मा, तुम रोई आज..?

जगाचा बाप त्याच्या आईला यशोदाआईला विचारत होता.
जगाचा बाप..परम परमात्मा भगवान श्रीकृष्ण उद्या गोकुळ सोडून जाणार असतो..आकृरजी त्याला न्यायला आलेले असतात.
आपलं लेकरू सुट्टी संपवून उद्या सीमेवर जाणार असेल ना तर आदल्या दिवशी आईचे डोळे सतत पाणावलेले असतात. #थ्रेड #म
यशोदा आई म्हणाली.. नहीं बेटा, रोई नहीं!
फिर ये आसू?
आई म्हणाली चुलीतील धुराने डोळे पाणावलेत..

'तेरे बच्चे तुजको प्यारे...रावण हो या राम..!
ये मा तुझे सलाम..'

यशोदा आई ने खरं सांगितलं... हो मी रडले.!
तो बाहेर दाढीवाला आलाय ना तो तुला न्यायला आलाय.
बस् इतनी सी बात है?
लहान कान्हा पळतच बाहेर गेला..आकृरजी आणि नंद बाबा बसले होते तिथं.. आणि म्हणाला..
"काका मी काय तुमच्या सोबत येणार नाही, आमची आई रडायली..!"
एवढं बोलून तो जगाचा बाप आत यशोदा आईच्या मांडीवर जाऊन बसला.
ही गोष्ट त्याने आई ला सांगितली.. यशोदा आईने कडकडून मिठी मारली श्रीकृष्णाला.
त्यादिवशी रात्री श्रीकृष्ण जेवायला बसला.. यशोदा आई ने विचारलं..
'लाला? तू इथून गेलास तर मला विसरून नाही ना जाणार?'
नहीं मां.. बिलकुल नहीं..!
मी सगळं विसरेन पण तू मला उकळाला बांधून घातलेला प्रसंग विसरणार नाही..
यशोदा आई म्हणाली..म्हणजे राग आहे अजून?
नाही.. मां, मी जगाला तो प्रसंग ओरडून सांगेन..
"अगर कान्हा को पकडना है, तो तुम्हे यशोदा बनना पडेगा..!"
यापूर्वी कधीही यशोदा आईने लाला ला मिठी मारली न्हवती..त्या आवेगाने तिने लाला ला जवळ घेतले.. वात्सल्याचा झरा आता दुथडी भरून वाहत होता.
( @DrVidyaDeshmukh ) डॉक्टर वात्सल्य..!

आकृर ज्या दिवशी श्रीकृष्णाला मथुरेला न्यायला गोकुळात आले त्यादिवशी पहिला विरोध त्यांना बाल गोपाळांचा झाला.. सवंगडी अक्षरशः आकृरजीच्या पायावर लोटांगण घालू लागले.. नका नेऊ आमच्या श्रीकृष्णाला.. आम्हाला पोरकं नका करू..
आकृर जेंव्हा नंदबाबा जवळ पोहचले.. यशोदा आई आत होती..नंदबाबा बाहेरच झोपाळ्यात बसले होते. 'कृष्णाला न्यायला आलोय..'
या एका वाक्यावर यशोदाआई आतून पळत बाहेर आल्या.
नंदबाबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागल्या.. 'मी आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही..पण आज मागते..लाला ला नका पाठवू.'
नंद बाबा म्हणाले ठिकाय नाही पाठवत.
यशोदाआई ला बाबांचा स्वभाव माहिती होता.. जगाच्या बापाची आई होती ती.. लाला सोडून जाणार म्हणल्यावर डोळे आपोआप पाझरू लागले.
श्रीकृष्ण संध्याकाळी गाई चरून आल्यानंतर यशोदा आईच्या मांडीवर बसला..
तिथं वर सांगितलेल्या 'मां, तुम रोई आज?' हे बोलणं झालं.
श्रीकृष्ण जाणार.. वनव्यासारखी पसरली बातमी गोकुळात.. सगळ्या सख्या गवळणी बेचैन झाल्या.. 'काय गं? तो जाईल?' आपापसात कुजबुजायच्या 'नाही..त्याला पाहिल्याशिवाय मी पाणीसुद्धा पीत नाही..तो मला सोडून जाईलच कसा..!'
सगळ्या गवळणी यशोदाआईकडे आल्या.. 'यशोदा, आम्ही सारखी तक्रार करतो कान्हा ची म्हणून तू त्याला पाठवतीयस ना? इथून पुढं तोंडातून एक शब्द काढणार नाही..फक्त कान्हाला नको पाठवू..'
अख्ख गोकुळ धाय मोकलून रडत होतं.. यशोदा आई ने तर रडण्याचा कळस गाठला..
"आईला रडायची सोय असते..बापाला ती मुभा नसते."
नंद बाबा श्रीकृष्णाच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले.. 'लाला जाओ.. दुनिया को तुम्हारी जरूरत है..!'
श्रीकृष्णाला कळलं नंदबाबांच्या भावना..
"बाप हा नारळासारखा असतो..वरून टणक..आतून खोबऱ्यासम मऊ."
बाल गोपालांनी तर सुरवातीला आकृरजीवर दगड उचलला.. हे असतं मित्रप्रेम..
कान्हा आणि यशोदा आईचं प्रेम.. माय लेकरांची सांगड त्यादिवशी अख्ख्या गोकुळात रंगली.
राधेनं दिलेलं मोरपीस कान्हा डोक्यावरून मिरवतो..हे असतं निखळ प्रेम.
नंदबाबा म्हणजे जगाच्या बापाचा बाप.
आज वासुदेवबाबा आणि देवकी माता यांच्यासह त्यांच्यासम जगात जे कोणी पीडित असतील.. त्यांच्यासाठी एखाद्या श्रीकृष्णाची वाट पाहू नका.. तो येणार ही नाही.
लोकशाही मूल्ये जोपासायला सुरवात करा.. जेवढे लोक तेवढे श्रीकृष्ण दिसतील. हे लवकर घडो.. कळावे..!
काली कमली वाला मेरा यार है,
मेरे मन का मोहन तु दिलदार है,
तु मेरा यार है, मेरा दिलदार है।।

