#Thread : एकता

गेल्या काही दिवसांपासून ‘मराठ्यांच्या राज्याचा अखेर’- ह्या विषयावरचे समकालीन संदर्भ चाळताना यशवंतराव होळकर यांची काही महत्त्वाची पत्रे वाचनात आली.

त्यावेळची आणि आजची परिस्थिती काही वेगळी नाही. म्हणूनंच प्रत्येकाने यशवंतरावांचे विचार आत्मसात करणे गरजेचं आहे.

१/१४
महादजींच्या मृत्यूनंतर त्यांचे दत्तकपुत्र दौलतराव ह्यांच्या हाती सत्ता आली.

दौलतराव महत्वाकांक्षी होते. तुकोजी होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्येष्ठ पुत्रास (काशीराव) हाताशी धरुन सगळी सत्ता स्वतःकडे घ्यायची होती.

रावबाजी तर पहिल्यापासून दौलतरावाच्या अमलाखाली होते.

२/१४
पण नाना फडणवीस आणि मल्हारराव होळकर ह्यांना हे मान्य नव्हतं. मल्हारराव कर्तृत्ववान होते.

पेशवे-शिंदे-होळकर ह्यांच्यात रावबाजी-दौलतराव-काशीराव आणि नाना-मल्हारराव असे गट निर्माण झालेले.

नानाच्या भितीमुळे बाजीरावाने दौलतरावास पुण्यात ठेवून घेतलेलं.

३/१४
दौलतरावांनी काशीरावाला हाताशी धरुन पुण्यात मल्हाररावांना ठार केलं. ह्या भयानक हत्येमुळे नाना फडणवीस हदरुन गेलेले.

ह्या सगळ्यामुळे होळकर-शिंदे वाद लयाला गेला.

पुढे १६-४-१८०१ रोजी बाळोजी कुंजराच्या ऐकून मूर्ख रावबाजीने विठोजी होळकर ह्यांची अमानूष हत्या करवली.

४/१४
नरसिंह विंचूरकर ह्यांच्या विनवण्यांचा ही फायदा झाला नाही.

इथूनंच मराठ्यांच्या राज्याच्या अखेराला सुरुवात झाली.

एवढं सगळं होऊन ही यशवंतरावांच्या मनात पेशव्यांसाठी असलेला जिव्हाळा कमी झालेला नव्हता.

१७-६-१८०१ रोजी लिहीलेल्या पत्रातून यशवंतरावांची पवित्र भावना दिसून येते.

५/१४
पुढे १८०२ मध्ये यशवंतराव पुण्यास यायला निघाले.

दौलतरावांच्या तावडीतून पुण्याला सोडवायचे आणि रावबाजीकडून बाळोजी कुंजर ला आपल्या ताब्यात घ्यायचे अशी त्यांची इच्छा होती.

पण यशवंतराव पुण्यावर चालून येत आहेत म्हटल्यावर बाजीराव कासावीस झाले.

६/१४
यशवंतरावांनी समेट घडवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण बाळोजी कुंजर ह्याने हा समेट होऊ दिला नाही.

२५-१०-१८०२ रोजी हडपसरच्या युद्धात यशवंतराव होळकर ह्यांनी पेशवे-शिंदे ह्यांच्या फौजांना पाणी पाजलं.

युद्धाचा परिणाम लक्षात येताच रावबाजी पर्वतीवरुन सिंहगडाच्या पायथ्याशी पळून गेला.

७/१४
पण यशवंतरावांचा रोष रावबाजीवर होता का?

नाही!

यशवंतरावांच्या शौर्याचं वर्णन करताना रियासतकार सरदेसाईंनी यशवंतरावांच्या मनातील भावना फार छान टिपल्या आहेत.

ज्या माणसाने आपल्या भावाची अमानूष हत्या केली त्याच्याबद्दल पण यशवंतरावांची काय भावना होती ते पहा👇🏼

८/१४
यशवंतरावाने दुसऱ्या बाजीरावास परत येण्यास सांगितले. पण रावबाजी सुवर्णदुर्गमार्गे वसईला गेला.

इंग्रजांसोबत रावबाजीने वसईचा तह केला. तहानंतर लगेच बाजीराव आणि यशवंतराव ह्यांच्यामध्ये काही गुप्त पत्रव्यवहार झाला.

ह्यासंबंधी इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे ह्यांचा लेख👇🏼

९/१४
१६-३-१८०३ रोजी यशवंतरावांनी अमृतराव पेशव्यांना एक पत्र पाठवलं.

