प्रतिनिधित्व करणारा #धावपटू हाबेल मुताई शर्यतीच्या अंतिम रेषेपासून काही फूट अंतरावर होता, परंतु तो गोंधळून गेला आणि त्याने शर्यत पूर्ण केली असा वाटून धावणे सोडून दिले. स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडिज त्याच्या पाठीमागे होता आणि काय घडत आहे Image
हे लक्षात येताच त्याने हाबेलकडे #धावणे चालू ठेवण्यासाठी ओरडण्यास सुरवात केली, परंतु हाबेलला #स्पॅनिश येत नाही आणि त्याला समजले नाही. म्हणून इव्हान ने अंतिम रेषेजवळ येताच त्याला पुढे ढकलले आणि त्याला #जिंकू दिले.
नंतर एका पत्रकाराने इव्हानला विचारले, "की तू असे का केले?" इव्हानने उत्तर दिले "माझे #स्वप्न आहे की एखाद्या दिवशी आपण अश्या जगात राहू जिकडे लोक आपल्या फायद्यापेक्षा जे बरोबर असेल ते करतील. मी त्याला जिंकू दिले नाही, तो #जिंकणार होता.
Read 5 tweets
21 Jun
#थ्रेड
#कर्ण
#एक_वेगळा_विचार
#जिवन
" कर्ण " महाभारतातील एक शूर राजा
सर्वोत्कृष्ट धनुर्धर , दानशूर अश्या अनेक कारणांनी आपण त्याला ओळखतो.
त्यांच्या शुरतेच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असणार परंतु कर्ण व जीवन यांची सांगळ घालण्याचा हा प्रयत्न म्हणून कर्ण एक वेगळ्या रीतीने मांडतोय
1/11
महाभारतात कर्ण हि व्यक्तीरेखा "असून अडचण व नसून खोळंबा" या तत्वात बसणारी आहे.मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे? मी अद्भुत आहे? आणि मी असामान्य व्यक्ती आहे? हे लहानपणापासून जाणले असतानाही त्या व्यक्तीरेखेनी स्वतःला संकुचित ठेवले
तो अजेय होता, तसेच जो पर्यंत त्याच्याकडे कवच-कुंडले आहेत
तो पर्यंत त्याला कोणीही युद्धात हरवू शकणार नाही याची जाणीव आसताना, त्याने दुर्योधनाने दिलेल्या राजपद स्वीकारण्यापेक्षा मनगटाच्या जोरावर मिळवण्याचा का प्रयत्न केला नाही? त्याने ठरवले असते तर कितीतरी राज्ये युद्धात जिंकून तो स्वामी होऊ शकला असता, तशी कधी महत्वाकांक्षा दिसली नाही
Read 11 tweets
20 Jun
#चला_अंधश्रद्धेचे_ग्रहण_सोडवूयात

उद्या एक खगोलीय घटना घडणार आहे ती म्हणजे सूर्य ग्रहण.उत्तर भारतातून काही भागात कंकणाकृती तर उर्वरित भारतात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल
ग्रहणाविषयी अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज समाजात प्रचलित असतात.अशाच गैरसमजांचे निराकरण करण्याचा हा प्रयत्न
ग्रहण अशुभ असते. ग्रहणे पाहू नयेत*
ग्रहण ही खगोलीय घटना आहे.जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत आणि एकाच प्रतलात येतात तेव्हा चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाऊन सूर्यग्रहण होते. यात शुभ-अशुभ असे काही नाही
ग्रहणात हवा अशुद्ध होते*
सुर्यग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीच्या काही भागावर पडते.सावली ही सावलीच असते.झाडाची सावली,डोंगराची सावली किंवा चंद्राची सावली सारखीच असते.जर झाडाच्या सावलीत हवा अशुद्ध होत नसेल तर चंद्राच्या सावलीत देखील होणार नाही.
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!