My Authors
Read all threads
२१ वर्षांपूर्वी, २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याने बळकावलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले #कारगिल युद्ध जिंकले. #कारगिल_विजय_दिवस त्याची थोडक्यात माहिती #Thread
@aparanjape @Girbane @yashodhanpanse #म @adgpi @MandarDiwakar @snigdhaman
हिवाळ्यात #कारगिल परिसर राहण्यासाठी अत्यंत प्रतिकूल होत असल्याने दोन्ही देशांचे सैनिक हिवाळ्यात खाली सुरक्षित जागी परतत. व उन्हाळ्यात पुन्हा आपल्या जागी येत. असा करार नसला तरी दोन्ही लष्करांनी ही बाब मान्य केली होती. मात्र, पाकिस्तानने त्याचा भंग केला.
काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या या एकमेव रस्त्यावर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता. ती सामरिकदृष्ट्या मोठी आघाडी ठरली असती. त्यासाठीच पाक लष्कराचे तत्कालिन प्रमुख जनरल #मुशर्रफ यांनी सुमारे ५० हजार सैनिक घुसखोरांच्या वेषात भारतीय हद्दीत धाडले
पर्वतरांगातील मेंढपाळांना पाकिस्तानच्या घुसखोरीची सर्वप्रथम कल्पना आली. या मेंढपाळांनी लष्कराला माहिती दिली. सुरुवातीला पाकिस्तानने हात वर केले. मात्र, हे घुसखोर नसून पाकिस्तानी सैनिकच आहेत, हे भारताने सिद्ध केले. आणि युद्धाला तोंड फुटले.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले. #KargilVijayDiwas
#Kargil #OperationVijay
मे महिन्याच्या सुरुवातीलाच हे युद्ध सुरू झाले. पाकिस्तानी सैनिकांना उंच शिखरांवरून खालच्या बाजूस मारा करणे सहज शक्य होता. तर खालच्या बाजूला असलेल्या भारतीय सैन्याला डोंगराळ भागात उंच शिळांमागे दडलेल्या पाकिस्तानी सैनिकांना टिपणे अत्यंत आव्हानात्मक होते.
उंचावर असलेले पाकिस्तानी सैनिक वरून भारतीय सैन्याची हालचाल सहज टिपू शकत होते. म्हणूनच भारतीय सैन्याने रात्री चढाई करण्याचा निर्णय घेतला. @adgpi
खरेदी घोटाळ्याच्या आरोपांवरून गाजलेल्या #बोफोर्स तोफांनी #कारगिल युद्धात मात्र, चांगलाच डंका वाजवला. याच तोफांमधून झालेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने पाकिस्तानला पाणी पाजले. #bofors #boforsegun
या युद्धाची व्याप्ती अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर २६ मे १९९९ रोजी केंद्र सरकारने हवाई दलाचा वापर करण्यास परवानगी दिली. त्याचवेळी सीमारेषा पार न करण्याचे बंधनही टाकण्यात आले. @IAF_MCC @nitinpurandare @nitinwelde @MjaVinod
हवाई दलाने या कामगिरीला #ऑपरेशनसफेदसागर असे नाव दिले. हवाई दलाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यास २१ दिवसांचा कालावधी लागला. हा वापर आधीच केला गेला असता, तर हे युद्ध लवकर संपुष्टात आले असते, असा दावाही केला जातो. #IAF #KargilWar
पाहणीसाठी (रेकी) पाठवलेल्या पहिल्या विमानावर पाकिस्तानने हल्ला केला. तरीही हे विमान सुखरूप परतले. मात्र, या उड्डाणातून पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीबद्दल, त्यांच्या हेलिपॅड्सबद्दल, तयारीबद्दल पुरेशी माहिती मिळाली. @IAF_MCC
@vayusena
#मिग२७ विमान नादुरुस्त होऊन त्यात आग लागली. फ्लाइट लेफ्टनंट के.नचिकेता यांनी इजेक्शन सीटच्या आधारे विमानातून उडी घेतली, आणि ते पाकिस्तानी सैनिकांच्या हाती सापडून युद्धकैदी झाले. त्यांना टॉर्चर केले गेले. आठ दिवसानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
हवाई दल सक्रिय झाल्यानंतर #मिग२३, #मिग२७ या विमानांचा तसेच #एमआय१७ या हेलिकॉप्टर्सचा वापर केला गेला. जूनच्या पहिल्या आठवड्यात #मिराज२००० ही लढाऊ विमानेही लढाईत उतरली.
#मिराज२००० मधून लेझर गाईडेड बॉंब डागता यावेत, यासाठी या विमानांचा तळ असलेल्या ग्वाल्हेर येथील टीमने केलेला तांत्रिक करामत (#जुगाड) निर्णायक ठरली. हे बॉंब डागण्यासाठी वैमानिकांना विक्रमी वेळेत प्रशिक्षित केले गेले.
या काळात हवाई दलाच्या विमानांनी सुमारे साडेसहा हजार उड्डाणे केल्याचे सांगितले जाते. याच काळात हवाई दलाच्या दळणवळण विभागानेही सुमारे साडेसहा हजार टन शस्त्रसामुग्री व अन्य वस्तूंची ने-आण करत मोठा वाटा उचलला.
नौदलानेही या काळात पाकिस्तानी नौदलाची चांगलीच नाकाबंदी केली. #ऑपरेशनतलवार अंतर्गत भारतीय नौदलाने कारगिल युद्ध सुरू असताना पाकिस्तानला समुद्रमार्गे कोणतीही रसद मिळणार नाही, याची दक्षता घेतली. पश्चिम व पूर्व नौदल मुख्यालयाने अरबी समुद्रावर वर्चस्व राखले.
पाकिस्तानी सैन्यानी केलेली घुसखोरी मोडीत काढत आपल्या अतुलनीय शौर्य, पराक्रमाच्या बळावर भारताने २६ जुलै रोजी आपला सर्व भूभाग परत मिळवला. २६ जुलै रोजी कारगिल फत्ते झाल्याची घोषणा केली गेली.
हे युद्ध कारगिल या मर्यादित भूभागातच लढले गेले. त्यामुळे याला मर्यादित युद्ध असे म्हणतात. भारताला अतिउंचावरील युद्धाचा मोठा अनुभव मिळाला. मात्र, पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर केलेली घुसखोरी लक्षात न आल्याने गुप्तचर यंत्रणेच्या मर्यादाही समोर आल्या.
१८ ग्रेनेडिअर्सचे ग्रेनेडिअर योगेंद्र सिंह यादव, गोरखा रायफल्सचे लेफ्टनंट मनोजकुमार पांड्ये (मरणोत्तर), १३ जॅक रायफल्सचे कॅप्टन विक्रम बात्रा (मरणोत्तर), याच युनिटचे रायफलमन संजय कुमार यांना #परमवीरचक्र, तर ११ जणांना #महावीरचक्र ने सन्मानित करण्यात आले.
#कारगिल युद्धात भारताचे ५२७ सैनिक-अधिकारी हुतात्मा तर सुमारे १३६० हून अधिक जायबंदी झाले. कारगिल येथे युद्धस्मारक उभारण्यात आले आहे. तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेल्या या स्मारकाला भेट देऊन अभिवादन करायलाच हवे. #जयहिंद. #जयहिंदकीसेना. 🇮🇳🇮🇳🇮🇳
@threadreaderapp pls unroll.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with prasadpanseMT

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!