#Thread
#शंकराचार्य
#ShankaraJayanti
आद्य शंकराचार्य अवतार कार्य :-
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।
जगताचे पालनहार भगवान श्रीकृष्ण आपल्याला अर्थात त्यांच्या भक्तांना वरील वचन देतात की,
१/
ज्या ज्या वेळी धर्मला ग्लानी येईल त्या त्या वेळी मी अवतार घेऊन धर्माचे अधिष्ठान कायम राखेल. आपण इतिहास पाहिल्यास ह्या वचनाची प्रचिती आपणाला अनेकदा आलेली दिसते. अशीच काहीशी परिस्थिती भगवान आद्यशंकराचार्यांच्या अवतारास कारणीभूत ठरली. सगळीकडे बुद्ध धर्माचे स्तोम माजले होते.
२/
तसेच आपला सनातन धर्म अनेक संप्रदायात विभागला गेला होता.अनेक भेद,अनेक मत-मतांतरं निर्माण झाले होते.धर्म अगदी त्राहि त्राहि करतं होता आणि अशातचं आपल्या भक्तांना दिलेले वचन पाळण्यासाठी भगवान साम्बसदाशिवाने अवतार घेतला.
शंकर दिग्विजय ग्रंथात शंकराचार्य यांच्या जन्माच वर्णन करणारा
३/
एक श्लोक आला आहे -
लग्नेशुभे शुभयुते सुषुवे कुमारं
श्री पार्वतीव सुखिनी शुभवीक्षिते च |
जाया सती शिवगुरोः निजतुङ्ग संस्ते
सूर्येकुजे रविसुते च गुरौचकेन्द्रे ||
ज्याप्रमाणे भगवान कार्तिकेयाला जन्म दिल्यावर भगवती पार्वतीला आनंद झाला असेल त्याचप्रमाणे बालक शंकराचा जन्म झाल्यावर
४/
माता आर्यम्बाला अतीव आनंद झाला. दिवस होता वैशाख शुद्ध पंचमीचा, आकाशात सर्व ग्रह उत्तम स्थितीत असताना शंकराचार्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव आर्यंबा तर वडिलांचे नाव शिवगुरू होते. त्यांचे कुळ कृष्ण यजुर्वेदीय नंबुद्री ब्राह्मणाचं होत आणि जन्मगाव केरळमधील पूर्णा नदीच्या
५/
किनारी असलेले कलाडी हे होते. लहान वयातच बाल शंकराचे पितृछत्र हरपले, त्यामुळे त्याचा सगळा सांभाळ त्यांच्या आईने अर्थात आर्यम्बा यांनी केला.
पुढे उपनयन अर्थात मुंज झाली आणि ब्रह्मचर्य आश्रम सुरू झाला. उत्तम अशा प्रज्ञेच्या जोरावर बाल शंकरांनी अगदी कमी वयात बरेच अध्ययन पूर्ण केले
६/
आणि आता वेध लागले ते सगळं त्यागुन संन्यास घेण्याचे.आपल्या धर्म शास्त्रात असे सांगितले आहे की जर अविवाहित पुरुषास संन्यास घ्यायचा असेल तर त्याला त्याच्या आईची परवानगी घ्यावी लागते आणि विवाहित पुरुषास आपल्या पत्नीची. त्यानुसार बालक शंकर आईला सतत संन्यास घेण्याविषयी विचारत असे पण
७/
बालकाच्या प्रेमापोटी आणि जर हा निघून गेला तर आपलं कोणीच आपल्याजवळ राहणार नाही ह्या भीतीने माता सतत त्यास विरोध करत असे.एकदा बालक शंकर पूर्णेत स्नान करत असता एका मगरीने पायाला पकडले आणि ती शंकराला पाण्यात घेऊन जाऊ लागली ते पाहून माता अत्यंत शोक करू लागली आणि हीच संधी योग्य आहे
८/
असे पाहून बाल शंकर म्हणाला की "माते जर तू मला संन्यास घेण्यास परवानगी देत असशील तरच मी माझा पाय सोडवून घेतो अन्यथा प्राण त्याग करतो." मातेने शेवटी परवानगी दिली आणि बाल शंकर पाण्यातून बाहेर आले.
आईची परवानगी घेऊन शंकरांनी आपले गाव सोडले व ते गुरूच्या शोधार्थ निघाले.
