नक्की वाचा....

विमान प्रवासात भेटलेल्या एका अमेरीकन माणासाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला “मला तुम्हा भारतीय लोकांमधे एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टिका करण्यामधे कमीपणा वाटत तर नाहीच, उलट एकप्रकारचा आनंद आणि अभिमान वाटतो. जगात असे कुठेच घडत नाही
अगदी आफ्रिकेच्या जंगलातुन आलेला माणूस सुद्धा आपल्या जंगलाला एव्हडी नावे ठेवत नाही. अमेरिकेमधे आपल्या देशाला नावे ठेवणे हे आपल्या आईला नावे ठेवण्यासमान समजतात. तुमच्या देशात बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तसे आमच्या देशात पण आहेत. म्हणून आपण आपला देश वाईट ठरवायचा का?” हा अमेरीकन माणुस
+
स्टॅनफोर्ड या प्रसिद्ध विद्यापिठातील नोबेल पारितोषीक विजेता प्रोफेसर होता.अशाच एका थोर अमेरीकन विद्वानाची गाठ पडली. त्याला भारताविषयी फार जिव्हाळा आहे. त्याने सांगीतले, “तुम्ही भारतीय लोक एक चुक नेहमी करत असता. तुम्ही भारताची तुलना नेहमी इग्लंड, अमेरिकेशी करत असता. पण या देशांना
स्वातंत्र मिळुन 200 वर्षे होऊन गेली आहेत. तुमच्या देशाला स्वातंत्र मिळुन फक्त 73 वर्षे झाली आहेत. त्यामुळे तुमच्या देशाची तुलना आमच्या देशाबरोबर करणे म्हणजे 10 वर्षांच्या मुलाची तुलना 30 वर्षांच्या माणसाबरोबर करण्यासारखे आहे.”
भारतातील आत्ताच्या अनागोंदिबद्दल ते म्हणतात, “तुम्ही
लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. भारताला स्वातंत्र मिळाल्यावर जी मंडळी सत्तेवर आली त्यांना ऍडमिनिस्ट्रेशनचा म्हणजे राज्यकारभाराचा कोणताही अनुभव नव्हता. हा जॉबच त्यांच्यासाठी नवीन होता. अमेरिकेचा प्रेसीडेन्ट असो किंवा ब्रीटनचा प्राइम मिनिस्टर असो, त्यांना थोडा- फार तरी
+
ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असतो. पण अनुभव नसताना सुद्धा सत्तेवर आलेल्या लोकांनी उत्तम कारभार केला. लोकशाही नुसतीच रुजवली नाही तर बळकट केली. तुमचा भारत देश हा मिनी यूरोप सारखा आहे. भारतातील एका राज्यातुन दुसर्‍या राज्यात जाणे म्हणजे युरोपातील एका देशातुन दुसर्‍या देशात जाण्यासारखे आहे
युरोपमधे देश बदलला तर नुसतीच भाषा किंवा संस्कृती बदलत नाही तर सरकार, नियम, चलन सगळेच बदललते ( त्या वेळी युरो आस्तित्वात नव्हते ). पण भारतात तसे नाही. राज्य बदलल्यावर भले भाषा बदलत असेल. पण देश बदलत नाही. एव्हढी विवीधता असुनही तुमचा देश अजुनही एकसंध आहे हीच आमच्या दृष्टिने मोठी
+
कौतुकाची गोष्ट आहे. युरोपीयन लोकांना हे अजुन जमलेले नाही. आता भारतामधे सत्तेवर येणार्‍या लोकांमधे ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असलेले जास्त लोक येणे आवश्यक आहे. या ठिकाणी मतदारांनी उमेदवार निवडुन देताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.”
अमेरीकेतील एक प्रसीद्ध सिनेटर आहे ते भारत
+
द्वेष्टे म्हणुनच प्रासिद्ध आहेत. त्यांची नुकतीच एक मुलाखत वाचायला मिळाली. त्यात त्यांनी म्हटले आहे, “ भारतापुढे आज जी संकटे आहेत. आणि ज्या संकटांचा भारताला सामना करावा लगला, ती सगळी संकटे “एकमेवद्वितीय ( Unique ) आहेत.जगातील कोणत्याच देशाने अशा प्रकारच्या समस्यांना तोंड दिलेले
+
