#Thread
#गुरुपौर्णिमा
श्रीगुरु आणि सद्गुरु :-
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस भारतवर्षात 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक जीवाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्व आहे. आज भारतातील दिव्य ज्ञानामृत केवळ आणि केवळ 'गुरू - शिष्य' परंपरारुपी
१/
#GuruPurnima2021
@ShefVaidya
गंगेतूनचं प्रवाहित होत होत आपल्यापर्यंत आले आहे.
भारतवर्षातील अनेक थोर ऋषीमुनींनी व संत मंडळींनी आपल्या दिव्यवाणीद्वारे गुरुमहिमा सांगितला आहे. त्यापुढे माझा हा लेख म्हणजे सूर्यप्रकाशासमोर एखाद्या पणतीच्या प्रकाशासारखे आहे. पण ह्या थोरामोठ्यांकडून जे
२/
काही मतीस कळाले ते मांडण्याचा प्रपंच इथे करत आहे.
आता महत्वाचा प्रश्न म्हणजे की 'गुरु' या शब्दाची व्याख्या काय? तर शास्त्रकारांनी गुरु ह्या शब्दाची व्याख्या अशी केली आहे की,
गुरु -
गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते ।।
३/
अर्थात 'गु' कार म्हणजे अज्ञानरुपी अंधकार व 'रु' कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज.
थोडक्यात सांगायचं तर जे आपल्या ज्ञानरूपी तेजाने अर्थात दिव्य ज्ञानाने शिष्याचा अज्ञानरुपी अंधकार दूर करतात तेच गुरु होय. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे की हे 'अज्ञान'
४/
कुठल्याही प्रकारचे असू शकते आणि ते दूर करणारा व्यक्ती किंवा वस्तू सुद्धा असू शकते. म्हणूनच तर नाथ भागवतात दत्तात्रय अवधूत सांगतात की,
"जो जो जयाचा घेतला गुण |
तो तो गुरु म्या केला जाण ||"
अर्थात त्यांनी ज्या ज्या कडून 'गुण' म्हणजेच ज्ञान घेतले त्यांना गुरु केले जसं की सूर्य,
५/
वायु,समुद्र,हत्ती,मधमाशी,मासा असे २४ वेगवेगळ्या प्रकारचे गुरु दत्तात्रयांनी केले. समर्थांनी पण दासबोधात सतरा वेगवेगळे गुरु सांगितले आहेत - मातापिता,मंत्रगुरू,यंत्रगुरु,राजगुरू,कुलगुरू,देवगुरू वैगरे.
ज्ञानेश्वरीत तर ठिकठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपले गुरू निवृत्तीनाथ महाराज
६/
यांची महती वर्णन करतात. त्यांचं त्यांच्या गुरूंवर निरतिशय प्रेम होते.
माऊली ज्ञानेश्वरीत बोलतात -
सायिखडयाचे बाहुले। चालवित्या सुत्राचेनि चाले।
तैसा माते दावीत बोले। स्वामी तो माझा।।१७६८।।
(ज्ञानेश्वरी अध्याय १८वा)
ज्याप्रमाणे बाहुलीचा खेळ करणारा दोरीच्या मदतीने बाहुलं
७/
चालवतो. त्याप्रमाणे माझे गुरु मला बोलवतात. म्हणजे गुरुंशिवाय विश्वात वावरणे केवळ अशक्य आहे.
मग गुरू आणि सद्गुरू वेगवेगळे असतात का? जर असतील तर मग सद्गुरू म्हणजे कोण? तर याचे उत्तर आहे की, केवळ गुरू जे असतात ते आपल्याला व्यावहारिक आणि सांसारिक गोष्टींचे आकलन करून देतात.
८/
तर सद्गुरुंविषयी सांगताना समर्थ दासबोधात वर्णन करतात की,
जो ब्रह्मज्ञान उपदेसी। अज्ञानअंधारे निरसी। जीवात्मया परमात्मयांसी। ऐक्यता करी।।
प्राणी मायाजळी पडीले। संसारदुःखे दुःखवले।
ऐसे जेणे मुक्त केले।तो सद्गुरू जाणावा।।
।।श्रीराम।।
(दासबोध गुरू लक्षण समास)
९/
म्हणजेच जे जीवास ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. त्याचं मायारुपी विश्वाचे अज्ञान दूर करतात,संसार दुःखातून मुक्त करतात. जीवाची परमात्म्याशी ऐक्यता करतात ते सद्गुरू जाणावेत.
मनुष्य जन्माला येतो व त्याच्या अनात्म विवेकामुळे ह्या जन्ममरणरुपी संसाराला सत्य मानतो. ह्यातच गुंतून राहून
१०/
सुखादुःखास प्राप्त होतो.त्याला ह्या मायारूपी संसाराच्या मिथ्यत्त्वाची जाणीव सद्गुरू करून देतात व 'ब्रह्म सत्य जगन् मिथ्या।'हे सत्य पटवून देतात. सद्गुरू आपल्या ज्ञानाच्या होडीतून जीवास ह्या संसाररुपी भवसागरातून पार करून देतात.