टीप- कथानक ऐकलेलं आहे.. मित्रप्रेम, मातृप्रेम पितृप्रेम आणि प्रेम यांची सांगड घालायचा प्रयत्न.. काही चूक झाली असल्यास ते माझे अज्ञान समजावे.❤

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

1 Dec
"ज्ञान्या जाऊ नको इंद्रायणीत अंघोळीला, इंद्रायणी बाटवशील..!"
लहानग्या ज्ञानेश्वराला समाजाने ही वागणूक दिली..
समाजाचा एवढा तिटकारा सोसूनही..पुढे तोच कैवल्याचा पुतळा.. 'किंबहुना सर्वसुखी' म्हणत जगाच्या कल्याणाला उत्तरला.
समाजाने भगवंताला सोडलं नाही..संत कसे सुटतील? #थ्रेड #म
रेड्या मुखी वेद बोलावले..निर्जीव भिंत चालवली.. किती तो हक्क? समाजाने एवढा त्रास दिला.. मनात आणलं असतं तर ते समाजाचे वाईट सहज करू शकले असते..पण, ज्ञानेश्वर माऊली झाले..
अवघ्या 22 वर्षाच्या आयुष्यात.. ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणास मागे ठेवून गेले.
जाता जाता पसायदान देत..सुखीया झाला.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई ला चार अपत्य.. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई.सर्वच संत झाले.एका वाक्यावर Phd होईल.असे साहित्य ही लेकरं मागे ठेवून गेले.
ज्ञानेश्वर माऊलींनी निर्माण केलेलं साहित्य चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंग, हरिपाठ.आज ही जीवनाचा गर्भितार्थ देतात.
Read 10 tweets
29 Nov
"हे हात माझे नाहीत.ते भारत भूच्या मातीचे आहेत.सीमेवर लढताना मी शहीद झालो तर तुला अभागी बनून रहावं लागेल.त्यापेक्षा माझा हातच तू हातात नको घेऊ."
यावर ती उत्तरली 'तस झालं तर तुमच्यामागे मी आपला संसार सांभाळीन आणि तुमचे कपडे घालून सीमेवर जाईन.'
वीर शहीद केशव गोसावी यांची ही गोष्ट.
'भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून जागा मिळत आहे..संधीचे सोनं करा.' हे पत्र आलं. त्यादिवशी धाय मोकलून रडला केशव..
वडिलांनी विचारलं काय झालं बाळा? डबडबल्या डोळ्यांनी नोकरी मिळाली बाबा..पण सीमेवर आणि माझं काही बरं वाईट झालं तिकडं तर?
एवढं बोलला तो.. बाबांनी समजावून सांगितलं.
केशव ला सल होती आपल्या हाताने अपंग असलेल्या बाबांची.. केशव पाचवीला असतानाच त्याची आई देवाघरी गेली. वडील हाताने अपंग.. समाजरीत म्हणून ते दुसरं लग्न सहज करू शकले असते..पण नाही.. त्यांनी स्वतः आपल्या अपंग हाताने भाकरी बनवून केशव ला लहानाचा मोठा केला.
Read 11 tweets
26 Nov
'परब्रह्मतत्वात लिंगीभेद नाही.ज्या देशात स्त्रियांना योग्य सन्मान मिळत नाही तो देश उन्नतावस्थेत पोहचत नाही.-स्वामी विवेकानंद.
आपण सगळेच जाणून आहोत. 'ती चार दिवसांची घुसमट.'
कोण्या स्कॉटलंड देशाने सॅनिटरी उत्पादने मोफत केली,आनंद आहे.पण आपल्या लक्ष्मीची घुसमट? त्याच काय? #थ्रेड #म
स्कॉटलंडला मासिक पाळी उत्पादने (मोफत उपलब्धता) कायदा पारित झालाय..आता तिथल्या कारभाऱ्यांना ती उत्पादने मोफत उपलब्ध करून द्यावी लागतील.. त्यासाठी २०२२ पर्यंत ८.७ मिलियन पौंड खर्च करतील ते..
पुढारलेला देश तो..अजूनही या बाबतीत मागास होता..
यासंबंधी विधेयक गेल्यावर्षी एप्रिलमध्ये त्यांनी मांडलं..म्हणजे वर्ष गेलं ते कार्य सिद्धीस न्यायला त्यांनाही..यातच आपणही आपली मर्यादा समजून घ्यायला हवी..आणि किती प्रयत्न करावे लागतील ओळखायला हवे.आणि आत्तापासून आपापल्या घरातून या 'भेदाभेद अमंगळास' तिलांजली देण्याचे शुभकार्य आटपावे.
Read 14 tweets
24 Nov
'काळ इतका मोठा असतो. की, काळाच्या पटावर तू आणि मी एक ठिपका आहोत ठिपका.!'