नाही. त्यामुळे या समस्यांना रेडीमेड सोल्युशन्स मीळणार नाहीत. भारतीयांनाच या समस्यांवर तोडगा शोधुन काढावा लागेल. माझी खात्री आहे की भारतातील लोक यामधे यशस्वी होतील. एव्हडे असुनही भारताने जी प्रगती केली आहे ती खरोखरच कौतुकस्पद आहे.” हल्ली ते भारताविषयी बरेच चांगले बोलत असतात. असाच
एक अमेरीकन इंजिनीयर भेटला तो कांही वर्षे भारतात राहुन गेला आहे. भारतामधे प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी भावना अहे त्याबद्दल त्याने भावना व्यक्त केली, *“तुमच्या देशामधे सरकारने प्रत्येक गोष्ट करावी अशी लोकांची अपेक्षा आहे. थोडक्यात तुम्ही लोक सरकारवर फार अवलंबुन आहात. आमच्याकडे
असे नाही. आम्ही कमीत कमी सरकारवर अवलंबुन असतो. पुष्कळशा गोष्टी आमच्या आम्ही करत असतो. तुम्हाला आमच्याकडे जी शिस्त, उच्च दर्जाची सार्वजनीक स्वच्छता, वाहतुकिच्या नियमांचे उत्तम पालन, व्यवहारात प्रामाणीकपणा व पारदर्शीपणा , करप्शन नसणे या ज्या गोष्टी दिसतात त्या सरकारने कडक कायदे
+
केले म्हणुन दिसत नाहीत. उलट आमच्या सरकारचे म्हणणे आहे की कायदे करुन किंवा कायद्याचा बडगा दाखवुन लोकांना शिस्त लावता येत नसते. उलट लोकांनी आपणहुन कायदे कानुन पाळले तरच ते उपयुक्त ठरतात. आम्हाला लहानपणापसुनच कायदे हे आमच्या फायद्यासाठी व संरक्षणासाठी केले आहेत, तसेच नगरीक म्हणून
+
आमची काही कर्तव्ये असतात हे मनावर ठसवले जाते.”*
मी मुद्दमुनच अमेरीकन लोकांचे उदाहरण दिले आहे. कारण अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील लोक भारताकडे कोणत्या नजरेने बघत असतात आणि आपण कोणत्या नजरेने बघत असतो हे कळावे म्हाणून.येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताला स्‍वातंत्रय मिळुन 74 वर्षे होत
आहे. त्यानिमित्त आपण आपल्या देशावीषयी काय विचार करत असतो याचा आढावा घेणे जरुरीचे आहे. आपला देश कसाही वेडावाकडा असला तरी तो आपला देश आहे. आपल्या देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण आपल्या देशासाठी काय केले व काय करु शकतो याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे. सरकारने काय करायचे
+
यापेक्षा मी रस्यात थुंकायची, रस्यात घाण किंवा कचरा टाकण्याची,बेशिस्त वागण्याची, वाहतुकिचे नियम तोडण्याची, पकडले गेल्यास पोलिसाला चिरिमिरी देउन सुटका करुन घेउन करप्शनला बढावा देण्याची, इतरांशी उद्धटपणे वागायची, संधी मिळेल तेव्हा डल्ला मारायची माझी सवय केव्हा मोडणार? आपणच घाण
+
करायची आणि ती उचलायला सरकारी माणुस येइल याची वाट बघायची. नाहीतर परदेशी पलायन करायचा विचार करायचा. असे हे किती दिवस चालणार? याचा आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा, कोरिया, तैवान, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी जी
+
प्रगती केली आहे ती तिथल्या जनतेने केली आहे, सरकारने नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रगत भारत निर्माण करणे हे आपल्या हातात आहे, सरकारच्या नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. आणि
+
सरकार म्हणजे कोण? ते कोणी परग्राहावरुन आलेले लोक नाहीत. ते आपल्यातीलच लोक आहेत. याचे भान ज्याचे त्याने ठेवावे हीच अपेक्षा.चला तर! आपण सगळे मिळुन प्रगत भारत निर्माण करुया! !

