'संभाजी म्हणजे रगेल, संभाजी म्हणजे रंगेल.' ही छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलची विशेषण त्यांच्यासाठी न्हवतीच मुळी.

लैंगिकतेबद्दल समाजात असणारी दांभिकता पुरेपूर उतू जाण्याचा काळ तो..पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषांच्या वापराची एक वस्तू म्हणून जगणं हेच सत्य होतं. #थ्रेड #म
आजही आपल्या समाजातएखादं लैंगिक प्रकरण समोर आलं.तर पुरुष मोकाट फिरतो आणि महिलेला मात्र समाजाकडून चारित्र्याची प्रमाणपत्र मिळवावी लागतात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आवाका सगळं जग 'तहेदिलसे' मान्य करतं आणि एक आपण,आपली मानसिकता मात्र तशीच आहे..बुरसटलेली..शतकोटी दूर.
१६५७ ला जन्मलेलं लेकरू ते... बाप वादळ वाऱ्यासम सह्याद्रीच्या कुशीतून गरागरा फिरणारा.. आईचं मातृत्व जेमतेम २ वर्षच भाळी लिहलेलं.. बाळ शंभूराजा १६५९ ला आईस पोरका झाला...सईबाई गेल्या..आईच्या दूध एका धाराऊ नावाच्या माऊलीने पुरवलं. बाकी सगळी आईची कर्तव्ये राजमाता जिजाऊ आईने केली.
अजून एक शिवाजी घडवायची भूक जिजाऊ आईच्या उदरात अजूनही होतीच.यावेळी सोबत होते साक्षात स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज.
जगातल्या दोन कार्यकर्तृत्ववान हस्ती छत्रपती संभाजी महाराजांच्या जडणघडणीत व्यस्त झाल्या.
९ व्या वर्षी ४ हजारी मनसबदारी हाती घेणारा वीर.
१० व्याला आग्रा भेट फत्ते.
११व्या वर्षी ५ हजारी मनसबदारी मिळवणारा.
१३व्या वर्षी रायाप्पा महाराचा सत्कार करणारा समताप्रिय छावा.
१४व्याला 'बुधभूषण' संस्कृत भाषेत लिहणारा लिजेंड.
१५व्या वर्षी अजून ३ ग्रंथ हातावेगळे करणारा साहित्यिक.
१६व्या वर्षी १० हजार सैन्याचा सेनानी
१७ व्यात फोंडा घ्यायला आबासाहेबांना मदत.
१८व्या वर्षी छत्रपती आबासाहेबांचा वारस..पहिला युवराज शंभूराजे.
१९व्या वर्षी देहू-पंढरपूर जगद्गुरू तुकाराम महाराजांची पहिली पालखी सोहळा चालवणारा शंभूराजा.
२३व्या वर्षी स्वराज्याचा छावा..स्वराज्याचे छत्रपती झाले.
२३ ते ३२व्या वर्षापर्यंत इंग्रज,फ्रेंच,डच,मोगल आणि पोर्तुगीज यांना पंजेफाड करत एकहाती मात देणारा लढवय्या राजा..

१२० लढाया केल्या... अजिंक्यतारा राहिला स्वराज्याचा छत्रपती.. तशीच वेळ आली तेंव्हा स्वतःचा प्राण अर्पण केला.

आजोबा आणि वडिलांसम वादळी आयुष्य जगला..परंपरेने.
धर्मासाठी झुंझावे। झुंझोनी अवघ्याशी मारावे।
मारीता मारीता घ्यावे। राज्य आपुले।।
देशद्रोही तितुके कुत्ते। यदर्थी संशोयो नाही।।
देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा।।
मुलुख बडवावा की बुडवावा। धर्मसंस्थापनेसाठी..