सद्गुरु स्तवनात ज्ञानेश्वर महाराज अत्यंत गोड
११/
शब्दात सांगतात,
"मावळवीत विश्वाभासु | नवल उदयला चंडांशु |
अद्वयाब्जिनीविकाशु | वंदूं आतां ॥१॥" (ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा)
जसा सद्गुरूरुपी सूर्याचा उदय होतो तसा साधकाचा 'विश्वाभास' अर्थात त्याचे अज्ञान दूर होते व अद्वैतरुपी कमळाचा विकास होतो. त्या सद्गुरूंना वंदन असो.
१२/
सद्गुरू कसे असतात यावर आचार्य विवेक चूडामणिमध्ये सांगतात -
ब्रह्मण्युपरतः शान्तो निरिन्धन इवानलः।
अद्वैतुकदयासिंन्धुर्बन्धुरानमतां सताम्।।
सद्गुरू हे ब्रह्मनिष्ठ असतात तसेच इंधनरहित अग्निसमान शांत व अकारण दयासिंधू असतात. अशा ह्या सद्गुरूंच्या चरणी शरण जाऊन त्यांना प्रार्थना
१३/
करावी की,
ब्रह्मानन्दरसानुभूतिकलितैः पूतैः सुशीतैः सितैः
र्युष्मद्वाक्कलशोज्झितैः श्रुतिसुखैर्वाक्यामृतैः सेचय।
संतप्तं भवतापदावदहनज्वालभिरेनं प्रभो
धन्यास्ते भवदीक्षणक्षणगतेः पात्री कृता स्वीकृता।।
हे ब्रह्मानन्दाने युक्त प्रभो संसाराग्निने तापलेल्या ह्या जीवास तुम्ही
१४/
तुमच्या ब्रह्मानुभवयुक्त वाणीने व पावन,पुनीत वाक् रुपी स्वर्णकलशरुपी निघणाऱ्या वचनांनी सिंचन करा. अशा प्रकारे प्रत्येक जीवाने अनन्यभावाने शरण जाऊन आपला उद्धार करून घ्यावा कारण सद्गुरू शिवाय आपल्या जीवनाला परीपूर्तता नाही.
१५/
शेवटी प्रत्येक आत्म्याचे मुक्ती हेच तर सर्वोच्च उद्दिष्ट आहे.
जया संगतीने विराग झाला ।
मनोदरीचा जडभास गेला ।
साक्षात परमात्मा मज भेटवीला ।
विसरू कसा मी गुरूपादुकेला ॥
अशा सद्गुरू चरणकमलांना वंदन करून थांबतो..!
धन्यवाद..!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा।

Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा। Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishwambharMule

11 Jul
#कालिदासदिन
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
आज "आषाढस्य प्रथम दिवसे" अर्थात आषाढाचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन..!
महाकवी कालिदासांनी आपल्या दिव्य काव्यप्रतिभेच्या जोरावर अनेक रचना करून संस्कृत
१/
@Kal_Chiron @ShefVaidya
भाषेला अधिकच सुंदर केले आणि समस्त रसिक लोकांना उपकृत केले.
"उपमा कलिदासस्य" ही उक्ती नेहमी सांगितली जाते ज्याचा अर्थ उपमा असावी तर कालिदासासारखी..!
आपण जर कालिदासाच्या काही रचनांवर ओझरती नजर जरी फिरवली तरी आपल्याला त्याचा प्रत्यय येईल..!
रघुवंशात कालिदास म्हणतात,
२/
क्व सूर्यप्रभवो वंशः क्व चाल्पविषयामतिः ।
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनाऽस्मि सागरम् ॥
अर्थात - कुठे तो सूर्यापासून उत्पन्न झालेला वंश आणि कुठे मी (कालिदास) त्यांचं गुणगान करण्याचा प्रयत्न करणारा अत्यंत अल्पमति. हे म्हणजे एखाद्या लहानशा नावेने मोठा सागर पार करण्याचे दिव्य
३/
Read 8 tweets
10 Jul
ही ऐतिहासिक स्थळे आपली उर्जाकेंद्रे आहेत..!
यातून ऊर्जा घेऊन आपण आपल्या कार्यात कार्यरत होऊन आपल्या राष्ट्राला एका नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो..!
ही स्थळे म्हणजे आपल्या दिव्य इतिहासाची व आपल्या थोर पुरुषांची साक्ष देतात. तेंव्हा ही स्थळे
१/
@Vinay1011 @malhar_pandey @HearMeRoar21
सुस्थित राहणे ही एका सशक्त राष्ट्राची गरज आहे.
पण खंत आज अशी आहे की आपल्या देशात आपल्या थोर राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांना कायम उपेक्षित ठेवून शासनाने केवळ आक्रमकांचा उदो उदो केला आणि ही सर्व दिव्य स्थळे दुर्दशेत गेली.
