#कारगिल युद्ध...५२ दिवस...भारतमातेचे ५२७ सुपुत्र हुतात्मा..आज त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्या बलिदानामुळेच आपले स्वातंत्र्य अबाधित आहे. या वीरपुत्रांना शतश: नमन. #जयहिंद #जयहिंदकीसेना @adgpi @indiannavy @IAF_MCC
२१ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा कारगिल #विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.
काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या या एकमेव रस्त्यावर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता. तसे झाल्यास सामरिकदृष्ट्या मोठी आघाडी ठरली असती. त्यासाठी पाक लष्कराचे तत्कालिन प्रमुख जनरल मुशर्रफ यांनी सुमारे ५० हजार सैनिक घुसखोरांच्या वेषात भारतीय हद्दीत धाडले.
हिवाळ्यात #कारगिल परिसर राहण्यासाठी अत्यंत प्रतिकूल होत असल्याने दोन्ही देशांचे सैनिक हिवाळ्यात खाली सुरक्षित जागी परतत. व उन्हाळ्यात पुन्हा आपल्या जागी येत. असा करार नसला तरी दोन्ही लष्करांनी ही बाब मान्य केली होती. मात्र, पाकिस्तानने त्याचा भंग केला.
पर्वतरांगातील मेंढपाळांना पाकिस्तानच्या घुसखोरीची सर्वप्रथम कल्पना आली. त्यांनी लष्कराला माहिती दिली. #पाकिस्तान ने आपला याच्याशी काहीच संबंध नसल्याचा दावा केला. मात्र, ते पाकचे सैनिकच असल्याचे भारताने सिद्ध केले, आणि युद्धाला तोंड फुटले.
युद्ध सुरू झाल्याची औपचारिक घोषणा झाली नाही. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीलाच हे युद्ध सुरू झाले.पाकिस्तानी सैनिक उंच शिखरांवर असल्याने त्यांना खालच्या बाजूस मारा करणे सहज शक्य होते.
तर खालच्या बाजूला असलेल्या भारतीय सैन्याला डोंगराळ भागात उंच शिळांमागे दडलेल्या पाकिस्तानी सैनिकांना टिपणे अत्यंत आव्हानात्मक होते.
उंचावर असलेले पाकिस्तानी सैनिक वरून भारतीय सैन्याची हालचाल सहज टिपू शकत होते. म्हणूनच भारतीय सैन्याने रात्री चढाई करण्याचा निर्णय घेतला.
खरेदी घोटाळ्याच्या आरोपांवरून गाजलेल्या #बोफोर्स तोफांनी #कारगिल युद्धात मात्र, चांगलाच डंका वाजवला. याच तोफांमधून झालेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताचा विजय सोपा झाला. #म
लष्करी कारवाई पाच मे रोजीच सुरू झाली होती. मात्र, या युद्धाची व्याप्ती अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर २६ मे १९९९ रोजी केंद्र सरकारने हवाई दलाचा वापर करण्यास परवानगी दिली. त्याचवेळी सीमारेषा पार न करण्याचे बंधनही टाकण्यात आले.
हवाई दलाने या कामगिरीला #ऑपरेशनसफेदसागर असे नाव दिले. हवाई दलाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यास २१ दिवसांचा कालावधी लागला. हा वापर आधीच केला गेला असता, तर हे युद्ध लवकर संपुष्टात आले असते, असा दावाही केला जातो. @IAF_MCC @nitinwelde @nitinpurandare @mjavinod
त्यावेळी हवाई दलाकडे मर्यादित संसाधनेच उपलब्ध होती. पाहणीसाठी (रेकी) पाठवलेल्या पहिल्या विमानावर पाकिस्तानने हल्ला केला. तरीही हे विमान सुखरूप परतले. या उड्डाणातून पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीबद्दल, त्यांच्या हेलिपॅड्सबद्दल, तयारीबद्दल माहिती मिळाली.
याच दरम्यान #मिग२७ विमान नादुरुस्त होऊन त्यात आग लागली. व फ्लाइट लेफ्टनंट के. #नचिकेता यांनी इजेक्शन सीटच्या आधारे विमानातून उडी घेतली, आणि ते पाकिस्तानी सैनिकांच्या हाती सापडले.
नचिकेता यांना युद्धकैदी बनविण्यात आले. त्यांना टॉर्चर करून त्यांच्याकडून माहिती मिळविण्याचे हरप्रकारे प्रयत्न केले गेले. अखेर आठ दिवसानंतर त्यांची सुटका झाली.
