#Thread
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्र - सांप्रत तरुणांसाठी आदर्शद्योतक:-
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः।।
चैत्र शुद्ध नवमीची मध्यान्हाची वेळ होती.अयोध्येत अतीव आनंदाच वातावरण होत.कारण साक्षात जगद्धर्ता महाविष्णूंचं अवतरण अयोध्येत झालं होत.
१/
संपूर्ण रघुकुल आज धन्य झाल. श्रीरामांच्या आधी होऊन गेलेल्या सकळ प्रभृतींची भगवद्भक्ती आज फळली. श्रीरामांचा अवतार झाला आणि सकळ पृथ्वी आनंदून गेली. यापुढील रामायण आपणा सर्वांना माहितीच आहे. आज माझा तो विषय नाही ये. आजचा विषय आहे की श्रीरामांचं एकंदर अवतारकार्य आपल्याला अर्थात
२/
आजच्या युवकांना कशाप्रकारे आदर्श ठरू शकतं. यात सर्वात सुरुवातीचा मुद्दा येतो की श्रीराम का आदर्श म्हणून बघायचे? तर आदर्श पुत्र,आदर्श पती, आदर्श बंधू,आदर्श राजा,आदर्श मित्र आणि आदर्श पुरुष ह्या सर्वांच ऐक्याने प्राकट्य कुठे होत असेल तर ते श्रीरामांच्या अवतारात आपल्याला होते.
३/
त्यामुळे श्रीरामांचा आदर्श घ्यायचा. तसेच श्रीरामांच्या ठाई सकळ शक्ती असताना देखील त्यांनी त्याचा वापर न करता केवळ आणि केवळ पुरुष मर्यादेत राहून संपूर्ण कार्य केलं. नाहीतर त्यांना काय गरज होती कोणाची ते एकटे रावणाचा वध करून सीतेस परत आणण्यास सक्षम होते.पण त्यांनी तसे न करता
४/
एखाद्या योध्याप्रमाणे वानरसेनेच्या मदतीने रावणाचा वध केला. म्हणून आपल्याला रामांचा आदर्श घ्यायचा आहे.
श्रीरामांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट जी अनेकदा सांगितली तरी परत सांगावीच लागते ती म्हणजे त्यांची निस्सीम पितृभक्ती. केवळ पित्याच्या आज्ञेखातर त्यांनी १४ वर्षे वनवास
५/
स्वीकारला. ज्यावेळी कैकयीने श्रीरामांना आज्ञा पालनाविषयी विचारले त्यावेळी श्रीराम म्हणतात "पित्रर्थे जीवितं दास्ये पिबेयं विष्मुल्बणम्।" अर्थात मी माझ्या वडिलांसाठी विष पिऊन प्राणत्याग करण्यासाठी पण तयार आहे. केवढी ही पितृभक्ती. तेच आज वृद्धश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढताना
६/
दिसत आहे. मुलांची आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी कमी होताना दिसत आहे. अशावेळी आपल्याला श्रीराम मार्ग दाखवत आहेत. सर्वांना आज त्या मार्गाने जाण्याची अत्यंत गरज आहे. त्यानंतर त्यांचे बंधुप्रेम. ज्यावेळी श्रीरामांना कळाले की माता कैकेयीची भरताला राजा करण्याची ईच्छा आहे, ते
७/
ऐकल्यावर रामांना जेवढा आनंद आपण राजा होणार हे कळल्यावर झाला नव्हता त्यापेक्षा जास्त आनंद भरत राजा होणार हे कळल्यावर झाला. लक्ष्मणावरचे प्रेम तर आपल्याला माहितीच आहे. असे बंधूप्रेम पाहून अगदी डोळे भरून येतात. सध्या दररोज भावाने भावाचा जमिनीसाठी किंवा नात्यातील कलहामुळे फडशा
८/
पाडला याच्या अनेको बातम्या आपण पाहतो. म्हणजे पैसा जमीन किंवा स्वतःचा अहंकारासाठी माणूस स्वतःच्या सख्ख्या भावाच्या जीवावर उठत आहे केवढं हे क्रौर्य वाढलं आहे माणसाच.!त्यामुळे श्रीरामांसारख्या आदर्शाची गरज आपल्याला आहे.
