आपण अंतःकरण म्हणतो त्याला मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे सामील असतात. आपलं मन काही एका विचारात असेल तर त्यास आजूबाजूचा विसर पडतो..अटेन्शन हे मनाचं कार्य आहे.
आपल्या ज्ञानेंद्रियांनी जाणलेलं त्याचा अर्थ लावण्याचे काम बुद्धी करते. #थ्रेड #म
एकावेळी अनेक विचार मनात येत असतात..संभ्रमावस्था म्हणतो आपण..तर अशावेळी परस्परविरोधी विचारातील कोणता विचार आमलात आणायचा हे बुद्धी ठरवते..
आपण म्हणतो 'एक मन म्हणतं हे कर एक मन म्हणतं ते कर.' पुढे जाऊन आपण जे काही करतो..ते बुद्धी ठरवत असते.
अनेकांपैकी कोणता विचार आमलात आणायचा ही विवेकबुद्धी ठरवते. आपण कितीही म्हणलं 'मनाचच ऐकायचं' तरी बुद्धीचा कार्यभाग बुद्धी साधत असतेच..आणि मनाला ते ऐकावं लागतं..

विचार हे मन आणि बुद्धी यांच्या संगमातून निपजतात.
यास महत्वाचा आणखी एक पदर म्हणजे भावना. ज्यावेळी भावना उत्तेजित असतात त्यावेळी बुद्धी मागे सरते..मेंदूतील केमिकल लोच्या बुद्धीस काम करू देत नाही.
'बुद्धी डोळस असली तरी तिला हातपाय नाहीत.' असं म्हणलं जात ते त्यामुळेच..
भावना शांत असतात..तेवढ्या काळातच बुद्धीला कार्य करता येते.
दुसरीकडे बुद्धी शुद्ध असेल तर भावना ही शुद्ध निपजतात..
मन,बुद्धी आणि भावना या तिघांत कोणीही श्रेष्ठ नाही..की कनिष्ठ नाही..कारण या तिघांची जडणघडण ज्या परिस्थितीत होते..माणूस त्या पद्धतीने मार्गक्रमण करतो. तिघांचा मेळ ज्याला घालता येईल तो माणूस आत्मशांत होतो.
तुमचा थेट प्रश्न होता..मन आणि बुद्धी यात कोणाची बाजू घ्यावी.

प्रश्नच नाही..आपण ठरवून कोणाचीही बाजू घेऊ शकत नाही..आपण ज्या परिस्थितीत भूतकाळातून ज्ञान आणि अनुभव कमावतो त्याचा वापर करून आपोआप द्वंद्वाचा शेवट ठरतो. त्यात मन जिंकली की बुद्धी हे ठरवणे अवघड कारण दोघांची सांगड असते.
बाकी, दोन मदमस्त हत्ती झुंजत असताना पायाखालच्यांना जीव मुठीत धरून बसावं लागतं.. मन आणि बुद्धी हे अटीतटीच्या वेळी मदमस्त हत्ती होऊन जातात आणि आपण ते पायाखालचे..❤

टीप- वैयक्तिक मतं आहेत.इतरांचा अनुभव वेगळा असू शकतो.🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

