जसं टॅक्सी येणं हे टांगेवाल्यांच्या मुळावर आलं.. तसं सांप्रतकाळी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं हे आयुर्वेदाच्या नावाने रस्त्याकडेला तंबूतुन पुड्या विकणाऱ्यांच्या मुळावर आलं.
काही भंपक स्वतःस आयुर्वेदाचार्य, योगाचार्य म्हणवून घेतात..त्यांच्यापासूनच आयुर्वेदास खरा धोका आहे.
#थ्रेड #म
आयुर्वेद हा विषय भारतीयांसाठी अगदीच जीवाचा विषय..जिथं जिथं इतिहासाच्या जीवावर मर्दुमकी गाजवावी तिथं तिथं भारतीय मागे हटत नाहीत..हा इतिहास आहे.. गेल्या साताठ वर्षात तर अशा आयुर्वेदाचार्य बाबा-बुवांचे मोठेच पेव अखंड भारतवर्षात फुटले.. हरेक भगवादारी व्यक्ती राजमान्य वैदू होऊन गेला.
नैसर्गिक जीवनपद्धतीने जीवनप्रवास करणे हे मूळ आयुर्वेदाचे तत्व.. आरोग्य हे त्याच नैसर्गिक संसाधनांचा वापर करून उत्तम राखणे हा सांगावा आयुर्वेदाचाच..तो योग्य आणि मान्यच.. पण म्हणून त्या आयुर्वेदिक पद्धतीत इतिहासात कधीही वैज्ञानिक दृष्टिकोनास तिलांजली दिल्याचे ऐकिवात नाही..
डॉ. शरदिनी डहाणूकर असतील की, डॉ. सदानंद सरदेशमुख असतील..त्यांनी आयुर्वेदाच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात वैज्ञानिकरित्या भरीव कामगिरी केली. त्याचा फायदा सबंध जगास झाला..आणि आयुर्वेदासही झाला.
प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक तर्कावर जोखणे हे परिपूर्णतेचे प्रतीक असते हे त्यांना मान्य होते.
गतवर्षी कोविड काळात अख्ख जग लस निर्मितीसाठी झटत असताना.. भारतीय आयुर्वेदाचे मारककर्ते रामकृष्ण यादव उर्फ रामदेवबाबा यांनी औषध तयार केल्याचे घोषित केले.. त्याचे पुढे जे व्हायचे ते झाले.. कारण कोणतीही वैज्ञानिक प्रक्रिया पार न पाडता केलेली बतावणी यापलिकडे तिथं काहीही न्हवतं.
तीच गत यंदाच्या फेब्रुवारीत घडली.. या आयुर्वेदाचे सोंग घेऊन पक्का व्यापारी बनलेल्या यादवने कोरोनील नामक औषध बाजारात आणले.. वरून WHO ने यावर शिक्कामोर्तब केल्याची बतावणी यावेळी केली..आणि यंदा त्यास दोन सरकारी अर्धवटरावांची ही मूकसंम्मती लाभली..WHO ने दावा तात्काळ फेटाळून लावला.
म्हणून या यादवसहित अर्धवटरावांचाही खेळ उघडा पडला..ते दोघे म्हणजे एक खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि दुसरे गोमाता प्रिय असणारे नितीन गडकरी.
वास्तविक कोणी कोणावर श्रद्धा ठेवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी आपण एखादं वैधानिक पद धारण करताना सायंटिफिक टेम्परची शपथ घेतली
असताना.. अशा अवैध आणि अवैज्ञानिक प्रक्रियेत सामील होतोच कसे? याचीसुद्धा त्यांना लाज वाटू नये?
आपले आरोग्यमंत्री स्वतः डॉक्टर आहेत.. त्यांची नियुक्ती मंत्रीपदी झाल्यावर हायस वाटलेलं.. पण आजच्या त्यांच्या वागण्याने हे खरंच डॉक्टर आहेत का? हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.
प्रत्येक औषध निर्मितीत काहीएक वैज्ञानिक प्रक्रिया असते..ते औषध निर्माण झाल्यावर त्याच्या चाचणी प्रक्रिया पार पाडून निरीक्षणे नोंदणीकृत करून त्या औषधांची परिणामकारकता आणि साईडइफेक्ट्स याचा दस्तऐवज तयार होतो.. या सगळ्या प्रक्रियेस बगल देऊन औषध आणायचे आणि त्यास विरोध नको म्हणायचे?
खरंतर त्या रामदेवबाबास विरोध म्हणजे आयुर्वेदास विरोध असा अतिशय मूर्ख समज सध्या बोकाळत आहे.. एका व्यक्तीला विरोध म्हणजे देशास विरोध.. हे ही त्याच पंगतीतील मूर्खजन.
आयुर्वेदाच्या नावाखाली या भोंदू वैदूने जो काही नंगानाच गेले साताठ वर्ष घातला आहे त्यास तोड नाही..
एरवी हा रामकृष्ण यादव नामक व्यक्ती अनुल्लेखाने मारायच्या लायकीचा..आणि कोणी काय व्यवसाय करावा किंवा कशावर पोट भरावे हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य..पण याच्या करणीने जर आयुर्वेदाचे नुकसान होऊन जगभर हसे होणार असेल तर मात्र भारतीयांनी सावध होऊन त्यास खड्यासारखे बाजूस करायला हवे.
नैसर्गिक जगणं वगैरे ठीकच पण त्यातही काहीएक वैज्ञानिकता असते..तिस बगल देऊन अंगारे-धुपारे आणि दगड-मातीची पुरचुंडी करून त्यास आयुर्वेद भासवून त्याचा बाजार मांडणे..आणि स्वदेशीच्या जागराखाली त्यास सामन्यांच्या भावनेला हात घालणे.याने भोंदू वैदूचे तेव्हढे भले होईल. आयुर्वेदाचे नाही..!❤️
महितीजाल, इकॉनॉमिक टाइम्स आणि लोकसत्ता
@Omkara_Mali @SahilVastad @Nilesh_P_Z @DrVidyaDeshmukh