हा प्रेरणामंत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा आहे.
अर्थात आज लोकशाही मार्गाने, लोकशाही मूल्ये जपत मार्गक्रमण करणे म्हणजेच छत्रपती शंभूराज्यांच्या विचारांचे पाईक होणं. तत्कालीन परिस्थितीत रोजची मृत्यूशी झुंज घेणं क्रमप्राप्त होतं.. आज काही तसं करण्याची गरज नाही..आपल्या प्रज्ञेस योग्य मार्ग दाखवणे हेच आजच्या काळात शौर्य आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे काही छत्रपती आबासाहेबांसारखे सरदारपुत्र न्हवते. शंभुराजांना युवराजकी जन्मतः मिळाली..ती त्यांनी स्वकर्तुत्वाने सिद्ध केली..प्रज्ञेतही शंभूराजे कुठंही कमी न्हवते..

रणांगणात सुरक्षा महत्वाची म्हणून बुलेटप्रूफ जॅकेट महिन्याभरात बनवलं...तरंगता तोफखाना बनवला.
उसळत्या दर्यात जंजिरा सर करायला ८०० मीटरचा सेतू बांधला. दुष्काळमुक्तीसाठी डोंगर फोडून जल नियोजन करणारा...बालमजुरी,वेठबिगारी विरोधी काम करणारा..सगळ्या धर्मांचा मान राखणारा..स्वतःचा आधुनिक बारुदखाना उभारणारा..

तेजासम पेटत राहिला छत्रपती शंभूराजा..
त्यांच्यावर कैक आरोप झाले.
अलीकडे इतिहासात छेडछाड करण्याची नवीनच पद्धत भरास आलीय.. समाजाची रितच आहे म्हणा ती.. तरीही इतिहासातील सगळ्या छत्रपतींचे कार्यकर्तृत्व या बदनामी करणाऱ्या इतिहासास पुरून उरेल ही 'काळ्या दगडावरची रेष' आहे.
आत्ता काल शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा निमित्ताने सगळीकडे हर्ष होता.
छत्रपतींचे आणि इतिहासातील सगळ्याच महापुरुषांचे कार्य डोक्यावर घेऊन मिरवण्याजोगेच आहे...हे मान्य.
प्रश्न आहे ते आपण डोक्यात किती घेतो? आणि त्या कार्याचे पारंपरिक पाईक किती होतो? हा.
त्याबरोबर अजून एक प्रश्न आहे.. अजून किती दिवस आपण आपल्या पूर्वजांच्या जीवावर उड्या मारणार?
पूर्वजांचं कर्तव्य त्यांनी फत्ते केलं.आपल्याला योग्य तो वारसा दिला.आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार? DJ, डॉल्बी?
तत्कालीन काळात जगभर डंका केला गेला छत्रपतींच्या नावाने.आज जगभर नाव व्हायला काय करायला हवं.हे सुज्ञांनी विचारपूर्वक तपासायला हवं. जन्मोजन्मी येरझाऱ्या नकोत नुसत्या.
जाता जाता अजून एक गोष्ट...छत्रपतींच्या विचारांचे पाईक व्हायचे असेल तर फक्त त्यांच्या विषयीचे साहित्य वाचून आणि मुठी आवळून ते होणार नाही..
ते साहित्य आत्मसात करून त्याबरहुकूम आजच्या AI च्या दुनियेत आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याने आपण त्यांच्या विचारांचे पाईक आहोत हा सिध्दांत असेल.❤️

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

14 Jan
छत्रपती शिवाजी महाराज हे रत्न ज्या विद्यापीठातून निपजलं.. ते चालतं बोलतं कुल म्हणजे राजमाता जिजाऊ आई.
राजमाता जिजाऊ म्हणजे वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य यांच्या त्रिवेणी संगमातून साकारलेली आई.

जयंतीचा झिंग उतरायला वेळ लागतो म्हणून लेट लेखन प्रपंच.