यशवंतराव म्हणतात, "श्रीमंतांची दौलत मोठी आहे, माणसं आता शंभर वर्षात वाढली आहेत त्यामुळे एकदिली नाही असं वाटल्यास तसं समजू नये. पूर्वापार चालीवर दृष्टी ठेऊन सगळे एका दिवशी एकदिल होतील, आणि हेच उत्तम आहे”.

१०/१४
ह्या पत्रातून यशवंतरावांचे उच्च विचार दिसून येतात.

आज सगळ्यांनी हे विचार आत्मसात करण्याची अत्यंत गरज आहे.

इतिहासाचं विकृतीकरण करणारे #बाजारु_विचारवंत नेहमी बाजीराव-यशवंतराव वाद रंगवून सांगतात आणि ब्राह्मण-धनगर वाद पेटवून द्यायचा प्रयत्न करतात.

११/१४
प्रत्येकाने एकदा तरी इतिहास जातीचा चष्मा काढून वाचावा. आपल्या लक्षात येईल की अगदी १६४६ पासून १८१८ पर्यंत मराठ्यांच्यात अनेक वाद झाले. पण ते कधीही जातीय नव्हते. राजकारणापूर्ते मर्यादित होते.

मराठ्यांच्या राज्याचा अखेर होण्याचे एकंच कारण होते - आपापसातील वाद!

१२/१४
दुर्दैवाने आज ही परिस्थिती वेगळी नाही. पण इतिहासातून बोध घेऊन आपण हे सगळे वाद मिटवून ‘येक होऊन परराष्ट्राचा प्रसार नाही होऊ दिला पाहिजे’.

जातीभेद उभा जाळावा, अवघा हिंदु तितुका मिळवावा!

🚩#जयभवानी_जयशिवराय🚩

१३/१४
संदर्भः

१) मराठी रियासत उत्तर विभाग ३ (रियासतकार सरदेसाई)

२) पेशवे दप्तर खंड ४१

३) भारत सरकारचा केंद्रीय दफ्तरखाना - ऐतिहासिक मराठी साधनें

१४/१४

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devashish Kulkarni

Devashish Kulkarni Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AjaatShatrruu

18 Sep
छायाचित्रांचा #Thread : पुण्याचा गणेशोत्सव (२०२१)

गेल्या वर्षी (२०२०) कोरोनामुळे नेहमीसारखा गणेशोत्सव साजरा करता आला नाही.

पण ह्या वर्षी काही राहवलं नाही. म्हणून काळजी घेऊन श्रींच्या दर्शनासाठी गेलेलो.

🔸मानाचा पहिला : कसबा गणपती

#मराठी #Pune

@ShefVaidya @aparanjape

१/१२
🔸मानाचा दुसरा : तांबडी जोगेश्वरी गणपती

२/१२
🔸मानाचा तिसरा : गुरुजी तालीम गणपती

३/१२
Read 12 tweets
8 Aug
#Thread: Anti-Brahmin Riots of 1948 - A Congress Conspiracy?

Following the death of MK Gandhi, Maharashtrian Brahmins experienced horrors, that despite being recorded, are unknown to the masses.

Brahmins were manhunted only because the assassin belonged to that community.

1/9
Within a few hours of Gandhi’s assasination, the details of the assassin and his caste miraculuosly trickled down to different parts of the country.

How did this happen? There was no social media back in 1948 to help this spread of information.

Who planned this pogrom?

2/9
Senior Congress leader and the Home Minister of the Central Provinces then, who later went on to become the Chief Minister of Madhya Pradesh wrote some very intriguing things in his memoirs.

Dwarka Prasad Mishra, in his ‘Living an Era’, reminisces in his works👇🏼

3/9
Read 9 tweets
29 Jul
आज पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण अशा पुरस्कारांचा मान वाढवणारे आणि प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचणारे शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे १००रीत पदार्पण करत आहेत.

ह्या इतिहासपुरुषाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. या महात्म्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात शिवचरित्र पोहोचवलं.

१/५
‘राजा शिवछत्रपती’ सारखं शिवचरित्र लिहून महाराष्ट्राच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचं अक्षरश: वेड लावणारा हा इतिहासमहर्षी.

‘जाणता राजा’ हे नाटक दिग्दर्शीत करुन बाबासाहेबांनी १६७४ चा भव्य ‘शिवराजाभिषेक’ सोहळा आपल्या डोळ्यासमोर उभा करुन आपल्यावर असंख्य उपकार केलेत.