९/
सगळ्यांचे आदिगुरू आज अवतरण रुपात गुरू शोधण्यासाठी निघाले होते. नर्मदेच्या किनारी त्यांची 'प पू गोविंद भगवत्पाद' यांची भेट झाली. ज्यावेळी त्यांनी शंकरांना पाहिलं व परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारला की तु कोण आहेस? त्यावेळी शंकरांनी उत्तर दिले,
स्वामिन्नहं न पृथिवी न जलं न तेजो
१०/
स्पर्शनो न गगनं न तद्गुणावा |
नापीन्द्रियाण्यपि तु विद्धि ततोऽवशिष्टो
यः केवलोऽस्ति परमः सशिवोऽहमस्मि।।
"हे स्वामी मी पृथ्वी नाहीये ना की मी जल आहे अथवा आकाश आहे, मी इंद्रिय देखील नाहीये. मी केवळ आणि केवळ शिवतत्व आहे." हे उत्तर ऐकून गोविंद भगवत्पाद यांना आनंद झाला व त्यांनी
११/
शंकरांना संन्यास दीक्षा दिली. तिथून पुढे वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत शंकराचार्यांनी आपल्या गुरुंजवळ वेद, वेदांत ,शास्त्रे यांचं उत्तम अध्ययन केलं. सोळाव्या वर्षी सर्व अध्ययन पूर्ण झाल्यावर गोविंद भगवत्पाद यांनी शंकराचार्यांना "तु आता सर्व अभ्यासात उत्तीर्ण झाला आहेस आता
१२/
तु भारतभ्रमण करायला जा.!" अशी आज्ञा केली.
त्यानुसार शंकराचार्य सगळ्यात सुरुवातीला काशीस गेले.तिथे त्यांना अनेक थोर विद्वान लोकांचा सहवास लाभला. अनेकांशी शास्त्रार्थ करण्याची संधी मिळाली.तसेच शंकराचार्यांनी काशीत असतानाचं प्रस्थान त्रयीवर
१३/
भाष्य लिहिले.प्रस्थान त्रयी म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता.त्यांनतर शंकराचार्य बद्रीनाथ येथे गेले.तिथेही अनेकांशी त्यांचे शास्त्रार्थ झाले. त्यांनी अनेक बुद्ध धर्माच्या विद्वानांचे मत खंडन केले व सनातन धर्मचं कसा सगळ्यात योग्य आहे हे पटवून दिले.
हे भ्रमण चालू असताना
१४/
त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की सनातन धर्म हा अनेक संप्रदायात विभागला गेला आहे. जसे की शैव,वैष्णव,सौर,शाक्त गाणपत्य इत्यादी. हे लोक एकमेकांत भांडत आहेत आणि धर्माचे नुकसान होत आहे. त्यामुळे ह्या लोकांना एकत्र करायला हवं. त्यासाठी त्यांनी पंचायतन पूजा पद्धती सुरू केली. पंचायतन
१५/
म्हणजे पाच देवता - गणपती,देवी,सूर्य,शिव,विष्णु सगळ्यांनी ह्या पाचही देवेतेंची पूजा करायची.ही नवीन पद्धत अत्यंत प्रभावी ठरली,यामुळे लोकांमध्ये असणारे वाद कमी झाले व एकता वाढली.
तसेच त्यांनी देशाच्या चारी दिशेला चार धर्म पीठांची स्थापना केली.पूर्वेला पुरी मठ,पश्चिमेला द्वारका
१६/
मठ, दक्षिणेस शृंगेरी आणि उत्तरेस बद्रीनाथ जवळ ज्योतिर्मठ. ह्या प्रत्येक मठाच चालकत्व आपल्या शिष्यांकडे सोपावल. प्रत्येक मठास विशिष्ट वेदाची जबाबदारी दिली जस की पूरीस ऋग्वेद, शृंगेरीस यजुर्वेद, द्वारकेस सामवेद आणि बद्रीनाथास अथर्ववेद.ह्यांची उत्तम जोपासना करणे व त्यातून आपल्या
१७/
धर्माचं सर्वथा रक्षण करणे व सनातन धर्मावर होणाऱ्या आघातांना चोख प्रत्युत्तर देणे हे ह्या मठांच मुख्य उद्दिष्ट होत.
आचार्यांनी ब्रह्म व जीवाच ऐक्य सांगणारा अद्वैताचा सिद्धांत प्रकाशझोतात आणला.आचार्य म्हणतात "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः।" अर्थात ब्रह्म केवळ सत्य
१८/
आहे बाकी सर्व अज्ञान आहे किंवा खोटे आहे आणि जीव व ब्रह्म एकच आहेत.हा अद्वैत सिद्धांत प्रकाशझोतात आल्यामुळे वेदांत विचाराचा नवीन प्रवाह चालू झाला.
