पहिल्याच कंपनीत मी ट्रेनी म्हणून काम करत असताना शामसाहेब (नाव बदललेय) त्या कंपनीचे मुंबई युनिटचे सर्व्हिस हेड होते.

माझ्यापेक्षा १०/१२ वर्ष मोठे. नागपूरच्या VNIT मधून इंजिनियरींग केलेले.अत्यंत हुशार,तल्लख, आम्हाला लहान भावासारखे
#SaturdayThread #मराठी #BusinessDots #सत्यकथा👇
वागवायचे.

फॅक्टरीत आले की संध्याकाळी सर्वांना ढाब्यावर घेऊन जायचे, पाहिजे ते घ्या म्हणायचे आणि मग अक्षरश: धुमाकुळ... आम्हालाही जणू आमच्या घरातीलच माणसासारखे वाटायचे. माझे ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचे प्रमुख कारण हे त्यांच्यासोबतच्या अशा जेवणावळीच होत्या.

यात मी सांगितलेला 👇
पदार्थाचा इतिहास, भूगोल त्यांना इतका आवडायचा की बऱ्याच वेळा मला ते बाहेरच्या राज्यात जावूनही कुठे काय खावे हे मला विचारायचे.

त्यांना कामासाठी कधीही फोन करा, कितीही किचकट प्रश्न असला तरी कायम उत्तर तयारच असायची, फिल्डवर काम केलेले असल्याने अनुभव, थर्मल इंजिनियरींगचे 👇
परफेक्ट ज्ञान, जबरदस्त कष्ट करण्याची तयारी याच्या जोरावर त्यांची एक वेगळीच जरब होती.

पुढे मी मुंबईत आलो आणि आमच्या गाठीभेटी अजून वाढल्या, मी जरी त्यांच्या कंपनीत नसलो तरी त्यांच्याकडून सतत मार्गदर्शन घेत असे.
पुढे साधारणपणे २००७ ला मी या ऊद्योग-व्यवसायात उतरलो, 👇
सुरूवातीला त्यांनी मला विरोध केला होता कारण माझे वय कमी आणि कोणतेच आर्थिक पाठबळ नसल्याने खुप अडचणी येऊ शकतात, दुसरे मी करत असलेल्या व्यवसायास फार काही भविष्य नाही, हे त्यांचे ठाम मत होते.

मी त्यांचा सल्ला ऐकला नाही याचा राग येऊन त्यांनी वर्ष - दोनवर्ष माझ्याशी संपर्क तोडला. 👇
मला याचे फार वाईट वाटायचे, बऱ्याचदा मी त्यांना फोन करायचो पण ते मला टाळायचे. पण काही कॅामन मित्रांकडे कायम माझी खुशाली विचारत असत.

साधारणपणे २००९ दरम्यान मला त्यांचा एक दिवस अचानक फोन आला “कसा आहेस? आणि मी तूला उद्या भेटायला येऊ का?”

मी कसलाही विचार न करता सर्व कामं बाजूला 👇
ठेवून त्यांना हो म्हटले.

मला खूप आनंद झाला होता कारण ते माझे तसे गुरूच होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता साहेब ॲाफीसमधे हजर, मस्त गप्पा झाल्या, त्यांना आमची प्रगती पाहून मनापासून आनंद झाला. दुपारी जेवण करताना त्यांनी मला अजून एक बातमी दिली ती म्हणजे त्यांनीही 👇
वर्षभरापूर्वी स्वत:चा बॅायलर बनविण्याचा उद्योग सूरू केलाय. नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही भरपूर जेवलो, पुर्वी ही तेच पैसे द्यायचे, त्या दिवशीही त्यांनीच पैसे दिले.

जायच्या वेळी मी त्यांना गुरूदक्षिणा म्हणून त्यांच्या व्यवसायास पुरक अशा आमच्याकडून मुद्दामच काही ॲार्डर्स दिल्या,👇
त्याचा बळेच संपुर्ण ॲडव्हान्सही देऊ केला. त्यांच्या डोळ्यात तो चेक घेताना अक्षरश: पाणी आले होते. मी मात्र अत्यंत सदभावनेनं आणि आपुलकीने शुभेच्छा देवून त्यांना निरोप दिला.