#Indian

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishram Parab

Vishram Parab Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishramParab2

19 May
आणि उत्तराची वाट बघावी!

मोदींकडे उत्तर देण्यासारखे काही नाही असा अनेकांचा समज झाला. परंतु, मोदींचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी विरोधकांना झोपविण्याची उत्तरे दिली आहेत, हे आपल्याला लक्षात येईल.

नरेंद्र मोदी सध्या विरोधक आणि हितचिंतक यांच्या कठोर टीकेचे धनी झालेले आहेत.
+
त्यांच्यावर चित्रपट करणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर म्हणतात, “प्रतिमा बनविण्यापेक्षा जीव वाचविणे गरजेचे आहे. सरकारने आव्हानांचा सामना करावा आणि ज्यांनी निवडून दिले आहे, त्यांच्यासाठी काम करावे. अनेक प्रकरणांवर सरकारवर टीका करणे गरजेचे आहे. नद्यांमध्ये वाहत असलेल्या मृतदेहांना
+
पाहून एखादा क्रूर व्यक्तीच विचलित होणार नाही, आपण संताप व्यक्त केला पाहिजे. जे काही होत आहे, त्याला सरकारला जबाबदार धरणं गरजेचं आहे.” पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या. ममतादीदींचे अभिनंदन करताना सर्वांनी नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. ममतादीदी विजयी
+
Read 26 tweets
18 May
#घोडचूक
... इजरायल पॅलेस्टाईन संघर्षात आपल्या बाजूने कोणकोणते देश उभे आहेत... त्यांचे ध्वज आपल्या ट्विट वर फडकवत... इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी त्या देशांचे आभार मानले... मात्र त्या २५ देशांमध्ये भारताचा तिरंगा नसल्यामुळे भारतीय समाजमन अस्वस्थ झालं... ते सहाजिकच Image
आहे पण... आंतरराष्ट्रीय राजकारणात एवढ हळवं होऊन चालत नाही... आंतरराष्ट्रीय राजकारण भावनेवर देखील चालत नाही... ते चालतं विशुद्ध पणे आपल्या देशाच्या होणाऱ्या फायदा नुकसान या गणितावर...
... याबाबतीत इस्रायलचे उदाहरण देता येईल... १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक मध्ये आपल्या ११ खेळाडूंच्या
हत्येचा बदला घेण्यासाठी मोसादने ऑपरेशन सुरू केले... रोम पॅरिस येथे या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या पॅलेस्टाईनच्या म्होरक्यांना मोसादने वेचून वेचून मारायला सुरुवात केली...
... आणि या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ब्लॅक सप्टेंबर या पॅलेस्टाईन मधील आतंकवादी संघटनेच्या ऑपरेशन्स
+
Read 11 tweets
15 May
फडणवीस म्हणजे एक मेट्रोपोलिटन कल्चर मधून आलेले, फ्लूएन्ट इंग्रजी बोलणारे, स्टाईल आणि फॅशनची जाण असणारे, फक्त पब्लिक-लाईफ मध्ये आहोत म्हणून आपली पत्नी सोबत दिसणे याला रिग्रेसिव्ह किंवा पोलिटिकली इन-करेक्ट न मानणारे एक 'अर्बन' नेते! गावाकडून आलेल्या इतर नेतेमंडळींप्रमाणे 'गावच्या
+
साधेपणा'चा खोटा आव आणणे, नौटंकी करणे या सध्या माणसाला कधी जमले नाही. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही, तर महाराष्ट्र भाजपसाठी पण हे सगळं तसं नवीनच होतं. बदललेल्या काळात जनतेसाठी मात्र त्यांची ही इमेज आणि बॅकग्राऊंड 'एक रिफ्रेशिंग चेंज' होता. जर जनतेच्या डोळ्यात हे खुपत असते
तर त्यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणूकीत, त्यांना तेल लावलेल्या पैलवानांसमोर (१०५) घवघवीत यश मिळालेच नसते! आणि म्हणूनच, फडणवीस यांना मी फक्त एक मेट्रोपॉलिटन कल्चर मधून आलेले एक अर्बन नेते एवढंच नाही, तर एक नवीन आणि Aspirational महाराष्ट्राचे प्रभावी Brand Ambassador आहेत असंही
+
Read 27 tweets
13 May
गेल्या काही दिवसात काही लोकं महाराष्ट्रात "बुद्धीभेदाचा" खेळ खेळत आहेत.