त्यानंतरचा गुण म्हणजे एकवचनीपणा खरतर हा गुण केवळ श्रीरामांचा
९/
नव्हता तर हे जणू संपूर्ण रघुकुलाचे ब्रीदच होते. एकदा वचन दिले की दिले त्यातून परत माघार नाही. भले ही मग आपले हानी झाली तरी चालेल. 'प्राण जाये पर वचन न जाये' ही गोष्ट श्रीरामांनी प्रत्यक्ष जीवनात अनुसरून आपल्याला दाखवली आहे. आज आपण जर पाहायला गेलं तर लोक एकदा एक सांगतात
१०/
आणि लगेच परत आपल्या म्हणण्यावरून पलटतात. एखाद्याच्या समोर खूप त्याची स्तुती करतील पण त्याने पाठ फिरवली की लगेच त्याला शिव्या घालायला देखील कमी करत नाहीत. आपल्या फायदयानुसार वागतात. अशावेळी आपण श्रीरामांच व्यक्तित्व आपल्या जीवनात उतरवणं अत्यंत गरजेचं होऊन जात.! धर्म
११/
संस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।। ह्या भगवतउक्तीनुसार श्रीरामांनी आपल्या पूर्ण अवतारकार्यात धर्माचं वहन केलं. तसेच त्यांनी पाखंडांचे खंडन देखील केले. त्यासाठी मग त्यांनी ते ज्यापद्धतीने अत्याचार करतात त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देखील दिली. याच उदाहरण म्हणजे वाली वध.वालीने
१२/
छळाने सुग्रीवाच्या अधिकारावर व पत्नीवर कब्जा केला. हे कळाल्यावर श्रीरामांनी काही सुग्रीवाला लेचपेचं भाषण दिलं नाही की तो तसा वागला म्हणून आपण कशाला तस वागायचं आपण कायम शांतीने खऱ्याने वागायचं. छे छे अहो नाठाळाचे माथी हाणू काठी ह्या नुसार त्यांनी वालीने जसं कपटाने सुग्रीवाला
१३/
छळलं होत तसाच समाचार श्रीरामांनी त्याचा घेतला. ह्यातून सांगायचं काय तर जो ज्या पद्धतीने वागतो त्याला त्या पद्धतीने उत्तर द्यावे. नाहीतर तुम्ही आमचे माणसं मारून रेल्वे मध्ये भरून पाठवा आणि आम्ही तुम्हाला पैशाचे बलुते देऊ असली पुळचट शिकवण काही कामाची नाही.त्यामुळे पाखंड खंडणात
१४/
हा आदर्श अत्यंत महत्वाचा वाटतो मला श्रीरामांचा. ह्या गोष्टीत आपल्याला श्रीरामांच मित्रप्रेम ही दिसून येते.
त्यानंतर ज्यावेळी सीतेच्या शोधासाठी सगळी वानरसेना तयार झाली. सगळ्यांनी एकजूट होऊन सीताशोध करायचे वचन श्रीरामांना दिले त्यावेळी त्यांनी असा विचार केला नाही की हे सामान्य
१५/
वानर आहेत साधे वन्यप्राणी आहेत हे काय माझ्या सीतेला शोधून आणतील. तस न करता त्यांनी सकळ वानरसेनेसोबत मिळून रावणाचा वध केला व सीतेला सोडवून आणले. यातून आपल्याला काय दिसते तर कोणालाही कमी न लेखने. कुठल्या जीवात काय गुण असेल काही सांगता येत नाही. प्रत्येकाला देवाने काहीतरी वेगळपण
१६/
दिलेलं आहे याच भान आपण सतत ठेवायला हवं. नाहीतर आजकाल लोक थोड काही शिकलं की इतक्या फुशारक्या मारतात जणू त्यांना ब्रह्मज्ञान झाल आहे.दुसऱ्याला अजिबात किंमत देत नाहीत. पण असे न करता प्रत्येकाला देवाने काही ना काही गुण दिलेले आहेत ह्याची जाणीव ठेऊन माणसाने वागायला हवे. त्यानंतर
१७/
राजा म्हणून आपल्या जबाबदारीचं काटेकोर निर्वहन. ज्यावेळी राज्याभिषेक झाला रामांचे राज्य चालू झाले. त्यावेळी जनतेमध्ये होणारी सीतेच्या विषयीची कुजबुज रामांना कळाली. त्यावेळी त्यांनी एका राजाच्या कर्तव्यास जागून सीतेचा त्याग केला. अर्थात राजाच्या जबाबदारीस जास्त महत्व दिले.
