📌➏ डॉ.बा.आंबेडकर यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी......

‘न शूद्राय यतिविद्ध्यात’ (शुद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही) या मनुस्मृतीच्या कायद्याला धिक्कारून, बाबासाहेबांनी शिक्षणाची पर्यायी व्यवस्था, चळवळीच्या बलबुत्यावर निर्माण केली.

#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
[1/n]
भारतीय शिक्षणाच्या परिप्रेक्षात बाबासाहेबांनी शिक्षणक्षेत्रात, मानवतावादी मूल्ये वर्धीत करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतलेली आहे. विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, प्राचार्य आणि शिक्षण संस्थेचे निर्माते, असा चढता आलेख त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात राहिलेला आहे.
#ThanksDrAmbedkar
[2]
बाबासाहेब हे स्वत: उच्च विद्या विभूषित होते. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा महत्वाचा संदेश दिला. भारतातील बहुजन वर्ग अज्ञानात व गुलामगिरित जगत होता. शिक्षणामुळे मनुष्य जागृत होतो .
#ThanksDrAmbedkar
[3]
व त्याला त्याच्या हक्क व अधिकारांची जाणीव होते. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे त्यांचे मत होते.

शिक्षणविषयक सिद्धांतापैकी निसर्गवाद हा देखील एक पाश्‍चात विचारवंतानी मांडलेला सिध्दांत आहे. डॉ.आंबेडकरांनी भारतीय समाजव्यवस्थेत

#ThanksDrAmbedkar
[4]
निसर्गवादाचे शैक्षणिक प्रारूप कष्टमय पध्दतीने रूजविले. शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेत तसा कायदा केला. हजारो वर्षांची शैक्षणिक मक्तेदारी मोडून काढली. शिक्षणावर व्यक्तीची योग्यता ठरते, जातीवर नाही हा विचार त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेत रूजविला
#ThanksDrAmbedkar
[5]
शिक्षणातून निर्माण होणारे जीते जागते ‘प्रोडक्ट’ म्हणजे ‘विद्यार्थी’, विद्यार्थ्यांची सर्वंकष जडण-घडण ज्या अध्ययन - अध्यापन प्रकियेतून साकारली जाते; अशी शाळा, महाविद्यालये कशी असावीत? कोणते अभ्यासक्रम असावेत?विद्यार्थ्यांना घडविणारा अध्यापक वर्ग

#ThanksDrAmbedkar
[6]
कोणत्या गुणवत्तेचाअसावा? विद्यार्थीदशेत अभ्यासक्रमाबरोबरच कोणत्या आधुनिक जीवनमूल्यांचा संस्कार विद्यार्थ्यांवर केल्याने, ते राष्ट्रउभारणीस फलदायी ठरेल? असे, असंख्य प्रश्न त्यांच्या चिंतनात होते. शिक्षणवास्तुचा परिसर, प्रशस्त ग्रंथालय, तेथील
#ThanksDrAmbedkar
[7]
पुरक अभ्यासाची साधने व उपक्रम आदी सर्व बाबींनीयुक्त अशी शिक्षण व्यवस्था त्यांना प्रस्थापित करावयाची होती.या चिंतनातूनच त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. मराठवाड्यातील औरंगाबादचे मिलिंद आणि मुंबईचे सिध्दार्थ ही महाविद्यालये त्यांच्या कृतीपूर्ण चिंतनाचीच अपत्ये
[8]
बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणसंस्थेचे धोरण जाहीर करतांना स्पष्ट केले होते की, ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे धोरण हे केवळ शिक्षणप्रसार करण्याचे नसून भारतात बौध्दीक, नैतिक आणि सामाजिक लोकशाहीचा ज्याव्दारे विकास होईल, अशी मनोवृत्ती घडवून