1 Nov
अत्याचार आणि मानसिक त्रास स्त्रियांना देणं ही रीत बनलीय आता.खऱ्या समाजात आपण स्त्रियांना जगण्यास लायक ठेवले नाही.याचे महत्वाचे कारण आपण स्त्रीस माणूस म्हणून पहाण्याची दृष्टी हरवली.त्याचा परिपाक स्त्री म्हणजे चॉकलेट.कोणीही त्याचा आस्वाद घ्यावा.इतक्या नीच पातळीवर समाज उतरला. #थ्रेड
एकाच वेळी आपण सध्या दोन समाजात जगत वावरत आहोत..एक खरा समाज आणि दुसरा आभासी म्हणजे समाजमाध्यमीय समाज. पहिल्यात आपण स्त्रीची अवस्था 'न भूतो न भविष्यती' इतकी दयनीय आणि वाईट केलीय.. NCRB चा डेटा आपण पाहिला तर कोणत्याही सुज्ञ व्यक्तीची मान शरमेने खाली जाईल.. ही वस्तुस्थिती आहे.
खऱ्या समाजातील ही अवस्था इथे समाजमाध्यमातून ही पहायला मिळते..कारण खरा समाज ज्या माणसांचा(?) बनला बनवला गेलाय तीच विकृत माणसं इथंही जगत वावरत आहेत.
गेले काही दिवस ज्या पद्धतीने सिक्रेट मेसेज या नावाखाली तमाशा या समाजमाध्यमातून सुरुय तो पहाता.आपली नैतिकता किती बालिश हा प्रश्न पडतो.
Read 10 tweets
30 Oct
'घराची कळा अंगण सांगतं...!'
फ्लॅट सिस्टिमला अंगण नसतं.. कळा कुठून येईल?
आजही गावाकडं जायचं म्हणलं की मन आसमंतात उधळायला लागतं.. कदाचित ही गावाकडच्या अंगणाची ओढ रक्तातच असते.
आज कोजागिरी.. आज घरचे सगळे हट्टाने अंगणात जमून गप्पाटप्पात रंगतात.. चंद्राची दुधात वाट बघत.❤ #म
एरवीही आम्ही अंगणातच जेवायचो..त्यामुळे त्यावेळी कोजागिरीचं फारसं काही वाटायचं नाही..
आज त्या अंगणात आम्ही नाही.. मी नाही..ताई नाही.. आज्जी तर या जगातच नाही.. मन फार पिळवटून जातं.. त्या आठवणींनी. अंगण ही अशाच दुःखाच्या कोशात आज असणार.
त्याच्या अंगाखांद्यावर बिलगलेलो आम्ही.. लहानाचे मोठे त्याच्याच मांडीवर झालो.. आज त्या अंगणाची आर्त हाक...डोळे ओसंडून वाहायला लावते.

कोजागिरीच्या दिवशी हसत खेळत रात सरायची..आज त्यातील मजा हरवलीय.. व्यस्त झालो आपण सगळे..त्या दुधाळ दिवसांनी आता तावूनसुलाखून व्यस्ततेची साय पांघरलीय.
Read 5 tweets
17 Oct
नवरात्रीचा सांगावा..

'जो समाज मांजर आडवी गेली म्हणून कर्मकर्तव्य थांबवतो,त्या समाजाचे भविष्य बोके ठरवतात.'