१८/
आज आपण वावरताना पाहतो की काम करताना अनेक ठिकाणी लोक आपल्या घरच्या लोकांना कर्तव्यापेक्षा जास्त महत्व देतात. त्यांच्या फायद्यासाठी कुठलेही नियम तोडायला मोडायला तयार असतात. मग तिकडे बाकीच्या लोकांचं काही होऊ देत आमच्या नातेवाईकांचे कल्याण झाले पाहिजे याकडे जास्त कल देतात लोक.
१९/
त्याऐवजी आपण श्रीरामांचा आदर्श घेऊन आपल्या कर्तव्यास जागायला हवे.
प्रत्येक मनुष्यास क्रोध येतो. मग तो कोणीही असो त्यात मग श्रीराम पण चुकले नाहीत. पण त्या क्रोधाचा वापर योग्य कसा करायचा हे आपल्याला श्रीराम दाखवतात. इतर वेळी अत्यंत करुणामय असणारी रामांची मूर्ती युद्धात मात्र
२०/
श्रीराम राम राम रणकर्कश राम राम। अशी होत असे. क्रोध नियोजन ही गोष्ट नक्कीच घेण्यासारखी वाटते मला.
ज्यावेळी रावणाचा पराभव झाला लंकेवर विजय झाला. त्यावेळी लंकेच्या सिंहासनावर बसावे अशी बऱ्याच लोकांची इच्छा होती त्यावेळी श्रीराम लक्ष्मणाला उद्देशुन म्हणाले अपि स्वर्णमयी लङ्का न
२१/
मे लक्ष्मण रोचते। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।। म्हणजेच काय तर लंका जरी सोन्याची असली तरी मला त्याची काही किंमत नाही कारण जननी अर्थात आई आणि जन्मभूमी ह्या मला स्वर्गाहून पण प्रिय. आपल्या आई आणि जन्मभूमी विषयीची कृतज्ञता कशी असावी याचा आदर्श आपण ह्या उदाहरणावरून
२२/
घेऊ शकतो. आजकाल अनेक लोक आपली जन्मभूमी सोडून शिक्षणासाठी अथवा अर्थार्जन करण्यासाठी दुसरीकडे स्थायिक होतात आणि आपल्या जन्मभूमी विषयी अत्यंत कृतघ्न होतात त्यांनी ही वरची गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.ज्या मातृभूमीत आपण लहानाचे मोठे झालो जिने आपल्याला आतापर्यंत घडवले
२३/
त्याविषयी मनात कृतज्ञता असायलाच हवी.
तर आज ह्या रामनवमीच्या पवित्र दिनी प्रभू श्रीरामचंद्रांविषयी जे काय मला वाटतं ते ह्या त्रोटक बोलातून मांडण्याचा प्रयत्न केला. इच्छा एकच की अखंड हिंदुस्थानचे दैवत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र हे आपल्या ऊर्जेचे केंद्र व्हावे व आपण
२४/
ह्या उर्जेद्वारे आपल्या कल्याणार्थ आणि राष्ट्राच्या प्रगतीत अग्रेसर व्हावे..!!
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥
रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।
सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥
धन्यवाद..!! #रामनवमी2021 #Ramnavmi

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा।

Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा। Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishwambharMule

19 Apr
#Thread
आपल्यातले खरे #हिंदू ओळखा...!!