"गडकरींना पंतप्रधान करा,मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, निवडणूकीआधी मोदीच्या जागी गडकरीही पंतप्रधान म्हणुन चालतील....ईत्यादी.....ईत्यादी!"

पण या मागण्या काय मराठी माणसासाठी प्रेम आहे म्हणुन किंवा नीतिन
+
गडकरींच्या कामाने ते प्राभावित झाले आहेत म्हणुन नाही तर फक्त मोदींना हटवण्यासाठी या मागण्या आहेत, या मागणीची सुरवात करणारा व्यक्ती तोच आहे ज्याने चाय पार्टी करून अटलजींचं सरकार एका मताने पाडलं होतं

पण भविष्यात कधी मोदी राजकारणात नसताना संघ-भाजपाने गडकरींना पंतप्रधान पदाचं
+
उमेदवार घोषित केलं तर महाष्ट्रातल्या तथाकथित पुरोगामी जनतेला गडकरींमध्ये "मराठी माणूस" दिसणार नाही, गडकरींमध्ये "ब्राह्मण माणूस" दिसायला लागेल.

गडकरी आज फक्त त्यांच्या कामाबाबत बोलतात ईतरांवर टीका टिप्पणी करत नाहीत,स्वताच्या कामांची तुलना ईतरांबरोबर करत नाहीत म्हणुन सर्वपक्षीय
+
Read 7 tweets
13 May
कोणी हे सांगू शकेल का एशियाई देशात फ़क्त भारतातच ही कोरोणाची दूसरी लाट का आली? ती ही मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून? पाकिस्तान, बांग्लादेश, भूटान, नेपाल, म्यांमार, थायलैंड, अफगानिस्तान, श्रीलंका या देशांची भौगोलिक परिस्तिथि ही भारत देशा सारखीच आहे, मग तिथे का दूसरी लाट
+
नाही?
इतर एशियाई देश सिंगापूर, मलेशिया, वियतनाम, अरब देश ताइवान, मंगोलिया, किर्गिस्तान, उछ्बेकिस्तान या देशांची भौगोलिक परिस्तिथि थोड़ीफार भारत देशासारखीच आहे. तिथे ही दूसरी लाट नाही,
का? का? का?
का हे देश जास्त Disciplined आहेत?
का तेथील नागरिक जास्त सुशिक्षित आहेत?
+
का तेथील आरोग्य व्यवस्था भारतापेक्षा चांगली आहे?

काय म्हणायचे आहे तुम्हाला?
पाकिस्तानमधील, बांग्ला देशातील लोक जास्त डिसिप्लिनड आहेत? तेथील आरोग्य व्यवस्था चांगली आहे?
भूटान, नेपाल आपल्या पेक्षा पुढारलेले देश आहेत?
मंगोलिया, अरब देश जास्त सुशिक्षित आहे? मग फ़क्त आणि
+
Read 13 tweets
10 May
′′Modi ji has to be brought to his knees, government has to be proved unsuccessful′′
This kind of thinking has created so much havoc.

If you don't believe then read..........

You will be shocked to know this truth.

It is notable that the Country has a total of 36 States
+
including 28 complete States and 8 Union Territories (UT).

But the shocking fact is that as of 8 am today, out of the 208330 deaths due to Corona in the Country, more than 107602 (51.65% deaths have occurred in only 6 states.

Out of these 6 States, 5 States are ruled by
+
Chhattisgarh (8312,) Punjab (8909) Rajasthan (4084) Jharkhand (2540), and Maharashtra (67985) Congress and Congress alliance.

The Sixth State is that Delhi (15772) whose Chief Minister is Kejriwal. Isn't it shocking that the number of Deaths due to Corona in these 6 States is
+
Read 20 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(