आता परिस्थिती बदलत आहे हे पाहून हायासे वाटते.
पण सगळा भार
२/
शासनावर का सोडायचा??
आपण पण प्रत्येक नागरिक या राष्ट्राचे आणि या थोर पुरुषांचे काही देण लागतो, तेंव्हा हाच विचार करून @Jhunj_Org ने श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या समाधीचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.
हे काम अत्यंत भव्य आहे कोणा एका व्यक्तीकडून हे पूर्ण होणारे नाही.
३/
Read 4 tweets
6 Jun
#थ्रेड
#शिवराज्याभिषेक_सोहळा
#हिंदू_साम्राज्य_दिवस
-:युगकर्ते शिवराय:-
साधारण तीनशे वर्षांपूर्वी या दिवशी सूर्य एक नवीन सकाळ घेऊन आला. तुम्ही म्हणाल की सूर्यासोबत दरोजचं सकाळ होते, मग या दिवसाच्या सूर्योदयात काय विशेष होते.? तर,आजच्या दिवसाचा सूर्य एक नवीन
१/
उषःकाल घेऊन आला होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा. कारण ३०० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अभिषिक्त झाले आणि शेकडो वर्षांच्या म्लेंच्छ अत्याचारांपासून महाराष्ट्र मुक्त झाला.
महाराज छत्रपती झाले यात अनेक वीरांचे मोलाचे योगदान होते. स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेऊन
२/
हे मावळे स्वराज्यासाठी व महाराजांसाठी प्राणाची ही किंमत मोजायला तयार होते. आई भवानीच्या व भगवान रायरेश्वराच्या आशीर्वादाने महाराजांनी स्वराज्याचा उद्योग आरंभला व त्यानंतर पुढील काळात महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांसह अखंड अहोरात्र स्वराज्य चळवळ चालवली.
३/
Read 8 tweets
6 Jun
#Thread
#KnowYourDharma
#HinduDharma
The logic of 33 Koti (Crores) Devtas :-
Many a times people say we have '33 Koti' i.e. Crores of Devtas in our Hindu Dharma. So is it true? Do we really have that many Devtas in Hindu Dharma.
Technically speaking we have 33 Koti Devtas in
1/
in the Hindu Dharma but here the word 'कोटी (Koti)' does not mean crores.The word 'कोटी(Koti)' is a Sanskrit word,which has different meanings. In '33 Koti' the meaning of word 'Koti' is "प्रभेदाः" i.e 'Types' not crores. So there are 33 types of 'Devtas' mentioned in many
2/
scriptures of Sanatan Hindu Dharma. In 9th ब्राह्मण (Brahman) of Brihadaranyaka Upnishad, when Maharshi Yadnyavalkya is asked about 'how many devtas are there?' He answered,
3/
Read 16 tweets
3 Jun
The words of Kavi Bhushan from Uttar Pradesh who was contemporary to Chatrapati Shivaji Maharaj :-
देवल गिरावते फिरावते निसान अली
ऐसे समै राव-रानै सबै गए लबकी।
गौरा गनपति आप , औरन को देत ताप
अपने मुकाम सब मारि गए दबकी।।
पीर पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत
सिध्द की सिधाई गई, रही बात रब की।
काशी हू की कला गई मथुरा मसीत भई
शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी।।
He is saying that, The Invaders are destroying our temples and raising their nishan and at this time all The Ranas and all other Kings are hiding. Fortunately Shivaji Maharaj Image
was born otherwise Kashi and Mathura would have lost their values and all the Hindus would have become Muslims.
In another Kavya he says,
Read 11 tweets
29 May
#वीर_सावरकर_जयंती
#VeerSavarkar
मनातील सावरकर विचारमार्तंड मावळू देऊ नका...!
कालचा २८ मे चा सूर्योदय आपल्यासोबत सावरकर विचारांची किरणे सोबत घेऊन आला. काल तात्यारावांची जयंती आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने साजरी केली. दिवसभर अनेक लोकांनी आपल्या आपल्या परीने सावरकरांचे विचार
१/
मांडले. हे सर्व पाहून सगळ्यात जास्त आनंद कोणास झाला असेल तर तो या मातृभूमीला कारण तिच्या एका थोर पण उपेक्षित पुत्राची गाथा काल लोकांच्या ओठावर आणि हृद्गत झाली होती संपूर्ण दिवस. अगदी सगळचं सावरकरमय झालं होत सगळं.!
स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिमत्त्व सहजासहजी कवेत येईल असं
२/
व्यक्तिमत्त्व नाहीये.तात्याराव कळायला आयुष्य खर्ची घातलं तरी त्यांचा थांग लागणं कठीण.
सावरकर हा विचारांचा महासागर आहे, आपण फक्त आपल्या बुद्धीसीमेनुसार त्यातील विचारामृत आपल्या भांड्यात भरून घेण्याचा प्रयत्न करावा व त्याचं सेवन पूर्ण जन्मभर करावं.
पण सावरकर विचार फक्त
३/
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(