#हवाईदल सक्रिय झाल्यानंतर #मिग२३, #मिग२७ या विमानांचा तसेच #एमआय१७ या हेलिकॉप्टर्सचा वापर केला गेला. जूनच्या पहिल्या आठवड्यात #मिराज२००० ही लढाऊ विमानेही लढाईत उतरली. @unapom
#मिराज२००० मधून लेझर गाईडेड बॉंब डागता यावेत, यासाठी या विमानांचा तळ असलेल्या ग्वाल्हेर येथील टीमने केलेला तांत्रिक करामत (जुगाड) निर्णायक ठरली. हे बॉंब डागण्यासाठी वैमानिकांना विक्रमी वेळेत प्रशिक्षित केले गेले
या काळात हवाई दलाच्या विमानांनी सुमारे साडेसहा हजार उड्डाणे केल्याचे सांगितले जाते. याच काळात हवाई दलाच्या दळणवळण विभागानेही सुमारे साडेसहा हजार टन शस्त्रसामुग्री व अन्य वस्तूंची ने-आण करत मोठा वाटा उचलला. @IAF_MCC @vayusena
नौदलानेही या काळात पाकिस्तानी नौदलाची चांगलीच नाकाबंदी केली. #ऑपरेशनतलवार अंतर्गत भारतीय नौदलाने कारगिल युद्ध सुरू असताना पाकिस्तानला समुद्रमार्गे कोणतीही रसद मिळणार नाही, याची दक्षता घेतली. @indiannavy @Cmde_GPrakash @srikantkesnur
पश्चिम व पूर्व नौदल मुख्यालयाने अरबी समुद्रावर वर्चस्व राखल्याने पाकिस्तानी नौदलावर मोठी दहशत निर्माण झाली.
पाकिस्तानी सैन्यानी केलेली घुसखोरी मोडीत काढत आपल्या अतुलनीय शौर्य, पराक्रमाच्या बळावर भारताने २६ जुलै रोजी आपला सर्व भूभाग परत मिळवला. २६ जुलै रोजी #कारगिल फत्ते झाल्याची घोषणा केली गेली. #कारगिल_विजय_दिवस
#KargilVijayDiwas
#Kargil
हे युद्ध #कारगिल या मर्यादित भूभागातच लढले गेले. त्यामुळे याला मर्यादित युद्ध असे म्हटले जाते. या युद्धामुळे भारतीय लष्कराला अतिउंचावरील युद्धाचा मोठा अनुभव मिळाला. मात्र, पाकिस्तानची मोठी घुसखोरी लक्षात न आल्याने गुप्तचर यंत्रणेच्या मर्यादाही समोर आल्या.
या युद्धातील अतुलनीय शौर्यासाठी १८ ग्रेनेडिअर्सचे ग्रेनेडिअर योगेंद्र सिंह यादव, गोरखा रायफल्सचे लेफ्टनंट मनोजकुमार पांड्ये (मरणोत्तर), १३ जॅक रायफल्सचे कॅप्टन विक्रम बात्रा (मरणोत्तर), याच युनिटचे रायफलमन संजय कुमार यांना #परमवीरचक्र ने गौरविण्यात आले.
तर ११ जणांना #महावीरचक्र ने सन्मानित करण्यात आले.
सुमारे दोन महिने चाललेल्या या कारगिल युद्धात भारताचे ५२७ सैनिक-अधिकारी हुतात्मा झाले. तर सुमारे १३६० हून अधिक जायबंदी झाले. भारतमातेच्या या सुपुत्रांचे स्मरण करण्यासाठी #कारगिल येथे युद्धस्मारक उभारण्यात आले @PrasadPawarMT
तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेल्या या स्मारकाला भेट देऊन या वीरांना अभिवादन करायलाच हवे. #जयहिंद #जयहिंदकीसेना. #कारगिल #कारगिल_विजय_दिवस #म
@threadreaderapp pls unroll.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with prasadpanseMT प्रसाद पानसे

prasadpanseMT प्रसाद पानसे Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @prasadpanseMT

4 Oct 20
#मटाहेल्पलाइन यंदाच्या शिलेदारांना मदतीचे चेक प्रदान सोहळा सुरक्षित वावराचे सर्व नियम पाळून सुरू. @ParagKMT @ashokpanvalkar @katranjeet @ShreedharLoniMT @MTjitendra @ShreedharLoniMT @mataonline @Matapune #म @MarathiRT #रिम @aparanjape @MarathiRojgar
प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, @mataonline चे संपादक @ParagKMT
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करत दहावीत 99.40 टक्के गुण मिळवणारी #जुन्नर येथील ऋतुजा आमले
Read 10 tweets
29 Aug 20
#unlock4guidelines जाहीर. 30 सप्टेंबरपर्यंत देशभरातील #containmentzones मध्ये कडक #lockdown कायम @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @shree_brahmeMT @mataonline #म