पुढे ठरल्याप्रमाणे त्यांनी ती ॲार्डर पुर्ण केली, आम्ही त्यांना बरेच रेफरन्सही त्यांना द्यायचो.
👇
पुढे अचानक वर्षभराच्या आतच त्यांचा फोन सतत बंद येऊ लागला, वेळेवर मालाची डिलीव्हरीही थांबली. वेळेवर माल मिळत नसल्याने आमच्या परचेस विभागाने इतर ठिकाणाहून माल मागवला, ते माझे मित्र असल्याने कोणीही त्यांची तक्रार माझ्याकडे करत नव्हते. बरं मी ही कामात इतका व्यस्त असायचो की या 👇
या गोष्टीकडे माझे लक्षच गेले नाही.

एक दिवस कॅश-फ्लो चेक करताना शाम साहेबांच्या कंपनीऐवजी भलत्याच व्हेंडरला का बरं ॲार्डर देताय हा प्रश्न मी सहकाऱ्यांना विचारला तेंव्हा त्यांनी साहेबांबद्दल बराच नकारात्मक बाबींचा पाढा वाचला.

दुसऱ्याच दिवशी मी त्यांना फोन केला,पण त्यांच्याशी 👇
संपर्कच होईना, सतत चारपाच दिवस पाठलाग केल्यानंतर एक दिवस रात्री ११ वाजता साहेबांचा फोन लागला, मी प्रेमाने सर्व चौकशी केली परंतु ते दारूच्या नशेत असल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी डोंबिवलीतल्या त्यांच्या घराजवळ भेटायचे ठरवून फोन ठेवला.

दुसऱ्या दिवशी मी सकाळीच तिकडे गेलो 👇
त्यांना भेटलो तर त्यांची अवस्था पाहून मला धक्काच बसला. दाढी वाढलेली, डोळ्याभोवती काळी वर्तुळं, हात थरथरत होते, डोक्यावरचे केस पुर्ण विस्कटलेले आणि कपडे पुर्ण खराब झालेले. ग्रीस आणि फॅक्टरीतले डाग.

मी अवाक् होऊन गेलो, तशातही मी त्यांना आदराने अलिंगन दिले, 👇
त्यांच्या हाताला धरून माझ्या गाडीत बसवले आणि एका हॅाटेलमधे घेवून गेलो.

त्यांच्या डोळ्यात मला सर्व काही हरल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. थोडा वेळ शांत बसल्यावर मी काहीच बोलत नाही हे ऐकून तेच स्वत:च म्हणाले - “टेक्निकल ज्ञान ऐकायलाच चांगले रे, आयुष्यात व्यवहारज्ञान पाहिजे!” 👇
मी काहीच बोलत नव्हतो - त्यांच्या भावनांना वाट मिळावी म्हणून मी फक्त ऐकत होतो. पुढे ते म्हणाले - “जिद्दीने करायला गेलो पण पैशांचे गणितच जुळत नाही आता,प्रत्येक ॲार्डरमधे नुकसान होतेय.

तीनतीन महिने कामगारांना पगार नाही त्यामुळे बरेचसे सोडून गेले, त्यामुळे आता स्वत:च काम करतोय..👇
अकाउंट पाहू कि परचेस कि मॅन्युफॅक्चरींग की सर्व्हीस कि नविन धंदा आणू? लोकं काम देतात पण पेमेंट टर्म्स अजिबात पाळत नाहीत रे. वैताग आलाय!

कंपनी चालू करताना घर बॅंकेकडे दिले होते आता बॅंकेने जप्तीची नोटीस पाठवलीये म्हणून दिवसा फोन बंद ठेवतो नाहीतर त्यांचे लोक खुप त्रास देतात...👇
सेल्स टॅक्स भरू शकलो नाही त्यामुळे वेगळाच मनस्ताप. जुने कस्टमर पहिला टॅक्स भरा तर राहीलेले पैसे देऊ म्हणतात, आता घर चालवायलाच पैसे नाहीत तर हे कुठून भरू. त्यामुळे त्यांच्याकडील उधारीही मिळत नाही. इकडे नवा माल घ्यायला पैसे ही नाहीत आणि क्रेडीटही शून्य.”

