My Authors
Read all threads
आज भारताच्या इतिहासातील Milestone ठरलेल्या,ज्या खटल्याने सगळ्या देशाला अप्रत्यक्षपणे दाखवुन दिले की'संविधानाच्या वर कोणतच सरकार नाही'त्या खटल्याचे जनक 'केशवानंद भारती' यांचे निधन झाले.भारतीच्या मनीध्यानी नसताना एका देवदुतामुळे ते रात्रीत(६८ दिवसात🙏) स्टार झाले #म #मराठी #धागा
सुरूवातीपासून सांगायचे म्हणले तर धागा खुप मोठा होईल परंतु थोडस introduce करावच लागेल.'केशवानंद भारती विरूद्ध केरळ राज्य'(१९७३) ह्या केसचा अप्रत्यक्ष पाया त्याच्या अगोदर होऊन गेलेल्या गोलकनाथ खटल्यामध्ये बांधला गेला होता(१९६७).गोलकनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की
सरकार मुलभूत हक्कांमध्ये घटनादुरुस्ती करू शकत नाही.ज्यामुळे कलम १३ आणि कलम ३६८च्या वापरावर निर्बंध आले.
*माहितीसाठी सांगतो की घटनेच्या भाग ३ मध्ये कलम १४ ते ३२ हे मुलभूत हक्क आहेत.
*कलम १३:- मुलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे
*कलम ३६८:- संसदेचा
घटनादुरुस्ती अधिकार व घटनादुरुस्ती पद्धत देण्यात आली आहे.
गोलकनाथ खटल्याच्या निर्णयामुळे सरकारवर बंधनं आली त्यामुळे सरकारने २४ वी घटनादुरुस्ती(१९७१) केली ज्यात कलम १३ व ३६८ मध्ये बदल करून असे घोषित केले केले की,संसदेला ३६८ अंतर्गत कोणत्याही मुलभुत हक्कात घट करण्याचा किंवा तो
काढुन टाकण्याचा अधिकार आहे व कलम १३ नुसार हा घटनादुरुस्ती कायदा अवैध नसेल आणि २५ व्या घटनादुरुस्ती नुसार सरकार कोणाचीही मालमत्ता बळकाऊ शकते आणि त्याची किंमत ठरवु शकते अशी तरतूद केली.

आता 'केशवानंद भारती vs केरळ राज्य' नक्की काय आहे पाहुया.
स्वामी 'एच.एच.श्री.केशवानंद भारती' हे
केरळस्थित 'एडनीर' मठाचे मुख्य होते.त्यावेळी केरळ सरकारने एक कायदा संमत केला ज्यानुसार सरकारला धार्मिक देवस्थानांच्या जमिनी स्वताकडे घेण्याचा अधिकार मिळाला.परंतु कलम २६ नुसार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला 'धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य' दिले आहे.त्यानुसार
तो 'धार्मिक संस्था स्थापन करू शकतो,त्यांच्या व्यवहारांची व्यवस्था स्वता पाहु शकतो व जंगम(movable like cash,vehicles etc) आणि स्थावर(non movable like land,house etc.) मालमत्ता स्वमालकीची असण्याचा हक्क ठेऊ शकतो.‌तर केरळ सरकारने 'एडनीर' मठावर दावा ठोकला परंतु केशवानंद भारतीजींने
त्यावेळीसचे भारतातील सुप्रसिद्ध वकील 'नानी पालखीवाला'(वर उल्लेखलेले देवदुत😉) ह्यांच्या सल्ल्याने कलम २६च्या संरक्षणाखाली उच्च न्यायालयात केस दाखल केली जी पुढे सर्वोच्च न्यायालयात गेली.सर्वोच्च न्यायालयात ही केस जवळपास '६८' दिवस चालली आणि न्यायालयीन इतिहासात आजपर्यंतचा सगळ्यात
मोठा बेंच म्हणजेच एकुण १३ वकील ह्या केसच्या सुनवाईमध्ये बसले होते.ह्या १३ पैकी ७ जणांनी स्वामींच्या बाजुने निर्णय दिला व ६ जणांनी स्वामींच्या विरोधात निर्णय दिला.
आता नक्की काय निर्णय दिले ते पाहु..
(१)सरकार संविधानात बदल करू शकते परंतु संविधानाच्या 'मुळ संरचनेला' धक्का न लावता.
मुळ रचना म्हणजे स्वावलंबी न्यायव्यवस्था,संसद,निवडणुक पद्धती आणि संविधानाचे देशामध्ये असणारे श्रेष्ठत्व इ.
थोडक्यात न्यायालयाने सरकारला सांगितले की,"तुम्ही बकरी खाऊ शकताय परंतु तिला न मारता😄😉".ह्याचा फायदा आपल्याला असा झाला की आपल्या मुलभुत हक्कांना सरकार धक्का लावु शकत नाही.
(२)न्यायालयाने सांगितले की संविधानातील प्रस्तावना(preamble) ही संविधानाचा अविभाज्य भाग आहे.
**आता केशवानंद केसचा नक्की सगळ्यात मोठा फायदा काय झाला ते पाहु..पुढे जेव्हा इंदिरा गांधीने ३९ व ४१ वी घटनादुरुस्ती आणली तेव्हा केशवानंद खटल्यामुळे त्या घटनादुरुस्तींना संमती मिळाली नाही.
माहितीसाठी:-
*३९ घटनादुरुस्ती:- भारताच्या माजी पंतप्रधान अथवा सध्याच्या पंतप्रधानावर कोणत्याही प्रकारचा दिवाणी अथवा फौजदारी खटला चालु शकत नाही.
*४१ घटनादुरुस्ती:-राष्ट्रपतीचा कालवधी ६ महिने ते १ वर्षाचा राहील.
इंदिराजींना वाटत होत की देशाचा जास्तीत जास्त ताबा सरकारकडे यावा पण
केशवानंद खटल्याने त्यांचे स्वप्न पुर्ण होऊन दिल नाही.पण इंदिरा गांधी इतक्यावरच थांबल्या नाहीत,त्यांनी जस्टीस रे यांना CJI केल जे त्या ६ जणांपैकी एक होते ज्यांनी केशवानंदला विरोध केला होता.तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो की सुप्रिम कोर्टच्या CJI(सर्वोच्च न्यायाधीश)ची नेमणुक ही
वयानुसार(ज्याच जास्त वय तो CJI)केली जाते पण इंदिरा गांधींनी पुढे २ सिनीयर असतानादेखील त्यांच्या मर्जीतल्या 'रे' यांची निवड केली आणि केशवानंद भारती खटला परत उघडला.
परंतु ह्यावेळीस आपल्या सर्वांचे देवदुत,तारणहार 'नानी पालखीवाला' परत एकदा देशाच्या मदतीला धावुन आले व त्यांनी कोर्टात
सांगितले की,"case re-open करण्यासाठी कोणतीही याचीका कोर्टात आलेली नाही त्यामुळे केसचा जुना निर्णयच ग्राह्य धरला जावा!!"
Fun fact:- हृया केसची तारीख(२४ एप्रिल,१९७३) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जन्मतारीख एकच आहे!!🤘🤘♥️♥️🔥🔥😄😄😊😊
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with वसुसेन😄

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!