हे असं मी का म्हणत आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर मी ह्या थ्रेड मध्ये देत आहे. मागे काही दिवसांपूर्वी सर्वश्रुत असलेले सद्गुरू अर्थात जग्गी वासुदेव ह्यांचा एक व्हिडिओ ट्विटर आणि
१/
इतर माध्यमांवर व्हायरल झाला.आपणही तो पाहिला असेल.ज्यात सद्गुरू कृष्ण आणि यशोदेच्या संबंधावर बोलताना दिसतात आणि त्यात त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं आपल्याला प्रथमदर्शनी दिसतं.ह्याविषयी जर पाहायला गेलं तर एक तर तो व्हिडिओ छाटून नेमका त्यातील वादग्रस्त भाग घेऊन बनवला आहे.
२/
ज्यांनी ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहायला असेल त्यांना ही गोष्ट लक्षात येईल की हा व्हिडिओ केवळ आणि केवळ सद्गुरूंची बदनामी करण्यासाठी बनवला आहे.मग प्रश्न येतो की सद्गुरूंची बदनामी हे लोक का करत आहेत? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सद्गुरू सध्या हिंदू मंदिरे सरकारी
३/
Read 13 tweets
18 Apr
नामस्मरणाचे महत्व :-
आपल्या हिंदू धर्मात नामस्मरणाचे प्रचंड महत्व सांगितले आहे. केवळ भक्तिभावाने केलेल्या नामस्मरणाने अनेक लोकांचं कल्याण झालं, अनेकांची दुर्गम संकटे दूर झाली. आपल्याकडे याची खूप उदाहरणे पाहायला भेटतात. त्यात परत कली युगात नामस्मरण हे अत्यंत+ Image
उपयुक्त आहे असं सांगण्यात येत. महाभारतात भगवान श्रीकृष्ण सांगतात की ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि।’ अर्थात कलियुगात मी जप यज्ञात अर्थात नामस्मरणात स्थित आहे. जे फळ इतर युगात मोठे मोठे अनुष्ठान करून प्राप्त ते फळ कलियुगात केवळ श्रद्धेने केलेल्या नामस्मरणातून मिळत. सध्या ह्या कोरोणा+
वैश्विक महामारीचा प्रकोप आपण पाहतच आहोत. सगळीकडे अत्यंत उदासीन वातावरण झालं आहे. त्यामुळे साहजिकच आपले मन ही उदासीन व निराश होऊन जाते. तर यासाठी आपण सगळ्यांनी यथाशक्ती जर देवाचे नामस्मरण केले तर नक्कीच सकारात्मक वातावरणाची अनुभूती आपल्याला नक्की येईल. त्यासाठी फार काही+
Read 7 tweets
15 Apr
-:हिंदू परिसंस्थेची (Ecosystem) आवश्यकता:-
तारीख होती १७ एप्रिल २०२०, त्यादिवशी मी सकाळी उठलो व सवयीप्रमाणे ट्विटर चाळत बसलो असता,दोन ट्रेंड्स ने माझं लक्ष वेधले एक म्हणजे पालघर आणि दुसरा म्हणजे साधू लीचींग.त्या ट्रेण्ड मधले ट्विट बघता बघता तो भयानक
१/
व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं, सगळ्या अंगावर शहारे आले आणि तळपायाची आग मस्तकात गेली.!तुम्हाला वेगळं सांगायला नको की तो व्हिडिओ पालघरमध्ये हत्या झालेल्या साधूंचा होता. किती भयानक आणि हृदयद्रावक होता तो व्हिडिओ.! २ अत्यंत दीन आणि करुण मुखाने इकडे तिकडे
२/
मदतीची याचना करणारे ते साधू आणि त्यांच्यावर अत्यंत क्रूर व त्वेषाने हल्ला करणारे ते नरराक्षस.! होय नरराक्षसच ते त्यांना मानव म्हणणे म्हणजे मानव जातीचा अपमान आहे. त्यात अजून एक धक्का देणारी गोष्ट कुठली होती तर ती ही की त्यातील एक साधू ज्यावेळी याचकभावाने तेथील पोलीसाकडे गेले
३/
Read 23 tweets
11 Apr
#Thread
-:संभाजी महाराज बलिदान दिवस आणि गुढीपाडवा:-
तारीख होती ११ मार्च १६८९ आणि तिथी होती फाल्गुन वद्य अमावस्या. महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस. स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अमानवी अत्याचार करून धर्मवीर छत्रपती
१/
संभाजी महाराजांना मारले. इतके अमानुष अत्याचार केले त्याने की शेवटी छिंदी छिंदी झालेला संभाजी महाराजांचा देह राहिला. पण इतके अत्याचार होऊन सुद्धा संभाजी महाराज आपल्या हिंदू धर्म रक्षक ह्या बिरुदावली पासून परावृत्त झाले नाहीत. मृत्यूला आनंदाने कवटाळले पण धर्मांतरण करण्यास तयार
२/
झाले नाहीत. केवढी ती स्वधर्माविषयीची आत्मीयता.