बरोबर..देऊळ मध्ये आण्णा केश्याला सांगत असतात.

या ठिपक्यांना जोडण्यात माणूस आपलं आयुष्य खर्च करतो..अगदी निर्भयपणे.
तरीही त्याला एक भीती असतेच..लोक काय म्हणतील.!

तू बदललायस! गर्भित अर्थ आहे यात. #थ्रेड #म
समाज ज्यावेळी मला 'तू बदललाय' म्हणतो ना..त्यावेळी त्याचा अर्थ इतकाच असतो.. की मी आता समाजाच्या मनाप्रमाणे वागत नाहीय..
मी मागे एका थ्रेड मध्ये म्हणलं तसं.. समाज हा सोयीप्रमाणे सोईस्कर सोयीसुविधा शोधत असतो.. त्यास एखाद्याचं जीवन कवडीमोल मात्र दरात हवं असतं.. वापरायला..
ज्या लोकांचा हा समाज बनलाय तीच लोकं त्या समाजाच्या उन्नतीसाठी झटताना न दिसणं केवळ क्लेशदायक आहे.
जे दिसतं.. ते नसतं.. पण समाज काही गोष्टीवरून लगेच निरीक्षण नोंदवून मोकळा होतो.
एक दृष्टांत सांगतो ..मी एका कीर्तनात ऐकलेला..म्हणजे तुम्हाला कळेल लोक कसे पाहतात..कसे निरीक्षण नोंदवतात.
Read 15 tweets
23 Nov
'बलविर पाशा को एड्स होगा क्या?'

काळ साधारणपणे वीसेक वर्षांपूर्वीचा.. टेलिव्हिजन वरून ऐकायला मिळायचे हे वाक्य. एड्स सारख्या रोगावर जनहितार्थ अशी ती जाहिरात.त्यावेळी गर्दीच्या ठिकाणी चेष्टेने सुई टोचवून 'वेलकम इन HIV फॅमिली' असा पोपट ही केला जायचा.
असाच पोपट आपला झालाय. #थ्रेड #म
मला वरील जाहिरात आठवली कारण त्याच पद्धतीचा पोपट आपला झाला.'अच्छे दिन आने वाले है!' या कॅम्पेन मुळे.
आता परिस्थिती अशी आहे की, 'अच्छे दिन...' वाले ही स्वतः बलविर पाशा सारखे गायब असतील.कारण ते अस्तित्वातच न्हवते..
छान छान जाहिराती पाहून साबण सोडा निवडायचा असतो..सरकार नाही.हेच खरं.
काही महिन्यांपूर्वी जिओ आणि फेसबुक एकत्र आलेत.. 'भारताला आघाडीचा डिजिटल समाज' बनवण्यासाठी मी हे करतोय अस झुकेरबर्ग म्हणत होता.. आज सत्तरेक कोटी भारतीय स्मार्टफोन वापरतात..त्यातील निम्मे आहेत जिओ वाले.. सुरवातीला फुकट मिळाले जिओ..बाजारातील सगळे खेळाडू गारद होईपर्यंत जिओ फुकट होतं.
Read 8 tweets
22 Nov
"The duty of a true patriot is to protect his country from his Government."

हे बोल आहेत प्रख्यात विचारवंत थॉमस पेन यांचे. ब्रिटिश अमेरिकन लेखक तो..
सांप्रतकाळी तो जर भारतीय असता.. तर तुम्ही patriotic असा किंवा नाही..पण सरकार पासून देशास वाचवा असा म्हणता झाला असता.. #थ्रेड #म
वर्षभर झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक परीक्षेच्या चाहुलीने खडबडून जाग यावी. तसे वर्तन आपल्या सरकारांचे असते.
आज कोरोनाला जगात येऊन वर्ष लोटले. त्यानंतर जवळपास चारेक महिन्यात तो भारतातही आला.त्याची पहिली लाट आता ओसरलीय.ती आपल्या सरकारने कशा प्रकारे हाताळली माहितीय आपल्याला.
येत्या काही दिवसात दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जातोय.. तो कोणीही मनावर घेत नाहीय.. साक्षात कोरोनाला भीक न घालणारा समाज या असल्या अंदाजांना काय मोजणार! हे ही आपल्या सरकारी वकुबानुसारच सुरुय म्हणायला हवं.
Read 13 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!