“तुझ्या कंपनीतून मागे 👇
दोन लाख आले त्यात मुलांची शाळेची फी भरली, इतर घरचे खर्च केले त्यामुळे तुमच्या लोकांना माल देऊ शकलो नाही. त्यामुळे त्यांचेही फोन घेणे बंद केले. नविन ॲार्डर जरी आल्या तरी, आहे तोच मामला पुर्ण करायला आता पैसे नाहीत. काय करू, कसे करू काही सुचत नाही.

हल्ली तर दोन दोन दिवस घरीच 👇
जात नाही फॅक्टरीतच झोपतो. मला हे सर्व ऐकून त्यांचे जुने दिवस आठवले, किती जिंदादिल माणूस, हुशार, ज्ञानी. एकदम साधासुधा अगदी तुमच्या आमच्या घरातल्यासारखा.

मी काही ठाम विचार केला आणि तिथून थेट त्यांच्या फॅक्टरीत जायचे ठरवले.

तिथे जावून त्यांच्या ॲार्डर्स,कॅशफ्लो, खर्च, 👇
परचेस स्टेटमेंट आणि इतर सर्व आर्थिक बाबी तपासाव्या म्हणून त्यांना डिटेल्स मागितले तर चक्कर येऊन पडेल असे उत्तर मिळाले...

म्हणे गेली दोन वर्ष फायदाच नाही त्यामुळे हे असे एकत्र काहीच ठेवले नाही...अगदी विखुरलेला डेटा...काही डायरीज आणि कंप्युटरवर साध्या PO आणि जूजबी ॲार्डर्स...👇
मी जे भेटले ते एकत्र केले. त्याचा अभ्यास केला. आर्थिक अवस्था वाईट होती पण काहीतरी मार्ग काढू म्हटले.

त्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी जे मोठे प्रोजेक्ट घेतलेले त्याच्या किंमती इतक्या कमी होत्या की त्यात फायदा मिळवायचा असेल तर डोळ्यात तेल घालूनच काम करावे लागणार होते. 👇
आपण मराठी लोक बऱ्यापैकी अघळपघळ असतो, फार बारकाईने विचारच करत नाही... त्यात उद्योग हा “फायदा” कमविण्यासाठीच केला जातो हे बेसिक बाजूला ठेवून भावनात्मकच जास्त विचार करतो.

त्यांनीही यात काहीही लक्ष न दिल्याने अशाच आर्थिक संकटात अडकले होते.

मी जवळपास दोन तीन दिवस सर्व अभ्यास 👇
करून त्यांना काही सल्ले दिले... जी कामं होणारच नाहीत त्या लोकांना तसे स्पष्ट सांगा, काम करून हवे असेल तर रेट वाढवून घ्या आणि नव्याने सुरूवात करा असे ठरले.

एके दिवशी बॅंकेत मी स्वत: त्यांना घेऊन गेलो. तिकडेही सर्व परिस्थिती सांगितली आणि मुदतवाढ घेतली. फायनांस आणि अकाउंट्स 👇
मध्येही बऱ्याच सुधारणा सांगितल्या. पुन्हा आमच्याकडून जी काही मदत करता येईल ती केली.

सर्व काही सुरळीत होईल असे मनोमन वाटत होते आणि दोनेक आठवड्यात अचानक एका कॅामन मित्राने बातमी सुन्न करणारी बातमी दिली “साहेबांनी आत्महत्या केली”

आता काहीच करू शकत नव्हतो. सुन्न झालो होतो. 👇
"Business is a serious affair, Don’t do it for fun or just bcoz others are doing” आर्थिकबाबी त्याचे परिणाम, धोके, तणाव पचवायाची ताकत असेल तरच पुढे या.

व्यावसायिक आयुष्य जितके सोपे, चकचकीत दिसते तसे ते नक्कीच नसते.

#आर्थिकसाक्षरता - पैशांचे नियोजन शिकाच!
#SaturdayThread #मराठी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Prafulla Wankhede 🇮🇳

Prafulla Wankhede 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @wankhedeprafull

30 Jan
माझ्या लहानपणी सहसा रेडीमेड कपडे खरेदी नसायचीच,शाळेव्यतिरिक्त वर्षातून एकदा दिवाळीत आणि दुसऱ्यांदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नवे शिवलेले वाढत्या अंगाचे 🤦‍♂️😉(ढगळे)कपडे मिळायचे.
त्यातही आईबाबा सोबत,त्यामुळे आपली आवड अशी काही फार नसायची..
१/१४

#आर्थिकसाक्षरता #SaturdayThread #मराठी #म
मळखाऊ, जाड, टिकायला मजबूत, स्वस्त आणि मस्त हेच क्रायटेरिया असायचे.