अत्यंत अल्प मिळालेल्या जीवनात प पू शंकराचार्यांनी अनेको ग्रंथांची रचना केली. मुख्यत्वे जर पाहायला गेलं तर प्रस्थानत्रयीवरच भाष्य,
१९/
त्याप्रमाणे त्यांनी अनेक प्रकरणं ग्रंथांची रचना केली जसे की विवेक चुडामणी,उपदेशसहस्त्री,आत्मबोध,अपरोक्ष अनुभूती इत्यादी.यासोबतच शंकराचार्यांनी अनेक देवतांच्या स्तोत्रांची रचना केली जसे की कनकधारा स्तोत्र, सौंदर्य लहरी,चर्पटपञ्जरिकास्तोत्र, विविध देवतांची अष्टके जी की आजही
२०/
अनेक ठिकाणी गायली जातात.
असा हा अतिदिव्य अवतार शंकराचार्यांनी वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी संपवला. भगवान सांबसदाशिव कैलासास स्थिर झाले. आज जे काही आपण सनातन धर्माचं अस्तित्व पाहत आहोत ते केवळ आणि केवळ आद्य शंकराचार्य यांच्या अवतारकार्यामुळे आहे.ज्यावेळी धर्म संपत
२१/
चालला होता त्यावेळी अवतार घेऊन धर्माचा रथ परत अग्रेसर करून सकळ मानवजातीचे कल्याण करणारे कार्य शंकराचार्यांनी केले. धर्मापुढे कुठलाही भेद,कुठलीही मतमतांतर ग्राह्य नाहीत,धर्मचं सर्वश्रेष्ठ आहे,हा वस्तुपाठ आपल्याला आचार्यांनी घालून दिला.
२२/
आज त्यांच्या अवतरण दिनी त्यांच्या पद्मचरणांवर कोटी कोटी प्रणाम..!!
विदिताखिलशास्त्रसुधाजलधे
महितोपनिषत् कथितार्थनिधे ।
हृदये कलये विमलं चरणं
भव शंकर देशिक मे शरणम् ॥🙏🙏
धन्यवाद..!!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा।

Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा। Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishwambharMule

16 May
#Hindu
#KnowYourDharma
Sanatan Hindu Dharma and Secularism :-
Now a days we hear lot about secularism and how it's in danger due to Hindu Dharma.Many people cry day and night saying that ''India is secular country and it's secularism is in danger." So what is the meaning of
1/
secularism? and does secularism really in danger due to Hindu Dharma?
The term "secularism" was first used by the British writer George Holyoake in 1851.Holyoake invented the term "secularism" to describe his views of promoting a social order separate from religion, without
2/
actively dismissing or criticizing religious belief. In Hindi secularism can be called as 'धर्मनिरपेक्षता' - neutral view to all the religions which is misdefined as 'Sarv Dharm Sambhav' i.e. all religions are same. I want to ask one simple question to these people who say all
3/
Read 19 tweets
4 May
#Thread
#हनुमान
बुद्धीतील जांबुवंताच्या उपदेशाची गरज..!!!
रावणाने सीतेचे हरण केले.राम अत्यंत शोकाकुल अवस्थेत लक्ष्मणासोबत सीतेच्या शोधार्थ फिरत असता महारुद्र हनुमानाची भेट झाली.पुढे सुग्रीवाची भेट झाली आणि सगळी वानरसेना सीतेला शोधायला निघाली.अंगद,जांबुवंत,नल,नील
१/
अशा वीर योध्यांसमवेत महाबली हनुमान ही निघाले. शोधात भटकत असता वानरांची सेना दक्षिण समुद्र किनारी येऊन ठेपली आणि तिथे थोर भगवद्भक्त जटायूच्या भावाची अर्थात संपातीची भेट वानरांना झाली आणि त्याने सगळी सीतेच्या हरणाची कहाणी वानरांना सांगितली.आता सीतेला रामांचा संदेश द्यायचा म्हणजे
२/
समुद्र ओलांडून लंकेत जावे लागणार. मग सगळ्यात चर्चा चालू झाली की कोण एवढा समर्थ आहे की समुद्र ओलांडून जाऊन सीतेस रामांचा संदेश पोचवू शकेल. ही चर्चा चालू असताना हनुमंतराय मात्र एका बाजूला शांत उभे होते. त्यांच्यात हाच समुद्र काय पण सप्तसमुद्र एकावेळी ओलांडून जाण्याचं सामर्थ्य
३/
Read 10 tweets
29 Apr
#Thread
#KnowYourDharma
#Hindu
Sanatan Hindu Dharma- Real pursuit of happiness...!!!!
These days we hear lot of people saying that we should protect our Hindu Dharma, we should protect our traditions, we should protect scriptures and many more..!