#ThanksDrAmbedkar
[9]
आणण्याचे कार्य तिला शिक्षणाच्या माध्यमातून करावयाचे आहे. मुंबईत उभारलेल्या महाविद्यालयाचे नाव ‌‘सिध्दार्थ’ ठेवलं. कारण शिक्षण प्रक्रियेतून बुध्दाचं तत्त्वज्ञान अंगीकारलेल्या विद्यार्थ्यांच्या पिढ्या त्यांना समाज कार्यास्तव

#ThanksDrAmbedkar
[10]
घडवायच्या होत्या. देशाच्या संरक्षणविषयक प्रेमामुळे त्यांना याच महाविद्यालयात सैनिकी शिक्षण देणारा कृतिशील अभ्यासक्रमही राबविण्याचे त्यांचे स्वप्न होते. औरंगाबादच्या महाविद्यालयास ‘राजा मिलिंदाचं’ नाव देण्यामागची वैचारिक पार्श्वभूमीही यापेक्षा वेगळी नव्हती.
#ThanksDrAmbedkar
[11]
‘शिक्षण हे वाघिणींचं दूध आहे, जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ या सुभाषितापासून आजही कित्येक उपेक्षित बांधव शिक्षणाच्या परिघाबाहेर आहेत.
शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. हे स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही.

#ThanksDrAmbedkar
[n/n]
@threadreaderapp Unroll please

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with पूनम अनुप बोरकर 💞

पूनम अनुप बोरकर 💞 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @gawande_poonam

5 Apr
📌➎ ओबीसी आणि आदिवासींसाठी योगदान....

‘डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून सगळ्यात मोठे उपकार केले आहे.
‘मनुस्मृती’सारख्या प्राचीन ग्रंथांत ज्यांना ‘शूद्र’ संबोधले आहे त्या ‘सेवा करणाऱ्या गावकुसाच्या आत रहाणाऱ्या
[1/n]
#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
@MarathiBrain
@MarathiRT
जाती म्हणजे ओबीसी’, असे ढोबळमानाने म्हणता येईल. त्यामुळे साळी, माळी, तेली, तांबोळी, न्हावी, धोबी, कुणबी, आगरी, कोळी, भंडारी, सुतार, लोहार, तांबट अशा सेवाकर्मी शूद्र जाती ओबीसी ठरतात. संविधानाच्या मते,
महाराष्ट्रात वा इतर काही राज्यांत

#ThanksDrAmbedkar
[2]
ज्यांना भटके विमुक्त समजले जाते ते देश पातळीवर ओबीसीच आहेत.या सर्व शूद्र ओबीसींसाठी भारतीय संविधानात कलम३४० आहे.डॉ.आंबेडकरनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देण्यामागे हिंदू कोड बिलासह याच कलम ३४०अन्वये ओबीसी समाजासाठी मागासवर्गीय आयोग न नेमण्याचेही एक प्रमुख कारण होते.
[3]
Read 12 tweets
4 Apr
📌 ➍ स्त्रीयांचे पुनरूत्थान......

"समाजातील स्त्रीची कितपत प्रगती झाली आहे त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो."
~ डॉ. बा. आंबेडकर

#ThanksDrAmbedkar
#थ्रेड #Thread
@LetsReadIndia
@MarathiBrain
@MarathiRT
@TUSHARKHARE14
[1/n]
महामानव डॉ. बा. आंबेडकरांनी २०जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स'मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात.

#ThanksDrAmbedkar
[2]
“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा”