एकदा कपडा सिलेक्ट झाला की मग आमची स्वारी निघायची टेलरच्या दुकानात, तिथे वाढत्या अंगाची मापे 🤦‍♂️घेतली की बाबा टेलरला न विसरता एक वाक्य सांगायचे “चोर खिसा ठेवा बरं”... आपल्या आयुष्यात हा चोरखिसा म्हणजे २/१४
जीव वाचवायला लागणारे पैसे #EmergencyFund.

कोणत्याही प्रवासात सहकुटुंब निघो वा एकटे बाबांनी चोरखिशात कायम एक ठराविक रक्कम ठेवायची सवय लावली. अगदी शेवटच्या वेळीच,कठीण काळातच त्याचा वापर करायचा.

लहाणपणी बऱ्याचवेळा विविध स्पर्धांसाठी तालुक्याच्या, जिल्ह्यांच्या ठिकाणी जायचो ३/१४
Read 14 tweets
26 Jan
आपण जर आज आपल्या घटनेची उद्देशिका वाचली तर सहज लक्षात येईल की ज्या देशाला विचार, व्यक्तीस्वातंत्र्य, जातीव्यवस्था, विद्वेष, जन्मजात विषमता, शिक्षणाचा अभाव, बहुतांश ग्रामीण भाग याचा शेकडो वर्षांचा पाया होता, प्रभाव होता त्या देशाने ही राज्यघटना त्या काळी कशी स्वाकारली असेल. १/६ Image
मला निःसंशय तेंव्हाची आपली भारतीय पिढी आजपेक्षा वैचारीक दृष्ट्या अधिक प्रगल्भ वाटते.

आजच्या दिवशी आपण भारतीयांनी “स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय यांच्या मुलभूत पायावर उभ्या असलेल्या महान राज्यघटनेचा स्वीकार केला.

खरे पाहता आपली भारतीय स्वातंत्र्य लढ्याची चळवळ ही २/६
ब्रिटीशांविरूद्ध तसेच एकाचवेळी इथल्याच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाबींवर सुरू होती.

ज्या धर्मरूढींनी, राजेशाहीने आणि वर्णवर्चस्ववादी परंपरेने विषमतावाद जोपासला होता त्या विरूद्ध ती चळवळ कडालली आणि जिंकलीही.

आजही आपण आपल्या देशाच्या राज्यघटनेतील या मुल्यांचा अंगीकार केला ३/६
Read 7 tweets
23 Jan
मुंबईत येऊन ३/४ वर्ष झाली होती. बऱ्यापैकी स्थिरावलो,सरावलो होतो. पैसे ही गरजेपेक्षा बरे मिळत होते,अगदी आनंदी आनंद!

बरं, आमच्या सुखाच्या व्याख्या मित्रांसोबत विकेंडला नवा सिनेमा पाहणे, नवनवीन हॅाटेलात जेवण करणे यापलीकडे काही नव्हत्या.

#SaturdayThread #समाजसेवा #मराठी #म १/१९
असेच एक दिवस सिनेमा पाहून स्टेशनवरून पायी चालत येत होतो. नेहमीचीच सिग्नलवर असणारी लहान मुले दिसली. उन्हाळ्याचे दिवस, त्यांच्या पायात चप्पल नाही, अंगावर धड कपडे नाहीत, भुकेने व्याकुळ. आमच्याकडे फार आशेने पाहत होती.
आम्ही सर्वच जण तसे गावखेड्यातून आल्याने बऱ्यापैकी संवेदनशील.
२/१९
सर्वांनीच त्यांना जवळ बोलावले आणि एका वडापावच्या गाडीवर त्यांना हवे तेवढे खा म्हणून सांगितले. पोरांचे चेहरे पाहण्यासारखे झाले, पोट भरल्याचा आनंद पोटापेक्षा डोळ्यातून, नाकातून चमकत होता.

पुढच्या रविवारी पुन्हा तोच प्रकार.

नंतर नंतर ती मुले आम्हाला ओळखायला लागली
३/१९
Read 19 tweets
20 Jan
मागच्या महिन्यात काही कामानिमीत्त पाचगणीला जाणे झाले. मुंबई-बेंगलोर महामार्गावरून वेळे आणि सुरूरच्या दरम्यान ड्रायव्हरने चहा प्यायला गाडी थांबवली.