आपल्या समाजास ज्याला त्याला देवत्व बहाल करण्याची सवय लागली त्यास आता बराच काळ लोटला. अलीकडे तर 'माणसात देव पाहण्यासाठी' रिघच लागलेली दिसते. असो #म #थ्रेड
माणसाला माणूस म्हणून पाहण्यासाठी जी आत्मशक्ती असावी लागते..तिचा तुटवडा हल्ली जास्तच जाणवू लागला आहे.. म्हणून आपण त्या आत्मशक्तीस पर्याय म्हणून ही देवत्वाची ढाल समोर केलीय..एकदा का व्यक्ती किंवा वस्तूला देवत्व दिलं की समाज म्हणून आपली जबाबदारी झटकण्यासाठी आपण मोकळे असतो.
माणसात देव पहा..या संकल्पनेचा बेधडक चुकीचा तेवढा अर्थ आपण घेतला. त्यामुळे देशाच्या लोकसंख्येएवढ्या देवांचाही बाजार इथं भरवला गेला.. ही वस्तुस्थिती आहे. एखादी परंपरा काय? त्यामागे उद्देश काय? आज त्याची उपयुक्तता काय? त्या रूढी परंपरेत बदल हवेत का? असे विचार हल्ली पडत नाहीत.
Read 14 tweets
16 Oct
खूप छान डॉक्टर मॅडम..नाती हे जर झाड असेल तर भावना या त्यासाठीच्या कल्चर आहेत. आपल्याला काहीतरी गोष्ट छळतीय ही गोष्ट लक्षात येऊन नात्यातील व्यक्तीसोबत ती वाटून घेणं महत्वाचं..व.पु चे विचार क्षणिकतेसाठी वाचायचे नसतात..त्याचा वापर आशा काही कामासाठी होईल का पहायला हवं.
व्यक्ती कोणीही असो.ती मायेच्या स्पर्शाची भुकेली असते..तो कनेक्ट वेळेत नाही मिळाला की परिस्थिती गंभीर बनत जाते..EQ वाढवायचे उपाय कसे आमलात आणायचे ज्याची त्याची पद्धत वेगळी असू शकते..फळ मात्र समृद्ध जीवन हेच मिळायला हव..हे प्रत्येकाने लक्षात ठेवा..
कारण,भावभावनांच्या खेळात हार जित नसते..तिथं एकतर असणं किंवा डायरेक्ट नसणं हेच असतं. या स्टेजला पोहचण्याअगोदर एकदा आपल्या मनात आपल्या जीवनाची कल्पना स्पष्ट असावी..म्हणजे भावनांना आवर घालायला सोपे जाते. अन्यथा वाहवत जाऊन शेवटी बुडून अंत होतो. ते टाळायला हवं आपण..
Read 4 tweets
15 Oct
सध्या मी सांगली-सोलापूर बॉर्डरवर नागज या परिसरात आहे.. रात्री मुक्काम येथील डोंगराच्या कुशीत एका शेतकऱ्याच्या घरी होता. काल सगळीकडे दिवसभर पावसाने झोडपून काढलेच होते..इथंही आहेच पाऊस पण तुलनेने थोडासा कमी वाटला. #म #थ्रेड
मी रात्री 11 च्या सुमारास पाहिलं..तेंव्हा वाऱ्याची दशा आणि दिशा..ढगांची घनता..यावरून काहीतरी आक्रीत पाऊस बरसेल याचा अंदाज बांधूनच झोपी गेलो. रात्री 12 ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत एकसारखा मुसळधार पाऊस ढासळला. परिसरातील तालीची रानं धुवून गेली.. ओढ्यावरील रस्ता धुवून गेला..तो बंद.
ज्या ठिकाणी पाणी यायला..एकसलग खूप मोठा पाऊस पडावा लागतो..त्याठिकाणी ही पाणी पोहचलं.

या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेत गेल्यावर्षी इतका पाऊस पडूनही इतकं पाणी लागलं न्हवतं..त्याठिकाणी ही पाण्याचा लोंढा वाहत होता.. आशा परिस्थितीत आजची सकाळ उजडली.. लाईटने अगोदरच जीव सोडला होता..
Read 10 tweets
5 Oct
आपण काय वाचतो? कसं वाचतो? हे महत्त्वाचं आहेच.पण त्याहून महत्वाचं आहे वाचलेलं किती आत्मसात करतो. बरोबर ना?
या सगळ्यांपेक्षा मला वाटतं महत्वाचं आहे आपलं वैचारिक अधिष्ठान निर्माण होण्यात आपण वाचलेला ऐवज किती उपयोगी पडतो ते.
सध्या वाचकांची कमी नाहीय.कमी आहे ती वेगळीच. ती काय? #म 1/n
आपल्या समाजास एकांगी विचार करण्याची सवय लागली त्यास आता बराच काळ लोटला.ती सवय आपल्याला लागलीय हे ही आपल्या लक्षात न येणे ही आपली दुखरी नस.वेगवेगळ्या सामाजिक समस्येसाठी उपाय शोधत असताना या दुखऱ्या नसेवर दाब पडतो ही वस्तुस्थिती आहे..मग कळ लागलेला समाज मूळ समस्येशी फारकत घेतो. 2/n
ही एकांगी विचार करण्याची अंगभूत सवय आता सवय न राहता तीच जगणं झालीय.हे निरीक्षण आहे..मग वाचनाने आपणास फक्त एका प्रचलित विचारांची क्षमता दिलीय का? आपण स्वतःची विचार क्षमता विकसित करण्यात कुठं कमी पडलो? त्यासाठी एखादा ऐवज वाचत असताना मी काय इंटेशन ठेऊन वाचतोय? हे महत्त्वाचं आहे.3/n
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!