#unlock4guidelines 30 सप्टेंबरपर्यंत देशभरातील शैक्षणिक संस्था बंदच राहणार @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @shree_brahmeMT @mataonline #म
नववी ते बारावीचे विद्यार्थी शंकानिरसनासाठी शाळेत जाऊन शिक्षकांना भेटू शकतील. त्यासाठी पालकांची लेखी संमती बंधनकारक
Read 7 tweets
12 Aug 20
Major announcement (achievement) for #Pune, shortly. stay tuned
#पुणे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, काही क्षणात. @rameshmashelkar
@anandesh
@Girbane @MCCIA_Pune @PuneIntCentre @IISERPune @aparanjape @sumitakale @yashodhanpanse @IM_HiteshShah
#पुणे येथे पुणे #नॉलेज #क्लस्टर ची स्थापना करण्यास प्रधान वैज्ञानिक सल्लागारांची मान्यता Principal Scientific Advisor awarded #PuneKnowledgeCluster. @ParagKMT
@ShreedharLoniMT @mataonline @anandesh @Girbane @MCCIA_Pune @aparanjape @kvijayraghavan #म
#PuneKnowledgecluster will be first of its kind. Will act as guide for other such clusters to come up in the country @PrinSciAdvGoI @kvijayraghavan @MCCIA_Pune @IISERPune @IUCAAScipop @satya_toi
Read 7 tweets
8 Aug 20
#केरळ च्या #कोझिकोड विमानतळावर #एअरइंडियाएक्स्प्रेस चे #बोइंग७३७ #विमान घसरून किमान १६ जणांचा मृत्यू झाला. मुंबईचे #कॅप्टनदीपकवसंतसाठे या विमानाचे प्रमुख वैमानिक होते. #म @aparanjape
@Girbane
@MandarDiwakar
@ChinmaykaleMT
@sameerkarve4 @MarathiRT Image
#एनडीए मधील प्रशिक्षणादरम्यान साठे यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. तर
#एअरफोर्सॲकॅडमी तील प्रशिक्षणादरम्यान त्यांनी #स्वॉर्डऑफऑनर मिळवली होती. ते उत्तम स्क्वाशपटूही होते. #CaptainSathe #NDA #AirforceAcadamy
हवाई दलातील प्रतिष्ठेच्या १७ स्क्वाड्रन (#गोल्डनॲरोज ) या #मिग२१ विमानांच्या तुकडीतील ते निष्णात लढाऊ वैमानिक होते.
सध्या याच तुकडीचे पुनरूज्जीवन करून #राफेल जेट्सचा त्यात समावेश केला गेला आहे. #17thSquadron #Iaf #Goldenarrows
Courtesy @LestWeForgetIN Image
Read 5 tweets
29 Jul 20
#महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या #दहावी च्या परीक्षेत ९५.३० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @mataonline @harshdudhe_MT @aparanjape #म @mandarchakradeo
गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ, परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,७५,१०३  विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १५,०१,१०५  विद्यार्थी उत्तीर्ण
विभागीय निकालात #कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के लागला. पुण्यासह #नगर#सोलापूर जिल्ह्याचा समावेश असलेल्या #पुणे विभागाचा निकाल ९७.३४ टक्के.
Read 4 tweets
26 Jul 20
#कारगिल #युध्द काळात हवाई दलाच्या विमानांनी सुमारे साडेसहा हजार उड्डाणे केल्याचे सांगितले जाते. याच काळात हवाई दलाच्या दळणवळण विभागानेही सुमारे साडेसहा हजार टन शस्त्रसामुग्री व अन्य वस्तूंची ने-आण करत मोठा वाटा उचलला.
नौदलानेही या काळात पाकिस्तानी नौदलाची चांगलीच नाकाबंदी केली. #ऑपरेशनतलवार अंतर्गत भारतीय नौदलाने पाकिस्तानला समुद्रमार्गे कोणतीही रसद मिळणार नाही, याची दक्षता घेतली. पश्चिम व पूर्व नौदल मुख्यालयाने अरबी समुद्रावर वर्चस्व राखले. @indiannavy
@srikantkesnur
आपल्या अतुलनीय शौर्य, पराक्रमाच्या बळावर
पाकिस्तानी सैन्यानी केलेली घुसखोरी मोडीत काढत भारताने २६ जुलै रोजी आपला सर्व भूभाग परत मिळवला. २६ जुलै रोजी कारगिल फत्ते झाल्याची घोषणा केली गेली. #KargilVijayDiwas
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(