Here question
1/
arises what knowledge do we have about our Dharma,our traditions and our scriptures?In my view if we want to protect our Dharma then we should have basic knowledge about our Dharma,traditions etc. Because if we become knowledgeable about above things then and then only we will
2/
be having real respect about our Dharma. In this series of threads I will try to explain the basics of Hindu Dharma,our traditions,our scriptures etc. according to best of my knowledge. If readers find anything wrong in my writings then feel free to correct me.Before we begin
3/
Read 13 tweets
21 Apr
#Thread
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्र - सांप्रत तरुणांसाठी आदर्शद्योतक:-
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः।।
चैत्र शुद्ध नवमीची मध्यान्हाची वेळ होती.अयोध्येत अतीव आनंदाच वातावरण होत.कारण साक्षात जगद्धर्ता महाविष्णूंचं अवतरण अयोध्येत झालं होत.
१/
संपूर्ण रघुकुल आज धन्य झाल. श्रीरामांच्या आधी होऊन गेलेल्या सकळ प्रभृतींची भगवद्भक्ती आज फळली. श्रीरामांचा अवतार झाला आणि सकळ पृथ्वी आनंदून गेली. यापुढील रामायण आपणा सर्वांना माहितीच आहे. आज माझा तो विषय नाही ये. आजचा विषय आहे की श्रीरामांचं एकंदर अवतारकार्य आपल्याला अर्थात
२/
आजच्या युवकांना कशाप्रकारे आदर्श ठरू शकतं. यात सर्वात सुरुवातीचा मुद्दा येतो की श्रीराम का आदर्श म्हणून बघायचे? तर आदर्श पुत्र,आदर्श पती, आदर्श बंधू,आदर्श राजा,आदर्श मित्र आणि आदर्श पुरुष ह्या सर्वांच ऐक्याने प्राकट्य कुठे होत असेल तर ते श्रीरामांच्या अवतारात आपल्याला होते.
३/
Read 27 tweets
19 Apr
#Thread
आपल्यातले खरे #हिंदू ओळखा...!!
हे असं मी का म्हणत आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर मी ह्या थ्रेड मध्ये देत आहे. मागे काही दिवसांपूर्वी सर्वश्रुत असलेले सद्गुरू अर्थात जग्गी वासुदेव ह्यांचा एक व्हिडिओ ट्विटर आणि
१/
इतर माध्यमांवर व्हायरल झाला.आपणही तो पाहिला असेल.ज्यात सद्गुरू कृष्ण आणि यशोदेच्या संबंधावर बोलताना दिसतात आणि त्यात त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं आपल्याला प्रथमदर्शनी दिसतं.ह्याविषयी जर पाहायला गेलं तर एक तर तो व्हिडिओ छाटून नेमका त्यातील वादग्रस्त भाग घेऊन बनवला आहे.
२/
ज्यांनी ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहायला असेल त्यांना ही गोष्ट लक्षात येईल की हा व्हिडिओ केवळ आणि केवळ सद्गुरूंची बदनामी करण्यासाठी बनवला आहे.मग प्रश्न येतो की सद्गुरूंची बदनामी हे लोक का करत आहेत? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सद्गुरू सध्या हिंदू मंदिरे सरकारी
३/
Read 13 tweets
18 Apr
नामस्मरणाचे महत्व :-
आपल्या हिंदू धर्मात नामस्मरणाचे प्रचंड महत्व सांगितले आहे. केवळ भक्तिभावाने केलेल्या नामस्मरणाने अनेक लोकांचं कल्याण झालं, अनेकांची दुर्गम संकटे दूर झाली. आपल्याकडे याची खूप उदाहरणे पाहायला भेटतात. त्यात परत कली युगात नामस्मरण हे अत्यंत+ Image
उपयुक्त आहे असं सांगण्यात येत. महाभारतात भगवान श्रीकृष्ण सांगतात की ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि।’ अर्थात कलियुगात मी जप यज्ञात अर्थात नामस्मरणात स्थित आहे. जे फळ इतर युगात मोठे मोठे अनुष्ठान करून प्राप्त ते फळ कलियुगात केवळ श्रद्धेने केलेल्या नामस्मरणातून मिळत. सध्या ह्या कोरोणा+
वैश्विक महामारीचा प्रकोप आपण पाहतच आहोत. सगळीकडे अत्यंत उदासीन वातावरण झालं आहे. त्यामुळे साहजिकच आपले मन ही उदासीन व निराश होऊन जाते. तर यासाठी आपण सगळ्यांनी यथाशक्ती जर देवाचे नामस्मरण केले तर नक्कीच सकारात्मक वातावरणाची अनुभूती आपल्याला नक्की येईल. त्यासाठी फार काही+
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(