मी ही सहजच गाडीतून उतरलो तर समोर रंगीबेरंगी कपडे कमरेला लावलेला “पोतराज” मला दिसला. केसांच्या जटा वाढलेल्या, हातात आसूड १/६
गुबूगूबू वाजणारा ढोल, पत्नी, त्याची लहान मुलगी आणि मरीआईचा गाडा.... मी एकदम स्तब्ध झालो.... माझा मोबाईल सूरू होता आणि तो माझ्याकडेच येतोय हे पाहून गाडीच्या हॅंडलकडे आपसूक हात गेला.

परत मलाच माझ्या पांढरपेशा स्वभावाची लाज वाटली, कॅाल एवढाही काही महत्वाचा नव्हता २/६
का कोण जाणे मला अचानक त्या पोतराजाशी संवाद साधायची इच्छा झाली..

तो ही माझ्याकडेच येत होता, त्याच्या डोळ्यातून त्याची गरीबी आरपार पोटापर्यंत दिसत होती..मास्क नव्हताच. कोरोना-बिरोना काही नाही..
मी त्याला बोलावून १०/१५ मिनिटे बोललो.

१२वी विज्ञान शिक्षण झालेला तो पोतराज, सरकारी ३/६
Read 6 tweets
16 Jan
या कोविड संकटात, टाळेबंदीत खुप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या.

पुर्वी आर्थिक चटके इतके पाहिलेत कि त्याचे काही अप्रुप नव्हते.तरीही काही बाबी अजून ठळक जाणवल्या.

1. Need Vs Wants चा फरक फार स्पष्ट झाला. हा माझा सर्वाधिक मोठा फायदा!अगदी आयुष्यभर..

#SaturdayThread #मराठी #म १/७
2. “Work From Home” आमच्या व्यवसायात धादांत “Timepass” वाटणारी गोष्ट आमची कंपनी आयुष्यात कधीही करू शकणार नाही हा मोठा गैरसमज दूर झाला.

3. आयुष्यात पहिल्यांदा सलग एवढे दिवस कुटूंबासोबत राहिलो, खरे आयुष्य अनुभवले. त्यांनी मला सहन केले याबद्दल त्यांचे कौतुक!
२/७
4. वय, जात, धर्म, देश, भाषा, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, बुद्धीवान असो की भोळा निसर्गासमोर आपण सर्वच सारखेच.सर्वांना एकच न्याय!

5. लॉकडाऊनमधे गरीब,मजूर,कामगार वर्ग अन्नपाण्याविना, सरकारी मदतीविना चालत गेला. आपणही कधीकाळी यांचाच भाग होतो. आज त्यांच्यापेक्षा चांगली परिस्थिती
३/७
Read 7 tweets
9 Jan
साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी आम्ही व्यवसाय विस्तार करत असताना मुंबई आणि जवळपासच्या जागांचा शोध घेत होतो.

इकडचे जागेचे दर ऐकून आम्हाला हादरा बसत होता, ROI यायलाही पाच वर्षाचा काळ त्यामुळे तो प्रोजेक्ट रखडतो की काय याची भीती वाटत होती.
#SaturdayThread #BusinessDots #मराठी #म १/१२
फॅक्टरी, मशीनरी, मनुष्यबळ, इतर पायाभूत सुविधा आणि “आपली २४ उपलब्धतता” यासाठी हा प्रकल्प मुंबईजवळ पर्यायाने घराजवळ असणे याला प्राथमिकता देत होतो पण मुंबईत हा प्रकल्प होणे शक्यच नव्हते या निष्कर्षावर आम्ही पोहचलो आणि तो बंद करणार अशात आमच्या डोक्यात एक कल्पना आली की प्रकल्प

२/१२
पुण्यात जर टाकला तर बराच खर्च कमी होईल.

तेंव्हा पुण्याला फॅक्टरी ही तशी परीक्षाच होती. या क्षेत्रात आम्हाला अनुभव असला तरी मॅन्युफॅक्चरींग हे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि त्यात जर एखादी जरी चूक घडली तरी तुम्ही सहज संपून जावू शकता.

त्यातही त्यातली गुंतवणूक, दगदग आणि ३/१२
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!