#थ्रेड #म
स्वराज्याची संकल्पना ही काही पोरखेळ करून मांडलेला भातुकलीचा खेळ न्हवे..छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या आगोदर राजमतेच्या उदरात ते स्वप्न अंकुरलं होतं.. म्हणूनच छत्रपती आबासाहेब छत्रपती झाले..म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जितके मोठे आहेत त्याहून मोठ्या राजमाता जिजाऊ आहेत.
राजमातेच्या आयुष्यात आलेले तिन्ही महापराक्रमी पुरुष वादळी आयुष्य जगले..पण त्या वादळामागील बळ हे जिजाऊ आईच्या त्यागातून आलं. वादळं कधी एकटी येत नसतात..जीवघेणी भयाण शांतता सोबतीला असते त्यांच्या..राजमातेच्या आयुष्यात अशी अनेक वादळे येऊन धडकली पण न डगमगता तिनं दोन दोन छत्रपती घडवले.
Read 18 tweets
12 Jan
'आपले देव आता जुने झालेत, आपल्याला नवा देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण, आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.' -स्वामी विवेकानंद
विज्ञान तंत्रज्ञानाने विपुलता येईल.पण मानवी सृजनशीलता हद्दपार होऊ नये.अन्यथा मानव आत्मकेंद्रि बनून समाजरचना मोडीत निघेल...
#थ्रेड #म
आइन्स्टाइनवाणीच्याही आगोदर विवेकानंद म्हणाले होते. 'धर्म विज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि विज्ञान धर्माशिवाय पांगळ आहे.' विज्ञान 'का?' हे सांगेल आणि धर्म 'कशासाठी?' हे शिकवेल. विवेकानंदांना अपेक्षित असलेला धर्म फार वेगळा आहे. धर्माच्याआधारे त्यातील अपप्रवृत्तीवर घणाघात त्यांनी केला.
राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाअगोदर दहा वर्षे विवेकानंद म्हणाले होते.'आमच्या वेदांनी शूद्रांना वेदाध्ययन अधिकार नाही असं कुठंच म्हणलं नाही.ती व्यास आणि शंकराचार्यांनी खेळी केलेली आहे.'
पृथ्वीपासून मैलो दूर असलेले गोळे आमच्यावर अनिष्ट शक्ती टाकतात कसे?हा प्रश्नच आहे.
Read 12 tweets
1 Jan
आत्ता गेल्या आठवड्यातली गोष्ट..एक मित्र आहे , NRI आहे..इंजिनिअरिंग करायला लंडन ला गेला तिथंच नोकरी मिळाली. सहज भेटायला आलेला..ये म्हणलं बेत करू..बोलता बोलता सहज विषय निघाला..शेती आणि शेतकरी आंदोलन वगैरे..
'शेतीसाठी आता जमीन नाही लागत रे..' या एका वाक्याने मी आवाक झालो. #थ्रेड #म
नाही..म्हणजे हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग हे असलं सगळं शिकून, प्रात्यक्षिक करून बसलो होतो मी.. पण त्याच्या बोलण्यातील ठामपणा आता जरा जास्तच आवेगला होता.. आणि आपल्या भारतातील सध्याची परिस्थिती बघून तर मला फारच काळजी वाटली..भारतीय शेतकऱ्यांची.
आता जमिनिशिवाय शेती म्हणजे जमिनीवरच्या शेतकऱ्यांना टफ फाईटच ना..आगोदर देशोधडीला लागलेला शेतकरी या फाईटने गारदच व्हायचा..हे गारद होणं टाळायचं असेल तर शेतकऱ्यांनी आता मूळ प्रवाह सोडून तंत्रस्नेही व्हायला हवं.
चर्चा जरा इंटरेस्टिंग वाटली..विषय वाढवला मी.. शेतकऱ्यांनी काय करावं पुढं?
Read 12 tweets
26 Dec 20
९१च्या अर्थ सुधारणेनंतर भारतीयांच्या डोळ्यावर छान ब्रँडेड चष्मे आले.त्या चष्म्यातून दिसणारी भविष्य चित्रे फारच मोहक होती.त्याच चष्म्यातून काही वस्तुस्थितीदर्शक चित्रे कानाडोळा करून दुर्लक्षली गेली.त्यात महत्वाची दोन.एक जॉबलेस ग्रोथ आणि दोन अगोदरच गटांगळ्या खाणारी शेती.
#थ्रेड #म
आज दिसणारी शेतीची अवस्था काही एका रात्रीत झाली नाही.. सत्तरच्या दशकापासून होणाऱ्या अवहेलनेला नव्वदनंतर जागतिक परिमाण भेटलं. त्यानंतरची शेतीची घसरण दिसायला जरी जुजबी वाटली तरी इंफ्लेशन चा विचार करता.. शेती म्हणजे जुगार आणि मरण्याचं तिकीट..ही अवस्था झाली.. सगळ्या जगभर हेच झालं.
अगदी अमेरिका फ्रांस अशा प्रगत राष्ट्रांतही शेती अधोगतीला जातीय..तिथंही सबसिडीज द्याव्या लागतच आहेत शेतकऱ्यांना..त्यातून तिकडेही शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतच आहेत..
आपल्यात आणि त्यांच्यात फरक फक्त इतकाच होता..की आपण कृषिप्रधान असूनही शेतीकडे दुर्लक्ष केलं.
Read 15 tweets
25 Dec 20
पहाटेचा पहिला प्रहर..बेडरूममध्ये कोणाची तरी चाहूल लागली.. उघड्या खिडकीतून चंद्राची शीतल छाया..त्या छायेत माझ्याकडे पाठमोरा उभा होता तो.. अगोदर किलकिले असलेले माझे डोळे खाडकन उघडले..
मी विचारलं..आण्णा आलेत का?
हो, अंधारात बोट केलं..
अंधारात गडद आण्णा मला पाठमोरे दिसले..
#थ्रेड #म
खिडकीत उभा होता तो केशा.. आणि अंधारात होते ते आण्णा. हो, तेच देऊळ मधले..!