#threadकर

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

5 May
आपण सगळे म्हणायला फक्त २१व्या शतकात आलोय..जुने दिवस आठवून त्यात तासनतास रमायला होतं.. पर्यायच नाहीय दुसरा.. मनाला भावेल असं जीवन जगण्याची सोय वर्तमानात नाही..म्हणून मन त्याला हवा असलेला कम्फर्ट शोधत मागे धावत जातं.
मनाला आसरा हवा असतो..शांततेचा..!❤️
#म
विज्ञानाने क्रांती केली..पण ती आपल्याला सूट होईल अशी पूरक व्यवस्था आपण उभी करू शकलो नाही.
एक स्वतंत्र देश म्हणून आपली तुलना आपण आपल्याशीच न करता.. एका धर्मांध देशासोबत करावी..आणि प्रत्येक निवडणुकीत त्या देशाच्या भावनेवर fluctuate होऊन आपला लोकप्रतिनिधी निवडावा..भयंकर होतंय हे.. २
लोकशाही लवाजमा लोकशाही देशास डोईजड वाटावा..आणि सरतेशेवटी कोणीतरी लोकशाहीच्या नरडीचा घोट घ्यावा.. लोकशाही देशास न पेलणारे पेल्यातील वादळ ते.. पेल्यातच शमेल.. लोकशाहीसह.
हक्क हवे असतात आणि कर्तव्ये पाळायची असतात.. त्यात कसूर झाल्यास कर्तव्ये गहाण पडतात..आणि हक्क विकले जातात. ३
Read 4 tweets
5 May
सध्या आरक्षण मान्य होत नाही ना? ठिकाय,तर समाजास अजून वेगवेगळ्या पद्धतीने कशी मदत करता येईल याचा विचार समाजातील 'आहे रे आणि नाही रे' वर्गांने करायला हवा..हा विचार सध्या महत्वाचा आहे.
कायदेशीर लढाई आणि त्यातील युक्तिवादात कमतरता असल्याने वस्तुस्थिती न्यायालयात समोर आली नाही. #म
ही बाब प्रथमदर्शनी दिसते.. बाकी सविस्तर निकाल आल्यानंतर मराठा समाजाचे प्रतिनिधी योग्य ती कायदेशीर रणनीती आखतील. तो पर्यंत सामाजिक स्थैर्य आणि शांतता राखणं ही आपली जबाबदारी आहे.
समाजाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास मांडताना न्यायालयास काय अपेक्षित आहे?
जेणेकरून मराठ्यांची सत्य परिस्थिती ठळकपणे समोर येईल.. यादृष्टीने नवीन अभ्यास करणे गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं त्या अभ्यास करणाऱ्या समितीस कायद्याचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे.. अन्यथा हा न्यायालयीन पेपर अभ्यास न करताच दिलेल्या चाचणी परीक्षेसम अयशस्वीच होणार.
Read 4 tweets
30 Apr
सणाच्या पहाटेचा पहिला प्रहर..आदल्या दिवशी रात्री १२ वाजेस्तोवर का जागलेली असेना ती.. त्यादिवशी पहाटे ३ च्याटोलला तिनं उठावं..डाळ शिजत घालावी..लगबगीनं पोळ्यांसाठी कणिक मळून ठेवावी आणि पाटा-वरवंटा घेऊन डाळीचं पुरण वाटावं..सणासुदीला आईचा बेत असतो पुरणपोळीचा.
#खाद्यसंस्कृती #थ्रेड #म
समाजाला जशी संस्कृती असते..तशी ती खाद्यपदार्थांनाही असते.. पण या दोन्ही संस्कृतींचा भार स्त्रियांच्या खांद्यावर असतो.. बाकी पुरुष नुसते बडेजाव मारण्यातच पुढं असतात..बहुतांश वेळा.
पाट्यावरच्या कणकेला वरवंट्याचे घाव घालणारी आई..प्रत्येक घावाला तिनं प्रेम ओतावं..त्याचीच चव आम्हाला.
लोहाराचा भाता चालावा तशी चूल धगधगावी..त्या धगित तापलेल्या तव्यावर पुरण भरून लाटलेली पोळी पडावी..अखंड दुरडी भरस्तोवर तिनं पोळ्यांचा रतीब घालावा..पोराबाळांना चांगल्या दोनरोज पुरतील एवढ्या पोळ्या तिनं दिवस उगवायला बनवाव्यात.
तांबडं फुटायला तिनं येळवणीच्या आमटीला फोडणी दिलेली असते.
Read 12 tweets
29 Apr
घटना साधारणपणे २०१७ ची..
पुण्यात होतो.शेती विषयक एक कार्यशाळा अटेंड करायचा बेत होता.विषय होता 'शेतीचा अर्थ'.
त्याच दिवशी केंद्र सरकारचे मुख्य अर्थसल्लागार सुब्रमण्यम झंझावाती अस काही बोलले.ते म्हणाले 'शेतकऱ्यांना आता प्राप्तिकराच्या जाळ्यात घ्यायला हवं.'
#महाराष्ट्रदिन #म #थ्रेड
बराच खल झाला तेंव्हा या विषयावर.. बरीच टीका झेलावी लागली सुब्रमण्यमनां.
१९२५ साली कर परिषदेत मागणी होती शेतकऱ्यांना कर लावा अशी.. आज आणिएक ४ वर्षांनी शंभरी होईल त्या मागणीची.. आज २१ सालीही निर्णय नाहीय त्यावर..शेती खरंतर भारतीयांना जिव्हाळ्याचा विषय..अलीकडे तर खूपच sympathy.
म्हणजे गेल्या शंभर एक वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहिलं..पण शेतकऱ्यांचं उत्पन्न काही करपात्र करता आलं नाही आपल्याला..म्हणायला फक्त शेती ही काळी आई आणि शेतकरी बळीराजा आहे..गेल्या शतकभरात जी काही वाताहत त्या आईची आणि लेकरांची झालीय ती शब्दात सांगायची सोय नाही.
शेती राज्यसूचीत येते.
Read 27 tweets
26 Apr
एवढी महान संतसाहित्य परंपरा, ब्रिटिशकालीन समाजसुधारकांचा वारसा आणि महापुरुषांची अखंड फौज वारसरूपी पाठीशी असताना.. आज आपल्याला एका श्वासाच्या ऑक्सिजनसाठी तडफडावं लागत असेल तर त्या परंपरेचे खरे वारस आपण आहोत का..?
येत्या चार दिवसात महाराष्ट्र दिन आहे..