औरंगजेब मोठा चाणाक्ष माणूस होता. त्याला माहिती होते की उद्या म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस. हा हिंदूंचा सन आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणूनबुजून आधीचा दिवस निवडला.
३/
Read 31 tweets
6 Apr
#Thread
तुकाराम महाराज - वैकुण्ठगमन की संशयित मृत्यू..?हा थ्रेड चालू करण्यापूर्वी मी माझ्या विषयी थोड सांगू इच्छितो. आमच्या दोन्ही घरात अर्थात माझ्या घरी आणि आजोळी भागवत सांगण्याची किमान ५ पिढ्यांपासून परंपरा आहे. माझे आजोबा हे खूप विद्वान आणि प्रसिद्ध भागवतकार होते.
१/
त्याचप्रमाणे माझ्या आईचे वडील हे एकनाथ महाराजांच्या परंपरेतील प्रसिद्ध भागवतकार व कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच वातावरण दोन्ही घरात अगदी ओतप्रोत भरलेलं आहे. सध्या ही परंपरा माझे काका आणि मामा उत्तमरित्या चालवत आहेत. अशा घरात वाढल्यामुळे साहजिकच
२/
अत्यंत विद्वान व थोर अध्यात्मिक विभूतींचा सहवास प्राप्त झाला त्यांना ऐकायला भेटलं.म्हणजे अगदी सध्या वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित घर म्हणजे देगलूरकरांच. त्या घरातील प पू चंद्रशेखर महाराज व प पू चैतन्य महाराज ह्यांच्यापासून ते अगदी सर्व सर्व लोकं.
३/
Read 20 tweets
5 Apr
ज्याठिकाणी विकासाच्या,प्रगतीच्या,कामांच्या बातम्या यायला हव्यात त्याठिकाणी दररोज भ्रष्टाचार,बलात्कार,उत्पीडन,कोरोणा काळातील ढिसाळ नियोजन ह्यांच्याच बातम्यांनी गेलं वर्ष गेलं. आणि त्यात मानाचा (अपमानाचा) तुरा म्हणजे आजची बातमी की मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख
१/
ह्यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचा आदेश दिला. एका विद्यमान गृहमंत्र्याविरूध्द केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणे ही खरचं महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आरोप पण कसले तर खंडणी वसुलीचे. ज्यावेळी महाराष्ट्र महामारीने त्रासून गेला होता. त्यावेळी ही लोकं स्वतःचे खिसे भरत होते
२/
किती प्रकरण सांगावीत अगदी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून ते आजच हे प्रकरण इथपर्यंत ह्या सर्व घटनेंनी महाराष्ट्र उध्वस्त झाला. नियोजनशून्य,भावनाशून्य,आत्मस्वार्थीय अशा लोकांचा भरणा ह्या सरकारमध्ये असल्याने महाराष्ट्र आज त्राही त्राही करत आहे..!!
३/
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!