एक स्त्री म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास प्रत्येक स्त्रीने आवर्जून म्हणावंच
#ThanksDrAmbedkar
[3]
Read 23 tweets
3 Apr
📌➌ पाणी, ऊर्जा धोरण आणि नियोजन...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 ते 1946 या काळात व्हॉईसरायच्या मंत्रिमंडळात श्रम, जलनियोजन, रोजगार, खनिजनिर्मिती मंत्री असताना आर्थिक योजना राबवून कामगारांच्या हिताचे कायदे केले
1/n
#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
@MarathiBrain
#थ्रेड #Thread
पाण्याचा दीर्घकाळ वापर करता यावा म्हणून अनेक धरणे बांधण्यास चालना दिली. ऊर्जा विकासासाठी अनेक धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले. कामगार आयोग, जल आयोग, वीज आयोग, नदी खोरे प्राधिकरण, स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. आपला देश अर्थ, वीज, उद्योग, शेती,
[2]
पाणी या क्षेत्रात परिपूर्ण व्हावा, म्हणून त्यांनी अनेक धोरणे तयार करुन विकासाचा पाया रचला. म्हणूनच डॉ.आंबेडकरांचे या क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे.
या मंत्रिपदी असताना त्यांनी वीजनिर्मिती आणि जलनियोजनाबाबत घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरले आहेत.

[3]
#ThanksDrAmbedkar
Read 14 tweets
2 Apr
📌➋ कामगार संघटन आणि संघर्ष....

पुर्वी समग्र भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल,असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले
#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
1/n
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती. जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानशून्यतेचे जीवन कंठणे नाकारले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणाचे उच्चाटन होईल. अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत होते.
2/n
#ThanksDrAmbedkar
#जयभीम
आंबेडकरांनी १५ऑगस्ट १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.पक्षाचे धोरण स्वष्ट करण्यासाठी कर्मचारी परिषद १२,१३फेब्रु १९३८ला मनमाड येथे झाली. त्यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, ‘ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.’
3/n
#ThanksDrAmbedkar
Read 14 tweets
1 Apr
📌➀ घटना आणि देशाचं भवितव्य..

25 नोव्हें1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत शेवटचं ऐतिहासिक भाषण दिलं होतं
त्यात त्यांनी जी चेतावणी दिली होती, जे इशारे केले होते ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेकदा सत्य ठरलेत आणि आजही ते सत्य ठरत आहेत
1/n

#ThanksDrAmbedkar
#जयभीम
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे महामानवाच्या विचारांवर विचार करणे, त्यांचा अंमल करणे कारण त्यांनी त्या भाषणात जे विचार, ज्या गोष्टीं मांडल्या त्या आजही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
2/n

#ThanksDrAmbedkar
#जयभीम
डाॅ.बा.आंबेडकरांच्या भाषणातील लोकशाहीविषयी महत्त्वाचे मुद्दे👇

घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती वाईट ठरणार त्याप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारकच ठरेल.
3/n
#ThanksDrAmbedkar
Read 14 tweets
12 Jul 20
पत्र तर नक्कीच लिहिले आहे पण फक्त आणि फक्त परिक्षेत औपचारिक आणि अनौपचारिक...😜
वास्तव जीवनात पत्र लिहिण्यासाठी ना कधी हाती पेन घेतला ना कधी माझ्यासाठी हाती एखादं पत्र पडलं...
हे पहिलं #माझंपत्र #SushantSinghRajpoot सरांसाठी...
1/n

#पूनमच्या_लेखणीतुन
#पूnm
#मराठी
Dear Sir,
'शेवटी का' असा प्रश्न तुम्ही गेल्यावर सर्वांनाच पडला. या प्रश्नांत गुरफटुन अनेकांचे दुःख आणि अश्रुंचे अभिनयही झाले. अनेक जण Hate You म्हणून मोकळे झाले.
तुमची एक्झिट मनाला चटका लावून तर गेलीच पण अशा एक्झिटची कल्पना तुमच्याकडून तरी कुणालाच नव्हती
2/n
#माझंपत्र
जगण्याची प्रेरणा देणारे तुम्ही एकदिवस स्वतःचं जीवन संपवता हे कुठंतरी रूचत नाही पण दुसरं मन म्हणतं 'का?' हा एकच प्रश्न शेवटी सोडून गेलात खरं पण कुणी विचार केला नसेल कि तुम्हालापण अशा प्रश्नांनी खुप छळलं असेल ना ज्याचं अनुत्तरीत राहणं तुम्हाला अनुत्तरीत होऊन जाण्यास विवश करतं
3/n
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!