#महाराष्ट्रदिन #थ्रेड #म
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य जग आणि मन॥
इति संत शिरोमणी जगद्गुरू श्री संत तुकोबाराय.

महाराष्ट्रसमाज आणि एकूणच भारतवर्षात गेली सताठशे वर्ष जी काही सामाजिक कूस बदल घडली. त्यात सिंहाचा वाटा हा संत साहित्यास जातो.
जवळपास १३व्या शतकाच्या उत्तरार्धापासून हा समाज एका अंदाधुंदीस सामोरा गेला, आजही जातोच आहे.त्यातून मार्ग दाखवण्याचे काम संत साहित्य इमानेइतबारे करत आहे.अगदी आजही.
संत साहित्याचा आवाका भला थोरला आहे. त्यातील प्राणप्रिय असणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकोबारायांविषयी सुरवातीला चार शब्द.
Read 20 tweets
3 Apr
"अश्मयुग काही दगड संपले म्हणून संपले नाही. पण तेल मात्र तेलयुगाचा अंत व्हायच्या अगोदर संपेल." हे गाजलेलं वाक्य त्यांचं.
एखाद्या व्यक्तीचं असामान्यत्व काळच अबाधित राखतो.
आत्ता फेब्रुवारीच्या २३ व्या दिवशी त्यांनी आपला निरोप घेतला.
बरोबर,ते आहेत शेख अहमद झाकी यामानी..!❤️
#थ्रेड #म
प्रत्येक कार्यप्रवण हाताच्या भाग्यरेषेचा इतिहास हा जळमटांनी व्यापलेलाच असतो.
झाकी जन्मले १९३० ला..मक्का, सौदी अरेबियात जन्माला आलेलं लेकरू ते..वडील हसन यामानी धार्मिक गुरू..आई साहित्यप्रेमी..सगळीकडं तांडे करून बोंबलत फिरणारे अरब..गरिबी पाचवीला पुजलेली..त्यावेळी देश ही ओळख न्हवती.
तरीही झाकीच्या पालकांनी त्याला शिकायला परदेशी पाठवलं..इजिप्तच्या कैरोत. तिथं ५१ ला लॉ केला. पुढं ५५ ला लॉ मास्टरकी मिळवली न्यूयॉर्कमध्ये.. ५६ ला Harvard लॉ स्कुलमधून ग्रॅज्युएट झाले..त्यानंतरच त्यांचं कार्यकर्तृत्व असं काही झळाळलं की, ६९ ला जपान, Osmania university भारताने ७५ ला.
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(