२/५
कोणता ही स्वार्थ न पाहता शिवछत्रपतींचं अष्टपैलू कर्तृत्व जगासमोर आणण्यासाठी या महात्म्याने स्वत: संपूर्ण आयुष्य वेचलं.

प्रत्येक शिवप्रेमी बाबासाहेबांचं ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र वाचल्याशिवाय राहू शकत नाही.

३/५
Read 5 tweets
12 Jun
#Thread : गोंद्या आला रे!

ZEE5 वर @malhar_pandey ने सुचवलेली #GondyaAlaRe ही मालिका बघितली.

मालिका बघून झाल्यावर मनामध्ये अभिमान आणि राग या दोन्ही भावना प्रकट झाल्या.

सर्वप्रथम, क्रांतिवीर चापेकर बंघू आणि महादेव रानडे यांच्या वीरस्मृतीस त्रिवार वंदन🙏🏼

१/१७
दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर आणि महादेव रानडे यांनी इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतिची जी ज्योत प्रज्वलित केली ती अनेक क्रांतिकारकांनी पुढे तशीच प्रज्वलित ठेवली ह्याचा सार्थ अभिमान वाटतो.

२/१७
१८९७ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. असंख्य लोकांनी या भयानक रोगामुळे आपले प्राण गमवले होते.

इंग्रज सरकारने या प्लेगला नियंत्रित करण्यासाठी वॅाल्टर चार्ल्स रॅंड च्या अध्यक्षेतेखाली एक कमिटी स्थापन केली होती.

पुण्यातील जनतेचा त्रास कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या...

३/१७
Read 17 tweets
6 Jun
६ जून - आज शिवराज्याभिषेक दिवस अर्थात #हिंदू_साम्राज्य_दिवस 🚩

१६७४ साली आजच्याच दिवशी आपले शिवाजीराजे छत्रपती झाले.

सभासदाने केलेलं वर्णन वाचून आंगावर काटा येतो👇🏼

या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.

१/१०
‘हिंदू साम्राज्य दिवस’ - हे ऐकलं की काही लोकांच्या पोटात दुखायला लागतं.

ही तीच लोकं आहेत ज्यांचे शिवछत्रपतींचे हिंदुत्व हिरावून घेण्याचे आणि त्यांना धर्मनिरपेक्ष ठरवण्याचे केविलवाणे प्रयत्न नेहमी फसेलेले आहेत.

पण हिंदवी स्वराज्य हे हिंदुंचं स्वराज्य होतं.

२/१०
आणि असं मी नाही तर समकालीन संदर्भ सांगतायेत.

🔸वा.सी.बेंद्रे त्यांच्या ‘Coronation of Shivaji The Great - गागाभट्टकृत: श्रीशिवराजाभिषेकप्रयोग:’ मध्ये काय लिहीतात ते वाचा👇🏼

शिवछत्रपतींच्या महाराजाभिषेकात हिंदु धर्मातील चार ही वर्णांनी सहभाग घेतला होता.

३/१०
Read 10 tweets
1 Jun
आज दुर्गमहर्षि गो.नी.दांडेकर यांची पुण्यतिथी...

महाराष्ट्रातील इतिहासप्रेमीना दुर्गभ्रमंतीचे वेड लावणारे, ऐतिहासिक कादंबरीकार, महाराष्ट्रातील संतावरील भरीव लेखन ,  प्रवासलेखन चारित्रलेखक असे विविध गुणी ऋषितुल्य व्यक्तीमत्व म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर होय.

१/५
गो.नी. दांडेकरांनी सांगितलेली एक आठवण👇🏼

महाबळेश्वर स्थानकात पुण्याला परतायला गाडीत बसलेलो. बाहेर धो धो पाऊस सुरु होता, पाखरंही आडोसा धरुन बसलेली.

खिडकीतुन आत येणारे तुषार झेलत उगीचच बाहेर बघत बसलेलो.

२/५
इतक्यात, एवढ्या जीवघेण्या पावसात सायकल मारत चाललेला एकजण दिसला.

विचारच करीत होतो इतक्यात चेहरा दिसला. तसाच धडपडत बसमधुन खाली उतरलो,धावतच जावुन त्या सायकलवाल्या तरुणाला आडोशाला घेतले अन विचारले हे काय? या प्रलयपावसात कुठुन आलात आणि कुठं निघालात?

३/५
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(