मी सरळ मुद्द्याला हात घातला..
काय केशा? कसं सुरुय शहरात? आणि आण्णा तुमचं बेंगलोर काय म्हणतंय?

मंगळूरात आणि शिटीत काय फरक न्हाय लगा.केशा बोलला,अण्णांनी केश्याला दुजोरा दिला.माझा प्रश्न कळला होता त्यांना.
मी म्हणलं होत तुम्हाला..मंगरूळ सोडू नका.भायर काय फरक न्हाय.उलट तुम्हाला त्रासच होईल.

हं बरोबर, आण्णा हताश वाटले.

पण मग हे सगळं एकसारखं..इथंबी तेच तिथंबी तेच,कुठवर चालणार? केशा संतापला.
मी त्याहून शांत मुद्रेनं त्याच्याकडं पाहिलं आणि म्हणलं..
देवाचा बाजार उठत न्हाई तोवर हे असंच.
Read 13 tweets
23 Dec 20
'No race can prosper till it learns there is as much dignity in tilling a field as in writing a poem.'

शेतीचं आणि शेतकऱ्यांचं महत्व या शब्दात सांगितलं होतं बुकर टी वॉशिंग्टनी.

'जय जवान जय किसान' हा आपला आवडता खेळ..जवान आणि किसान यांची अवस्था बरी म्हणावी अशीही नाही. #थ्रेड #म
भारतीय समाज कमालीचा भावनिक प्राणी..अगदी पहिल्यापासून.. याच भावनिकतेतून त्याने ज्याला ज्याला राजा किंवा देव/देवी संबोधलं त्याची वाताहत त्यानेच मन लावून केली..
इतिहास गवाह है..!
त्याने अखंड निसर्गाशी देवत्वाचं नातं जोडलं, पुढे निसर्ग कोपला हे ही त्यानेच ठरवलं..
यथावकाश स्त्रीला देवी मानण्याचे सत्कार्य त्याने उभारले.. आज जगाच्या पाठीवर धर्मांधळ्या मुस्लिम देशांनंतर भारतभूमीत स्त्रीस जास्तीत जास्त बेअब्रू केलं जातं. ही वस्तुस्थिती आहे.
Read 14 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!